वाशिम, दि. १० (जिमाका) : कोरोनावर मात करण्यासाठी काय खबरदारी घ्यावी, याबाबत विविध माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेच्या माध्यमातून घरोघरी जावून याबाबत माहिती देण्यात येत आहे. कोरोनाला हरविण्यासाठी मास्कचा वापर, हात स्वच्छ धुणे आणि शारीरिक अंतर राखणे या त्रिसूत्रीचा वापर करून आपल्या जीवनशैलीत बदल करणे आता आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
वाशिम येथील जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरातील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेचे (आरटी-पीसीआर) ई-लोकार्पण मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात आरोग्यमंत्री राजेश टोपे, वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा, जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, अपर जिल्हाधिकारी शरद पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिता आंबरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर सहभागी झाले होते.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, कोरोना संसर्गाला सुरुवात झाली तेव्हा राज्यात केवळ एक-दोनच विषाणू चाचणी प्रयोगशाळा होत्या. आता राज्यात प्रयोगशाळांची संख्या वाढविण्यात आली असून प्रत्येक जिल्ह्यात प्रयोगशाळा उभारणी करण्यात येत आहे. त्यानुसार वाशिम येथे विषाणू चाचणी प्रयोगशाळा उभारणीची मागणी आज पूर्ण झाली. या प्रयोगशाळेचा पूर्ण क्षमतेने उपयोग करून चाचण्यांची संख्या वाढवावी. कोरोना बाधितांचा शोध घेण्यासाठी चाचणीची सुविधा, उपचार केंद्रांची संख्या वाढविली आहे. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेच्या माध्यमातून घरोघरी जावून लोकांची आरोग्य तपासणी करतो आहोत. त्यामुळे कोरोना संसर्गाचा आलेख कमी होण्यास मदत होईल, असे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले.
कोरोना बाधितांसाठी मोठ्या प्रमाणात बेड्स उपलब्ध करून दिले आहेत. मात्र, त्याचा वापर करण्याची वेळ येवू नये, अशी परिस्थिती निर्माण करणे आवश्यक आहे. कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी शासकीय यंत्रणा दिवसरात्र मेहनत करीत आहे, याचा सार्थ अभिमान आहे. नागरिकांनी सुद्धा कोरोनाला दूर ठेवण्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे. आपल्या जीवनशैलीत काही प्रमाणात बदल केल्यास कोरोनाला रोखणे सहज शक्य असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी केला.
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, राज्यात ४०० पेक्षा अधिक विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा कार्यान्वित झाल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यात ह्या प्रयोगशाळा होत आहे. पालकमंत्री श्री. देसाई यांनी या प्रयोगशाळेसाठी सातत्याने पाठपुरावा करून जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून दिला आहे. या प्रयोगशाळेमुळे चाचण्यांची गती आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढेल. जिल्ह्याचा कोरोना मृत्युदर हा केवळ १ टक्का आहे, ही चांगली बाब आहे. जिल्ह्यात कोरोना बाधितांसाठी उपलब्ध असलेल्या बेड्सच्या प्रमाणात फक्त ७ टक्के रुग्ण भरती आहेत, तर ९३ टक्के बेड्स रिकामे आहेत, ही चांगली बाब आहे.
जिल्ह्यात जास्तीत जास्त कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्यात यावा, असे सांगून श्री. टोपे म्हणाले, १३ केएल क्षमतेचा लिक्विड ऑक्सिजन प्लँट जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात उभारण्यात यावा. त्यामुळे ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात साठवणूक करता येईल, तसेच रुग्णांना योग्य प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा होईल. जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या बेडची माहिती नागरिकांना मिळण्यासाठी डॅशबोर्ड तयार करण्यात यावा. तसेच आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्याचे अधिकार आता जिल्हाधिकारी यांना देण्यात आले असून जिल्ह्यातील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही करावी. खासगी कोविड हॉस्पिटलला भरारी पथकांच्या नियमित भेटी होतील, याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, वाशिम जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जबाबदारी दिल्यानंतर जिल्ह्याच्या विकासाकडे आपण लक्ष केंद्रित केले. विकासप्रक्रियेत लोकप्रतिनिधी आणि शासकीय यंत्रणा यांना सोबत घेतले. याचप्रकारे कोविड नियंत्रणासाठी सुरुवातीपासूनच लोकप्रतिनिधी व शासकीय यंत्रणांना सोबत घेवून काम नियोजनबद्ध काम सुरु आहे. यापूर्वी जिल्ह्यातील संशयित रुग्णांच्या घशातील स्त्राव नमुने तपासणीसाठी अकोला, अमरावती, यवतमाळसह इतर जिल्ह्यांमध्ये पाठविण्यात येत होते. त्याचा अहवाल येण्यास बराच कालावधी लागायचा. आता जिल्ह्यातच ही प्रयोगशाळा सुरु होत असल्यामुळे २४ तासांच्या आत अहवाल प्राप्त होणार आहेत. २७० नमुने एकाच दिवसांत तपासले जाणार आहेत. त्यामुळे चाचण्यांची संख्या वाढण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.
‘माझे कुटुंब, माझी जबाबदरी’ या मोहिमेचे पहिल्या टप्प्यातील गृहभेटीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारासाठी १३ कोविड केअर सेंटर, ४ डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर व २ डेडीकेटेड कोविड हॉस्पिटलची सुविधा निर्माण करण्यात आलेली आहे. जिल्हा नियोजन समितीमार्फत विषाणू संशोधन व निदान (आरटी-पीसीआर) प्रयोगशाळेसाठी २ कोटी रुपये, औषधे खरेदीसाठी ३ कोटी ६० लक्ष रुपये, ऑक्सिजन सुविधेसाठी ४६ लक्ष रुपये, रॅपिड अँटीजेन टेस्ट कीटसाठी ९९ लक्ष रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत, असे पालकमंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.
प्रास्ताविक जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी केले. ते म्हणाले, वाशिम हा आकांक्षित जिल्हा असून विषाणू चाचणी प्रयोगशाळेमुळे कोविड साथीनंतरही विविध विषाणूजन्य आजारांच्या निदानासाठी मदत होणार आहे. जिल्ह्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. या प्रयोगशाळेमुळे कोरोना चाचण्यांना गती देण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपर जिल्हाधिकारी शरद पाटील यांनी केले, आभार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी मानले.
0000
कोरोना को हराने के लिए जीवनशैली में परिवर्तन करना जरूरी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
वाशिम स्थित आरटी-पीसीआर प्रयोगशाला का ई-लोकार्पण किया
वाशिम, दि. १० (जिमाका) : कोरोना पर मात करने के लिए हमें कौन-सी खबरदारी बरतनी चाहिए, इसे लेकर विविध माध्यमों के द्वारा बड़े पैमाने पर जनजागरण किया जा रहा है। ‘मेरा परिवार, मेरी ज़िम्मेदारी’ अभियान के माध्यम से घर-घर जाकर इस अभियान से जुड़ी एवं खबरदारी बरतने को लेकर जानकारी दी जा रही है। कोरोना को हराने के लिए मास्क का उपयोग, हाथ स्वच्छ होना और शारीरिक दूरी बनाए रखना इन त्रिसूत्री का उपयोग करते हुये हमें अपने जीवनशैली में परिवर्तन करना जरूरी है, यह प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने किया।
वाशिम स्थित जिला महिला अस्पताल के परिसर के विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाला का (आरटी-पीसीआर) ई-लोकार्पण मुख्यमंत्री श्री. ठाकरे के हाथों किया गया, इस अवसर पर वे बोल रहे थे।
कार्यक्रम में स्वास्थ्य मंत्री राजेश टोपे, वाशिम जिले के पालकमंत्री शंभूराज देसाई, जिला परिषद के अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, विधायक राजेंद्र पाटणी, विधायक अमित झनक, वाशिम के नगराध्यक्ष अशोक हेडा, जिलाधिकारी हृषीकेश मोडक, अपर जिलाधिकारी शरद पाटिल, जिला शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, निवासी उपजिलाधिकारी शैलेश हिंगे, उपजिलाधिकारी संदीप महाजन, जिला नियोजन अधिकारी सुनिता आंबरे, जिला स्वास्थ्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर उपस्थित थे।
मुख्यमंत्री श्री. ठाकरे ने कहा कि कोरोना के संक्रमन की शुरुआत हुई, तब राज्य में सिर्फ एक-दो ही विषाणू परीक्षण प्रयोगशालाएँ थी। लेकिन अब राज्य में इसकी संख्या बढ़ाई गई है और प्रत्येक जिले में प्रयोगशाला का निर्माण किया जा रहा है। आज वाशिम के विषाणू परीक्षण प्रयोगशाला के निर्माण की मांग पूरी हुई। इस प्रयोगशाला का पूरी क्षमता से उपयोग कर परीक्षण की संख्या बढाई जाए।
मुख्यमंत्री श्री. ठाकरे ने कहा कि कोरोना बाधितों को खोजने के लिए परीक्षण की सुविधा, उपचार केंद्र की संख्या भी बढ़ाई है। ‘मेरा परिवार, मेरी ज़िम्मेदारी’ अभियान के माध्यम से घर-घर जाकर लोगों के स्वास्थ्य की जांच की जा रही है। जिससे कोरोना के संक्रमन का आलेख कम होने में मदद होगी।
उन्होंने कहा कि कोरोना बाधितों के लिए बड़े पैमाने पर बेड्स उपलब्ध कराए जा रहे है। लेकिन इसका उपयोग करने की नौबत न आए, इस तरह की परिस्थिति का निर्माण करने की जरूरत है। कोरोना विषाणू के संक्रमन पर नियंत्रण में लाने के लिए शासकीय यंत्रणा दिन-रात परिश्रम ले रही है। इस बात पर गर्व है। नागरिकों ने भी कोरोना को दूर रखने के लिए उचित खबरदारी बरतने की जरूरत है। अपने जीवनशैली में कुछ पैमाने पर परिवर्तन करने पर कोरोना को रोकना एवं उसे हराना सहज संभव होने की बात भी मुख्यमंत्री श्री. ठाकरे ने इस दौरान कहीं।
स्वास्थ्य मंत्री राजेश टोपे ने कहा कि राज्य में ४०० से अधिक विषाणू संशोधन व निदान प्रयोगशालाएँ कार्यान्वित हुई है। प्रत्येक जिले में अब यह प्रयोगशाला हो रही है। पालकमंत्री श्री. देसाई ने इन प्रयोगशालाओं के लिए निरंतर पहल करते हुये जिला नियोजन समिति से निधि उपलब्ध कराया है। इस प्रयोगशालाओं के कारण परीक्षण की गति और कॉन्टॅक्ट ट्रेसिंग का प्रमाण बढ़ा है। जिले का कोरोना मृत्युदर सिर्फ १ फीसदी है, जो की बहुत अच्छी बात है। जिले में कोरोना बाधितों के लिए उपलब्ध बेड्स की मात्रा में सिर्फ ७ फीसदी मरीज भर्ती है, वहीं ९३ फीसदी बेड्स खाली है और यह भी बहुत अच्छी बात है।
जिले में अभिकतम कॉन्टॅक्ट ट्रेसिंग पर ज़ोर दिया जाये, यह कहते हुये श्री. टोपे ने कहा कि १३ केएल क्षमता के लिक्विड ऑक्सिजन प्लैट का जिला सामान्य अस्पताल परिसर में निर्माण किया जाए। जिससे ऑक्सिजन का बड़े पैमाने पर भंडारण किया जा सकेगा। साथ ही मरीजों को उचित मात्रा में ऑक्सिजन भी उपलब्ध हो सकेगा। साथ ही जिले में उपलब्ध बेड्स की जानकारी मिलने के लिए डैशबोर्ड बनाया जाए। उन्होंने कहा कि स्वास्थ्य विभाग के रिक्त पद भरने का अधिकार अब जिलाधिकारी को दिया गया है और जिले के रिक्त पद भरने की कार्यवाही की जाए। इसके अलावा निजी कोविड हॉस्पिटल को उड़न दस्ते की नियमित रूप में भेट होती रहेगी, इस बात की दक्षता भी ली जाए।
पालकमंत्री श्री. देसाई ने कहा कि वाशिम जिले के पालकमंत्री के रूप में ज़िम्मेदारी देने के बाद जिले के विकास की ओर ध्यान केंद्रित किया है। विकासप्रक्रिया में लोकप्रतिनिधि और सरकारी यंत्रणा को साथ लिया है। साथ ही कोविड नियंत्रण के लिए शुरुआत से ही लोकप्रतिनिधि व सरकारी यंत्रणा को साथ लेते हुये नियोजनबद्ध तरीके से काम जारी है। हालांकि इसके पहले जिले के संदिग्ध मरीजों के गले के स्वैब (स्त्राव) नमुने जांच के लिए अकोला, अमरावती, यवतमाल समेत अन्य जिलों में भेजे जा रहे थे। जिसकी रिपोर्ट आने में अधिक समय निकल जाता था। अब जिले में ही प्रयोगशाला शुरू हो रही है, इसलिए अब २४ घंटे के भीतर ही रिपोर्ट प्राप्त होगी। इस प्रयोगशाला में एक दिन में २७० नमुने का परीक्षण किया जाएगा। इसलिए अब परीक्षण की संख्या बढ़ाने में भी मदद होगी।
पालकमंत्री श्री. देसाई ने बताया कि ‘मेरा परिवार, मेरी जबाबदरी’ इस अभियान के प्रथम चरण में गृहभेट का लक्ष्य पूरा हुआ है। जिले के कोरोना बाधित मरीजों के उपचार के लिए १३ कोविड केअर सेंटर, ४ डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर व २ डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल की सुविधा का निर्माण किया गया है। जिला नियोजन समिति के जरिये विषाणू संशोधन व निदान (आरटी-पीसीआर) प्रयोगशाला के लिए २ करोड़ रुपये, दवाइयों की खरीदी के लिए ३ करोड़ ६० लाख रुपये, ऑक्सिजन सुविधा के लिए साठी ४६ लाख रुपये, रॅपिड एंटीजेन टेस्ट कीट के लिए ९९ लाख रुपये उपलब्ध कराए गए है।
कार्यक्रम का प्रास्ताविक जिलाधिकारी श्री. मोडक ने किया। प्रास्ताविक में उन्होंने बताया कि वाशिम यह उभरता हुआ जिला है और विषाणू परीक्षण प्रयोगशाला के कारण कोविड के बाद भी विविध विषाणूजन्य बीमारी के निदान के लिए इस प्रयोगशाला की मदद होगी। जिले की दृष्टि से यह महत्वपूर्ण कदम है। इस प्रयोगशाला के कारण कोरोना के परीक्षण कि गति बढ़ाने में मदद होगी। कार्यक्रम का संचालन अपर जिलाधिकारी शरद पाटिल ने किया एवं जिला शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड ने आभार प्रकट किया।
0000
LIFESTYLE CHANGE CRUCIAL FOR COVID-19 TO EBB :–MAHA CM UDDHAV THACKERAY
Washim RT-PCR Lab’s Online Dedication
(Jimaka) Washim, October 10, 2020: “Cautions to be taken to defeat the Coronavirus (COVID-19) are being widely circulated across all information mediums for public awareness. The ‘My Family, My Responsibility’ public campaign is being leveraged for an unprecedented outreach of the information to every household in Maharashtra. It is now necessary to administer the triple boost remedy (read social responsibility) of donning masks, frequently hand sanitizing and keeping a social distancing as a lifestyle change,” Maharashtra Chief Minister, Uddhav Thackeray said today.
He was speaking after inaugurating Washim district’s virology research and Diagnostic Laboratory (RT-PCR) facility through an online public dedication that was also attended by the state health minister Rajesh Tope, Washim’s guardian minister, Shambhuraje Desai, District Council president Chandrakant Thackeray, members of legislative assembly, Rajendra Patni and Amit Jhanak, district council president, Ashok Heda, collector Hrishikesh Modak, additional collector Sharad Patil, district surgeon Dr Madhukar Rathod, resident deputy collector Shailesh Hinge, deputy collector Sandeep Mahajan, distric tplanning officers Sunita Ambre, district health officer Dr Avinash Aaher, among others.
The Chief Minister noted that while there were a mere handful of such laboratories for conducting virological studies to offer immediate medical applications when the COVID-19 pandemic broke out, these numbers have grown manifold as the state government has set about establishing at least one such lab at the Zilla level of Maharashtra. “The demand for one (RT-PCR lab) in Washim has been accomplished today in keeping with this game plan against the Coronavirus and it is essential to utilize the facility to its optimum for heightened testing processes to identify active patients. Along with increasing the number of such laboratories, the ‘My Family, My Responsibility’ is being leveraged to physically check on the health status of every household in the state. This will help to mitigate the spread of the COVID-19 footprint and keep it in check,” Mr Thackeray said.
“There is a need to ensure that the situation does not escalate further notwithstanding the large number of hospital bed facilities made available to house anticipated COVID-19 patients. We must create a situation to prevent such a circumstance from arising. It is of immense pride that the government machinery has been tirelessly working night and day to control the pandemic. It is also necessary for citizens to take due precautions to keep Corona at a distance. Bringing about a lifestyle change to some extent by us can be the simple mechanism to stop the Coronavirus,” the Chief Minister reiterated.
Health Minister Rajesh Tope while stating that over 400 laboratories have been commissioned in the state so far added that every zilla will benefit from such a testing and diagnostic laboratory. ” The Guardian Minister Mr Desaid relentlessly pursued with the zilla planning committee and procured the needed funds for the lab. This facility will increase the rate of testing and contact tracing tremendously. Washim has registered a lower mortality rate due to COVID-19 that is pegged at 1 per cent, which is a good thing. Even the occupancy rate of COVID-19 beds in the district is only seven per cent which means that 93 percent of beds are lying unoccupied, which is also very good.” Mr Tope said.
Emphasising upon contact tracing the minister said,”A 13 KL capacity liquid oxygen plant will be set up in the general hospital facility located in the zilla so that a large quantity of the gas that is indispensable for the treatment of COVID-19 patients is available. A dashboard (online) providing (real time) data on the availability of hospital beds in the zilla should be on public display. The district administration has been empowered to fill up the vacant posts in the health department and should fill up the posts. Also, there will be inspections of private COVID-19 hospitals from time by flying squads of the state government.”
Guarding Minister Mr Desai said, “After being entrusted the guardianship of the district I focussed my attention on the development of the region by involving the local peoples’ representatives as well as the state machinery for the purpose. In the same manner we have been actively working to curb the COVID-19 in a planned manner. Till now the throat swabs of suspected virus infected patients were being set across for testing to Akola, Amravati, Yavatmal and neighbouring districts. The results were often time lagged. It will now be possible to get the test results within 24 hours itself with the laboratory commissioned today in the zilla having a capacity to process 270 tests daily. This will greatly enhance the effort to scale up testing.”
He added that each household in the district had already been visited once as part of the first phase of the ‘My Family, My Responsibility’ public campaign. Thirteen COVID-19 Care Centres, four dedicated COVID-19 health centres and two dedicated COVID-19 hospital facilities have been established for the Coronavirus patients, he further noted.
The collector Mr Modak in his introductory address said, “Washim district is the aspirational destination for people across the state and hence the multiple medical facilities set up here would have a continued utility value even after our current friend Corona has departed from us. They would be useful for similarly tackling similar epidemics and diseases that arise in the coming future. This (commissioning of the laboratory today) is an important step in to increase Corona testing. The online dedication programme was moddrated by additional district collector Sharad Patil while the concluding remarks were made by Dr Madhukar Rathod.