११ मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ५२.४९ टक्के मतदान

मुंबई, दि.१३ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात आज सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सूरुवात झाली असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ५२.४९ टक्के मतदान झाले आहे.

चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे

➡️ नंदुरबार –  ६०.६० टक्के

➡️ जळगाव –  ५१.९८ टक्के

➡️ रावेर – ५५.३६ टक्के

➡️ जालना – ५८.८५ टक्के

➡️ औरंगाबाद  – ५४.०२  टक्के

➡️ मावळ – ४६.०३ टक्के

➡️ पुणे – ४४.९० टक्के

➡️ शिरूर –  ४३.८९ टक्के

➡️ अहमदनगर-  ५३.२७ टक्के

➡️ शिर्डी – ५२.२७ टक्के

➡️ बीड –  ५८.२१ टक्के

०००