‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक प्रा. कृष्णात खोत यांची मुलाखत

0
15

            मुंबई, दि. 20 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास आणि जय महाराष्ट्र कार्यक्रमात जागतिक मातृभाषा दिनानिमित्त‘ ‘रिंगाण या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झालेले कोल्हापूर जिल्ह्यातील लेखक प्राध्यापक कृष्णात खोत यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

            श्री. खोत यांची ओळख नव्या काळातील मराठी साहित्याला वेगळी दिशा देणारे लेखक म्हणून होत आहे. गावाकडची संस्कृती आणि खेड्यात होत असलेल्या बदलांमुळे निर्माण होत असलेला संघर्ष हे त्यांच्या लिखाणाचे विषय आहेत. श्री. खोत यांच्या गावठाण, झडझिंबड, रौंदाळा आणि धूळमाती या कादंबऱ्यांमधून बदलत्या ग्रामीण जीवनाचं वास्तविक चित्रण आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील निकमवाडी या छोट्याशा खेड्यातील लेखकाचा साहित्य अकादमी पुरस्कारापर्यंतचा प्रवास याविषयी दिलखुलास आणि जय महाराष्ट्र कार्यक्रमातून लेखक प्रा. खोत यांनी माहिती दिली आहे.

            दिलखुलास कार्यक्रमात लेखक प्रा. खोत यांची मुलाखत शुक्रवार दि. 23, शनिवार दि. 24, सोमवार दि. 26 आणि मंगळवार दि. 27 फेब्रुवारी 2024 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. तर जय महाराष्ट्र कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. 27 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. प्राध्यापक नंदकुमार मोरे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

0000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here