महाराष्ट्राला आठ ‘राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कार’

0
11

                        

नवी दिल्ली,दि.9 : उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी आज महाराष्ट्रातील एकूण आठ संस्थांना  केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री डॉ. महेंद्रनाथ पांडे यांच्या हस्ते राष्ट्रीय उद्योजकता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या 5 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून येथील प्रवासी भारतीय केंद्रात आज राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कार 2019’ चे वितरण करण्यात आले. मंत्रालयाचे सचिव डॉ. के.पी. कृष्णनन, सह सचिव ज्योत्स्ना सिटलींग आणि दलित चेंबर ऑफ कॉमर्स (डिक्की)चे संस्थापक मिलींद कांबळे यावेळी मंचावर उपस्थित होते. 

देशातील प्रतिभावान युवा लघुउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कार अंतर्गत आज एकूण चार श्रेणींमध्ये देशातील 36 संस्थांना सन्मानित करण्यात आले. यात महाराष्ट्रातील एकूण 8 संस्थांचा समावेश आहे.

या पुरस्कारांना  आणि  अशा दोन श्रेणींमध्ये विभागण्यात आले होते. अ श्रेणीमध्ये तीन उपश्रेणी करण्यात आल्या होत्या. याअंतर्गत 1’ या उपश्रेणीत 1 लाख रुपयांपर्यंत सुरुवातीची गुंतवणूक असणाऱ्याउद्योजकांची निवड करण्यात आली. या श्रेणीमध्ये पुण्यातील लोहगाव परिसरातील अर्ली फुड्स प्रा.लि. चा सन्मान करण्यात आला. संस्थेच्या संस्थापक शालिनी कुमार आणि विजयालक्ष्मी नागराज यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 2016 मध्ये स्थापन झालेली ही संस्था मुलांसाठी ऑर्गनिक बिस्कीट तयार करते. स्थानिक महिलांना या उद्योगामुळे रोजगार उपलब्ध झाला आहे.

1 श्रेणीमध्येच नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी येथील क्रांतीज्योती महिला बचत गटाला सन्मानित करण्यात आले. बचत गटाच्या दीपा चौरे, अरुणा खडसे आणि अंजुमन शेख यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 2012 पासून कार्यरत या बचत गटाच्या माध्यमातून 100 महिला उद्योजिका तयार झाल्या असून कापडी पिशव्या बनविण्याचे कौशल्य त्यांनी अवगत केले आहे.

2’ या उपश्रेणीत 1 लाख ते 10 लाखापर्यंतची आरंभीची गुंतवणूक असणाऱ्याउद्योजकांची निवड करण्यात आली. यात राज्यातील 4 संस्थांना सन्मानित करण्यात आले. सातारा जिल्ह्यातील पाचगणी नजीकच्या देवरी गावातील देवरी कला गाव या संस्थेला यावेळी सन्मानित करण्यात आले. संस्थेचे संस्थापक मंदाकिनी व अतुल माथुर, सुरेश पुंगटी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.  2009 मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेने स्थानिक आदिवासींच्या कला व संस्कृतीची जोपासणा करून त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. 

याच श्रेणीत नवी मुंबई येथील लेटस् कँप आऊट कँप ग्राऊंड प्रा.लि. चा सन्मान करण्यात आला. संस्थेचे संस्थापक अभिजीत आणि मंगला म्हात्रे यांनी पुरस्कार स्वीकारला. 2010 मध्ये स्थापना असलेल्या संस्थेने मोठ्या शहरानजिकच्या ग्रामीण भागातील जनतेला त्यांच्या शेतावर उत्तम नियोजनबध्द मनोरंजन पार्क उभारून देत रोजगार उपलब्ध करून दिला आहे. वर्धा येथील ग्लोबल एंटरप्रायजेसचाही यावेळी सन्मान करण्यात आला. संस्थेचे संस्थापक बलवंत ढगे यांनी पुरस्कार स्वीकारला. 2012 मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेने तंत्रशुद्ध पद्धतीचा वापर करून खादी कापडांचा उद्योग सुरु केला आहे. या माध्यमातून स्थानिकांना रोजगारही उपलब्ध झाला आहे. नाशिक येथील स्त्री स्वाभिमान सॅनिटरी नॅपकीन निर्मिती युनिटचाही यावेळी सन्मान करण्यात आला. दिव्यांग असूनही समाजसेवेच्या प्रेरणेने 2016 मध्ये ही संस्था स्थापन करणारे रवींद्र सुपेकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या संस्थेने बायोडीग्रेडेबल आणि रासायनिक द्रव्यांचा उपयोग न करता व स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकिनची निर्मिती करत ग्रामीण भागातील महिलांना या नॅपकिन्स उपलब्ध करून दिल्या.

3’ या उपश्रेणीत 10 लाख ते 1 कोटीपर्यंतची आरंभीची गुंतवणूक असणाऱ्याउद्योजकांची निवड करण्यात आली. या श्रेणीत ठाणे पश्चिम येथील स्काऊट माय ट्रिप या संस्थेला सन्मानित करण्यात आले. संस्थेचे संस्थापक विनीत राजन आणि दीपक अनंथ यांनी पुरस्कार स्वीकारला. पर्यटकांना विविध सोयी उपलब्ध करून देणारी ही संस्था 2016 मध्ये स्थापन झाली आहे. 

 श्रेणी अंतर्गत पर्यावरणपूरक वस्तू निर्मात्यांना एकूण 6 पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात राज्यातील पुणे येथील पाषाण भागातील व्हेंचर सेंटर या संस्थेचा सन्मान करण्यात आला. संस्थेच्या नुरेल पेझारकर आणि डॉ. रेणुका दिवाण यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 

 श्रेणीतील पुरस्काराचे स्वरूप 5 लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे आहे  तर  ब श्रेणीतील पुरस्काराचे स्वरूप 10 लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे आहे. 2016 पासून दरवर्षी राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here