रविवार, मे 11, 2025
Home Blog Page 1656

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडून ज्येष्ठ पत्रकार नीलकंठ खाडीलकर यांच्या कुटुंबियांचे सांत्वन

मुंबई,दि.22: अग्रलेखांचा बादशहा,ज्येष्ठ पत्रकार आणि नवाकाळचे माजी संपादक नीलकंठ खाडीलकर यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी खाडीलकर यांच्या गिरगाव येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी खाडीलकर यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वनही केले.

यावेळी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी,माजी मंत्री छगन भुजबळ,दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत,वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे  सहसंचालक तात्याराव लहाने,माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे-पाटील,लेखिका विजया वाड यांच्यासह सर्व क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी खाडीलकर यांचे अंत्यदर्शन घेतले. 0000

Governor Bhagat Singh Koshyari pays tribute to Nilkanth Khadilkar

Mumbai, November 22:- Governor of Maharashtra Mr Bhagat Singh Koshyari condoled the death of the ‘King of editorials’ and senior journalist with the newspaper Navakal ,Neelkanth Khadilkar.

He visited the Girgaon resident of the departed scribe for paying his obeisance. The governor met the family of Khadilkar and expressed his condolence to the bereaved members. Former Chief Minister Manohar Joshi, former minister Chhagan Bhujbal, executive editor of daily Saamana Sanjay Raut, Joint Director of Directorate of Medical Education and Research (DMER) Dr Tatyarao Lahane, former justice B G Kolse Patil, writer Vijaya Waad and renowned personalities from various fields also paid their obeisance to the departed soul.

0000

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी ने नीलकंठ खाडीलकर परिवार को दी सांत्वना

मुंबई : अग्रलेखों के बादशहा,वरिष्ठ पत्रकार और नवाकाल समाचारपत्र के पूर्व संपादक नीलकंठ खाडीलकर के निधन पर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी ने खाडीलकर के गिरगाव स्थित निवासस्थान पर जाकर उनके पार्थिव देह का अंतिम दर्शन लिया.

राज्यपाल श्री. कोश्यारी ने खाडीलकर के परिवार से मिलकर उन्हें सांत्वना भी दी.

इस समय पूर्व मुख्यमंत्री मनोहर जोशी,पूर्व मंत्री छगन भुजबल,दैनिक सामना के कार्यकारी संपादक संजय राऊत,वैद्यकीय शिक्षण और संशोधन संचालनालय के सहसंचालक तात्याराव लहाने,पूर्व न्यायमुर्ती बी.जी. कोलसे-पाटील,लेखिका विजया वाड समेत सभी क्षेत्र के कई गणमान्य व्यक्तियों ने खाडिलकर का अंतिम दर्शन लिया.

0000000

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई,दि.21 :राज्यातील युवक-युवतींना स्वयंपूर्ण, आत्मनिर्भर बनविण्यासाठी,त्यांच्या स्वयंरोजगार प्रकल्पांना आर्थिक सहाय्यातून रोजगाराच्या  संधी उपलब्ध करुन देणाऱ्या  राज्य शासनाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP)या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई शहर व उपनगरामधील सुशिक्षित नवउद्योजक बेरोजगारांना वाढत्या लोकसंख्येचा विचार करता तसेच उद्योग व्यवसायामध्ये व्यापक प्रमाणात पूरक गुंतवणुकीसाठी राज्य शासनामार्फत नव्यानेच कार्यान्वित झालेल्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP)सद्यस्थितीत मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. ही योजना100टक्के ऑनलाईन कार्यप्रणालीनुसार राबविण्यात येते. इच्छुक अर्जदारांनी योजनेची माहिती तसेच ऑनलाईन अर्जासाठीmaha-cmegp.gov.inया संकेतस्थळावर भेट देऊन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन मुंबई प्राधिकरण विभागाचे उद्योग सह संचालक पी.जी. राठोड यांनी केले आहे.

योजनेंतर्गत सेवा उद्योगासाठी कमाल रु.10.00लाखाचे व उत्पादन प्रकल्पासाठी कमाल रुपये50लाखांचे अर्थसहाय्य बँकेमार्फत दिले जाते. ज्यामध्ये शासनाचे अनुदान प्रवर्गनिहाय15ते25टक्के देय आहे. तसेच अर्जदाराची स्वगुंतवणूक5ते10टक्के भरावी लागणार आहे. आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत.

1)जन्म दाखला/शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र/वयाचा पुरावा

2)शैक्षणिक पात्रतेसंबंधीचे कागदपत्रे/प्रमाणपत्रे

3)आधार कार्ड

4)जातीचे प्रमाणपत्र (एस.सी./एस.टी. प्रवर्गासाठी)

5)विशेष प्रवर्गासाठीचे पूरक प्रमाणपत्र (अपंग,माजी सैनिक)

6)स्वसाक्षांकित विहित नमुन्यातील वचनपत्र (Undertaking)

7)प्रकल्प अहवाल

 अधिक माहितीसाठी संपर्क साधा-

          उद्योग सह संचालक (मुंप्रावि) यांचे कार्यालय,

          विकास सेंटर, 702, 7वा मजला,सी. गिडवाणी मार्ग,

          बसंत सिनेमागृहाजवळ,चेंबूर (पूर्व),मुंबई– 400074

          Email ID : didicmumbai@gmail.com

परिचय केंद्राकडून दिवाळी अंकांची समृद्ध परंपरा जपण्याचे उत्तम कार्य – उपायुक्त संदीप माळवी

महाराष्ट्रपरिचयकेंद्रातदिवाळीअंकप्रदर्शनाचेउद्घाटन

नवी दिल्ली,22 :महाराष्ट्रातील दिवाळी अंकांची समृद्ध परंपरा  राजधानी दिल्लीत जपण्याचे मोलाचे कार्य महाराष्ट्र परिचय केंद्र करीत असल्याचे गौरवोद्गार ठाणे महानगरपालिकेचे उप आयुक्त संदीप माळवी यांनी आज येथे काढले.

श्री.माळवी यांच्या हस्ते आणि अनिवासी भारतीय ॲड.प्रणिता देशपांडे यांच्या उपस्थितीत आज महाराष्ट्र परिचय केंद्राच्या दिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.यावेळी श्री.माळवी यांनी हे विचार मांडले. 

परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी  श्री. माळवी आणि श्रीमती देशपांडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.  महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

शिक्षण,आरोग्य,राजकारण,महिला,बालक,तरूण,चित्रपट अशा विविध विषयांना वाहिलेले सकस दिवाळी अंक मराठी भाषेत प्रक्राशित होतात.ही दिवाळी अंकांची मेजवानी परिचय केंद्र मराठी वाचकांना राजधानी दिल्लीत उपलब्ध करून देते. दिवाळी अंकांची समृद्ध संस्कृती या निमित्ताने जपली जाते ही गौरवाची बाब असल्याचे श्री.माळवी यांनी सांगितले.

ॲड.देशपांडे म्हणाल्या,मराठी भाषेतील वैविध्यपूर्ण साहित्य दिवाळी अंकांच्या रूपात वाचकांना एकत्रित वाचायला मिळते.हा साहित्यिक ठेवा वाचकांपर्यंत पोहोचविण्याची परिचय केंद्राची दीर्घ परंपरा कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.परिचय केंद्रात असलेल्या हस्तलिखित दिवाळी अंकांचे डिजिटायजेशन केल्यास आम्हा परदेशातील मराठीजनांनाही हे दुर्मिळ अंक वाचायला मिळतील, अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

प्रदर्शनात125दिवाळी अंकांची मेजवानी  

या प्रदर्शनात गृहलक्ष्मी,आवाज,  मिळून साऱ्याजणी,चारचौघी,श्री व सौ,अंतर्नाद,जत्रा,किशोर,अक्षरधारा,तारांगण,कालनिर्णय,उत्तम कथा,निरंजन,अन्नपूर्णा,लोकसत्ता,महाराष्ट्र टाइम्स,लोकमत-दिपोत्सव,साप्ताहिक सकाळ,  प्रभात,झी मराठी आदी125  दिवाळी अंक मांडण्यात आले आहेत.हे प्रदर्शन दिनांक28नोव्हेंबर2019पर्यंत सकाळी9ते सायंकाळी  6वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.

 000000 

रितेशभुयार/वृत्तवि.क्र.२५५/  दिनांक22/11/2019    

जलशक्ती राष्ट्रीय पुरस्कारासाठी ३० नाव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई दि. 22 : जलसंधारण आणि व्यवस्थापन या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दिल्या जाणाऱ्या दुसऱ्या जलशक्ती राष्ट्रीय पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत३० नाव्हेंबर २०१९आहे.

जल संधारण आणि व्यवस्थापन या क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाने गेल्या वर्षीपासून राष्ट्रीय जल पुरस्कार जाहीर केले आहेत. यंदाचे पुरस्काराचे हे दुसरे वर्ष असून,या पुरस्कारासाठी केंद्र शासनाने राज्यातील विविध संस्थांना अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठीwww.mowr.gov.inकिंवाwww.cgwb.gov.inयासंकेतस्थळास भेट द्यावी.

जीएसटी प्रॅक्टिशनर्सच्या नावनोंदणी पुष्टीकरणासाठी १२ डिसेंबरला परीक्षा

मुंबई दि. २१ : राष्ट्रीय सीमा शुल्क, अप्रत्यक्ष कर आणि नार्कोटक्स अकादमी (नासेन) यांच्या  २८ मे २०१८ रोजीच्या अधिसूचनेनुसार वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) प्रॅक्टिशनर्सच्या नाव नोंदणीच्या पुष्टीकरणासाठी १२ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी ११ ते १.३० या वेळेत  परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.

यासंबंधी केंद्रीय वित्त मंत्रालयाने प्रसिद्धीपत्रक निर्गमित केल्यानुसार नियम ८३ (२) च्या अधीन जीएसटी नेटवर्कवर नोंदणीकृत झालेले आणि नियम ८३ (१) (ख) च्या अंतर्गत येणारे जीएसटीपी अर्थात जे सेल्स टॅक्स प्रॅक्टिशनर किंवा टॅक्स रिटर्न प्रिपेयरर म्हणून काम केलेले आणि तत्कालीन कायद्यांतर्गत पाच वर्षांच्या कामाचा अनुभव असेलेले प्रॅक्टिशनर यांना ३१ डिसेंबर २०१९ च्या आत परीक्षा देणे आवश्यक आहे. यापूर्वी यासाठी  दि. ३१ ऑक्टोबर २०१८, १७ डिसेंबर २०१८ आणि १४ जून २०१९ रोजी परिक्षांचे आयोजन करण्यात आले होते. अशा प्रॅक्टिशनर्ससाठी पुढील परिक्षा १२ डिसेंबर २०१९ रोजी आयोजित करण्यात आली आहे.

परीक्षा संगणकावर घेण्यात येईल. यासाठी जीएसटीपीद्वारे नोंदणीकृत पोर्टलवर नोंदणी करता येऊ शकेल. यावर नासेन आणि सी.बी.आय.सी च्या संकेतस्थळाची लिंक देण्यात आली आहे. १२ डिसेंबर २०१९ च्या परीक्षेसाठी नोंदणी व्हावी यासाठी हे पोर्टल २२ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत खुले राहील. परीक्षार्थींच्या मदतीसाठी या काळात एक मदत केंद्रही सुरु करण्यात येईल व त्याची माहिती नोंदणी पोर्टलवर उपलब्ध करून दिली जाईल. या परीक्षेसाठी परीक्षार्थींनी ५०० रुपयांची परीक्षा फी ऑनलाईन स्वरूपात भरणे आवश्यक आहे.

जीएसटी कायदा आणि प्रकिया-वेळ २ तास ३० मिनिट, बहुपर्यायी प्रश्न संख्या १००, भाषा इंग्रजी किंवा हिंदी, गुण २००, पात्रता गुण किमान १००, निगेटिव्ह मार्किंग नाही, याप्रमाणे परीक्षेचे स्वरूप तर केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधिनियम २०१७,एकात्मिक वस्तू आणि सेवा कर अधिनियम २०१७, सर्व राज्यांचे वस्तू आणि सेवा कर अधिनियम २०१७, केंद्रशासित प्रदेशातील वस्तू आणि सेवाकर अधिनियम २०१७, वेळोवेळी निर्गमित केलेल्या अधिसूचना, परिपत्रके आणि आदेश याप्रमाणे अभ्यासक्रम राहणार आहे.

वस्तू आणि सेवा कर प्रणाली ही सातत्याने विकसित होत असलेली प्रणाली आहे. यामुळे या परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतच्या माहितीवर आधारित असेल.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे नवीन वर्षातील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

मुंबई,दि.22 :महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे2020मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर हे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

या वेळापत्रकानुसार राज्य सेवा परीक्षा2020साठीची मुख्य परीक्षा शनिवारपासून तीन दिवस आणि सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय परीक्षा ही शनिवारी घेण्यात येणार असून उर्वरित सर्व पूर्व तसेच मुख्य परीक्षा रविवारी घेण्याचे नियोजित आहे.

राज्य सेवा परीक्षा2020साठीची जाहिरात डिसेंबर2019मध्ये प्रसिद्ध करण्यात येणार असून पूर्व परीक्षा5एप्रिल2020रोजी तर मुख्य परीक्षा शनिवार,8ऑगस्ट ते सोमवार10ऑगस्ट, 2020अशी तीन दिवस घेण्यात येणार आहे. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षेसाठी जानेवारी2020मध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार असून पूर्व परीक्षा1मार्च रोजी तर मुख्य परीक्षा दि.14जून2020रोजी घेण्यात येणार आहे.

सहायक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा जानेवारी2020मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असून पूर्व परीक्षा15मार्च, 2020रोजी तर मुख्य परीक्षा12जुलै2020रोजी घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त परीक्षेसाठी फेब्रुवारी2020मध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार असून पूर्व परीक्षा3मे2020रोजी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा2020अंतर्गत संयुक्त पेपर क्रमांक1- 6सप्टेंबर2020रोजी,पेपर क्र.2 (पोलीस उपनिरीक्षक)13सप्टेंबर2020,पेपर क्रमांक2 (राज्य कर निरीक्षक)-27सप्टेंबर2020,पेपर क्र.2 (सहायक कक्ष अधिकारी)-4ऑक्टोबर2020रोजी घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्र वन सेवा परीक्षा मार्च2020मध्ये जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असून पूर्व परीक्षा10मे रोजी तर मुख्य परीक्षा11ऑक्टोबर2020रोजी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षेसाठी मार्च2020मध्ये जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असून महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा17मे2020मध्ये घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा दिनांक‍18ऑक्टोबर2020रोजी घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त परीक्षा एप्रिल2020मध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार असून पूर्व परीक्षा7जून2020रोजी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षेअंतर्गत संयुक्त पेपर क्रमांक1-दि.29नोव्हेंबर2020रोजी,संयुक्त पेपर क्रमांक2 (लिपिक-टंकलेखक)-  6डिसेंबर2020,संयुक्त पेपर क्रमांक2 (दुय्यम निरीक्षक,राज्य उत्पादन शुल्क,गट-क)-13डिसेंबर2020रोजी तर संयुक्त पेपर क्रमांक2 (कर सहायक)-20डिसेंबर2020रोजी घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्र कृषि सेवा परीक्षा मे2020मध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार असून पूर्व परीक्षा5जुलै रोजी तर मुख्य परीक्षा1नोव्हेंबर, 2020रोजी घेण्याचे नियोजित आहे. सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा सप्टेंबर, 2020मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असून परीक्षा शनिवार28नोव्हेंबर, 2020रोजी घेण्याचे नियोजित आहे. परीक्षांचे वेळापत्रक आयोगाच्याwww.mpsc.gov.inया संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. हे वेळापत्रक अंदाजित असून त्यामध्ये बदल होऊ शकतो असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

0000

सचिन गाढवे/वि.सं.अ/22.11.2019   

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडून हुतात्म्यांना आदरांजली

मुंबई, दि.21 : मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी झालेल्या आंदोलनातील हुतात्म्यांना आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी फोर्टमधील हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करुन  अभिवादन केले.

याप्रसंगी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे, बृहन्मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड, कोकण विभागाचे आयुक्त शिवाजी दौंड, पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनीही यावेळी पुष्पचक्र वाहून हुतात्म्यांना अभिवादन केले.

यावेळी मंत्रालय, महापालिका, पोलीस, नौदलातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 0000

Maharashtra Governor pays tributes to the martyrs of Samyukta Maharashtra movement

Mumbai, 21st Nov : Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari today visited the Hutatma Smarak in Mumbai and offered tributes to the martyrs of Samyukta Maharashtra movement.

The Governor placed a wreath at the Martyrs’ Memorial and stood in silence in memory of the martyrs who laid down their life in the agitation for Samyukta Maharashtra.

Mayor of Mumbai Vishwanath Mahadeshwar, Additional Chief Secretary Sitaram Kunte, Director General of Police, Maharashtra Subodh Jaiswal, Commissioner of Police Sanjay Barve and senior government officials also paid their respects at the Martyrs’ Memorial. It was on 21st of November in the year 1955, that people agitating peacefully were fired upon.

0000

सागरी मत्स्यव्यवसाय प्रशिक्षणासाठी २० डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. 21: सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचालनया 6 महिन्याच्या प्रशिक्षण वर्गासाठी मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्राकडे येत्या 20 डिसेंबरपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

मत्स्यव्यवसायाचा विकास व विस्तार होण्याच्या दृष्टीकोनातून मत्स्यव्यवसायातील इच्छुक प्रशिक्षणार्थींना‘सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचालनहे 6 महिन्यांचे प्रशिक्षण वर्सोवा येथील मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रामध्ये देण्यात येते. 2019-2020 या वर्षातील प्रशिक्षण वर्गाचे आयोजन दिनांक 1 जानेवारी ते 30 जून 2020 या 6 महिन्याच्या कालावधीत करण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी दरमहा 450 रुपये तर दारिद्र्य रेषेखालील प्रशिक्षणार्थीला दरमहा 100 रुपये इतके प्रशिक्षण शुल्क आकारले जाते.

प्रशिक्षणार्थी क्रियाशील मच्छिमार व प्रकृतीने सुदृढ असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थीचे वय 18 ते 35 या दरम्यान असावे. पोहता येणे आवश्यक आहे. किमान 4 थी इयत्ता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थीस मासेमारीचा किमान 2 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. बायोमेट्रिक कार्डधारक किंवा आधारकार्डधारक असावा. संबंधित संस्थेच्या शिफारसीसह विहित परिपूर्ण अर्ज असावा. प्रशिक्षणार्थी दारिद्र्य रेषेखालील असल्यास अर्जासोबत त्याबाबतचे प्रमाणपत्र, संबंधीत गट विकास अधिकाऱ्याच्या दाखल्याची साक्षांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.

निकषांची पूर्तता करणाऱ्या इच्छुक मच्छिमारांनी मच्छिमार सहकारी संस्थेच्या शिफारशीसह मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, पांडुरंग रामले मार्ग, तेरे गल्ली, वर्सोवा, मुंबई-61 येथे दिनांक 20 डिसेंबर 2019 पर्यंत अर्ज करावा असेही आवाहन करण्यात आले आहे.

0000

सचिन गाढवे/वि.सं.अ./दि.21.11.2019

‘जय महाराष्ट्र’ व ‘दिलखुलास’ ‍कार्यक्रमात उद्या ‘स्वच्छ – निर्मल तट अभियान’ या विषयावर मुलाखत

मुंबई, दि. २१ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्रदिलखुलास’‍ कार्यक्रमात स्वच्छ – निर्मल तट अभियान  या विषयावर सामाजिक वनीकरणचे प्रधान मुख्य वन संरक्षक डॉ.दिनेश कुमार त्यागी यांची  मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर  शुक्रवार दिनांक २२ नोव्हेंबर २०१९ रोजी संध्याकाळी ७.३० वाजता प्रसारित होईल. या मुलाखतीमध्ये  प्रधान सचिव वने विकास खारगे यांच्या प्रतिक्रियेचा समावेश आहे.

दिलखुलास’‍कार्यक्रमात ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसेच प्रसारभारतीच्या न्यूज ऑन एअरया ॲपवरही शुक्रवार दि.२२ आणि सोमवार दि.२५ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. ही मुलाखत निवेदिका कल्पना साठे यांनी घेतली आहे.      

या मुलाखतीमध्ये स्वच्छ  निर्मल तट अभियानाचा उद्देश, व्याप्ती व कार्यक्रमाचे स्वरूप,सागरी स्वच्छतेमध्ये स्थानिक प्रशासन व लोकांचा सहभाग,कांदळवन संवर्धन व जतन याविषयी सविस्तर माहिती डॉ.त्यागी यांनी जय महाराष्ट्र  दिलखुलासकार्यक्रमात  दिली आहे.

नवी मुंबई डाक विभागात डाकसेवकांची पदभरती

मुंबई, दि. 21 : भारतीय डाक विभागांतर्गत महाराष्ट्र मंडळ कार्यालयांची 3650 ग्रामीण डाक सेवक पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून त्यामध्ये अधीक्षक डाकघर, नवी मुंबई विभाग यांच्या कार्यक्षेत्रातील शाखा डाकपालाच्या 19 पदासाठी तसेच इतर भरती कार्यालयामार्फत 41 डाक सेवक/ सहाय्यक शाखा डाकपाल ही पदे भरली जाणार आहेत, असे वरिष्ठ अधीक्षक डाकघर, पनवेल यांनी कळविले आहे.

पात्र व इच्छुक उमेदवारांनी 30 नोव्हेंबर 2019 पर्यंतhttp://appost.in/gdsonline/या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावेत. नवी मुंबई विभागकार्यक्षेत्रातील पात्र उमेदवारांना अर्जाची फी प्रधान डाकघर, पनवेल यांच्याकडे जमा करता येणार आहे.

अफवांना, भूलथापांना बळी पडू नये

भारतीय डाक विभाग पैसे भरण्यासाठी कोणत्याही प्रकारचा फोन व संदेश पाठवित नाही. निवड झालेल्या उमेदवारांना सिस्टिम जनरेटेड संदेश त्यांची निवड झाल्यावर प्राप्त होऊ शकेल. आवश्यक पत्र व्यवहार अधिकृत भरती कार्यालयामार्फत केला जाईल याची नोंद घ्यावी. त्यामुळे उमेदवारांनी आपला नोंदणीकृत क्रमांक व भ्रमणध्वनी क्रमांक जाहीर करु नये व अफवांपासून सावध राहावे. तसेच भारतीय डाक विभाग कोणत्याही हेतूसाठी आपणास फोन करत नाही. म्हणून उमेदवारांनी या बाबतीत जागरुक राहावे व कोणत्याही अफवांना, भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत बाधित क्षेत्रासह आरोग्य व शाश्वत विकासाला प्राधान्य – पालकमंत्री चंद्रशेखर...

0
️नियामक परिषद बैठक संपन्न नागपूर, दि. १० : जिल्ह्यातील प्रत्यक्ष खाण बाधीत क्षेत्र व अप्रत्यक्ष खाण बाधित क्षेत्रात शासन निर्णयान्वये दिलेल्या निर्देशानुसार येत्या आर्थिक वर्षात...

गुणवत्तापूर्ण कामे करण्याला प्राधान्य द्यावे – सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

0
सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा बैठक सिंधुदुर्गनगरी, दि.10 (जिमाका) सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही तडजोड न करता कामे गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्यावर भर द्यावा. कंत्राटदारांकडून योग्यप्रकारे कामे...

तणावाच्या परिस्थितीमुळे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांचा दौरा रद्द

0
मुंबई, दि.10 : तणावपूर्ण परिस्थिती पाहता सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी "आय.ओ.टी. सोल्यूशन वर्ल्ड काँग्रेस अँड बार्सिलोना सायबर सिक्युरिटी काँग्रेस...

विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील खारपाण पट्ट्याला ५.७८ लाख एकर सिंचन लाभ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
भोपाळ, दि. 10 : तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत  महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन राज्यांमध्ये एका ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी करण्यात आली. सुमारे 19,244 कोटींच्या या...

भारतीय सैन्य दलाच्या समर्थनार्थ सातारा जिल्ह्यात रविवारी तिरंगा रॅलीचे आयोजन – पालकमंत्री शंभूराज देसाई

0
सातारा दि.10  : भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती अनुषंगाने भारतीय सैन्य दलाच्या समर्थनार्थ जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या ठिकाणी तिरंगा रॅलीचे आयोजन करा, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज...