चांगल्या आरोग्य सुविधा देण्यास शासनाचे सर्वोच्च प्राधान्य – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0
9

स्वातंत्र्यदिनानिमित्त मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे करणार कामगारांचे हित जोपासणार

मुंबई, दि. १५ :- आरोग्य या विषयाकडे प्राधान्याने लक्ष दिले जाणार असून राज्यातील खेड्यापाड्यांमध्ये तसेच दुर्गम भागात उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा आणि वैद्यकीय सुविधा पोहोचण्यास शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. भारतीय स्वातंत्र्याच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त आज मंत्रालयात झालेल्या मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात १५० टेस्टिंग लॅब सुरू करण्यात आल्या आहेत. राज्यात विविध ठिकाणी रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालये उभारण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्याला स्वतःच्या पायावर उभे करणे हे या शासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे, असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले, जे विकेल तेच पिकेल अशी शासनाची भूमिका आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला दर्जेदार अन्नधान्य मिळेल. शेतकऱ्यांच्या समोर सतत कर्जाचा डोंगर उभा आहे. शेतकऱ्यांना या समस्येतून कायमस्वरूपी कसे मुक्त करता येईल याकडे लक्ष देण्यात येईल. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत सुमारे २९ लाख ५० हजार शेतकऱ्यांना १८ हजार ९८० कोटी रुपये रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करून कर्जमुक्त करण्यात आले आहे. मागील दहा वर्षात झाली नाही एवढी विक्रमी म्हणजे ४१८ लाख क्विंटल कापूस खरेदी यावर्षी शासनाने केलेली आहे.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, किसान हरितक्रांती करतात तर जवान आपल्या देशाचे रक्षण करतात. त्याचबरोबरीने आपले कामगार सुद्धा उद्योगाची बाजू समर्थपणे सांभाळत असतात. म्हणून कामगारांच्या हिताकडेही शासन तितकेच लक्ष देईल. अनेकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने ‘महाजॉब्ज’ हे पोर्टल सुरू केले आहे. त्यामुळे राज्यात नवीन उद्योग येतील. कामगारांना रोजगार उपलब्ध होईल. जय जवान, जय किसान, जय कामगार हे यापुढे आपल्या राज्याचे ध्येय असेल.

पहिले राज्य

ऑनलाईन शिक्षण सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. सर्वसामान्य गरीब माणसाचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्यातील सर्व प्रमुख शहरांमध्ये झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

उद्योग

अनलॉक प्रक्रिया सुरू केल्यानंतर राज्यात सध्या सुमारे ५० ते ६० हजार उद्योग सुरू झाले आहेत. उद्योग क्षेत्रात १२ देशांमधील गुंतवणूकदारांसोबत सुमारे १६ हजार कोटीं रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत, असेही मुख्यमंत्री यांनी सांगितले.

कोविड योद्धे

कोरोना रुग्णांना बरे करण्यासाठी अहोरात्र झटणारे डॉक्टर्स, नर्सेस, इतर वैद्यकीय यंत्रणा आणि पोलीस यंत्रणेत काम करणारे कर्मचारी, स्वच्छता दूत हेच खरे कोविड योद्धे आहेत. या काळातही न डगमगता ते समर्पित भावनेने सेवा देत आहेत. कोरोनातून बरे झालेले नागरिकही लढवय्ये आहेत. त्यांचे मी कौतुक करतो असे मुख्यमंत्री म्हणाले.

कोरोनाच्या कालावधीत पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आपले काम चोखपणे बजावले. पण हे करताना काही पोलीस अधिकारी व कर्मचारी हे कोरोनाला बळी पडले. त्यांनाही मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. अहोरात्र आपल्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी सज्ज असणाऱ्या आपल्या जवानांच्या कामगिरीचेही मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीद जवानांना त्यांनी अभिवादन केले. राज्यातील राष्ट्रपती पदक, शौर्यपदक आणि प्रशंसनीय सेवा पदक जाहीर झालेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचेही त्यांनी अभिनंदन केले. दरम्यान मनोगत व्यक्त केल्यानंतर त्यांनी कोविड योध्दांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे आभार मानले.

सर्व धर्मीयांचे आभार

कोरोनाच्या कालावधीत सर्व धर्मीयांचे महत्त्वाचे सण-उत्सव येऊन गेले आणि पुढेही ही येत आहेत. मात्र सर्वांनीच संयम बाळगून, नियमांचे पालन करून, शांततापूर्वक हे सणवार साजरे केले आणि देशासमोर एक आदर्श उदाहरण उभे केले. त्यांचे देखील या निमित्ताने मी मनःपूर्वक आभार मानतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.

आरोग्यविषयक महत्त्वाचे निर्णय

 राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर शासनाने त्वरेने पावले उचलली. देशात प्रथमच तज्ज्ञ डॉक्टरांचा टास्क फोर्स तयार केला. जिल्ह्यातील डॉक्टरांचे सुद्धा टास्क फोर्स तयार केले. गावोगावी कोरोना ग्राम दक्षता समित्या तयार करून गावकरी आणि लोकांवरही जबाबदारी टाकण्यात आली. महाराष्ट्र हा लढवय्यांचा प्रदेश आहे. कितीही संकट आली तरी आपण डगमगलो नाही.

राज्यात कोरोना चाचण्या मोठ्या प्रमाणात वाढविल्या आहेत. रुग्णांच्या संपर्कातील लोकांचे ट्रेकिंग, ट्रेसिंग आणि ट्रीटमेंटला वेग दिला आहे. राज्यात जिल्ह्याजिल्ह्यात रुग्ण सुविधांची उभारणी वेगाने सुरू आहे. त्यामुळे काही ठिकाणी रुग्ण वाढीचा वेग काहीसा कमी झाला आहे. कोरोनाविरुद्धचा लढा हा आपण जिंकल्याशिवाय राहणार नाही. कोरोनावर आतापर्यंत लस आलेली नाही. परंतु सुरक्षित अंतर ठेवणे, स्वयंशिस्त, स्वच्छता पाळणे, मास्क वापरणे, गर्दी टाळणे या उपायांद्वारे आपल्याला हे संकट परतवून लावायचे आहे.

आधी आपण लॉकडाऊन केले. नंतर पुनश्च हरिओम करून आपण अतिशय सावधपणे हळूहळू अनेक गोष्टी पुन्हा सुरू करत असल्याचेही मुख्यमंत्री श्री ठाकरे म्हणाले.

आदिवासींच्या कल्याणासाठी

शासनाने साडेचार कोटी लिटर दुधाचे रूपांतर भुकटीत केले. आदिवासी मुले व महिलांना ही दूध भुकटी मोफत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. गेल्या काही वर्षांपासून बंद असलेली खावटी योजना सुरू करण्यात आली असून 100 टक्के अनुदान म्हणून 2 हजार रुपये रोख रक्कम आणि दोन हजार रुपयांच्या जीवनावश्यक वस्तू देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे आर्थिक विवंचनेतील आदिवासींना दिलासा मिळणार आहे.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग

कोरोनाचे संकट असतानाही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेसमृद्धी महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे. हा महामार्ग केवळ रस्ता असणार नाही तर या महामार्गाच्या दुतर्फा अनेक सुविधा उपलब्ध होतील. त्यामुळे हा महामार्ग खऱ्या अर्थाने समृद्धी आणल्याशिवाय राहणार नाही.

आरोग्य, शेती, उद्योग अशा ज्या – ज्या क्षेत्रात क्रांती करण्याची गरज आहे तिथे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरेल. यापुढील काळातही महाराष्ट्र हे देशाला दिशा दाखविल्याशिवाय राहणार नाही. जवान, किसान आणि कामगारांना एकत्र घेवून आपण स्वराज्याचे रूपांतर सुराज्यात करू असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

मनोगतानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयातील छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी  श्रीमती रश्मी ठाकरे, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता, मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर, माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर, मुख्य सचिव संजय कुमार, प्रधान सचिव व मुख्य राजशिष्टाचार अधिकारी श्रीमती मनीषा पाटणकर-म्हैसकर, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग तसेच विविध विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्यासह कोरोनावर मात केलेले कोरोना योद्धे उपस्थित होते.

मंत्रालय में स्वतंत्रता दिन पर मुख्यमंत्री के हाथों ध्वजारोहण किया गया

अच्छी स्वास्थ्य सुविधाएं देने के लिए प्राथमिकता रहेगी- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

किसानों को खुद को पैरो पर खड़ा करेंगे कामगारों का हित का भी होगा संवर्धन 

मुंबई दि. 15 : – स्वास्थ्य इस विषय को ओर प्राथमिकता से ध्यान दिया जाएगा और राज्य के गाँव-कस्बों में एवं दूर-दराज़ क्षेत्र में उत्तम स्तर की स्वास्थ्य सुविधा और चिकित्सा सुविधाओं को पहुंचाने के लिए सरकार की सर्वोच्च प्राथमिकता होगी, यह प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने किया। भारतीय स्वतंत्रता के 73 वें वर्धापन दिन के अवसर पर आज मंत्रालय में आयोजित मुख्य शासकीय समारोह में मुख्यमंत्री के हाथों ध्वजारोहण किया गया, इस अवसर पर वे बोल रहे थे।

उन्होंने कहा कि कोरोना के मद्देनज़र राज्य में 150 टेस्टिंग लैब शुरू की गई है। राज्य में  विविध जगहों पर अस्पतालें और चिकित्सा महाविद्यालयों का निर्माण किया गया है। किसानों क खुद के पैरों पर खड़ा करना, यहीं इस सरकार का मुख्य उद्देश्य है, यह कहते हुए मुख्यमंत्री ने कहा कि जो बिकेगा, उसी की फसल होगी, यहीं सरकार की भूमिका है। इसलिए राज्य की जनता को उत्तम अनाज भी मिलेगा।      किसानों के सामने हमेशा कर्जरूपी पहाड़ खड़ा रहता है। किसानों को इस समस्या से हमेशा के लिए किस तरह से मुक्त किया जा सकता है, इस ओर ध्यान दिया जाएगा। महात्मा जोतिराव फुले किसान कर्जमुक्ति योजना में तकरीबन 29 लाख 50 हजार किसानों को 18 हजार 980 करोड़ रुपये की रकम उनके खाते पर जमा कर किसानों को कर्जमुक्त किया गया है। पिछले दस सालों में नहीं हुई होगी, इतनी बढ़त यानि 418 लाख क्विंटल कपास की खरीदी इस साल सरकार ने की है।

मुख्यमंत्री ने आगे कहा कि किसान हरितक्रांति करते है और जवान हमारे देश की रक्षा करते है। इसकी के साथ-साथ हमारे कामगार भी उद्योग को समर्थ रूप से संभालते है। इसीलिए कामगारों के हित की ओर भी उतने ही ललक से ध्यान दिया जाएगा। कई लोगों को रोजगार उपलब्ध कराने के लिए सरकार ने ‘महाजॉब्ज’  पोर्टल शुरू किया है। इससे राज्य में नए उद्योग आएंगे। कामगारों को रोजगार उपलब्ध होगा। आगे अपने राज्य का जय जवान, जय किसान, जय कामगार यहीं लक्ष्य होगा।  

पहला राज्य

ऑनलाईन शिक्षा शुरू करनेवाला महाराष्ट्र यह देश का पहला राज्य साबित हुआ है। आम लोगों को उनके घर का सपना पूरा करने के लिए राज्य के सभी मुख्य शहरों में झोपड़पट्टी पुनर्विकास योजना चलाने का निर्णय भी सरकार ने लिया है।

उद्योग

अनलॉक प्रक्रिया शुरू करने के बाद राज्य में इन दिनों तकरीबन 50 से 60 हजार उद्योग शुरू हुए है। उद्योग क्षेत्र में 12 देशों के निवेशकों के साथ भी तकरीबन 16 हजार करोड़ रुपये के सामंजस्य करार किए जाने की बात मुख्यमंत्री ने कहीं।

कोविड योद्धा

मुख्यमंत्री ने कहा कि कोरोना मरीजों को ठीक करने के लिए दिन-रात कार्यरत डॉक्टर्स, नर्सेस, इतर चिकित्सा यंत्रणा और पुलिस  यंत्रना में कार्यरत कर्मचारी, स्वच्छता दूत ही सच्चे कोविड योद्धा है। इन दिनों में भी बिना डरे समर्पित भाव से सेवा दे रहे है। हालांकि कोरोना से जो लोग ठीक हुए है, वो भी शूर है, मैं उनकी सराहना हूँ।

कोरोना के दिनों में पुलिसों ने कानून एवं सुव्यवस्था बनाए रखने का काम बहुत ही अच्छे से निभाया है। लेकिन यह काम करते समय कुछ पुलिस अधिकारी और कर्मचारी भी कोरोना का शिकार हुए है। मुख्यमंत्री ने इस दौरान उन सभी को श्रद्धांजलि अर्पित की है। दिन-रात अपनी सीमा को सुरक्षित रखने में सज्ज अपने जवानों के कार्य की भी मुख्यमंत्री ने सराहना की। देश के लिए बलिदान देनेवाले शहीद जवानों को उन्होंने अभिवादन किया। राज्य के राष्ट्रपति पदक, शौर्यपदक और प्रशंसनीय सेवा पदक घोषित हुए है, ऐसे पुलिस अधिकारी और कर्मचारियों का भी उन्होंने अभिनंदन किया। इस दौरान उन्होंने मनोगत व्यक्त करने के बाद कोविड योद्धाओं से प्रत्यक्ष मिलकर उनके प्रति आभार व्यक्त किया।

सभी धर्मियों के प्रति आभार

मुख्यमंत्री ने कहा कि कोरोना की अवधि में सभी धर्म के महत्वपूर्ण पर्व-त्योहार आए और आगे भी आ रहे है। लेकिन सभी ने संयम बरतते हुए, नियमों का पालन करते हुए, शांतिपूर्वक पर्व-त्योहार मनाए है और देश के सामने एक आदर्श उदाहरण रखा है। मैं उन सभी के प्रति शुक्रिया अदा करता हूँ।

स्वास्थ्य विषयक महत्त्वपूर्ण निर्णय

 राज्य में कोरोना के मरीज मिलने के बाद सरकार ने जल्द कदम उठाए। देश में प्रथमत: ही विशेषज्ञ डॉक्टरों का टास्क फोर्स तैयार किया। जिले के डॉक्टरों का भी टास्क फोर्स तैयार किया है। गाँव-गाँव कोरोना ग्राम दक्षता समितियां बनाकर ग्रामीणों एवं लोगों पर ज़िम्मेदारी सौंपी गई। महाराष्ट्र यह शूरवीरों का प्रदेश है। कितनी भी मुसीबतें आई हो, लेकिन हम डरें नहीं है।

राज्य में कोरोना परीक्षण बड़े पैमाने पर बढ़ाया है। मरीजों के संपर्क में लोगों का ट्रेकिंग, ट्रेसिंग और  ट्रीटमेंट को गति दी है। राज्य में, जिले-जिले में मरीज सुविधाओं का निर्माण भी तेजी से शुरू किया है। इससे भी कुछ जगहों पर मरीजों के बढ़ने की गति कुछ पैमाने पर कम हुई है। कोरोना के खिलाफ की लड़ाई जीतेंगे ही। कोरोना पर अब तक टीका नहीं आया है, लेकिन सुरक्षित दूरी बनाए रखना, स्वयं अनुशासन, स्वच्छता का पालन, मास्क का उपयोग, भीड़ से बचना इन उपायों से हम इस संकट को दूर कर सकते है।

पहले हमने लॉकडाऊन किया। उसके बाद पुनश्च हरिओम कर हम बहुत ही सावधानी से धीरे-धीरे कुछ बातों को फिर से शुरू करने की बात मुख्यमंत्री श्री ठाकरे ने कहीं।

आदिवासियों के कल्याण के लिए

सरकार ने साढ़ेचार करोड़ लिटर दुध का रूपांतर पावडर में किया। आदिवासी बच्चों एवं माहिलाओं को दूध पावडर मुफ्त में देने का निर्णय सरकार ने लिया है। पिछले कुछ सालों में बंद पड़ी हुई खावटी योजना शुरू की है और 100 फीसदी अनुदान के रूप में 2 हजार रुपये नकद रकम और दो हजार रुपए की जीवनावश्यक वस्तू देने का निर्णय सरकार ने लिया है। इससे आर्थिक मुसीबत में फंसे आदिवासियों को राहत मिलेगी।

हिंदुहृदयसम्राट बालासाहब ठाकरे समृद्धि महामार्ग

कोरोना का संकट रहते हुए भी हिंदुहृदयसम्राट बालासाहब ठाकरे  समृद्धि महामार्ग का काम तेजी से शुरू है। यह महामार्ग केवल रास्ता नहीं होगा, बल्कि इस महामार्ग के दोनों ओर कई सुविधाएं भी उपलब्ध होगी। जिससे यह महामार्ग सही मायने में समृद्धि लाए बगेर नहीं रहेगा।

स्वास्थ्य, कृषि, उद्योग ऐसे जिन-जिन क्षेत्र में क्रांति करने की आवश्यकता है, वहाँ पर महाराष्ट्र यह देश का पहला राज्य साबित होगा। आगे भी महाराष्ट्र यह राज्य देश को दिशा दिखाए बगेर नहीं रहेगा। जवान, किसान और कामगारों को एकसाथ लाकर हम स्वराज्य का रूपांतर सुराज्य में करेंगे, यह विश्वास भी मुख्यमंत्री ने इस दौरान व्यक्त किया है।

अपने विचार व्यक्त करने के बाद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने  मंत्रालय के छत्रपति शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर और राजमाता जिजाऊ की प्रतिमा को पुष्प अर्पित कर उन्हें अभिवादन किया। इस अवसर पर श्रीमती रश्मी ठाकरे, उच्च न्यायालय के मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता, मुंबई की महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर, पूर्व मंत्री, विधायक दीपक केसरकर, मुख्य सचिव संजय कुमार, प्रधान सचिव एवं मुख्य राजशिष्टाचार अधिकारी श्रीमती मनीषा पाटणकर-म्हैसकर, पुलिस महासंचालक सुबोध जयस्वाल, मुंबई के पुलिस आयुक्त परमबीर सिंग और  विविध विभागों के अपर मुख्य सचिव एवं कोरोना पर मात किया है, ऐसे कोरोना योद्धा उपस्थित थे। 

0000000    

Flag Hoisting by Chief Minister at  Mantralaya on the Occasion of Independence Day

Priority to Provide Good Health Facilities – Chief Minister Uddhav Thackeray

Farmers will be Made Self Reliant The Interests of the Workers will be Safeguarded

 Mumbai ; 15: – The issue of health will be given priority and the highest priority of the government will be to provide quality health care and medical facilities in the rural as well as remote areas of the state, stated Chief Minister Uddhav Thackeray.  The flag was hoisted by  Chief Minister Uddhav Thackeray at the main government function held at the Mantralaya today on the occasion of the 73rd anniversary of Indian Independence.  He was speaking on the occasion. On the backdrop of Corona 150 testing labs have been started in the state.  He said that hospitals and medical colleges would be set up at various places in the state.

Stating that the main objective of this government is to make the farmers self reliant, the Chief Minister further said that the role of the government is to reap what it sold.  As a result, the people of the state will get quality food grains.  Farmers are constantly facing a mountain of debt.  Attention will be paid to how farmers can be permanently freed from this problem.  Under the Mahatma Jotirao Phule Farmers’ Debt Relief Scheme, about 29 Lakh 50 Thousand  farmers have been made free from debt by depositing an amount of Rs 18 thousand 980 crore in their accounts.  This year, the government has purchased a record 418 lakh quintals of cotton, which is unprecedented in the last ten years.

 The Chief Minister further said that farmers carry out green revolution while soldiers protect our country.  At the same time, our workers are managing the industry capably.  Therefore, the government will pay equal attention to the welfare of the workers.  To provide employment to many, the government has launched a portal named ‘Mahajobs’.  So it will attract new industries to the state.  Employment will be available to the workers.  Jai Jawan, Jai Kisan, Jai Kamgar will be the ideal of our state from now onwards.

 First state

Maharashtra has become the first state in the country to begin online education. The government has decided to implement slum redevelopment schemes in all major cities of the state to fulfill the dream of the poor common man for a home.

 Industry

 Since the unlock process started, about 50 to 60 thousand industries have been started in the state.  In the industry sector, MoUs worth around Rs 16 thousand crore have been signed with investors from 12 countries, he said.

 Covid warriors

 Doctors, nurses, other medical staff and police personnel , Cleanliness messengers who work day and night to cure Corona patients are the real Covid warriors. They are serving with a sense of dedication even during this time.  Citizens who have recovered from Corona are also fighters.  “I appreciate them,” he said.

 During the Corona period, the police

performed their duty of maintaining law and order.  But in doing so, some police officers and staff fell victim to Corona.  The Chief Minister also paid homage to them. The Chief Minister also lauded the performance of the troops who were ready to guard our borders day and night.  He saluted the martyred soldiers who sacrificed for the country.  He also congratulated the police officers and staff who have been awarded the President’s Medal, Bravery Medal and Commendable Service Medal in the state.  After expressing his thoughts, he had a courtesy meeting wuth the Covid warriors and thanked them.

 Thanks to all devotees

 Important festivals of all religions have come and gone during the Corona period.  But the people of all religions celebrated the festivals by following

following the rules peacefully and setting an example before the country.  I would also like to thank them on this occasion,  the Chief Minister said. 

 Important health decisions

 The government took swift action after finding Corona patients in the state.  For the first time in the country, a task force of expert doctors was formed. A task force of doctors at  district level was also forned.  Villagers and people were also made responsible by forming  Corona Village Vigilance Committees.  Maharashtra is a state of fighters.  No matter how many crises came, we overcame strongly.

 Corona testing has been increased on a large scale in the state.  Trekking, tracing and treatment of people in contact with patients have been accelerated. Setting up of patient facilities in the districts of the state is in full swing.  As a result, the patient growth has slowed down at some places. We will not stop till we win the fight against Corona. Still there is no vaccine for Corona.   But we have to  face this crisis through measures like keeping safe distance, self-discipline, keeping cleanliness, using masks and avoiding crowds.

 We had the lockdown earlier.  Chief Minister Shri Thackeray said that by enchanting Hariom again, we are resuming many things very carefully and slowly.

 For the Welfare of the Tribals

 The government converted 4.5 crore liters of milk into powder.  The government has decided to provide this milk powder free of cost to tribal children and women.  The Khawti scheme, which has been closed for the last few years, has been started and the government has decided to provide Rs 2,000 in cash and Rs 2,000 in manner of  essential items as 100 per cent subsidy.  This will bring relief to the economically disadvantaged tribals.

 Hindu Hraday Samrat Balasaheb Thackeray Samriddhi Highway

 Despite the crisis of Corona, the work of Hindu Hriday Samrat Balasaheb Thackeray Samridhi Highway is in full swing. This highway will not only be a road but there would be many facilities on both sides of this highway.  Therefore this highway will  bring prosperity in the true sense.

 Maharashtra will prove to be the first state in the country to have a revolution in health, agriculture and industry and other sectors wherever required. In the future too, Maharashtra will keep on showing direction to the country.  The Chief Minister expressed confidence that by bringing soldiers, farmers and workers together, we will transform Swarajya into Surajya.

 After the speech, Chief Minister Uddhav Thackeray greeted Chhatrapati Shivaji Maharaj, Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar and Rajmata Jijau by offering flowers to their status.  Mrs. Rashmi Thackeray, Chief Justice of the High Court Dipankar Datta, Mayor of Mumbai Mrs. Kishori Pednekar, Former Minister, MLA Deepak Kesarkar, Chief Secretary Sanjay Kumar, Principal Secretary and Chief Protocol Officer Mrs. Manisha Patankar-Mhaiskar, Director General of Police Subodh Jaiswal, Commissioner of Police Mumbai Parambir Singh , Additional Secretaries of of various departments and Corona warriors who defeated Corona were present on the occasion . 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here