नागरिकत्व कायद्याबाबत सिटीझन ऑफ इंडिया संस्थेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन

0
10

नागपूर,दि. 20 : सुधारित नागरिकत्व कायद्यासंदर्भात नागपूर येथील सिटीझन ऑफ इंडिया संस्थेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की,या सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे समाजात मनभेद निर्माण होतील. संविधानाच्या तत्त्वांची अवहेलना होईल. त्यामुळे हा कायदा लागू करणे उचित ठरणार नाही.

त्यावर मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी शिष्टमंडळाला दिलासा दिला की, कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून निर्णय येईलच. या दरम्यान समाजाने मनात  कुठलीही भीती बाळगू नये.

यावेळी महाराष्ट्र मुस्लिम समाजाचे धर्मगुरू मुफ्ती मुजिब अश्रफ,आमदार अमीन पटेल,आमदार अब्दुल सत्तार,आमदार वजाक  मिर्झा,डॉ. मोहम्मद अवेश हसन,आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here