गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना: शेतकऱ्यांसाठी एक आधार

शेती व्यवसाय करताना अनेकदा अपघात होतात. कधी वीज पडतेकधी पूर येतोतर कधी सर्पदंश किंवा विंचू दंश होतो. याशिवायविजेचा शॉकरस्त्यावरील अपघात किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे अपघात होऊ शकतो. अशा परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू होतो किंवा ते अपंग होतात. घरातील कर्त्या व्यक्तीला अपघात झाल्यास कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होते आणि अडचणी येतात. अशा अपघातग्रस्त शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यासाठी शासनाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना सुरू केली आहे.

*योजनेची उद्दिष्ट्ये:

अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणे.

शेती व्यवसायातील धोके कमी करणे.

शेतकऱ्यांचे मनोबल वाढवणे.

या योजनेत राज्यातील वहितीधारक खातेदार शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य (आई-वडीलपती/पत्नीमुलगा व अविवाहित मुलगी) पात्र आहेत.

अर्जदाराचे वय 10 ते 75 वर्षे असावे.

अपघातामुळे मृत्यू झाल्यास किंवा दोन डोळेदोन हात किंवा दोन पाय निकामी झाल्यास 2 लाख रुपयांची मदत मिळते.

एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास 1 लाख रुपयांची मदत मिळते.

अर्ज करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

*आवश्यक कागदपत्रे:*

7/1 उतारा

मृत्यूचा दाखला (अपघाती मृत्यू झाल्यास)

तलाठ्याकडील गाव नमुना नं. 6 क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद

शेतकऱ्याच्या वयाचा दाखला (शाळा सोडल्याचा दाखलाआधार कार्डनिवडणूक ओळखपत्र)

प्रथम माहिती अहवाल (FIR)

स्थळ पंचनामा

पोलिस पाटील माहिती अहवाल

अपघाताच्या स्वरूपानुसार आवश्यक कागदपत्रे

*अपघात –

या योजनेत रस्ता अपघातरेल्वे अपघातपाण्यात बुडून मृत्यूजंतुनाशके हाताळताना विषबाधाविजेचा धक्कावीज पडून मृत्यूखूनउंचावरून पडून झालेला अपघातसर्पदंशविंचूदंशनक्षलवाद्यांकडून हत्याजनावरांच्या हल्ल्यात मृत्यूबाळंतपणातील मृत्यूदंगल आणि अन्य कोणत्याही अपघातांचा समावेश आहे.

सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या कृषी सहाय्यककृषी पर्यवेक्षकमंडळ कृषी अधिकारीतालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

                                                                   –जिल्हा माहिती कार्यालय सोलापूर.