जिल्ह्यातील पोलीस दलाच्या सक्षमीकरणाला प्राथमिकता; जिल्हा नियोजनमधून २८ कोटी निधी – पालकमंत्री गुलाबराव पाटील

0
9

गुन्हेगारी थांबविण्यासाठी नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा – नाशिक विशेष पोलीस महानिरीक्षक दतात्रय कराळे

जळगाव दि. ६ (जिमाका) : पोलीस कामकाजाचे स्वरूप दिवसेंदिवस विस्तारत असून त्यासाठी आधुनिक यंत्रणा, सुसज्ज कार्यालय अत्याधुनिक साधन सामुग्री असणे ही काळाची गरज झाली आहे. त्यासाठीच पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात येत आहे. जिल्ह्यातील पोलीस दलाच्या सक्षमीकरणाला प्राथमिकता देण्यात आली असून इमारत, वाहने इत्यादीसाठी जिल्हा वार्षिक नियोजनमधून २८ कोटी एवढा निधी देण्यात आल्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आज सांगितले.

पाळधी व रामानंद नगर येथील पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी यावेळी आमदार राजू मामा भोळे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दतात्रय कराळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी , चाळीसगाव अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर, जळगाव अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, धरणगाव पोलीस निरीक्षक उमेश डमाळे, चोपडा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक सचिन शिरसाठ , जिल्हा परिषद सदस्य प्ताताप्राव पाटील, सा.बा.चे कार्यकारी अभियंता गिरीश सूर्यवंशी, राजू परदेशी, प्रांजळ पाटील, उप अभियंता एस.डी. पाटील, योगेश अहिरे, पाळधी बु. चे सरपंच विजय सिंग पाटील, उपसरपंच राहुल ठाकरे, पाळधी खु. चे सरपंच लक्ष्मीबाई कोळी, उपसरपंच भारती पाटील, सरीता कोल्हे माळी, आशुतोष पाटील, ग्रामविकास अधिकारी पाठक, सचिन पवार, संजय पाटील आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, पोलीस आपल्या सुरक्षेसाठी 24 तास देतात, ही त्यांची सेवा अत्यंत महत्त्वाची असून त्यांना कोणत्याही साधनाची कमतरता पडू नये, असा शासनाचा प्रयत्न आहे. जिल्हा प्रशासनाचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे उत्तम काम करत असून ते कामाच्या बाबतीत नो पेंडंसी कलेक्टर आहेत.

पोलीस प्रशासनाचे कर्तव्य आहे जनतेच्या सुरक्षितता पुरविण्याची, ते कर्तव्य आम्ही करत आहोत. पोलीस बळकटीकरणासाठी पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांनी जिल्हा वार्षिक नियोजनामधून निधी मिळवून दिल्याबद्दल गौरवपूर्ण उल्लेख करून नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दतात्रय कराळे यांनी गुन्हेगारी थांबविण्यासाठी जनतेला सहकार्याचे आवाहन केले. या दोन्ही ठाण्याच्या इमारती एका वर्षात पूर्ण करु, अशी ग्वाही ही त्यांनी यावेळी दिली.

आज एसआरपीएफ चा वर्धापन दिन तो योग गाठून दोन्ही पोलीस ठाण्यांच्या इमारतीचे भूमिपूजन होत असल्याचे सांगून पोलीस स्टेशन हे सर्वसामान्यांच्या संरक्षणाचे ठिकाण आहे, घाबरण्याचे नाही. त्यामुळे नागरिकांनी गुन्हेगारी संपविण्यासाठी पोलिसांना मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.

प्रा. दीपक पवार यांनी सूत्रासंचालन केले. पोलीस उपअधिक्षक सुनील नंदवाडकर यांनी प्रास्ताविक केले. पोलीस निरीक्षक उमेश डमाळे यांनी आभार मानले.

०००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here