समान संधी केंद्र राष्ट्रनिर्मितीसाठी महत्त्वपूर्ण – समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे

0
17

समाजकल्याण विभागांतर्गता समान संधी र्केद्र व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची कार्यशाळा संपन्न

            अमरावती, दि. 8 : सामाजिक न्याय विभागाच्या समान संधी केंद्राच्या माध्यमातून समाजातील मागासवर्गीय व वंचित घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच त्यांचा सर्वांगिण विकास होण्याच्यादृष्टीने विविध योजनांचा लाभ दिला जातो. त्यात मागासवर्गींयांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे, रोजगारक्षम होण्यासाठी उद्योजकता व व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण देणे, राष्ट्रनिर्मितीकरीता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे आदी बाबींचा समावेश आहे. सुदृढ राष्ट्रनिर्मिती समान संधी केंद्र महत्वपूर्ण असून शासनाचे विविध उपक्रम केंद्राच्या माध्यमातून राबवावेत, असे निर्देश समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी कार्यान्वयन यंत्रणांना दिले.

             सामाजिक न्याय भवन येथे समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली समान सधी र्केद्र व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा जात प्रमाण्पत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष लक्ष्मण राऊत, समाजकल्याण प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त जया राऊत, प्रो. राम मेघे  इस्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड रिसर्च, बडनेराचे प्राचार्य जी.एस. बमनोटे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

            डॉ. नारनवरे म्हणाले की, मागासवर्गीय तसेच वंचित घटकांना शासन राबवित असलेल्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी समान संधी केंद्र स्थापित करण्यात आली आहे. सामाजिक न्याय विभागाव्दारे राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक, स्वंयरोजगार, कौशल्य प्रशिक्षण आदीसंदर्भातील योजनांची माहिती मागासवर्गीयांना केंद्रांच्या माध्यमातून देण्यात यावी. केंद्राच्या समन्वयकांनी सामाजिक जबाबदारी समजून नागरिकांना येणाऱ्या अडचणी व समस्या सोडविण्याचा प्रयत्न करावा. विद्यार्थ्यांना शैक्षणिक, सामाजिक तसेच करिअर बाबत असलेल्या संधीचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन त्यांनी केले.

             सामाजिक न्याय विभागाव्दारे नवनवीन उपक्रम राबविण्यात येतात. आयुक्त डॉ. नारनवरे यांच्या संकल्पनेतून समान संधी केंद्र राज्यात स्थापित होत आहे. राज्यातील सर्व महाविद्यालयामध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाच्या शिष्यवृत्ती तसेच इतरही योजनांची माहिती, शासनाच्या योजना व उपक्रम इत्यादींचा समाजातील दुर्बल घटकांना लाभ व्हावा, तसेच त्यांच्या व देशाच्या उन्नतीकरीता मार्गदर्शन, समुपदेशन,आर्थिक सामाजिक आणि इतर बाबी संदर्भातील मार्गदर्शन महाविद्यालय परिसरात उपलब्ध  होण्याकरीता समान संधी केंद्राची (Equal Oppottunity Center) स्थापन करण्यात आलेली आहे, अशी माहिती श्री. वारे यांनी प्रास्ताविकातून दिली.

यावेळी सामाजिक न्याय विभागा अंतर्गत कार्यरत असलेल्या अनुसुचित जाती व नवबौध्द मुला मुलींच्या शासकीय निवासी शाळांचा इयत्ता 10 वी चा निकाल 100 टकके लागल्याने सदर शाळांत गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थी त्यांचे पालक व मुख्याध्यापकांचा गौरव मान्यवरांचे हस्ते करण्यात आला, भारतरत्न डॉ. बाबासाहेब  आंबेडकर स्वाधार योजने अंतर्गत लाभान्वित झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देवुन गौरव करण्यात आला. तसेच कर्मविर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजने अंतर्गत अनुसुचित जाती व नबवौध्द घटकातील भुमिहिन बीपीएल शेतमजुरांना या योजने अंतर्गत जमीनीचे पटटे देवुन शेत मालक बनण्याची स्वप्न पुर्ती केली.यावेळी सर्व लाभार्थ्याचा उपस्थित मान्यवरांचे शुभ हस्ते सत्कार करण्यात आला.

तसेच या वेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब  आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेतलेल्या विद्यार्थी शशांक भगत व कु. प्रियंका गवई  यांनी या योजने मुळे त्यांना फायदा झाला या बाबत त्यांचे मनोगत व्यक्त केले व त्यांना मिळालेल्या लाभामुळे त्यांनी शासनाचे व विभागाचे आभार मानले.

            जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त श्रीमती जया राऊत यांनी मा.आयुक्त महोदयांचे संकल्पनेतुन मंडणगड पॅटर्न जिल्हयात राबविण्यात येत असल्याने त्याचा विद्यार्थ्यांना व पालकांना खुप फायदा झाला असल्याचे त्यांनी नमुद केले . तसेच डॉ.जी.आर.बमनोटे यांनी विद्यार्थ्याकरीता समान संधी केंद्र हे अतिशय महत्वाची भुमिका बजावणारे केंद्र असल्याने सर्व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

यावेळी अमरावती जिल्ह‌्यातील महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राद्यापक, समान संधी केंद्राचे समन्वयकव विद्यार्थी,समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त,श्रीमती माया केदार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री.राजेंद्र जाधवर, व इतर अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्र संचालक श्रीमती मंगला देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन श्री.राजेंद्र जाधवर यांनी केले.

0000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here