विधानसभा निवडणुकीसाठी ३ लाखांहून अधिक सुरक्षा जवान सज्ज

0
15

मुंबई, दि. 18 : विधानसभा निवडणुक शांततेत पार पाडण्यासाठी राज्य आणि केंद्राचे पोलीस दल सुसज्ज झाले असून सुमारे तीन लाखाहून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. गडचिरोली जिल्ह्यात विशेष सुरक्षा व्यवस्था केली असून तीन हेलिकॉप्टर व ड्रोन तैनात करण्यात आले असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक तथा विधानसभा निवडणुकीसाठीचे सुरक्षा विषयक नोडल अधिकारी मिलिंद भारंबे यांनी दिली.

मतदान व मतमोजणीच्या कालावधीत कोणतीही अनुचित घटना घडू नये, शांततेत सर्व प्रक्रिया पार पाडावी, यासाठी राज्य पोलीस दलातील 2 लाख पोलीस अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलीस दल, नागालँडचे महिला पोलीस दल आदी केंद्रीय सुरक्षा दलाच्या 350 कंपन्या (प्रत्येक कंपनीत शंभर अधिकारी/जवानांचा समावेश), राज्य राखीव पोलीस दलाच्या 100 कंपन्या, राज्य गृहरक्षक दलाचे 45 हजार जवान अहोरात्र तैनात करण्यात आल्या आहेत. याबरोबरच इतर राज्यातील सुमारे 20 हजार गृहरक्षक दलाच्या जवानांचीही मदत घेण्यात आली आहे.

००००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/18.10.2019 000

विधानसभा चुनाव के लिए

3 लाख से अधिक सुरक्षा जवान सुसज्ज

मुंबई, दि. 18 : विधानसभा चुनाव शांतिमय के वातावरण में पूरी हो सकेइसके के लिए राज्य और केंद्र के पुलिस दल सुसज्ज हो गए है और तकरीबन तीन लाख से अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात किए जाएंगे। गढ़चिरोली जिले में विशेष सुरक्षा व्यवस्था की है और तीन हेलिकॉप्टर और ड्रोन तैनात किए गए है, यह जानकारी विशेष पुलिस महानिरीक्षक तथा विधानसभा चुनाव के सुरक्षा विषयक नोडल अधिकारी मिलिंद भारंबे ने दी है।

मतदान और मतगणना के समय कोई भी अनुचित घटना न हो, शांतता में  सभी प्रक्रिया पूरी हो, इसके लिए राज्य पुलिस दल के 2 लाख पुलिस अधिकारी, कर्मचारी तैनात किए गए है। केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पुलिस दल, नागालँड के महिला पुलिस दल आदि केंद्रीय सुरक्षा दल के 350 कंपनियां (प्रत्येक कंपनी में सौं अधिकारी/जवान शामिल है), राज्य राखीव पुलिस दल की 100 कंपनियां, राज्य गृहरक्षक दल के 45 हजार जवान दिनरात (अहोरात्र) तैनात किए गए है। इसके साथ ही अन्य राज्यों के तकरीबन 20 हजार गृहरक्षक दल के जवानों की भी मदद ली गई है।

००००

 

Over 3 lakh security personnel deployed for Assembly elections

Mumbai, Oct 18: In order to conduct peaceful and fair polling over three lakh security personnel of State and Center police forces will be deployed in the state. Special security arrangements have been made in Gadchiroli district with the deployment of three helicopters and drone, said Special IGP and Nodal Officer of Security for these Assembly elections, Milind Bharambe.

Two lakh state police personnel have been deputed to ensure peaceful polling and counting of votes. 350 Companies (Each Company consists of 100 officers/Jawans) of Central Industrial Security Force, Central Reserve Police Force, Nagaland Women Police Force etc., 100 companies of State Reserve Plice Force, 45000 jawans of State Home Guards have been deployed on 24 hour duty. In addition to this, services of 20000 Home Guard Jawans of other states are also sought for the peaceful conduct of elections.

0000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here