‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या ‘महात्मा गांधी यांचे विचार व कार्य’ या विषयावर मुलाखत

0
12

दिलखुलास कार्यक्रमात याच विषयावरील मुलाखतीचे गुरुवारी आणि शुक्रवारी प्रसारण

मुंबई, दि.30 : माहिती  व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित जय महाराष्ट्रदिलखुलासकार्यक्रमात ज्येष्ठ  विचारवंत सदानंद मोरे आणि पत्रकार सचिन परब  यांचा सहभाग असलेली महात्मा गांधीजी यांचे  विचार व कार्यया विषयावर विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून मंगळवार दि. १ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता आणि राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून’दिलखुलासकार्यक्रमात गुरुवार दि. ३ आणि शुक्रवार दि. ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. निवेदिका उत्तरा मोने  यांनी ही मुलाखत घेतली आहे.

        

विश्वाला अहिंसेचा संदेश देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधींजींचे विचार आणि मूल्य, महात्मा गांधीजींच्या जीवनातील तत्वे, साहित्यिक गांधी, सत्य, अहिंसा आणि असहकार या विषयीचे  विचार या विषयाची माहिती श्री. मोरे आणि श्री.  परब   यांनी जय महाराष्ट्रदिलखुलासया कार्यक्रमातून दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here