नदी स्वच्छ, सुंदर, प्रदूषणमुक्त व अमृत वाहिनी करण्यासाठी दूषित पाणी नदीमध्ये जाऊ देऊ नये- डॉ. सुरेश खाडे

0
8

            सांगली, दि. 5, (जि. मा. का.) : नदी स्वच्छ, सुंदर, प्रदूषणमुक्त व अमृत वाहिनी करण्यासाठी दूषित पाणी नदीमध्ये जाऊ न देणे, नदीची स्वच्छता ठेवणे ही काळाची गरज आहे. यासाठी आवश्यक ती दक्षता सर्वांनी घ्यावी, असे आवाहन कामगार मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले.

        स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत चला जाणुया नदीला या  अभियानांतर्गत कृष्णा नदीच्या तीरावर माईघाट सांगली येथे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते कलश पुजन करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महानगरपालिका आयुक्त सुनिल पवारअतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवालउपवनसंरक्षक निता कट्टेनिवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह पाटीलजलसंपदा विभगाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकरजलबिरादरी महाराष्ट्र राज्य नरेंद्र चुग आदि उपस्थित होते.

            पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, गेल्या काही वर्षातील पर्जन्याच्या विचलनामुळे कधी अनावृष्टी तर कधी अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे पूर आणि दुष्काळ यासारख्या समस्या भेडसावत आहेत. त्याचा शेती उत्पादनावरही  विपरीत परिणाम होत आहे. वाढते नागरीकरण व औद्योगिकरणामुळे उपलब्ध पाण्यावरील ताण वाढला आहे. नद्यांमध्ये आलेल्या गाळामुळे त्यांची वहन व साठवण क्षमता कमी झाली आहे. या बाबींचा विचार करता नदीला जाणून घेणे आणि तिच्या समस्यांचा अभ्यास करून त्यांची सोडवणूक करण्यासाठी चला जाणूया नदीला या  अभियानाखाली नदी संवाद यात्रेची सुरूवात करण्यात आली आहे.  संबंधित यंत्रणांनी नदीला जाणून घेवून समस्यांची सोडवणूक करण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत. या अभियानासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. शासन यासाठी कुठेही कमी पडणार नाही. नदी स्वच्छ, सुंदर करण्यासाठी प्रत्येकाचे योगदान महत्वाचे आहे. त्यासाठी  या उपक्रमास नागरिकांनीही त्यांचे योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

            यावेळी उपवनसंरक्षक निता कट्टे व श्री. नरेंद्र चुग यांनी मनोगत व्यक्त करताना चला जाणुया नदीला या  अभियानाचा हेतू विशद करून हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

            प्रारंभी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते कृष्णामाणगंगाकोरडामहाकालीयेरळाअग्रणी व  तिळगंगा या सात नद्यांचे कलश पुजन करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्वांनी जलप्रतिज्ञा घेतली. शेवटी या सर्व कलशांचे कृष्णा नदी मध्ये विसर्जन करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी केले.  सूत्रसंचालन संगीता मोरे यांनी केले.

            या कार्यक्रमास प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी श्री. अवताडे, चला जाणुया नदीला अभियानाचे जिल्हा समन्वयक डॉ. रविंद्र व्होराकृष्णा नदी समन्वयक डॉ. मनोज पाटीलअग्रणी नदी समन्वयक अंकुश नारायणकरमहांकाली नदी समन्वयक सागर पाटीलतिळगंगा नदी समन्वयक प्रकाश पाटीलयेरळा नदी समन्वयक संपतराव पवारजाई कुलकर्णीकोरडा नदी केंद्रस्थ अधिकारी सचिन पवारमाणगंगा नदी केंद्रस्थ अधिकारी अभिनंदन हरगुडेयेरळा नदी केंद्रस्थ अधिकारी डी. एस. साहुत्रेसांगली पाटबंधारे विभागाच्या सहायक अधीक्षक अभियंता तृप्ती मुकुर्णेउपकार्यकारी अभियंता श्वेता दबडेयांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी, संबंधित गावचे सरपंचउपसरपंचनागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here