‘जय महाराष्ट्र’ व ‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांची मुलाखत

0
12

मुंबई,दि.१७ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित‘जय महाराष्ट्र’व  ‘दिलखुलास’कार्यक्रमात प्रधानसचिव  व मुख्य  निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांचीविधानसभा निवडणूक तयारीया विषयावर विशेष मुलाखत घेण्यात आली आहे.  ही विशेष मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरउद्याशुक्रवार दिनांक १८ ऑक्टोबर २०१९ रोजी रात्री ९ वाजता प्रसारित होईल.तसेच ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून शुक्रवार दि. १८ आणि सोमवार  दि. २१ ऑक्टोबर २०१९ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल.   ‘दिलखुलास’हा कार्यक्रम  प्रसारभारतीच्या’न्यूज ऑन एअर’या ॲपवरही  शुक्रवार दि. १८ आणि सोमवार  दि. २१ ऑक्टोबर  २०१९  रोजी सकाळी ७.२५ ते ७.४०या वेळेत  ऐकता येईल.  निवेदक हेमंत बर्वे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

    

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांकरिता मतदारसंघातील तयारी,विधानसभा मतदारसंघात मतदार जनजागृतीवर देण्यात येणारा भर,मतदानात युवक व महिलांची टक्केवारी वाढण्यासाठी सुरु असलेले प्रयत्न,भारत निवडणूक आयोगाच्या’स्वीप’या उपक्रमाचे यश,राज्यात मतदार जनजागृतीसाठी सदिच्छादूतांचा सहभाग,राज्यातील एकूण मतदार संख्या,मतदार केंद्रे,प्रत्यक्ष मतदानादिवशी मतदारांना पुरविण्यात येणाऱ्या  सोयीसुविधा,  दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक मतदारांच्या सुविधेसाठी मतदान केंद्राची रचना,ईव्हीएम-व्हीव्हीपॅट बद्दलचा संभ्रम दूर करण्याकरिता होत असलेले प्रयत्न,राज्यातील  सर्व्हिस वोटरची संख्या,  या विषयांची माहिती श्री.बलदेव सिंह यांनी’जय महाराष्ट्र’आणि  ‘दिलखुलास’कार्यक्रमातून दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here