पंडित जसराज यांच्या निधनाने शास्त्रीय संगीतातील एक पर्व संपले : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

0
8

मुंबई, दि. १७ : ख्यातनाम शास्त्रीय गायक व संगीतकार पद्मविभूषण पंडित जसराज यांच्या निधनाने भारतीय शास्त्रीय संगीताचे मोठे नुकसान झाले असून त्यांच्या जाण्याने शास्त्रीय संगीतातील एक पर्व संपले आहे, अशा शोकभावना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केल्या आहेत.

पंडितजी मेवाती घराण्याशी संबंधित होते. सुरुवातीला त्यांनी वडिलांकडून संगीताचे धडे गिरवले व त्यानंतर भावाने त्यांना प्रशिक्षण दिले. ८० वर्षांहून अधिक काळ ते संगीत क्षेत्रात कार्यरत होते. आपल्या संगीताने त्यांनी लाखो श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात त्यांनी शास्त्रीय संगीताची वेगळी छाप सोडली. पंडित जसराज यांचे भारत, अमेरिकेसह जगभरात अनेक शिष्य आहेत. पंडितजींना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. शास्त्रीय संगीतातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल भारत सरकारने पद्मश्री, पद्मभूषण व पद्मविभूषण या पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. त्यांच्या जाण्याने संगीत क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करुन पंडित जसराज यांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहे, असे श्री.थोरात म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here