‘दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात कृणाल नेगांधी यांची मुलाखत

0
8

मुंबई, दि. २९: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘शाश्वत पर्यावरण विकास’ या विषयावर शाश्वत पर्यावरण विकास परिषद आयोजन समितीचे सचिव तसेच बांबू प्रॉडक्शनचे व्‍यवस्‍थापकीय संचालक कृणाल नेगांधी यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

वाढलेले कार्बन उत्सर्जन, त्यातून झालेला हवामान बदल आणि त्यामुळे निर्माण होणारे संकट लक्षात घेता राज्य शासनाने या समस्येवर शाश्वत उपायासाठी व्यापक आणि महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेतले आहेत. त्याअनुषंगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन आणि लातूर जिल्ह्यातील फिनिक्स फाऊंडेशन संस्थेच्या सहकार्याने मुंबईत दि. 9 जानेवारी, 2024 रोजी “शाश्वत पर्यावरण विकास” परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या माध्यमातून बांबू लागवड, शाश्वत शेती आणि पर्यावरण रक्षण अश्या विविध उपक्रम व योजनांवर चर्चा आणि कार्यक्रमांची आखणी करण्यात येणार आहे. नागरिक आणि शेतकरी यांना या विषयाबाबतची जनजागृती तसेच या उपक्रमांची अंमलबजावणी  याबाबतची सविस्तर माहिती ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून श्री. नेगांधी यांनी दिली आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात श्री. नेगांधी यांची मुलाखत सोमवार दि. 1, मंगळवार दि. 2 आणि बुधवार दि. 3 जानेवारी 2024 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत गुरुवार, दि. 4 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदिका सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स – https://x.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here