महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी दोन मंत्री समन्वय ठेवणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0
10

राजकीय मतभेद विसरुन कायदेशीर लढाईला वेग देणार

मुंबई, दि. 7 :  महाराष्ट्रकर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याला वेग देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने सर्व संबंधित वकिलांची तातडीने बैठक घेण्याचे तसेच सर्वश्री एकनाथ शिंदे व छगन भुजबळ यांची समन्वयक मंत्री म्हणून नेमणूक करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले. मुख्यमंत्री स्वत: या संदर्भामध्ये ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे यांच्याशीदेखील चर्चा करणार आहेत.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी आज मंत्रालयात मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी मंत्री सर्वश्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, छगन भुजबळ, नितीन राऊत, आमदार सर्वश्री हसन मुश्रीफ, राजेश पाटील, अनिल परब आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर तातडीने सीमाप्रश्नी मंत्रालयात बैठक बोलावून एकीकरण समितीला निमंत्रण दिले, यावरून याप्रश्नी महाराष्ट्राची बाजू अधिक मजबूत करण्याची आपली इच्छा असल्याचे मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले. तसेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सोडविण्यासाठी कोणतेही राजकीय मतभेद न ठेवता सर्वांनी एकत्र यावे. सीमाभागातील गावे महाराष्ट्रात येण्यासाठी सुरू असलेल्या कायदेशीर लढ्यात राज्याची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी कालबद्ध रितीने जाण्याच्या देखील सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

सीमाप्रश्नासंबंधी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याच्या सद्यस्थितीचा आढावा घेऊन मुख्यमंत्री म्हणाले, सीमाप्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात सध्या कायदेशीर लढा सुरू आहे. हा खटला जलद गतीने संपविण्यासाठी राज्य शासनातर्फे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील. यासाठी या खटल्यातील वकिलांची तातडीने संयुक्त बैठक घेण्यात येईल. तसेच खटल्याच्या पुढील सुनावणीस ज्येष्ठ विधीज्ञ हरीश साळवे यांनी बाजू मांडावी, यासाठी त्यांना विनंती करण्यात येईल.

यावेळी राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव अंशू सिन्हा, ड.शिवाजीजाधव, ड.संतोषकाकडे, श्री. दिनेश ओऊळकर, महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी आमदार श्री. मनोहर किणेकर, माजी आमदार अरविंद पाटील, दिगंबर पाटील, बेळगाव तरूण भारतचे संपादक किरण ठाकूर, प्रकाश शिढोळकर यांच्यासह एकीकरण समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. 00000

कानूनन लड़ाई को मिलेगी गति

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न में

दो मंत्री समन्वय रखेंगे – मुख्यमंत्री

मुंबई, दि. 7 : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न को लेकर उच्चतम न्यायालय चल रहे मामले को गति देने के लिए राज्य सरकार की ओर से सभी संबंधित वकिलों की तत्काल बैठक लेने और सर्वश्री एकनाथ शिंदे और छगन भुजबल की समन्वयक मंत्री के रूप में नियुक्ति करने के निर्देश मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे ने यहाँ पर दिए। मुख्यमंत्री स्वयं इस संदर्भ में वरिष्ठ विधिज्ञ हरिश सालेवे से भी चर्चा करेंगे।

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न को लेकर आज मंत्रालय में मुख्यमंत्री श्री. ठाकरे की अध्यक्षता में बैठक हुई। इस बैठक में मंत्री सर्वश्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटिल, छगन भुजबल, नितीन राऊत, विधायक सर्वश्री हसन मुश्रीफ, राजेश पाटिल, अनिल परब आदि उपस्थित थे।

मुख्यमंत्री पद स्वीकारने के बाद तत्काल सीमाप्रश्न को लेकर मंत्रालय में बैठक लेकर एकीकरण समिति को निमंत्रण दिया गया, इस पर इस समस्या को लेकर महाराष्ट्र का पक्ष अधिक मजबूत करने की इच्छा होने की बात  मुख्यमंत्री श्री. ठाकरे ने कहीं। साथ ही महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न के हल के लिए कोई भी राजनैतिक मतभेद न रखते हुए सभी ने एकसाथ आए। सीमा क्षेत्र के गाँव महाराष्ट्र में आने के लिए कानूनन लड़ाई में राज्य का पक्ष प्रभावपूर्ण तरीके से रखने के लिए कालबद्ध पद्धति से प्रक्रिया के करने की सूचना मुख्यमंत्री ने इस दौरान दी।

सीमा प्रश्न संबंधी उच्चतम न्यायालय में शुरू मामले की सद्यस्थिति का जायजा लेकर मुख्यमंत्री ने कहा कि सीमाप्रश्न पर उच्चतम न्यायालय में वर्तमान में कानूनन लड़ाई शुरू है। यह मामला तेजी से खत्म करने के लिए राज्य सरकार की ओर से सर्वतोपरी प्रयास किए जाएंगे। इसके लिए इस मामले के वकिलों की जल्द संयुक्त बैठक ली जाएगी। साथ ही मामले की आगे की सुनवाई के लिए वरिष्ठ विधीज्ञ हरिष सालेवे पक्ष रखे, इसके लिए उन्हें विनती की जाएगी।

इस दौरान राज्य के महाधिवक्ता श्री. आशुतोष कुंभकोणी, सामान्य प्रशासन विभाग के सचिव अंशू सिन्हा, एड. शिवाजी जाधव, एड. संतोष काकडे, श्री. दिनेश ओऊलकर, महाराष्ट्र एकीकरण समिति के पूर्व विधायक  श्री. मनोहर किणेकर, पूर्व विधायक श्री. अरविंद पाटिल, श्री. दिगंबर पाटिल, बेलगाव तरूण भारत के संपादक श्री. किरण ठाकूर, श्री. प्रकाश शिढोलकर समेत एकीकरण समिति के पदाधिकारी उपस्थित थे।

—–000—–

नंदकुमार वाघमारे/वि.सं.अ./7.12.2019

00000

The legal battle to be speeded up

Two ministers to coordinate for Maharashtra- Karnataka border dispute

–          Chief Minister

Mumbai, date 7th: Chief Minister Shri. Udhhav Thackeray directed to hold a State Government’s meeting of all lawyers related to the case of Maharashtra- Karnataka Border dispute so that the case under prosecution in the Supreme Court can be speeded up. He also directed to appoint Sarvshi Eknath Shinde and Chhagan Bhujbal as coordination minister. Chief Minister will personally discuss the case with senior jurist Harish Salve.

A meeting was held in Mantralaya today under the presidency of Chief Minister Shri. Thackeray regarding Maharashtra- Karnataka border dispute. Minister Eknath Shinde, Subhash Desai, Jayant Patil, Chhagan Bhujbal, Nitin Raut, MLA Sarvshri Hasan Mushreef, Rajesh Patil, Anil Parab was present.

As soon as Chief Minster took the charge, he immediately called for a meeting regarding border dispute and invited Ekikaran (unison) committee. Chief Minister Shri. Thackeray said that he wishes to strengthen Maharashtra’s case in this dispute. He also said that all should come together keeping political differences aside to solve Maharashtra- Karnataka border dispute. Chief Minister also directed to follow the timeline to strengthen the state’s side in the legal battle that is fought to include borderline villages in Maharashtra.

Chief Minister reviewed the border dispute case under prosecution in the Supreme Court. He said that the border dispute case is under prosecution in the Supreme Court.  State Government will try its best to proceed with the case in a possible short time. A joint meeting of all lawyers related to this case will be held. Senior lawyer Harish Salve will be requested to state the case in the next hearing.

Advocate General Shri. Ashutosh Kumbhkoni, Secretary of General Administration Department Anshu Sinha, Adv. Shivaji Jadhav, Adv. Santosh Kakade, Shri. Dinesh Ovulkar, former MLA, and Maharashtra Ekikarana Committee’s Shri. Manohar Kinekar, former MLA Shri. Arvind Patil, Shri. Digambar Patil, Belgaum Tarun Bharat’s Editor Shri. Kiran Thakur, Shri. Prakash Shidholkar and office-bearers of Maharashtra Ekikarana Committee were present at the meeting.

0000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here