जिल्ह्याच्या सर्वसमावेशक विकासाचे नियोजन करावे – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

जिल्हा विकास आराखड्यांतर्गत आढावा बैठकीत निर्देश

सांगली, दि. २१, (जि. मा. का.) : जिल्ह्याचा विकासदर वाढावा यासाठी निश्चित करण्यात आलेल्या जिल्हा विकास आराखड्यामध्ये जिल्ह्याच्या सर्वसमावेशक विकासाचे योग्य नियोजन करावे. वर्षनिहाय उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी, आराखड्यामध्ये समाविष्ट यंत्रणांनी याबाबतचा अहवाल प्रतिमाह जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करावा, अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षामध्ये जिल्‍हा विकास आराखडा आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, महापालिका आयुक्त सत्यम गांधी, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यांची प्रमुख उपस्थिती होती. तर दूरदुष्य प्रणालीद्वारे विविध यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

सांगली जिल्ह्याचा सर्वसमावेश विकास होऊन जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढावे यासाठी कृषि, उद्योग, शिक्षण, पर्यटन, कौशल्य विकास, समाजकल्याण अशा विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण विकास होऊन जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढावे, विविध उत्पादनांची निर्यात वाढावी यासाठी जिल्ह्याची बलस्थाने, कमतरता, संधी व धोके या बाबींचे SWOT ॲनालिसिस आवश्यक बदलांचा सिध्दांत प्राथमिक उपक्षेत्रे आदी अनुषंगाने चर्चा करण्यात आली.

000000