विद्यार्थ्यांनी देशाच्या उभारणीत योगदान देण्याचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचे आवाहन

0
10

सिम्बायोसिस विद्यापीठाचा सोळावा पदवीदान समारंभ संपन्न

पुणे,दि. 8 : भारत अनेक शतकांपासून जागतिक ज्ञान केंद्र आहे. आपल्या देशाला तक्षशिला ते नालंदा असा मोठा शैक्षणिक परंपरेचा वारसा लाभला आहे. हा वारसा जोपासत विद्यार्थ्यांनी आपल्या बौद्धिक संपदेचा वापर देशाच्या उभारणीसाठी करण्याचे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी आज केले.

लवळे येथे सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या सोळावा पदवीदान समारंभश्री.नायडू यांच्या उपस्थितीत पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यपाल भगतसिंहकोश्यारी, मंत्री छगन भुजबळ, विद्यापीठाचे कुलपती शां. ब. मुजूमदार, कुलगुरू रजनी गुप्ते, प्र. कुलगुरू तथा प्रधान संचालिका विद्या येरवडेकर,  कुलसचिव एम. जी. शेजूल उपस्थित होते.

उपराष्ट्रपतीश्री.नायडू म्हणाले, शिक्षण घेण्यासाठी जात,‍ लिंग, भाषा, देश यांची कोणतीही बंधने नसतात. शिक्षणामुळे जगभरातील संधीची दारे उघडली जातात. शिक्षण हे प्रत्येकाला जबाबदारीची जाणीव करुन देते. आपल्या देशाला तक्षशिला ते नालंदा असा उज्ज्वल शैक्षणिक वारसा आहे. संपूर्ण आशिया खंडातील विद्यार्थी शिक्षणासाठी भारतात येत होते. हा “वसुधैव कुटुंबकम्”चा वारसा सिम्बायोसिस विद्यापीठ चालवत आहे. जगभरातील विविध देशांचे विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणासाठी येतात, ही गौरवाची बाब आहे.

पुणे शहर हे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. तसेच न्यायमूर्ती रानडे, गोपाळ कृष्ण गोखले, गोपाळ गणेश आगरकर, लोकमान्य टिळक, वासुदेव बळवंत फडके या लोकोत्तर पुरुषांचा वारसा या शहराला लाभला आहे. या शहराशी महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही ऋणानुबंध असल्याचे श्री. नायडू यांनी सांगितले.

यावेळी विद्यापीठातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना उपराष्ट्रपतींच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. उपराष्ट्रपतींच्या हस्ते प्रसिद्धगीतकार जावेद अख्तर, शास्त्रज्ञ डॉ. टेसी थॉमस यांना मानद डॉक्टरेट पदवी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली.

यावेळी जावेद अख्तर, डॉ. टेसी थॉमस यांची भाषणे झाली. प्रास्ताविक डॉ. शां. ब. मुजूमदार यांनी केले तर आभार विद्यापीठाच्या प्र. कुलगुरू तथा प्रधान संचालिका विद्या येरवडेकर यांनी मानले.

कार्यक्रमानंतर उपराष्ट्रपतीश्री.नायडूयांच्या हस्ते विद्यापीठाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, पालक, शिक्षक उपस्थित होते. 0000

सिम्बायोसिस विश्वविद्यालय का 16 वां पदवीदान समारोह संपन्न

छात्रों ने देश के निर्माण में योगदान देना चाहिए- उपराष्ट्रपति एम. व्यंकैया नायडू

पुणे, दि. 8 : भारत कई दशकों से वैश्विक ज्ञान का केंद्र रहा है। यह देश तक्षशिला से नालंदा इस तरह के एक बड़े शैक्षणिक परंपरा की विरासत से लाभप्राप्त है। इस विरासत को संभालते हुए छात्रों ने देश के निर्माण के लिए अपने बौद्धिक संपदा का उपयोग करने का आवाहन उपराष्ट्रपति एम. व्यंकैया नायडू ने आज यहाँ पर किया।

लवले स्थित सिम्बायोसिस अंतरराष्ट्रीय अभिमत (Deemed University) विश्वविद्यालय का 16 वां पदवीदान समारोह उपराष्ट्रपति एम. व्यंकैया की उपस्थिति में संपन्न हुआ, इस अवसर पर वे बोल रहे थे। समारोह में राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मंत्री छगन भुजबल, विश्वविद्यालय के कुलपति शां. ब. मुजूमदार,  कुलपति रजनी गुप्ते,  प्रतिकुलपति तथा प्रधान संचालिका विद्या येरवडेकर,  कुलसचिव एम. जी. शेजूल उपस्थित थे।

उपराष्ट्रपति एम. व्यंकैया नायडू ने कहा कि शिक्षा प्राप्त करने के लिए जात, लिंग, भाषा, देश इस तरह के कोई भी बंधन नहीं रहते। शिक्षा से विश्वभर में अवसर प्राप्त हो सकते है। शिक्षा यह प्रत्येक को अपनी ज़िम्मेदारी का एहसास कराती है। अपने देश का तक्षशिला से नालंदा ऐसा उज्ज्वल शैक्षणिक इतिहास है। पूरा एशिया खंड के छात्र शिक्षा के लिए भारत में आते थे। यह वसुधैव कुटुंबकम् का इतिहास सिम्बायोसिस विश्वविद्यालय आगे बढ़ा रहा है। विश्वभर के विविध देशों के छात्र यहाँ पर शिक्षा प्राप्त करने के लिए आते है, यह बात गौरवास्पद है।

उपराष्ट्रपति ने आगे कहा कि पुणे शहर यह महाराष्ट्र की सांस्कृतिक राजधानी है। साथ ही न्यायमूर्ती रानडे,  गोपाल कृष्ण गोखले, गोपाल गणेश आगरकर, लोकमान्य तिलक, वासुदेव बलवंत फडके ऐसे लोकोत्तर पुरुषों का इतिहास इस शहर को मिला है। इस शहर से महात्मा गांधी और डॉ. बाबासाहेब आंबेडकर का ऋणानुबंध होने की बात भी श्री. नायडू ने कहीं।

समारोह में विश्वविद्यालय के गुणवत्ताधारक छात्रों को उपराष्ट्रपति के हाथों पदवी प्रदान की गई। उपराष्ट्रपति के हाथों प्रसिध्द गीतकार जावेद अख्तर, शास्त्रज्ञ डॉ. टेसी थॉमस को मानद डॉक्टरेट पदवी सन्मानपूर्वक प्रदान की गई।

समारोह में जावेद अख्तर, डॉ. टेसी थॉमस का भी भाषण हुआ। समारोह का प्रास्ताविक डॉ. शां. ब. मुजूमदार ने किया और विश्वविद्यालय  के प्र. कुलपति  तथा प्रधान संचालिका विद्या येरवडेकर ने उपस्थितों के प्रति आभार व्यक्त किया।

कार्यक्रम के पश्चात उपराष्ट्रपति के हाथों विश्वविद्यालय के परिसर में वृक्षारोपण किया गया। इस दौरान विविध क्षेत्रों के मान्यवर, छात्रों के परिजन, शिक्षक एवं छात्र उपस्थित थे।

0000 

16 th convocation ceremony of Symbiosis University concluded

Students should contribute in construction of the nation -Vice President M Venkaiah Naidu

Pune, December 8:- India is the centre for knowledge since decades. We have the educational heritage from Takshashila to Nalanda. The students should use their intellectual property to preserve the heritage of the nation and utilize it in construction of the nation, appealed Vice President of India M Venkaiah Naidu.

He was speaking during the 16th convocation ceremony of Symbiosis International deemed University in Lavale. Governor Mr Bhagat Singh Koshyari, Minister Chhagan Bhujbal, Chancellor of University S B Mujumdar, Vice- Chancellor Rajni Gupta, Pro-Vice Chancellor and Principal Director Vidya Yeravdekar, Registrar MG Shejul were also present during the ceremony.

Speaking further Vice president Venkaiah Naidu said there are no barriers of cast, gender, language and nation for seeking knowledge. He said that due to education, the doors of opportunities in the entire world are opened. Education makes one aware of responsibilities. Our nation has rich heritage of education right since Takshashila to Nalanda. Students from the entire Asian continent visit India for education. The legacy of Vasudhaiva Kutumbakam is been taken ahead by the Symbiosis University. Students from various parts of the world come here for pursuing quality education and this is a matter of pride, he added.

The vice president further said that Pune is the cultural capital of Maharashtra. Great personalities like justice Ranade, Gopal Krishna Gokhale, Gopal Ganesh Agarkar, Lokmanya Tilak, Vasudev Balwant Phadke had close relation with Pune. Mahatma Gandhi and Dr Babasaheb Ambedkar were also associated with Pune. 

The meritorious students of the university were conferred degrees at the hands of the Vice-president. Famous writer Javed Akhtar and scientist Dr Tessy Thomas were bestowed on honorary doctorate during the program. Javed Akhtar and Dr. Tessy Thomas also spoke on the occasion. Introductory speech of the program was delivered by Dr S B Mujumdar. Pro Vice-Chancellor and principal Director Vidya Yeravdekar proposed the vote of thanks. The vice president planted trees in the premises of the University after the program. Prominent personalities from various fields, teachers and students were present in large number.

0000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here