रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किमतीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

0
8

नवी दिल्ली, 18 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने विपणन हंगाम 2024-25 करिता सर्व अनिवार्य रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किंमतींमध्ये वाढ करण्यास मंजुरी दिली आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

उत्पादकांना त्यांच्या उत्पादनासाठी रास्त भाव मिळावा यासाठी सरकारने विपणन हंगाम 2024-25 साठी रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किंमतींमध्ये वाढ केली आहे. मसूरच्या एमएसपीमध्ये  425 रुपये प्रति क्विंटल, तर पांढरी मोहरी आणि काळ्या मोहरीसाठी 200 रुपये प्रति क्विंटल दराने वाढ मंजूर करण्यात आली आहे. गहू आणि करडईसाठी प्रत्येकी 150 रुपये प्रतिक्विंटल वाढ मंजूर करण्यात आली आहे. बार्ली आणि हरभऱ्यासाठी अनुक्रमे 115 रुपये प्रति क्विंटल आणि 105 रुपये प्रति क्विंटल वाढ मंजूर करण्यात आली आहे.

विपणन हंगाम 2024-25 साठी रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किंमती:

(Rs.per quintal)

S.No Crops MSP RMS

2014-15

MSP RMS 2023-24 MSP RMS 2024-25 Cost* of production RMS 2024-25 Increase in MSP (Absolute) Margin over cost (in per cent)
1 Wheat 1400 2125 2275 1128 150 102
2 Barley 1100 1735 1850 1158 115 60
3 Gram 3100 5335 5440 3400 105 60
4 Lentil

(Masur)

2950 6000 6425 3405 425 89
5 Rapeseed

& Mustard

3050 5450 5650 2855 200 98
6 Safflower 3000 5650 5800 3807 150 52

 

सर्वसमावेशक उत्पादन खर्चाचा संदर्भ विचारात घेऊनकामगारांची मजुरीबैल किंवा यंत्राद्वारे केलेल्या आणि इतर कामांची मजुरीभाडेतत्वावर घेलेल्या जमिनीचे भाडे तसेच बियाणेखतेसेंद्रिय खतेसिंचन शुल्क यासारख्या सामग्रीच्या वापरावर झालेला खर्चशेतीची अवजारे आणि शेत बांधणीवरील घसाराखेळत्या भांडवलावरील व्याजपंप संच इत्यादींसाठी झालेला डिझेल/वीज इ.इंधनाचा खर्चइतर किरकोळ खर्च आणि कौटुंबिक मजुरीचे मूल्य यांचा या सर्व खर्चामध्ये समावेश आहे.

विपणन हंगाम 2024-25 साठी अनिवार्य रब्बी पिकांसाठी एमएसपीमधील वाढ देशभरातील सरासरी उत्पादन खर्चाच्या किमान 1.5 पट इतकी निश्चित करण्याच्या केंद्रीय अर्थसंकल्प 2018-19 च्या घोषणेनुसार आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या सरासरी उत्पादन खर्चावर अपेक्षित सर्वात जास्त 102 टक्के भाव गव्हासाठी मिळणार असून त्या खालोखाल पांढरी- काळी मोहरी या पिकांसाठी 98 टक्के,  मसुरला 89 टक्केहरभऱ्याला 60 टक्के, बार्लीला  60 टक्के तर करडईला 52 टक्के अधिक भाव  मिळणार आहे. रब्बी पिकांच्या या वाढलेल्या एमएसपीमुळे शेतकऱ्यांना रास्त भाव मिळतील आणि पीक विविधतेला प्रोत्साहन मिळेल.

अन्न सुरक्षा वाढवण्यासाठीशेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि आयातीवरील अवलंबत्व कमी करण्यासाठी सरकार  तेलबियाकडधान्ये आणि श्री अन्न/भरड धान्यांच्या पीक विविधीकरणाला प्रोत्साहन देत आहे. किंमत धोरणाव्यतिरिक्तसरकारने  आर्थिक सहाय्य प्रदान करण्याच्या तसेच शेतकऱ्यांना तेलबिया आणि कडधान्ये लागवडीसाठी प्रोत्साहित करण्यासाठी दर्जेदार बियाणे पुरवण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना आणि राष्ट्रीय तेलबिया आणि पाम तेल अभियान यांसारखे विविध उपक्रम हाती घेतले आहेत.

त्याचबरोबरकिसान क्रेडिट कार्ड योजनेचे लाभ देशभरातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठीसरकारने किसान रिन पोर्टल (KRP), केसीसी घर घर अभियानआणि शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांबाबत वेळेवर योग्य निर्णय घेण्यास सक्षम करण्यासाठी वेळेवर आणि अचूक हवामान माहिती प्रदान करण्यासाठी हवामान माहिती नेटवर्क डेटा सिस्ट‍िम (WINDS) सुरू केले आहेत. कृषी क्षेत्रात क्रांती घडवून आणणेआर्थिक समावेशकता वाढवणेडेटाचा योग्य वापर  करणे आणि देशभरातील शेतकऱ्यांचे जीवनमान  सुधारणे हे  या उपक्रमांचे उद्दिष्ट आहे.

000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here