विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर; राज्यात २१ आक्टोबरला मतदान, २४ ऑक्टोबरला मतमोजणी

0
16

नवी दिल्ली,दि.21 :  महाराष्ट्रासाठी  विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर झाला आहे.राज्यात21ऑक्टोबर2019  रोजी मतदान पार पडणार असून24ऑक्टोबरला मतमोजणी  होणार आहे. 

येथील‘निर्वाचन सदन’या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्यालयात आज पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र आणि हरियाणा  राज्यांच्या विधानसभा निवडणुका तसेच देशातील विधानसभा पोटनिवडणुकीचा  कार्यक्रम जाहीर करण्यात आला.मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.निवडणूक आयुक्त सुशिल चंद्रा आणि अशोक लवासा यावेळी उपस्थित होते.निवडणूक कार्यक्रमांच्या या घोषणेने राज्यात आजपासून आदर्श आचारसंहिता लागू  झाली आहे.   

…असा आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम

महाराष्ट्रातील विधानसभेच्या एकूण288जागांसाठी21ऑक्टोबर2019ला मतदान घेण्यात येणार आहे. 27सप्टेंबरला निवडणूक अधिसूचना जारी होणार आहे.  उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख4ऑक्टोबर असून5ऑक्टोबरला उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. 7ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे. 21ऑक्टोबरला मतदान तर24ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. 27ऑक्टोबरला  राज्यातील निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे.महाराष्ट्र विधानसभेची मुदत9नोव्हेंबरला संपत आहे.  

राज्यात8कोटी95लाख मतदार

केंद्रीय  निवडणूक आयोगाच्या वतीने  जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार31ऑगस्ट2019पर्यंत राज्यात मतदारांची  एकूण संख्या 8कोटी95लाख62हजार706एवढी आहे. 2014च्या तुलनेत राज्यातील  मतदान केंद्रांमध्ये5.61टक्क्यांनी वाढ झाली असून यावर्षीच्या विधानसभेसाठी  एकूण95हजार473मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात येणार आहे.उमेदवारांना निवडणूक खर्चाची मर्यादा28लाख रूपये ठेवण्यात आली आहे. 

मतदार व उमेदवारांसाठीहेल्पलाइनॲपची सुविधा

मतदारांच्या मदतीसाठी आयोगाने‘व्होटर हेल्पलाईन-1950’सुरु केली आहे. 1950या क्रमांकावर एसएमएस करून मतदारांना माहिती मिळवता येणार आहे.मतदारांसाठी‘व्होटर हेल्पलाईन ॲप’ही सुरु करण्यात आले आहे.उमेदवारांना आपल्या उमेदवारी अर्जाची स्थिती व प्रचारविषयक परवानगीसह अन्य महत्त्वाची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी‘सुविधा ॲप’सुरु करण्यात आले आहे.उमेदवार,राजकीय पक्ष किंवा उमेदवाराच्या वतीने प्रतिनिधी  थेट  https://suvidha.eci.gov.inया संकेतस्थळावर अर्ज करू शकतो व  उमेदवारांना ॲपवर परवानगीबाबतची  स्थिती कळू शकणार आहे.   

आचारसंहिता काळात असे असणार नियम

निवडणूक काळात आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे आदेश असून उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी सांगितले आहे. निवडणूक प्रचार काळात रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत प्रचारासाठी ध्वनिक्षेपकावर बंदी घालण्यात आली आहे. तर पर्यावरणपूरक प्रचार साहित्य व माध्यमांचा उपयोग करण्याचे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे.

संवेदनशील मतदान केंद्रांवर व्हिडिओग्राफी, सीसीटीव्ही आणि वेबकास्टिंग करण्यात येणार आहे.   प्रसार माध्यमांमधून आचारसंहितेचे उल्लंघन रोखण्यासाठी  जिल्हा स्तरावर माध्यम नियंत्रण केंद्र उभारण्यात येणार आहे.

सोशल मीडियाद्वारे प्रचारासाठी प्रमाणपत्राची आवश्यकता

निवडणूक काळात प्रसारमाध्यमांवरून चुकीची माहिती प्रसारित होऊ नये व अफवांना आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यानुसार राजकीय पक्षांना फेसबुक, ट्विटर, यूट्यूब, व्हॉट्सॲप आदी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार साहित्य प्रसारित करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून गठित करण्यात आलेल्या ‘सोशल मीडिया प्रमाणपत्र नियंत्रण केंद्रा’चे प्रमाणपत्र घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. असे प्रमाणपत्र नसल्यास सोशल मीडियावरून प्रचारास बंदी असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.  

०००००

रितेश भुयार/वृत विशेष क्र.219 /दि.21.09.2019

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here