राज्यात पावसाचा जोर ओसरला कोणत्याही जिल्ह्याला रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट नाही 

मुंबई, दि. 4 : भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार राज्यात पावसाचा जोर ओसरला असून पुढील 24 तासांकरिता राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला रेड किंवा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला नाही, अशी माहिती राज्य शासनाच्या मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे.

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये 65 मि मी पर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला असून ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे.

        राज्यातील काही महत्वाच्या धरणांचा पाणीसाठा (दलघमी) आणि धरणांमधून सोडण्यात आलेला विसर्ग (क्यूमेक्स) खालीलप्रमाणे-:

सुर्या धामणी (ठाणे) (एकूण क्षमता २७६.३५ दलघमी) आत्तापर्यंत १८.४० क्यूमेक्स विसर्ग

गोसेखुर्द (भंडारा) (एकूण क्षमता ७४०.१७ दलघमी) आत्तापर्यंत ११८८.७४ क्यूमेक्स विसर्ग

भंडारदरा (अहमदनगर) (एकूण क्षमता ३०४.१० दलघमी) आत्तापर्यंत २३.३६ क्यूमेक्स विसर्ग

दारणा (नाशिक) (एकूण क्षमता२०२.४४  दलघमी) आत्तापर्यंत ३५.४० क्यूमेक्स विसर्ग

धोम- बलकवडी (सातारा) (एकूण क्षमता ११२.१४ दलघमी) आत्तापर्यंत २४ क्यूमेक्स विसर्ग

राधानगरी (कोल्हापूर) (एकूण क्षमता २१९.९७ दलघमी) आत्तापर्यंत १२१  क्यूमेक्स विसर्ग

ऊर्ध्व वर्धा (अमरावती) (एकूण क्षमता ५६४.०५ दलघमी) आत्तापर्यंत ९४ क्यूमेक्स विसर्ग

बेंबळा (यवतमाळ) (एकूण क्षमता १८३.९४ दलघमी) आत्तापर्यंत ४० क्यूमेक्स विसर्ग

निम्न वर्धा (वर्धा) (एकूण क्षमता २१६.८७ दलघमी) आत्तापर्यंत १७.४२ क्यूमेक्स विसर्ग

वारणा (सांगली) (एकूण क्षमता ७७९.३४ दलघमी) आत्तापर्यंत २४३ क्यूमेक्स विसर्ग

कृष्णा-धोम (सातारा) (एकूण क्षमता 331.05 दलघमी) आत्तापर्यंत ३९ क्युमेक्स विसर्ग

इराई (चंद्रपूर) (एकूण क्षमता १७२.२० दलघमी) आत्तापर्यंत ३६.४० क्यूमेक्स विसर्ग

चासकमान (पुणे) (एकूण क्षमता २१४.५० दलघमी) आत्तापर्यंत ४७ क्यूमेक्स विसर्ग सुरु आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे.

पुढील २४ तासांकरिता किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांसाठी दुपारी २:३५ वाजता भरतीची वेळ देण्यात आली असून साधारण ४. ७ मीटर पर्यंत समुद्राच्या लाटा येण्याचा अंदाज आहे.

वीज कोसळण्याची शक्यता असणा-या जिल्ह्यातील नागरिकांनी अद्ययावत व सतर्क  राहण्यासाठी आपल्या मोबईलमध्ये “DAMINI” हे ॲप डाउनलोड व  इन्स्टॉल करावे.  हे ॲप वापरकर्त्यांना 20 ते 40 किलोमीटर GPS नोटिफिकेशनद्वारे सतर्क करते तसेच घ्यावयाच्या खबरदारीचे उपाय देखील देते.

नागरिकांनी आपत्तीचा इशारा आणि अधिकृत सूचना प्राप्त करण्याकरिता “SACHET” App डाउनलोड व इन्स्टॉल करावे.

राज्य शासनाद्वारे नागरिकांना CAP-SACHET या पोर्टलच्या माध्यमात वेळोवेळी सूचना आणि संदेश पाठविण्यात येत आहेत. तरी नागरिकांनी प्राप्त होणाऱ्या सूचनांचे पालन करावे.

आपत्ती-संबंधित माहिती व मदतीसाठी नागरिकांनी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुढे नमूद केलेल्या सोशल मीडियाचे अकाउंट फॉलो करावेत :

फेसबुक: https://www.facebook.com/SDMAMaharashtra?mibextid=ZbWKwL

ट्विटर: https://twitter.com/SDMAMaharashtra

अतिरिक्त माहितीकरिता खालील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा:

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष: 1077 (टोल फ्री क्रमांक)

राज्य आपत्कालीन कार्य केंद्र: 022-220279900

ईमेल: controlroom@maharashtra.gov.in

मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून ४ ऑगस्ट २०२३ रोजी  संध्याकाळी ६:०० वाजता प्राप्त आकडेवारीनुसार  महाराष्ट्र  हवामान सद्यस्थिती आणि अंदाज देण्यात आला आहे.

0000

संध्या गरवारे/विसंअ