दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या साहित्य संमेलनासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. नुकताच मराठीला अभिजात भाषाचा दर्जा मिळाला आणि आपल्या देशाच्या राजधानीच्या ठिकाणी अखिल भारतीय साहित्य संमेलन होत आहे त्याचा मला साहित्यिक म्हणून खूप आनंद होतो आहे. तारा भवाळकर याच्या अध्यक्ष आहेत. साठ वर्षांपूर्वी तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली आपल्या भारत देशाच्या राजधानीच्या ठिकाणी अखिल भारतीय साहित्य संमेलन भरलेलं होतं. त्यानंतर आज आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर अखिल भारतीय साहित्य संमेलन दिल्ली या ठिकाणी होत आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचे उद्घाटक आहेत, आपल्या महाराष्ट्राचे जाणते राज्यकर्ते आणि साहित्य क्षेत्राचे जाणकार शरद पवार यांचे स्वागताध्यक्ष आहेत.
आपली मराठी भाषा ही अनेक खेड्यापाड्यांमध्ये बोलल्या जात असणाऱ्या बोलीभाषेतून आली असून ते जे भाषेचे झरे येतात आणि त्यातूनच या अभिजात भाषेचे असणारे अनेक पुरावे आपल्याला देत असते. इतकी वर्ष अभिजात भाषा मिळवण्यासाठीचा असणारा जो खटाटोप आहे, त्याला यश मिळालं आणि अनेक समितीने अगदी रंगनाथ पठारे यांच्या समितीने जो अहवाल मांडला, त्याचा अभ्यास करून आपल्याला केंद्र सरकारने या अभिजात भाषेचा दर्जा दिला. अभिजात भाषेचा दर्जा मिळणे ही गोष्ट सरकारच्या दृष्टिकोनातून शिक्कामोर्तब करणं जेवढी गरजेची होती त्याच्यापेक्षा जास्त गरजेचे आपण आपल्या भाषेमध्ये जे साहित्य निर्माण करतो ते साहित्य इतर भाषेमध्ये जाणं आहे. आपल्या अभिजातपणाच्या खुणा आपल्या साहित्यातल्या साहित्य मूल्यातून दाखवून देणं ही गोष्ट मराठीत लिहिणाऱ्या प्रत्येकाच्या लक्षात असली पाहिजे. आणि त्यातूनच आपण अभिजात भाषेचा असणारा दर्जा टिकवू शकतो. सातत्याने चांगली निर्मिती होणे, सातत्याने आपण तिच्याबद्दलचा विचार करणं गरजेचं आहे.
मराठी भाषा खेड्यापाड्यात बोलली जाते, ती शहरांमधून जरा लोप पावते आहे. खेड्यापाड्यातील लोक आज शहरामध्ये राहत आहेत आणि आपल्या मुलांनी मराठी शकु नये अशी त्यांची अपेक्षा आहे, इतर भाषा शिकण्याबद्दल कुणाचाही दुमत असणार नाही परंतु, त्याच बरोबर आपली मराठी भाषा आपली मातृभाषा ही आपली भाषा कशी होईल याकडे लक्ष अनेक विचारवंतानी, साहित्यिकांनी, इथल्या शास्त्रज्ञांनी दिले पाहिजे. जर ही माझी मराठी भाषा ज्ञानभाषा झाली तर निश्चितपणे ते अभिजात भाषा आहे असं कोणाला सांगावे लागणार नाही. तिचं अभिजातपण हे तिच्यामध्ये असणाऱ्या सामर्थ्यांमध्ये लपलेलं आहे. अनेक बोली नष्ट होत असताना आपण अभिजात भाषेचा दर्जा मिळवतो. आपण या अनेक बोलीभाषा जगवल्या पाहिजेत. ते या अभिाजात भाषेचे झरे आहेत असं मला वाटतं. प्रमाण भाषेला या खेड्यापाड्यातल्या बोलल्या जाणाऱ्या बोलीभाषा आहेत त्या भाषा मिळतात आणि त्यातून प्रमाण भाषेला जोड मिळते.
माझा साहित्य अकादमी पर्यंतचा प्रवास जो आहे तो माझ्या भाषेनेच मला करता आला. मला इतर भाषेतून तो करता आला नसता. मी माझ्या गावची माझ्या परिसराचीच बोलीभाषा घेऊन प्रथम आलो. अभिजात भाषा ही वरून पडत नाही ती खालून उगवलेली असते आणि ही गोष्ट आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक साहित्यिकांनी दाखवून दिलेली आहे. वि. स. खांडेकरांच्या पासून अगदी राजन गवसांच्यापर्यंत, किरण गुरवांच्या पर्यंत. कोल्हापूरच्या असणाऱ्या वेगळ्या बोलींचे अनेक सार आनंद यादव यांच्यामध्ये आपल्याला दिसतात, रणजीत देसाई, शिवाजी सावंत यांच्यामध्ये ती गोष्ट दिसते. किरण गुरव, विश्वास पाटलांच्यामध्ये ती गोष्ट दिसते. आणि नव नवीन येणाऱ्या अनेक मुलांच्या वतीने ती गोष्ट दिसते. मला वाटते कोल्हापूरमध्ये प्रत्येक परिसरामध्ये बोलणारी वेगवेगळी बोलीभाषा आहे ती देखील अभिजातचे झरे आहेत. चंदगड, निपाणी ह्या परिसरामध्ये मराठी बोलणारी वेगळी आणि इकडे शाहुवाडी, कोकण परिसराच्या घाटमाथ्यावर बोलणारी भाषा वेगळी. आमच्या पन्हाळ्याच्या परिसरामध्ये बोलणारी भाषा वेगळी जरी असली तरी ती मराठीचे अतिशय एक ऊर्जा स्त्रोत आहेत. आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मराठी शाळा देखील आज मरता कामा नयेत, मराठी शाळा देखील टिकल्या तर आपल्या अभिजात भाषेला अजून जोर मिळेल.
000000