सर्वांगीण विकासासोबत जिल्ह्याला कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्नशील – पालकमंत्री दत्तात्रय भरणे

0
11

सोलापूर, दि. १५ : जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विविध विकास प्रकल्प राबवले जात आहेत. त्यासाठी ४२४ कोटी रुपयांचा आराखडा आखण्यात आला आहे. सर्वांगीण विकासासोबतच जिल्ह्याला कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या ७३ व्या वर्धापनदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री श्री. भरणे बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूद्ध कांबळे, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांच्यासह लोकप्रतिनिधी, कोरोना योद्धे, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

पोलीस पथकाने मानवंदना दिली. यावेळी श्री. भरणे यांनी जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. श्री. भरणे म्हणाले, जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि सोलापूर महानगरपालिका यांच्या माध्यमातून व्यापक प्रयत्न सुरू आहेत. सोलापूर शहरातील कोरोनाचा संसर्ग आणि मृत्यूचा दर कमी करण्यात यश आले असून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही याचप्रमाणे यश येईल. कोरोना विषाणूच्या मुकाबल्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून भरीव निधीची तरतूद केली असून राज्य स्तरावरुनही भरघोस निधी दिला जाईल.

जिल्ह्यातील आरोग्याच्या पायाभूत सुविधा अधिक मजबूत होण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे बळकटीकरण करण्यावर भर देण्यात येईल. खास महिला आणि मुलांसाठीच्या स्वतंत्र रुग्णालयाची उभारणी लवकरच पूर्ण करण्यात येईल. साथरोग नियंत्रण रुग्णालय सुरु केले जाणार असून उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे मनुष्यबळ आणि औषधांचा तुटवडा भासू नये यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे, असेही त्यांनी नमूद केले.

सोलापूर जिल्हा शेतीवर अवलंबून आहे. कृषी औद्योगिक जिल्हा म्हणून ओळख अधिक दृढ होण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. यंदा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने पेरणीखालील क्षेत्र वाढले आहे. ही बाब अतिशय समाधानाची आहे. शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री विमा योजनेस चांगला प्रतिसाद दिला आहे. शेती आणि शेतकरी सक्षम व्हावे यासाठी उन्नत शेती, समृद्ध शेतकरी, कृषी यांत्रिकीकरण, गट शेतीस प्रोत्साहन, मागेल त्याला शेततळे या योजनांना चांगले यश मिळत आहे, असे ते म्हणाले.

जिल्ह्यातील रस्ते विकासाचे काम प्राधान्याने हाती घेण्यात आले आहे. पालखी मार्गांना महामार्गांचा दर्जा देण्यात आला असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने या रस्त्यांची कामे सुरू आहेत. या कामांसाठीचे भूसंपादन गतीने करण्यात आले आहे. भूसंपादनापोटी शेतकऱ्यांना सुमारे दोन हजार कोटी रुपयांची भरपाई देण्यात आली असून गावांतील वाहतूक सुरळीत होण्यासाठी पालकमंत्री पाणंद रस्ते योजना प्रभावीरित्या राबवली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रशासकीय कामकाजात माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर होत असून शेतकऱ्यांना संगणकीकृत सात बारा उतारे दिले जात आहेत. स्वामित्व योजनेअंतर्गत गावठाणांची ड्रोनद्वारे मोजणी करण्यासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातील दहा गावांची निवड करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना जमिनींचे उतारे झटपट मिळण्यासाठी राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमाअंतर्गत सातबारा उताऱ्यांसोबत ८/अ उताराऱ्यांचेही संगणकीकरणाचे काम सुरु आहे, असेही त्यांनी सांगितले.

वनक्षेत्र वाढविण्यासाठी यंदा सुमारे अडीचशे हेक्टर क्षेत्रावर पावणेतीन लाख रोपांची लागवड करण्याचे उद्दिष्ट्य आहे. वृक्ष लागवडीच्या या मोहिमेत नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून विकासात योगदान देण्याचे आवाहनही श्री. भरणे यांनी केले.

यावेळी महसूल, पोलीस, जिल्हा परिषद, सार्वजनिक आरोग्य, महानगरपालिका यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

कोरोना योद्ध्यांचा सन्मान

जिल्ह्यातील उत्कृष्ट काम केलेल्या महसूल, पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी, कोरोना काळात काम केलेले अधिकारी, कर्मचारी, कोरोना योद्धे, सामाजिक संस्था यांचा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी कर्तव्यावर असताना कोरोनामुळे निधन झालेले पोलीस नाईक जाकीर हिदायतरसूल शेख यांच्या वारसांना शासनाकडून मंजूर ५० लाख आणि पोलीस महासंचालक यांच्या विशेष सहायता निधीतून १० लाख रूपयांचा धनादेश पालकमंत्री श्री. भरणे यांच्या हस्ते देण्यात आला.

सन्मानार्थी खालीलप्रमाणे

पोलीस दलात उत्कृष्ठ सेवा केल्याने पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह प्राप्त- ग्रामीण- पोलीस निरीक्षक अरूण सावंत (स्थानिक गुन्हे शाखा), विश्वंभर गोल्डे (माळशिरस), सहायक पोलीस निरीक्षक सुनिल जाधव (करमाळा), सहायक फौजदार नाशिर शेख (तालुका पोलीस ठाणे), हवालदार महेश क्षीरसागर (सुरक्षा शाखा), सुभाष राठोड (विशेष शाखा), शहर- पोलीस निरीक्षक संजय जगताप, सहायक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ गुरव, रणजित माने, पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ देशमाने, हवालदार उमाकांत कदम, संजय आवताडे, गजानन कणगेरी, मुनीरोद्दीन शेख, इमाम कासीम महेंदी, पोलीस नाईक धनाजी सुरवसे, संजय सावरे, मंजूनाथ मुत्तनवार, राहुल फुटाणे, पोलीस शिपाई श्रीमती श्रीदेवी म्हेत्रे.

महसूल विभाग – प्रांताधिकारी सचिन ढोले (पंढरपूर), तहसीलदार राजेश चव्हाण (माढा), नायब तहसीलदार तुषार देशमुख (माळशिरस), लघुलेखक प्रदीप शिंदे (जिल्हाधिकारी स्वीय सहायक), मंडल अधिकारी जे.आर. धनुरे (बोरामणी), अव्वल कारकून जे.डी. पवार (जिल्हाधिकारी कार्यालय), तलाठी श्रीमती ए.ए. जोरी (उत्तर सोलापूर तहसील), लिपीक टंकलेखक केतन राचमाले (जिल्हाधिकारी कार्यालय), वाहन चालक आर.एस. पालक (मोहोळ तहसील), पोलीस पाटील सचिन माने (कोंडबावी, ता. माळशिरस), कोतवाल विकास माने (लक्ष्मीदहिवडी, ता. मंगळवेढा), शिपाई राजू आगळे (अपर जिल्हाधिकारी कार्यालय).

कोरोना काळात उत्कृष्ट कामकाज करणारे कोरोना योद्धे खालीलप्रमाणे

उपायुक्त धनराज पांडे, पंकज जावळे, अजय पवार (महानगरपालिका), उपजिल्हाधिकारी शैलेश सुर्यवंशी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. ए.एन. मस्के, विभाग प्रमुख डॉ. व्ही.एन. धडके (शासकीय रूग्णालय आणि महाविद्यालय), पोलीस नाईक महेश कांबळे, पोलीस शिपाई श्रीमती प्रियंका आखाडे, होमगार्ड गजानन स्वामी, विशाल वजाळे (ग्रामीण पोलीस), वैद्यकीय अधिकारी डॉ.वैशाली शिरशेट्टी, आरोग्य निरीक्षक सचिन कदम, परिचर शिवम अलकुंटे, आशासेविका सरोजा वाघमारे, सफाई कामगार नागनाथ केशपागा, नागुबाई रातुल, झाडूवाली शिवबाई बनसोडे, स्मशानभूमी रखवालदार राजू डोलारे (महानगरपालिका)

वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद पुरी, अधिपरिचारिका श्रीमती रुपाली पर्वतराव, वॉर्ड बॉय अंकुश क्षीरसागर, वॉर्ड कामगार सिता घंटे (जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय), वैद्यकीय अधिकारी डॉ.वृषाली पाटील, आरोग्यसेविका श्रीमती एस. एम. मठे, आशासेविका फरहान शेख, भागिरथी कुंभार, अॅम्ब्युलन्स वाहन चालक गणेश झुंझार( जिल्हा परिषद), नायब तहसीलदार प्रविण घम, अव्वल कारकून चंद्रकांत हेडगिरे, लिपीक अजित कांबळे, सुशांत देशपांडे, विजय काकडे, शिपाई रमेश माळी, मोजणीदार समीर पाटील, लिपीक अतुल रणसुभे लिपीक प्रशांत माशाळकर, अव्वल कारकून राजू शेळके (जिल्हाधिकारी कार्यालय), लघुलेखक निम्नश्रेणी सागर लोंढे (जिल्हा कृषी कार्यालय), मंडल अधिकारी विजयकुमार जाधव (म्हैसगाव, कुर्डूवाडी), तलाठी विकास माळी (सांगोला), कोतवाल फिरोज सुतार (तळसंगी), श्रीमती कविता चव्हाण (टायगर ग्रुप ऑल इंडिया) आणि चंद्रिका चौहान (उद्योगवर्धिनी सामाजिक संस्था).

पोलीस आयुक्त कार्यालय-

हवालदार अशोक लोखंडे, पोलीस नाईक प्रवीण जाधव, अंबाजी कोळी, इम्रान शेख, पोलीस शिपाई मनीष जाधव, भीमराव काळे, संपत करबाळे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here