‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाची तयारी पूर्ण; पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी घेतला आढावा

0
13
पालघर दि. 14 : ‘शासन आपल्या दारी’ पालघर जिल्ह्याच्या कार्यक्रमाचा शुभारंभ दि. 15 जून रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोळगाव, पालघर येथे होणार असून या कार्यक्रमाची तयारी जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली आहे. या तयारीचा आढावा सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज घेतला.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वनगा, रविंद्र फाटक, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, जिल्हा पोलिस अधिक्षक बाळासाहेब पाटील, सहायक जिल्हाधिकारी आयुषी सिंह, संजिता महापात्रा, जिल्हा परीषदेच्या माजी अध्यक्षा वैदही वाढाण, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन, उपजिल्हाधिकारी (सा.प्र) संजिव जाधवर, जिल्हा नियोजन अधिकारी प्रशांत भामरे तसेच विविध विभागाचे प्रमुख आदि मान्यवर उपस्थित होते.
‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी उपस्थित राहू इच्छिणारे लाभार्थी यांना पिण्याच्या पाण्याची मुबलक उपलब्धता तसेच खाद्य पदार्थ याची उपलब्धता जिल्हा प्रशासन करणार आहे. तसेच कार्यक्रमास उपस्थित राहणारे लाभार्थी यांना वाहतूक सुविधा उपलब्ध करण्याविषयी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आढावा घेतला.
पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी केली कार्यक्रम स्थळाची पाहणी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचा शुभारंभ होणार असून कार्यक्रम स्थळी भव्य मंडप उभारण्यात आला आहे. या मंडपात 25 हजार व्यक्तींना बसण्याची सोय करण्यात आली आहे. या सर्व बाबींचा आढावा कार्यक्रमास्थळी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here