6 लाख 10 हजार जण क्वॉरंटाइन – गृहमंत्री अनिल देशमुख
मुंबई दि. 18 – लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी 4 लाख 90 हजार 647 पास पोलीस विभागामार्फत देण्यात आले. तसेच 6 लाख 10 हजार व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले आहे.अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत. कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा अपेक्षित आहे. तसेच सोशल डिस्टेन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.
· दि.22 मार्च ते 17 जून या कालावधीत कलम 188 नुसार 1,31,627 गुन्हे नोंद; 27,159 व्यक्तींना अटक. विविध गुन्ह्यांसाठी 7 कोटी 90 लाख 35 हजार 001 रुपयांचा आकारला दंड
· पोलिसांवर हल्ला होण्याच्या 268 घटना घडल्या, त्यात 851 व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.
· पोलिसांच्या 100 नंबर या फोनवर लॉकडाऊन काळात 1,03,707 फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली.
· ज्यांच्या हातावर क्वारंटाईन असा शिक्का आहे अशा 734 व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. राज्यात एकूण 6,10,281 व्यक्ती क्वारंटाईन आहेत.
· अवैध वाहतूक करणाऱ्या 1335 वाहनांवर गुन्हे दाखल, 83,061 वाहने जप्त
· परदेशी नागरिकांकडून झालेल्या व्हिसा उल्लंघनचे 15 गुन्ह्यांची राज्यभरात नोंद
· कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने मुंबईतील 29 पोलीस व 1 अधिकारी अशा एकूण 30, पुणे 3, सोलापूर शहर 2, नाशिक ग्रामीण 3, ए.टी.एस. 1, मुंबई रेल्वे 2, ठाणे ग्रामीण 2, जळगाव ग्रामीण 1, पालघर 1 अशा 45 पोलिस बांधवांना वीरगती प्राप्त
· पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन.
· सध्या 122 पोलीस अधिकारी व 899 पोलीस कोरोनाबाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
· राज्यात सध्या एकूण 122 रिलिफ कँम्प असून त्या ठिकाणी जवळपास 4,138 लोकांची केली आहे व्यवस्था
000000