शुक्रवार, ऑगस्ट 22, 2025
Home Blog

गणेशोत्सव काळात नागरिकांची गैरसोय टाळा -पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्गनगरी दि २१ (जिमाका):- सततच्या पावसामुळे शहरी व ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे रस्त्यांची डागडूजी व दुरूस्तीची कामे २५ ऑगस्ट पर्यंत पूर्ण करा. पावसाळ्याचे दिवसांत साथीच्या रोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.

गणेशोत्सवाच्या अनुषंगाने पालकमंत्री नितेश राणे यांच्या अधक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटीलमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकरजिल्हा बॅकेचे अध्यक्ष मनीष दळवीपी.एम. विश्वकर्मा समितीचे सदस्य प्रभाकर सावंतअपर जिल्हाधिकारी शुभांगी साठेनिवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. राणे पुढे म्हणाले कीगणेशोत्सवासाठी अनेक ठिकाणांहून चाकरमानी जिल्ह्यात येत असतात. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आपले कर्तव्य असल्याने जिल्ह्याच्या प्रवेशाच्या ठिकाणीरेल्वे स्थानकांवर आरोग्य पथकांची नेमणूक करा. पावसाळा लक्षात घेता साथीचे आजार निर्माण होणार नाहीत याची दक्षता घ्या. औषधसाठा कमी पडणार नाही याची काळजी घ्या. जिल्ह्यातील रस्त्यांवरील खड्डे ही गंभीर समस्या बनली आहे. राष्‍ट्रीय महामार्गाची अवस्था बिकट झाली आहे. यासह राज्य महामार्गजिल्हा परीषद अखत्यारीतील रस्त्यांची डागडूजी आणि दुरूस्तीची कामे 25 ऑगस्ट पर्यंत पूर्ण करा. दुरूस्तीचे काम करत असताना प्राधान्य क्रम ठरवून कामे पूर्ण करा असेही ते म्हणाले.

००००

पालकमंत्री नितेश राणे यांनी साधला उपोषणकर्त्यांशी संवाद

NHM काम बंद आंदोलन मागे घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दि. २१ (जिमाका) :-  नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. रुग्णांना सेवा देताना कोणत्याही प्रकारची हयगय नको. रुग्णसेवेला प्रथम प्राधान्य द्या. आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करा. रुग्णसेवेबद्दल नागरिकांच्या कोणत्याही तक्रारी येता कामा नये असे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रशासनाला दिले.

पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषणकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्यासाठी संबंधित यंत्रणांना निर्देशित केले. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटीलमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकरजिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवीपी.एम. विश्वकर्मा समितीचे सदस्य प्रभाकर सावंतअपर जिल्हाधिकारी शुभांगी साठेनिवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे  तसेच संबंधित विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

यावेळी कारीवडेसावंतवाडी येथे नागरिकांना आरोग्य सेवा मिळत नसल्याबाबत उपोषणाचा इशारा दिला होता. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी उपोषणकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या मागण्या लवकरच पुर्ण करण्यात येतील असे आश्वासित केले.

पालकमंत्री नितेश राणे म्हणाले कीजिल्ह्यातील आरोग्य सेवा सुधारणेला प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील रिक्त पदे भरण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल. अत्याधुनिक रुग्णवाहिकांची खरेदी करण्यात येईल. सावंतवाडी येथे सुपर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याबाबत अधिक गतीने पाठपुरावा करण्यात येईल. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करणार असल्याचेही ते म्हणाले.

राष्ट्रीय आरोग्य मिशन  (NHM) कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू होते. या शिष्टमंडळाने देखील पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेत सर्व कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याची विनंती केली. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी याबाबत नक्कीच सकारात्मक मार्ग काढण्यात येईल. प्रशासन कायमस्वरुपी तुम्हाला मदत करणार असून रुग्णसेवा ही महत्वाची असल्याने काम बंद आंदोलन संपवून उद्यापासून सर्वांनी कामावर हजर व्हावे असेही त्यांनी शिष्टमंडळाला सांगितले असता शिष्टमंडळाने देखील सकारात्मक प्रतिसाद दिला.

00000

मिशन शक्ती अंतर्गत पाळणा योजनेची राज्यात अंमलबजावणी – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात ३४५ ठिकाणी ही पाळणाघरे सुरू करण्यास मान्यता

मुंबई दि २१ : केंद्र शासनाच्या मिशन शक्ती अंतर्गत सामर्थ्य या उपक्रमामध्ये महिलांना नोकरीदरम्यान मुलांची काळजी घेता यावी, यासाठी ६ महिने ते ६ वर्षे वयोगटातील मुलांसाठी अंगणवाडीत “पाळणा” ही योजना सुरू करण्यात आली आहे. यामुळे कामगार व नोकरदार महिलांना मोठा दिलासा मिळणार असून मुलांच्या संगोपनासाठी सुरक्षित व दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात ३४५ ठिकाणी ही पाळणाघरे सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. पाळणाघरांमध्ये डे-केअर सुविधा, पूर्व शालेय शिक्षण, पूरक पोषण आहार, वाढीचे निरीक्षण, आरोग्य तपासणी, लसीकरण आदी सुविधा दिल्या जाणार आहेत. तसेच मुलांना दिवसातून तीन वेळा म्हणजेच सकाळचा नाश्ता, दुपारचे गरम शिजवलेले जेवण आणि संध्याकाळचा नाश्ता देण्यात येईल.

पाळणा घर महिन्यात 26 दिवस, दररोज 7.5 तास सुरु राहील, यामध्ये जास्तीत जास्त 25 मुले असतील. याठिकाणी एक पाळणा सेविका व एक पाळणा मदतनीस नेमण्यात येईल. वीज, पिण्याचे पाणी, बालस्नेही शौचालय यांसारख्या सुविधा उपलब्ध असणार आहेत.

या कार्यक्रमाअंतर्गत अंगणवाडी सेविका यांना ₹1500 प्रतिमाह भत्ता देण्यात येणार आहे. अंगणवाडी मदतनीस यांना ₹750 प्रतिमाह, पाळणा सेविका मानधन यांना ₹5500 प्रतिमाह, तर पाळणा मदतनीस यांना ₹3000 प्रतिमाह भत्ता देण्यात येणार आहे.
—– 000 —-

महाराष्ट्र सदनात लवकरच स्वयंसहायता गटांचे दालन

नवी दिल्ली, दि.21 : राजधानी दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील स्वयं सहायता गटांच्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी एक स्वतंत्र दालन सुरू करण्यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला तसेच संबंधित यंत्रणांना दिले.

ग्रामविकास मंत्री गोरे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी निवासी आयुक्त यांनी प्रस्तावित केलेल्या बचतगट वस्तू प्रदर्शन व विक्री दालनबाबत सविस्तर चर्चा झाली. तसेच श्री. गोरे यांनी प्रस्तावित जागेची पाहणी देखील केली. यावेळी सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार उपस्थित होत्या.

महाराष्ट्र सदनात येत्या काळात बचतगटातील महिलांसाठी फिरते दालन उपलब्ध करून दिले जाईल. या दालनात गृहोपयोगी तसेच सजावटीच्या आणि वाळवणाच्या वस्तू यासह एक जिल्हा उत्पादन, भौगोलिक मानांकन असणारे उत्पादन अशा वस्तू राहतील. यामुळे महाराष्ट्रातील महिलांना राजधानीत व्यासपीठ उपलब्ध होईल असे श्रीमती विमला यांनी सांगितले.

ग्रामविकास मंत्री श्री. जयकुमार गोरे यांनी या उपक्रमासाठी सकारात्मकता दर्शविली असून  स्वयं सहायता गटांचे दालन महाराष्ट्र सदनात सुरु करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत संबंधिताना सूचित देखील केले.

00000

अमृत, नगरोत्थानच्या पायाभूत सुविधांच्या कामांची गती वाढवण्यासाठी महत्वाच्या सुधारणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उचलले पाऊल

मुंबई, दि २१ : केंद्राचे अमृत अभियान त्याचप्रमाणे नगरोत्थान महाभियानातील पायाभूत सुविधा प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन नागरिकांना सुविधांचा लाभ जलद गतीने मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार नगरविकास विभागाने काही महत्त्वाच्या तरतुदी केल्या आहेत. या संदर्भातील शासन निर्णय देखील प्रसिद्ध करण्यात आला. प्रकल्प वेळेत पूर्ण न केल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येईल, असेही यात म्हटले आहे.

यामुळे अमृत – २ आणि नगरोत्थान मधील प्रकल्पांची गती वाढून, अधिक पारदर्शकता येईल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जबाबदारी निश्चित करता येईल.

नवीन तरतुदीनुसार, प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ देताना ठेकेदाराकडून वास्तववादी नियोजन घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभाग आदींकडून आवश्यक परवानग्या वेळेत न मिळाल्यास मंत्रालयीन स्तरावर थेट पाठपुरावा करण्यात येणार आहे.

……तर कारवाई करणार

प्रकल्प वेळेत पूर्ण न झाल्यास संबंधित ठेकेदार, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार अथवा अंमलबजावणी करणारे अधिकारी यांच्यावर नियमांनुसार कारवाई करण्यात येणार आहे

अमृत अभियानासाठी नवीन प्रकल्प विकास व व्यवस्थापन सल्लागार  नेमण्यास मान्यता देण्यात आली असून, तोपर्यंत विद्यमान पीडीएमसीसी कार्यरत राहील.

सर्व करारनामे व कार्यादेश  शासनाने दिलेल्या मानकानुसार  करणे अनिवार्य राहणार आहे.

मासिक अहवाल बंधनकारक

प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी मासिक अहवाल शासनाकडे सादर करणे सर्व संस्थांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी स्वतंत्र स्वरूपाचा नमुना उपलब्ध करून देण्यात येईल.

नगरोत्थानसाठी स्वतंत्र प्रकल्प कक्ष

त्याचप्रमाणे नगरोत्थान महाभियानासाठी स्वतंत्र प्रकल्प व्यवस्थापन कक्ष स्थापन करून अमृत २ अभियानाच्या धर्तीवर स्वतंत्र पोर्टल विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तसेच अमृत 2.0 अभियानाच्या पोर्टलवरील माहिती प्रत्येक १५ दिवसांनी अद्ययावत करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यासाठी प्रत्येक संस्थेत नोडल अभियंता नेमण्यात येणार असून माहिती वेळेत अद्ययावत न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.

००००

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून निरीक्षकांची नियुक्ती

मुंबई, दि.२१ : भारतीय संविधानातील कलम ३२४ अंतर्गत प्रदत्त अधिकारांचा वापर करून भारताच्या निवडणूक आयोगाने (ECI) उपराष्ट्रपती निवडणूक २०२५ साठी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या कार्यक्रमानुसार, उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी ९ सप्टेंबर २०२५ रोजी मतदान व मतमोजणी होणार आहे.

या निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून सुशीलकुमार लोहानी, आयएएस (ओडिशा कॅडर : १९९५), अतिरिक्त सचिव, पंचायती राज मंत्रालय आणि डी. आनंदन, आयएएस (सिक्कीम कॅडर : २०००), अतिरिक्त सचिव, वित्त मंत्रालय (व्यय विभाग) यांची नियुक्ती केली आहे.

याशिवाय, नितीनकुमार शिवदास खाडे, आयएएस (आसाम-मेघालय कॅडर : २००४), संयुक्त सचिव, ग्रामीण विकास मंत्रालय (भूमी संसाधन विभाग) यांना राखीव यादीत स्थान देण्यात आले आहे.

उपराष्ट्रपती निवडणुकीचे संपूर्ण आयोजन पारदर्शक आणि सुरळीत पार पडावे, यासाठी निवडणूक आयोगाकडून या नियुक्ती करण्यात आल्या असल्याचे भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

000

संजय ओरके/विसंअ

जीआय नामांकन प्राप्त पिकांच्या पॅकेजींग व ब्रँडींगसाठी मदत करण्यास शासन सकारात्मक फलोत्पादन मंत्री – भरत गोगावले

पुणे दि.२१ : राज्यामध्ये उत्पादित होत असलेल्या फळ पिकाची निर्यात वाढविण्यासाठी फळ पिकाचे क्लस्टर वाढवावेत तसेच जीआय नामांकन प्राप्त पिकांच्या पॅकेजींग व ब्रँडींगसाठी मदत करण्यास शासन सकारात्मक असून त्या अनुषंगाने प्रस्ताव तयार करण्यात यावा, अशा सूचना राज्याचे रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खार भूमि विकास मंत्री भरत गोगावले यांनी केले.

साखर संकूल येथे आयोजित राज्यातील फलोत्पादन विभागाच्या आढावा बैठकीत श्री. गोगावले बोलत होते. बैठकीस  कृषि आयुक्त डॉ. हेमंत वसेकर, संचालक, विस्तार व प्रशिक्षण रफिक नाईकवाडी, संचालक कृषिप्रक्रिया व नियोजन विनयकुमार औटे आदी उपस्थित होते.

श्री. गोगावले  म्हणाले, प्रत्येक विभागाची भौगोलिक परिस्थिती बघून त्यानुसारच कामकाज करावे. फलोत्पादन वाढीसाठी नाविन्य पूर्ण उपक्रम राबवून विभागाचा महसूल वाढवावा. राज्यातील फलोत्पादनाचे क्षेत्र वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. शासनाच्या रोपवाटीका  बळकट करण्यासाठी काय उपाययोजना करण्यात येतील याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करावा. प्रत्येक रोपवाटिकेस काही ठरावीक खेळते भांडवल ठेवता येईल का या संदर्भात तपासणी करुन प्रस्ताव शासनास सादर करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

कोकणामध्ये  मोठया प्रमाणावर सुपारीची लागवड होत आहे. परंतू सुपारी पीक भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये समाविष्ठ नाही. या पिकाचा या योजनेमध्ये समावेश करण्यात यावा.  महाराष्ट्र ग्रामीण हमी योजनेंतर्गत परमीटवर शेतकऱ्यांच्या कलमे-रोपे पुरवठा केल्यानंतर त्याची कुशलची रक्कम शासकीय रोपवाटीकेस देण्या संदर्भात व खजूर या पिकाचा समावेश या योजनेमध्ये करण्याबाबत शेतकऱ्यांची मागणी असल्याने यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना श्री. गोगावले यांनी दिल्या.

बैठकीत विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा सविस्तर आढावा संचालक फलोत्पादन अंकुश माने यांनी तर व्यवस्थापकीय संचालक अशोक किरनळळी, यांनी महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि वनऔषधी वनस्पती मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनां संदर्भात सादरीकरण केले.

या बैठकीस ठाणे, नाशिक, पुणे छत्रपती संभाजीनगर, लातूर,  विभागांचे  विभागीय कृषि सह संचालक उपस्थित होते तर अमरावती व नागपूर विभागाचे  कृषि सहसंचालक दूरदुष्यप्रणालीव्दारे उपस्थित होते.

000000

पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडून पूरग्रस्तांसाठी तातडीने मदत साहित्य उपलब्ध

नांदेड दि. २१ ऑगस्ट : जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी तातडीने औषधे व जीवनोपयोगी साहित्य उपलब्ध करून दिले आहे. शासनासह विविध सामाजिक संस्थांच्यावतीनेही मदतीचा ओघ पूरग्रस्त गावातील नागरिकांसाठी सुरू आहे.

मुखेड तालुक्यातील लेंडी धरणाच्या प्रभाव क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे मुक्रमाबाद, हसनाळ, रावणगाव, भिंगोली, भासवाडी या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. या पुराच्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरून जीवनावश्यक वस्तू व साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
दरम्यान, पालकमंत्री अतुल सावे यांनी #पूर परिस्थितीची तातडीने दखल घेऊन पूरग्रस्तांसाठी मदत साहित्य उपलब्ध करून दिले आहे. हे साहित्य देगलूरचे उपविभागीय अधिकारी व मुखेडचे तहसीलदार यांना वितरणासाठी सुपूर्द केले असून, त्यांच्यावतीने पूरग्रस्तगावांमध्ये या साहित्याचे वितरण करण्यात येत आहे. या साहित्यात प्रामुख्याने दैनंदिन वापरातील कपडे साडी, टीशर्ट, ट्रॅकपँट, टॉवेल, आणि जीवनावश्यक औषधे पॅरासीटामॉल टेबलेट स्ट्रिप, ओआरएस इ. साहित्याचा यामध्ये समावेश आहे.
०००००

मुख्यमंत्री सहायता निधीमुळे दुर्धर आजारांवर झाला उपचार

आता जिल्ह्यातच मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष

यवतमाळ, दि.२१ (जिमाका) : मुख्यमंत्री सहायता निधी अनेक रुग्णांसाठी आधार ठरला आहे. जिल्ह्यात योजनेचा कक्ष सुरु झाल्यापासून हा निधी मिळविणे अधिक सोपे आणि कमी त्रासाचे झाले आहे. जिल्ह्यातील अनेक रुग्णांना या कक्षाचा लाभ झाला असून दोन रुग्णांच्या जटील शस्त्रक्रियांसाठी कक्षाच्या निधीने मोठा दिलासा दिला आहे.

सर्वसामान्य गरीब कुटुंबातील रुग्ण दुर्धर आजारांवर उपचार किंवा शस्त्रक्रिया करू शकत नाही. असे आजार झाल्यास त्यांना खरा प्रश्न पडतो, यासाठी येणारा खर्च करायचा कसा. अशा रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष मोठा आधार देणारा ठरला आहे. अनेक रुग्णांना या कक्षाने वैद्यकीय मदतीचा हात दिला. गेल्या महाराष्ट्र दिनी जिल्हाधिकारी कार्यालयातच कक्ष सुरु झाल्याने रुग्णांना अधिक फायद्याचे ठरत आहे.

यवतमाळ येथील जितेंद्र मनोहर श्रीवास हे ५० वर्षाचे नागरिक आहेत. त्यांच्या मेंदुत संसर्ग झाल्याने गेल्या अनेक दिवसांपासून ते नागपूर येथील मेयो रुग्णालयात भरती होते. त्यांना उपचारासाठी लागणाऱ्या खर्चाची चिंता होती. विविध ठिकाणी प्रयत्न करूनही त्यांना उपचारासाठी खर्चाची आवश्यक रक्कम जुळविता येत नव्हती. पानठेल्याचा व्यवसाय असल्याने त्यांचे उत्पन्नही जेमतेम होते. कोणत्याही योजनेतून आजारासाठी रक्कम मिळत नसल्याने त्यांना मुख्यमंत्री सहायता कक्षाबाबत समजले. त्यांनी लगेच अर्ज केला आणि त्यांना उपचारासाठी 50 हजार रुपयांची रक्कम तातडीने मंजूर करण्यात आली. या मदतीने ते आपल्या मेंदूतील संसर्गावर उपचार करु शकले.

झरी जामणी तालुक्यातील आंबेझरी या अतिशय दुर्गम गावातील विनोद मधुकर शिंदे यांना क्रॅानिक मायलॅाइड ल्युकेमिया हा आजार होता. अनेक दिवसांपासून ते या आजाराशी झुंजत होते. वर्षाला यासाठी त्यांना बराच खर्च येत होता. मुख्यमंत्री सहायता कक्षास मदतीसाठी अर्ज केल्यानंतर त्यांना 50 हजार रुपयांचे सहाय्य उपचारासाठी मंजूर करण्यात आले. मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या मदतीने आजारावर उपचार करता आले. हा कक्ष अतिशय चांगला असून रुग्णांना आधार देणारा असल्याचे या दोनही रुग्णांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करतांना सांगितले.

वैद्यकीय उपचार, शस्त्रक्रियेच्या मदतीसाठी रुग्ण जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षास संपर्क साधू शकतात किंवा https://cmrf.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्जासोबत आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, राशन कार्ड, वैद्यकीय अहवाल, खर्चाचे अंदाजपत्रक जोडणे आवश्यक असते. मदतीच्या लाभासाठी रुग्ण राज्याचा निवासी व त्याचे उत्पन्न एक लाख 60 हजारापेक्षा कमी असावे.

        0000

महानगरपालिकेच्या आरोग्य वर्धिनी केंद्राची विभागीय आयुक्तांकडून पाहणी

अमरावती, (दि. २१ ऑगस्ट) : विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी आज महानगरपालिकेच्या रहाटगाव येथील आरोग्य वर्धिनी केंद्राला भेट देऊन तेथील आरोग्य सेवा-सुविधांचा सखोल आढावा घेतला. नागरिकांना आरोग्य विषयक सर्व सोयी-सुविधा तत्परतेने मिळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले. यावेळी त्यांच्यासोबत महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा-चांडक उपस्थित होत्या.

या भेटीदरम्यान डॉ. सिंघल यांनी केंद्रात दिल्या जाणाऱ्या सेवांबद्दल समाधान व्यक्त केले. रुग्णांची नोंदणी, तपासणी आणि मोफत औषध वाटप यांसारख्या सुविधांचा नागरिक मोठ्या प्रमाणावर लाभ घेत असल्याचे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. आरोग्य केंद्रातील कामकाजाची माहिती घेतल्यानंतर त्यांनी भविष्यात या केंद्रांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण सूचना केल्या.

विभागीय आयुक्त डॉ. सिंघल म्हणाल्या की, शहरातील नागरिकांना मोफत व गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा सहज उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. रुग्णांची नोंदणी आणि आरोग्य अहवाल संगणकीकृत पद्धतीने ठेवावे, जेणेकरून आकडेवारीचे विश्लेषण आणि नियोजन सोपे होईल. आरोग्यविषयक जागृतीसाठी नियमित मोहीम आणि कार्यशाळांचे आयोजन करावे. आरोग्य केंद्र परिसर स्वच्छ आणि निर्जंतुक ठेवण्यास प्राधान्य द्यावे. नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कामे करावित, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

महापालिकेमार्फत सुरू करण्यात आलेली आरोग्य वर्धिनी केंद्रे स्थानिक नागरिकांच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. रुग्ण नोंदणी, तपासणी आणि आवश्यक औषधे या ठिकाणी मोफत दिली जातात.  या आरोग्य वर्धिनी केंद्रांचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्तांनी यावेळी केले.

महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी केंद्रातील सेवा अधिक प्रभावी बनवण्यासाठी सूचना दिल्यात. त्या म्हणाल्या की, औषधांचा तुटवडा जाणवू नये यासाठी औषधसाठा सातत्याने अद्ययावत ठेवावे. गरजेनुसार नवीन तपासणी उपकरणे व सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे. नागरिकांकडून अभिप्राय घेऊन त्यानुसार सेवांमध्ये सुधारणा करावे. वैद्यकीय व प्रशासकीय कर्मचाऱ्यांसाठी नियमित प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करावे. आपत्कालीन परिस्थितीत जलद प्रतिसाद देणारी व्यवस्था कार्यान्वित ठेवावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

यावेळी उपायुक्त नरेंद्र वानखडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, डॉ. संदीप पाटबागे, डॉ. तरोडेकर आणि स्टाफ नर्स सुचिता चोपडे आदी उपस्थित होते.

00000

ताज्या बातम्या

गणेशोत्सव काळात नागरिकांची गैरसोय टाळा -पालकमंत्री नितेश राणे

0
सिंधुदुर्गनगरी दि २१ (जिमाका):- सततच्या पावसामुळे शहरी व ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे रस्त्यांची डागडूजी व दुरूस्तीची कामे २५ ऑगस्ट पर्यंत पूर्ण...

पालकमंत्री नितेश राणे यांनी साधला उपोषणकर्त्यांशी संवाद

0
NHM काम बंद आंदोलन मागे घेण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी दि. २१ (जिमाका) :-  नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. रुग्णांना सेवा देताना कोणत्याही प्रकारची...

मिशन शक्ती अंतर्गत पाळणा योजनेची राज्यात अंमलबजावणी – महिला व बालविकास मंत्री आदिती...

0
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात ३४५ ठिकाणी ही पाळणाघरे सुरू करण्यास मान्यता मुंबई दि २१ : केंद्र शासनाच्या मिशन शक्ती अंतर्गत सामर्थ्य या उपक्रमामध्ये महिलांना नोकरीदरम्यान मुलांची...

महाराष्ट्र सदनात लवकरच स्वयंसहायता गटांचे दालन

0
नवी दिल्ली, दि.21 : राजधानी दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील स्वयं सहायता गटांच्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी एक स्वतंत्र दालन सुरू करण्यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश...

अमृत, नगरोत्थानच्या पायाभूत सुविधांच्या कामांची गती वाढवण्यासाठी महत्वाच्या सुधारणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उचलले...

0
मुंबई, दि २१ : केंद्राचे अमृत अभियान त्याचप्रमाणे नगरोत्थान महाभियानातील पायाभूत सुविधा प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन नागरिकांना सुविधांचा लाभ जलद गतीने मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ...