अल्पसंख्याक समाजाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा-अल्पसंख्याक विकास मंत्री दत्तात्रय भरणे 

मुंबई,दि.५:-राज्यातील अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विविध योजना राबविल्या जातात. या योजनांचा लाभ या घटकातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा, यासाठी काटेकोर नियोजन करा, असे निर्देश अल्पसंख्याक विकास मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

अल्पसंख्याक विकास मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षेतेखाली विभागाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत मंत्रालयात आज आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला विभागाचे सचिव रुचेश जयवंशी, राज्यातील जिल्हाधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी (दूरदृश्य प्रणालीद्वारे) उपसचिव मिलिंद शेणॉय, श्रीमती विशाखा आढाव उपस्थित होते.

मंत्री श्री. भरणे म्हणाले, अल्पसंख्याक समाजासाठीच्या योजनांची प्रभावी अमंलबजावणी करावी, लोकाभिमुख उपक्रम राबवावेत. या समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी निधी कमी पडू देणार नाही. अल्पसंख्याक समाजाला मुख्य प्रवाहत आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यांच्या सर्वांगिण प्रगतीसाठी कटिबद्ध आहे. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती योजना, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचा निधी वाढविण्यासाठी पाठपुरावा करणे, स्वयंसहायता बचतगट योजना, शाळा आधुनिकीकरण अशा महत्वपूर्ण योजना आहेत. अशा सर्व लोकाभिमुख योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा, अशी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली.
000000