‘माझ्या मराठीची बोलू कौतुके। परी अमृताते ही पैजा जिंके।।’ ‘‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी !’’

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. एक लढाई यशस्वी झाली. आपल्या मराठी भाषिकांसाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी काही विशिष्ट निकष पूर्ण करावे लागतात. मराठीने हे सर्व निकष पूर्ण केले आणि म्हणूनच तिचा दर्जा अभिजात भाषांमध्ये समाविष्ट केला गेला.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळताच संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण आहे. अनेकांनी अभिनंदन आणि आनंद साजरा केला.

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी गेल्या काही वर्षांपासून लढा सुरू होता. संसदेत वारंवार याबाबतची मागणी होत होती. राज्यातल्या सर्वच पक्षांनी ही मागणी लावून धरली होती. त्यामुळे अभिजात भाषा म्हणजे काही तरी आहे, इतकीच माहिती सामान्य नागरिकांना होती.

संपूर्ण महाराष्ट्राला व जगभरात पसरलेल्या मराठीजनांना अभिमान वाटावा अशी  केंद्र सरकारने मराठी भाषेला ‘अभिजात दर्जा’ देण्याचा निर्णय  घेतला आहे.  केंद्र सरकारने गेल्या अनेक दशकांपासूनची मराठी जनतेची ही मागणी पूर्ण केली आहे. अभिजात दर्जा मिळवण्यासाठीचे सर्व निकष मराठी भाषेने पूर्ण केले आहेत. मराठीसह एकूण पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. मराठीसह पाली, प्राकृत, आसामी व बंगाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.

मराठी मातृभाषा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा अर्थ हा आहे की, मराठी भाषा आता भारतातील त्या विशिष्ट भाषांच्या यादीत आली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही आपल्या मराठी भाषिकांसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. ज्यांना त्यांच्या प्राचीन परंपरा, साहित्यिक, श्रीमंती आणि ऐतिहासिक महत्त्वामुळे अभिजात भाषा म्हणून मराठी ओळखली जाणार आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी काही विशिष्ट निकष पूर्ण करावे लागतात. मराठीने हे सर्व निकष पूर्ण केले आणि म्हणूनच तिचा दर्जा अभिजात भाषांमध्ये समाविष्ट केला गेला हे विशेष असून यास केंद्र सरकारने दिलेली मराठी भाषिक यांच्यासाठी पर्वणीच आहे.

मराठी भाषेने अभिजात भाषेसाठी असलेले निकष पुर्णपणे पार पाडले. मराठी भाषाचे पुरातन साहित्य: संबंधित भाषेचा इतिहास किमान १५०० ते २००० वर्षांपेक्षा अधिक आहे आणि तिचे प्राचीन साहित्य आजही उपलब्ध आहे. मराठी भाषेला समृद्ध साहित्य परंपरा असून या भाषेत असे साहित्य आहे की, जे प्राचीन काळापासून अलीकडच्या काळापर्यंत अस्तित्वात आहे आणि त्याचे महत्त्व सिद्ध झालेले आहे. मराठी मूळ भाषा आहे. संबंधित भाषा स्वतःची स्वतंत्र आहे, म्हणजेच इतर कोणत्याही भाषेपासून थेट उधार घेतलेली नाही. मराठी भाषेला सांस्कृतिक महत्त्व आहे व भाषा मराठी समाजातील सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची मानली जाते.

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ! मराठीला मिळाला अभिजात भाषेचा दर्जाकेंद्र सरकारचा मोठा निर्णय. मराठीला अभिजात दर्जा मिळण्याचे फायदे आहेत ते म्हणजे भाषेचे संवर्धन आणि संरक्षण सरकारकडून मराठी भाषेच्या संशोधनासाठी आणि तिच्या संवर्धनासाठी निधी मिळेल. त्यामुळे मराठी भाषेच्या जतनासाठी आणि प्राचीन साहित्याच्या अभ्यासासाठी प्रोत्साहन मिळेल. शोधकार्याला प्रोत्साहन मिळाल्याने अभिजात भाषांवर संशोधन करणाऱ्या व्यक्तींना राष्ट्रीय स्तरावर विशेष अनुदाने आणि शिष्यवृत्त्या दिल्या जातील. शैक्षणिक विकास, मराठी भाषेतील प्राचीन साहित्य, संस्कृती आणि इतिहास यांचे अधिकाधिक शैक्षणिक अभ्यासक्रमात समावेश होईल, ज्यामुळे मराठी विद्यार्थ्यांना त्यांच्या भाषेचा अधिक खोल अभ्यास करता येईल. अभिजात दर्जा मिळाल्याने मराठी भाषेचा दर्जा उंचावला गेला आहे आणि तिच्या जतनासाठी आणि प्रसारासाठी अनेक नवे मार्ग खुले झाले आहेत.

प्रा.डॉ.बबन मेश्राम,

साहित्यीक व लेखक

समाजशास्त्र विभाग प्रमुख,

एन.एम.डी.महाविद्यालय गोंदिया