‘जल जीवन मिशन’ची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा – मंत्री गुलाबराव पाटील

छत्रपती संभाजीनगरमधील कामांचा आढावा

मुंबई, दि. १०: ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत छत्रपती संभाजीनगरमधील जीवन प्राधिकरण अंतर्गत एकूण ११६४ योजनांची कामे जलदगतीने पूर्ण करण्यासंदर्भातील कार्यवाहीचा आढावा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतला. नळ पाणी पुरवठा अंतर्गत १०० टक्के नळ जोडणी पूर्ण झालेल्या ७१७  योजना असून, उर्वरित ४४० कामे पूर्ण करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ‘जल जीवन मिशन’अंतर्गत योजनांची आर्थिक आणि भौतिक प्रगती, सिल्लोड, गंगापूर-वैजापूर ग्रीड, देवगाव, पिशोर, लाडसावंगी, केळगाव, चारनेर, शिरसाळा, ३५ गावे औरंगाबाद, रेल कनकावतीनगर पाणी पुरवठा योजनांची सद्य:स्थिती, कामे पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या समस्या, १०० दिवस कार्यक्रम अंतर्गत पूर्ण करण्यात येणाऱ्या कामांचा मंत्री श्री. पाटील यांनी आज मंत्रालयातील दालनात आढावा घेतला.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नळ जोडणी अंतर्गत ७१८ गावांत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत नळ जोडणीच्या १४ च्या राबविण्यात येत आहे. यामध्ये १४ लाख २२ हजार ६५१ लोकसंख्येत २ लाख ८५ हजार ९८ घरे आहेत. २ लाख २६ हजार ६५४ नळ जोडणी पूर्ण केली असून, दोन लाख ३७ हजार ११५ नळ जोडणी १०० दिवस कार्यक्रमाअंतर्गत साध्य करण्यात येणार आहे.

या बैठकीस विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, विशेष कार्यकारी अधिकारी प्रशांत भांबरे, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी (ई- उपस्थित होते.) जल जिवन मिशनचे अभियान संचालक ई. रविंद्रन, मुख्य अभियंता मनिषा पलांडे, कार्यकारी अभियंता दी. ह. कोळी, अजित वाघमारे, वरिष्ठ भू-वैज्ञानिक जीवन बेडवाल यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

०००