मुंबई, दि. 29 :- “आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे कौतुक करायला शब्द अपुरे आहेत. तब्बल सतरा वर्षांनंतर भारतीय क्रिकेट संघाने टी-ट्वेंटी वर्ल्डकप जिंकून देशवासियांना दिलेला आनंद अवर्णनीय आहे. संपूर्ण देश या विजयाने भारावून गेला आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने केलेली कामगिरी जगज्जेत्यासारखीच आहे. विराट कोहली, अक्षर पटेल, शिवम दुबे यांनी दमदार पण संयमी खेळी करुन सर्वाधिक धावांचा विक्रम रचला. सूर्यकुमार यादवचा झेल, जसप्रीत बुमराहची गोलंदाजी हे सारंच अविस्मरणीय होतं. संघातल्या प्रत्येक खेळाडूचं योगदान, समस्त देशवासियांच्या शुभेच्छांमुळेच हे यश मिळालं आहे. भारतीय क्रिकेट संघाचं हे यश देशातील क्रिकेटसह देशातील अन्य खेळांना संजीवनी तसेच खेळाडूंना प्रेरणा देईल. आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे मी मनापासून अभिनंदन करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले आहे.
ताज्या बातम्या
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे आम्हाला मोठा आधार मिळाला – महिलाभगिनींनी व्यक्त केली भावना
Team DGIPR - 0
बुलढाणा, दि.19 : महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत राज्य शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून अनेक भगिनींना आर्थिक स्वातंत्र्य मिळाले आहे. बँक खात्यात आलेल्या...
दिल्लीतील मराठी रसिकांसाठी २२ सप्टेंबरला कलगीतुरा नाटकाचे सादरीकरण
Team DGIPR - 0
नवी दिल्ली 19 : नवी दिल्लीतील इंडियन हॅबिटॅट सेंटरच्या राष्ट्रीय स्तरावरील आयएचसी नाट्य महोत्सवात नाशिकमधील लोकप्रिय ‘कलगीतुरा’ या संगीत नाटकाची निवड झाली आहे. हे नाटक २२ सप्टेंबर...
कृषी विभागातील विविध योजनांच्या प्रचारार्थ महात्मा गांधी जयंतीदिनी तालुकास्तरीय मेळावे – कृषिमंत्री धनंजय मुंडे
Team DGIPR - 0
मुंबई दि. 19 : कृषी विभागातील विविध योजनांच्या प्रचारासाठी कृषी विभागातील विविध महामंडळाच्या समन्वयाने दि. 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त राज्यभर मेळावे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती...
विदर्भातील संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांची नुकसान भरपाई तातडीने अदा करावी – कृषिमंत्री धनंजय...
Team DGIPR - 0
मुंबई, दि. 19 : विदर्भातील संत्रा व मोसंबी उत्पादकांचे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान भरून येण्यासाठी शासनाने निर्गमित केलेला निधी सर्व प्रक्रिया पूर्ण करून वितरित करण्यात यावा, अशा...
राज्यात सोयाबीन खरेदी केंद्र तातडीने सुरु करावीत – कृषिमंत्री धनंजय मुंडे
Team DGIPR - 0
मुंबई दि 19 : कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्याचा कार्यक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लवकरच होणार आहे. त्यामुळे या कामातील केवायसी व...