जलजीवन मिशन अंतर्गत योजनेतील कामांचे सुधारित प्रस्ताव तातडीने सादर करावे – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

0
9

मुंबई, दि.30 : जलजीवन मिशन अंतर्गत कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी योजनेतील कामांचे सुधारित प्रस्ताव तातडीने सादर करावेत, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

जल जीवन मिशनबाबत आढावा बैठक मंत्रालयात मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीला पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, विभागाचे सहसचिव अमन मित्तल, मुख्य अभियंता मनीषा पलांडे, अतिरिक्त प्रकल्प संचालक सुषमा सातपुते, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अजय सिंग आदी उपस्थित होते.

पाणीपुरवठा मंत्री श्री. पाटील म्हणाले, जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्याची होणारी कामे नागरिकांसाठी महत्त्वाची असून यामुळे अनेक गावात पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था होणार आहे. विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी कालमर्यादा लक्षात घेऊन कामे करावीत. योजनेतील ज्या कामांमध्ये तांत्रिक कारणास्तव व निविदा प्रक्रिये दरम्यान मूळ अंदाजपत्रकापेक्षा वाढ होऊन पंधरा टक्के जास्त फरक होत आहे. अशा कामांसाठी सुधारित मान्यता गरजेची असून यादृष्टीने परिपूर्ण प्रस्ताव वित्त विभागास सादर करावेत, अशा सूचना मंत्री श्री.पाटील यांनी यावेळी दिल्या.

या बैठकीत प्रधान सचिव श्री.दराडे, कार्यकारी संचालक श्री. कृष्णा, श्री. मित्तल, श्रीमती पलांडे यांनी माहिती सादर केली. यावेळी सुधारित मान्यतेसाठी वित्त विभागास सादर करण्यात येणाऱ्या प्रस्तावावरील अनुषंगाने विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली व कार्यवाही बाबत सूचना देण्यात आल्या.

०००

किरण वाघ/विसंअ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here