लोकप्रिय गझलकार इलाही जमादार यांच्या निधनाने मराठीतील ‘कोहिनूर-ए-गझल’ काळाच्या पडद्याआड गेला आहे. गझलरसिकांचा महानायक हरपला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
इलाही जमादार यांनी मराठी गझलरसिकांच्या हृदयसिंहासनावर अधिराज्य केलं. मराठी साहित्यविश्व समृद्ध केले. इलाही जमादारांच्या गझला साहित्यरसिकांना यापुढेही कायम निर्भेळ आनंद देत राहतील. त्यांचं निधन ही गझलविश्वाची मोठी हानी आहे. मी इलाही जमादार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
0000