साडेतीन वर्षात महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांसाठी २९५ कोटींचा निधी

0
14

             

    

नवी दिल्ली,2 :  महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांसाठी केंद्र पुरस्कृत योजनांमधून गेल्या साडेतीन वर्षात295कोटी13लाख2हजार500रुपयांचा निधी वितरित झाला आहे.

केंद्रीय वने व पर्यावरण तथा हवामानबदल मंत्रालयाच्या वतीने देशातील18राज्यांमधील व्याघ्र प्रकल्पांच्या विकासासाठी गेल्या तीन वर्षात व चालू आर्थिक वर्षात एकूण1हजार221कोटी65लाख89हजार500रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांना295कोटी13लाख   

महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांसाठी वर्ष2016-17ते2018-19या मागील तीन आर्थिक वर्षात एकूण258कोटी3लाख47हजार500रुपयांचा निधी वितरित करण्यात आला.तर चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत(21नोव्हेंबर2019) 37कोटी  9लाख55हजारांचा  निधी वितरित करण्यात आला आहे.

वर्ष2016-17ते2018-19या मागील तीन आर्थिक वर्षात देशातील18राज्यांमधील व्याघ्र प्रकल्पांसाठी एकूण1हजार10कोटी42लाख  8  हजार400रुपयांचा निधी वितरित करण्यात आला.तर चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत(21नोव्हेंबर2019) 211कोटी23लाख81  हजारांचा  निधी वितरित करण्यात आला आहे.

केंद्रीय वने व पर्यावरण तथा हवामानबदल राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही  माहिती दिली.

000000 

रितेशभुयार/वृत्तवि.क्र.२५९/  दिनांक2/12/2019    

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here