पर्युषणपर्वानिमित्त जैन संघ रथयात्रेला राज्यपालांच्या उपस्थितीत प्रारंभ

0
11

मुंबई, दि 22 : पर्युषण पर्वानिमित्त दक्षिण मुंबई येथे आयोजित जैन संघ रथयात्रेचा आज महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी झेंडा दाखवून शुभारंभ केला.

मुंबई जैन संघटनेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 200 जैन संघांचे साधू – साध्वी तसेच हजारो नागरिक यावेळी उपस्थित होते. जैन समाजाच्या वतीने मुंबई मध्ये पहिल्यांदाच या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील जैन समाजातील सर्व समुहाचे गुरु एकत्र येऊन समाजाला एकतेचा संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला.

पर्युषणपर्वानिमित्त शुभेच्छा देताना राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, केवळ रुपवान,धनवान,बलवान असणे पुरेसे नाही. तर मनुष्याने क्षमावान असणे महत्त्वाचे आहे. रथयात्रेला संबोधित करताना राज्यपाल म्हणाले,या रथयात्रेच्या माध्यमातून मुंबईतील जैन बांधवांचा मोठा महासागर पहावयास मिळाला आहे.

0 0 0

Maha Governor  flags off Jain Sangh Rath Yatra

Mumbai, 22nd Sept 2019 : The Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari today (22nd Sep) flagged off a largely attended Jain Sangh Rath Yatra in Mumbai. The Rath Yatra was organized to commemorate the holy Paryushan Parva. More than 200 Jain Sanghas, Sadhus, Sadhvis and thousands of citizens participated in the Yatra. Speaking on the occasion the Governor said it is not enough to become rich, handsome and physically strong. He said it is important for human beings to bear the virtue of Kshamapana (forgiveness).

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here