राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी एकूण ५ हजार ५३४ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल

0
10

अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांची माहिती

मुंबई, दि. ०४ : विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यात विविध मतदारसंघांमध्ये ३ हजार ७५४ उमेदवारांनी ५ हजार १६३ नामनिर्देशनपत्रे दाखल केली. आजपर्यंत एकूण ५ हजार ५३४ उमेदवारांनी ७ हजार ५८४ नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी श्री. दिलीप शिंदे यांनी दिली. नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याची अंतिम मुदत आज संपली.

सर्वाधिक उमेदवार भोकरमध्ये तर सर्वात कमी उमेदवार माहिम आणि शिवडीमध्ये

अधिक माहिती देताना अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी श्री. शिंदे म्हणाले, आज नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदारसंघात सर्वाधिक १३५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यापाठोपाठ पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात ८५ उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे दाखल केली. सर्वात कमी नामनिर्देशनपत्रे मुंबईतील माहिम आणि शिवडी या मतदारसंघांमध्ये दाखल करण्यात आली. या मतदारसंघांमध्ये प्रत्येकी ४ उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे आजअखेर दाखल केली.   

नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या संपूर्ण कालावधीत आजअखेर नंदुरबार जिल्ह्यात ४ मतदारसंघात एकूण ४४ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केली. तर धुळे जिल्ह्यात ५ मतदारसंघात ७० उमेदवार, जळगाव जिल्ह्यात ११ मतदारसंघात १७५ उमेदवार, बुलढाणा जिल्ह्यात ७ मतदारसंघात ९५ उमेदवार, अकोला जिल्ह्यात ५ मतदारसंघात १०७ उमेदवार, वाशिम जिल्ह्यात ३ मतदारसंघात ६३ उमेदवार, अमरावती जिल्ह्यात ८ मतदारसंघात १७६ उमेदवार, वर्धा जिल्ह्यात ४ मतदारसंघात ६४ उमेदवार, नागपूर जिल्ह्यात १२ मतदारसंघात २५३ उमेदवार, भंडारा जिल्ह्यात ३ मतदारसंघात ७० उमेदवार, गोंदीया जिल्ह्यात ४ मतदारसंघात ७६ उमेदवार, गडचिरोली जिल्ह्यात ३ मतदारसंघात ४७ उमेदवार, चंद्रपूर जिल्ह्यात ६ मतदारसंघात ११० उमेदवार, यवतमाळ जिल्ह्यात ७ मतदारसंघात १३६ उमेदवार, नांदेड जिल्ह्यात ९ मतदारसंघात ४०२ उमेदवार, हिंगोली जिल्ह्यात ३ मतदारसंघात ५८ उमेदवार, परभणी जिल्ह्यात ४ मतदारसंघात ८८ उमेदवार, जालना जिल्ह्यात ५ मतदारसंघात १५० उमेदवार, औरंगाबाद जिल्ह्यात ९ मतदारसंघात २४७ उमेदवार, नाशिक जिल्ह्यात १५ मतदारसंघात २४३ उमेदवार, पालघर जिल्ह्यात ६ मतदारसंघात ८० उमेदवार, ठाणे जिल्ह्यात १८ मतदारसंघात ३०० उमेदवार, मुंबई उपनगर जिल्ह्यात २६ मतदारसंघात ३३५ उमेदवार, मुंबई शहर जिल्ह्यात १० मतदारसंघात १०६ उमेदवार, रायगड जिल्ह्यात ७ मतदारसंघात १३२ उमेदवार, पुणे जिल्ह्यात २१ मतदारसंघात ४४१ उमेदवार, अहमदनगर जिल्ह्यात १२ मतदारसंघात २०३ उमेदवार, बीड जिल्ह्यात ६ मतदारसंघात २३२ उमेदवार, लातूर जिल्ह्यात ६ मतदारसंघात १३५ उमेदवार, उस्मानाबाद जिल्ह्यात ४ मतदारसंघात ९२ उमेदवार, सोलापूर जिल्ह्यात ११ मतदारसंघात २७३ उमेदवार, सातारा जिल्ह्यात ८ मतदारसंघात १२५ उमेदवार, रत्नागिरी जिल्ह्यात ५ मतदारसंघात ४५ उमेदवार, सिंधुदूर्ग जिल्ह्यात ३ मतदारसंघात ३२ उमेदवार, कोल्हापूर जिल्ह्यात १० मतदारसंघात २०४ उमेदवार, सांगली जिल्ह्यात ८ मतदारसंघात १२५ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केली आहेत.

००००

इरशाद बागवान / वि.सं.अ. / दि.04.10.2019

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here