राष्ट्रीय संस्कृती महोत्सवातून देशाच्या संस्कृतीचे जतन होण्यासह तिला प्रोत्साहन मिळेल- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

0
7

            मुंबईदि. 11 : भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. या देशात अनेक जातीधर्मप्रांतभाषा बोलल्या जातात. परंतुया देशाची संस्कृती भारताला सदैव एकसंघ ठेवते असे सांगत “राष्ट्रीय संस्कृती महोत्सव” देशाच्या संस्कृतीला जतन आणि प्रोत्साहन देण्याचे कार्य करेल असा आशावाद राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केला.

            केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयामार्फत राष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सव चर्चगेट येथील आझाद मैदान येथे आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात केंद्रीय सांस्कृतिक मंत्री श्री. जी किशन रेड्डीपर्यटनकौशल्य विकास व उद्योजकता,महिला व बालविकास मंत्री श्री. मंगलप्रभात लोढाकेंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या सह सचिव अमिता प्रसाद साराभाईसांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खरगे आदी मान्यवर उपस्थित होते.

            राज्यपाल भगतसिंग कोश्यारी पुढे म्हणाले कीभारताला श्रीमंत पुरातन संस्कृती लाभली आहे. या देशामध्ये नालंदातक्षशिलायांसारखे विद्यापीठ होती. परदेशी विद्यार्थी भारतात विद्या ग्रहण करण्यासाठी येत असे. याच पार्श्वभूमीवर भारत देश येत्या काळात कलानाटकक्रीडा यांसह इत्यादी कला प्रकारांना प्रोत्साहन देणारा व नेतृत्व करणारा देश बनेल. “राष्ट्रीय संस्कृती महोत्सव” याचा आरंभ असून येत्या काळात हा महोत्सव देशाच्या संस्कृतीला गौरवाच्या शिखरावर नेईल.

            याप्रसंगी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री श्री. जी किशन म्हणाले कीभारताप्रमाणे मुंबई शहराला प्राचीन वारसासांस्कृतिक समृद्धीआधुनिकतेचा गौरवशाली इतिहास इतिहास लाभला आहे. राष्ट्रीय संस्कृती महोत्सव भारताच्या याच महान परंपरेला चालना देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करेल. मुंबईत गणेश उत्सवनवरात्री यांसारखे विविध उत्सव साजरे केले जातात. या उत्सवांना सांस्कृतिकअध्यात्मिकसामाजिक महत्त्व आहे. राष्ट्रीय संस्कृती महोत्सवात सादर केल्या जाणाऱ्या सर्व कला भारताच्या युवकांना जोडतील. हे महोत्सव लुप्त होणाऱ्या कलांना व्यासपीठ उपलब्ध करून देईल तसेच भारतीय कला कौशल्य कार्यगिरी ग्रामीण उत्पादनांना प्रोत्साहन देण्यात येईल.

            श्री. जी किशन पुढे म्हणाले कीकेंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या माध्यमातून देशातले प्राचीन ऐतिहासिक स्थळेतीर्थक्षेत्र यांना जतन करण्याचे कार्य सुरू आहे. महाराष्ट्र ही महामानवभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची कर्मभूमी आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या कार्याची व्याप्ती लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या माध्यमातून दिनांक 14 एप्रिल 2023 पासून आंबेडकर सर्किट नावाने ट्रेन सुरू करण्यात येणार आहे. ही ट्रेन भारतासह परदेशी अभ्यासकांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थानकर्मस्थानअंत्यसंस्कार झाले अशी चैत्यभूमी घडवणार असल्याचे श्री. जी किशन यांनी सांगितले.

            सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले कीभारताला समृद्ध असा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. आज मुंबईत आयोजित करण्यात आलेला राष्ट्रीय संस्कृती महोत्सव हा राष्ट्रीय ऐक्य आणि एकात्मतेला प्रोत्साहन देण्यासाठी गरजेचा आहे. संयुक्त राष्ट्र संघाने देशाचे आकलन मूल्यांकन पर कॅपिटा इन्कम वर नसून हॅपिनेस इंडेक्स वर करणे सुरू केले आहे. धनाद्वारे भौतिक संसाधने विकत घेता येतात. परंतु मनःशांती आणि सुख विकत घेता येत नाही. मनशांती प्राप्त करण्यासाठी सांस्कृतिक विभाग महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो कारण हा विभाग आपल्यामध्ये नवचैतन्य ऊर्जा उत्साह निर्माण करतो असे श्री मुनगंटीवार यांनी सांगितले.

            भारतीय सांस्कृतिक वारसा महोत्सव 11 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी 2023 या दरम्यान आझाद मैदान येथे आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाअंतर्गत पारंपारिक आदिवासी व लोकनृत्यशास्त्रीय -गायन संगीत तसेच सुप्रसिद्ध कलाकारांचे सादरीकरण संध्याकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत असणार आहे. हस्तकला हस्तक्षेप तसेच पारंपरिक खाद्य महोत्सव सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत असणार आहे.

            हा महोत्सव भारताचा समृद्ध आणि वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारसा प्रदर्शित करण्याची संधी आहे. सांस्कृतिक देवाणघेवाणीद्वारे राष्ट्रीय ऐक्य आणि एकात्मतेला प्रोत्साहन देणे हे या महोत्सवाचे उद्दिष्ट आहे. मंत्रालयाच्या वतीनं दरवर्षी भारतातील विविध राज्यांमध्ये या महोत्सवाचे आयोजन केले जाते. हा महोत्सव 2019 मध्ये मध्य प्रदेशात, 2022 मध्ये आंध्र प्रदेश आणि तेलंगणमध्ये आयोजित करण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here