समृद्धी महामार्गावरील वैजापूरजवळील अपघाताचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दु:ख

0
3

मुंबई, दि. १५: नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गावर वैजापूर तालुक्यात जांबरगाव टोलनाक्याजवळ टेम्पो ट्रॅव्हलर आणि ट्रकच्या भीषण अपघातात निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागल्याची घटना अत्यंत दुःखद, वेदनादायी आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले आहे. अपघातातील मृतांना उपमुख्यमंत्र्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करुन त्यांच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा केली आहे. तर जखमींवर तातडीने, शासकीय खर्चाने सर्वतोपरी उपचार करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

अपघातात १२ जणांचा मृत्यू तर १५ जण जखमी झाले आहेत. सर्व प्रवाशी नाशिक परिसरातील असून देवदर्शन करुन ते नाशिककडे परतत असल्याची प्राथमिक माहिती आहे.

०००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here