बुधवार, जून 11, 2025
Home Blog Page 1718

जनतेचा एकही पैसा वाया जाणार नाही याकडे कटाक्षाने लक्ष द्या-सचिवांच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

मुंबई, दि.२९ : जनतेने शासनावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आणि महाराष्ट्राला देशातअग्रेसर करण्यासाठी विकास कामे करताना जनतेचा एकही पैसा वाया जाणार नाही याकडे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कटाक्षाने लक्ष द्यावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. 

मुख्यमंत्री कार्यालयात पदभार स्वीकारल्यानंतर प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी मुख्य सचिव अजोय मेहता, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव भूषण गगराणी आणि विविध विभागाचे सचिव उपस्थित होते. 

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, जनतेने दिलेल्या करातून विकासकामांसाठी निधी प्राप्त होत असतो.  निधीचा योग्य प्रकारे विनियोग करून विकासाला गती देणे आवश्यक आहे.  सेवाभावनेने कामे केल्यास जनतेचा विश्वास संपादन करता येईल.  सरकार माझे आहेअशी विश्वासाची भावना जनतेच्या मनात निर्माण करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. 

जनतेने विश्वासाने मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपविली आहे. राज्याला मुंबईत जन्मलेला पहिला मुख्यमंत्री मिळाला असल्याने मुंबईसह राज्याला देशात अग्रेसर करण्याचे स्वप्न घेऊन यापुढे काम करावयाचे आहे. विकासकामांसाठी निधी देताना करदात्याचे उत्पन्नही वाढेल याकडेदेखील लक्ष देणे तेवढेच महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण आणण्यासाठी विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवावा.

जनसेवेसाठी पारदर्शक आणि स्वच्छ कारभारावर अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे.  शासन आणि प्रशासनाबद्दल जनतेच्या मनात आपुलकीची आणि आदराची भावना निर्माण होण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. सर्वांगीण विकास साधताना कामांची गती आणि दिशेलाही तेवढेच महत्त्व आहे.  त्यादृष्टीने प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची जबाबदारी खूप महत्त्वाची आहे. अधिकारी आपल्या जबाबदारीचे सक्षमपणे निर्वहन करतील आणि प्रगतीचे उद्दिष्ट गाठण्यास शासन यशस्वी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ००००

CM Uddhav Thackeray holds Secretary’s meeting,

directs them not to waste a single paisa of public exchequer

Mumbai, Nov 29: Chief Minister Uddhav Thackeray Friday advised the senior administrative officers to utilize each paisa of the people while carrying out development works to make Maharashtra a leader state in the country and to justify the faith people of the state reposed in this government.

He was interacting with the senior administrative officers after assuming the responsibility of the Chief Minister of the State. Chief Secretary Ajoy Mehta, Principal Secretary of CMO Bhushan Gagarani and secretaries of various departments were present on this occasion.

CM Thackeray said that the funds for development works are made available from the tax paid by the people. It is necessary to give impetus to development by optimum utilization of the funds allocated. We can earn the public faith by working with service attitude. It is our responsibility to make people feel allegiance to the government.

People have entrusted this responsibility of Chief Minister with great faith. The State has received the first chief minister born in Mumbai and therefore we need to work with a dream to make Mumbai and the state leader in development in the state.

We need to look towards increasing taxpayers’ income while making funds available for development works. In addition to that priority of development works should be fixed to bring better days in the life of farmers and workers.

The officers should concentrate on transparent and clean administration as this is necessary to create respect and attachment of people with the government. Speed and direction of development works are also equally important. From this point of view the senior administrative officers have to play an important role which they will do and the government would succeed in achieving its target, the CM confidently hoped.

0000

चंदगड, हातकणंगले व ढाणकी नगरपंचायतींसाठी २९ डिसेंबरला मतदान

विविध नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील मतदान

मुंबई, दि. 29 : कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड व हातकणंगले आणि यवतमाळ जिल्ह्यातील ढाणकी या नवनिर्मित 3 नगरपंचायतींच्या अध्यक्ष व सदस्यपदांच्या सार्वत्रिक; तसेच 26 नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील विविध 22 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी 29 डिसेंबर 2019 रोजी मतदान; तर 30 डिसेंबर 2019 रोजी मतमोजणी होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.

श्री. मदान यांनी सांगितले की, संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकांसाठी 4 ते 12 डिसेंबर 2019 या कालावधीत नामनिर्देशनपत्र दाखल करता येतील. 8 डिसेंबर 2019 रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार नाहीत. छाननी 13 डिसेंबर 2019 रोजी होईल. अपील नसलेल्या ठिकाणी 18 डिसेंबर 2019 रोजी नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. अपील असलेल्या ठिकाणी न्यायालयाचा निकाल आल्यानंतर तिसऱ्या दिवसापर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. 29 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. 30 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू होईल.

नगरपरिषद/ नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुका: मोर्शी, धरणगाव, रत्नागिरी आणि सावंतवाडी.

नगरपरिषद/ नगरपंचायतनिहाय पोटनिवडणूक होणाऱ्या जागांचा तपशील: गडहिंग्लज- हद्दवाढ क्षेत्रासाठी, मलकापूर- 7, वाई- 8, खानापूर- 7, बार्शी- 5, मनमाड- 1, भुसावळ- 4, भडगाव- 3, नवापूर- 6अ आणि 7, परंडा- 7, कळंब- 8, उमरेड- 11, भिवापूर- 4, सिंधी (रेल्वे)- 8, मोहाडी- 4, 9 आणि 12, साकोली- 6, कोरपणा- 16, भामरागड- 5 आणि 16.

०-०-०

(Jagdish More, SEC)

दिलखुलास कार्यक्रमात शनिवारी ‘आपला महाराष्ट्र’ विशेष वार्तापत्र

मुंबई, दि. 29 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलासकार्यक्रमात आपला महाराष्ट्रहे विशेष वार्तापत्र  शनिवार दि. 30 नोव्हेंबर रोजी प्रसारित होणार आहे. हे वार्तापत्र राज्यातील आकाशवाणीच्या 22 केंद्रांवरून तसेच प्रसारभारतीच्या न्यूज ऑन एअर या ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे.

आपला महाराष्ट्रया वार्तापत्रात दर आठवड्यात राज्यातील विविध भागात घडलेल्या घटना, घडामोडी, शासनाचे महत्त्वाचे निर्णय यांचा विस्तृत आढावा घेतला जाईल. राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, परभणी, रत्नागिरी, सांगली,  अहमदनगर, अकोला,  अमरावती, बीड, चंद्रपूर, धुळे, नांदेड, सिंधुदुर्ग,  उस्मानाबाद, सातारा, सोलापूर,यवतमाळ या 22 आकाशवाणी केंद्रावरून हे वार्तापत्र प्रसारित  केले जाणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले हुतात्म्यांना अभिवादन

मुंबई, दि. 29 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईतील हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र वाहूनहुतात्म्यांना अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासोबत मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर, मंत्री एकनाथ शिंदे, खासदार अनिल देसाई, खासदार विनायक राऊत, आमदार सर्वश्री आदित्य ठाकरे, रविंद्र वायकर, ॲड.अनिल परब, संजय राठोड, माजी मंत्री दिवाकर रावते, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनीही पुष्प वाहून हुतात्म्यांना अभिवादन केले.

0000

सह्याद्री वाहिनीवर उद्या ‘संविधान दिन’ कार्यक्रमाचा वृत्तान्त

मुंबई, दि. २९ : सामाजिक न्याय  व विशेष सहाय्य विभाग तसेच डॉ. बाबासाहेब  आंबेडकर  संशोधन व  प्रशिक्षण  संस्था ( बार्टी) पुणे यांच्या मार्फत नागरिकांचे मूलभूत कर्तव्य जागरुकता मोहिमेचा प्रारंभ संविधान दिनाचे औचित्य साधून   करण्यात आला. या कार्यक्रमाचा वृत्तान्त  दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून शनिवार दि.३०  नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता  प्रसारित होईल. निवेदक राजेंद्र हुंजे  यांनी या वृत्तान्ताचे वाचन केले आहे.

राज्यात २६ नोव्हेंबर २०१९ ते  २६ नोव्हेंबर २०२० या वर्षाच्या कालावधीत‘नागरिकांचे मूलभूत कर्तव्य जागरुकता मोहीमराज्यात राबविण्यात येणार असून पुढील वर्षभर शासनाच्या  सर्व विभागांमार्फत विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे  पार पडलेल्या  कार्यक्रमप्रसंगी  मुख्य सचिव अजोय मेहता, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, विधिज्ञ डी.एन. संदानशीव, बार्टीचे महासंचालक कैलास कणसे, समाजकल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर उपस्थित होते. या जागरुकता मोहीम शुभारंभ कार्यक्रमाचा वृत्तान्त दूरदर्शनवर या कार्यक्रमातून प्रसारित होणार आहे.

००००

‘जागो ग्राहक जागो’ या मोहिमेअंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

मुंबई, दि. 29 : नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यांच्या कार्यालयातर्फे जागो ग्राहक जागो‘या मोहिमेअंतर्गत नुकताच सिडनहॅम कॉलेज, चर्चगेट येथे एक दिवसाचा प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे, शिधावाटप नियंत्रक कैलास पगारे, उप नियंत्रक शिधावाटप सर्वश्री लीलाधर दुपारी, ज्ञानेश्वर जवंजाळ, अजिंक्य बगाडे, प्रशांत काळे, गणेश जाधव व सुहास शेवाळे हे उपस्थित होते.

या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी विभागातील इतर अधिकारी व कर्मचारी तसेच जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य हे मोठया प्रमाणात उपस्थित होते. या दिवसभराच्या प्रशिक्षण कार्यक्रमात डॉ.सिताराम दीक्षित, अध्यक्ष कन्झुमर्स गायडन्स सोसायटी ऑफ इंडिया यांनी ग्राहक संरक्षण कायदा (2019 सुधारित) यासंदर्भात सुधारित तरतुदीबाबत मार्गदर्शन केले. उपनियंत्रक शिधावाटप ई परिमंडळ प्रशांत काळे यांनी अन्नसुरक्षा कायदा व ई पॉस मशिन या बाबत माहिती दिली. तर, सहाय्यक नियंत्रक वैधमापनशास्त्र पांडुरंग बिराजदार यांनी थेट विक्री करणाऱ्या कंपन्यांचे कामकाज व त्यांच्या विरुद्ध येणाऱ्या तक्रारीचे निराकरण तसेच वैधमापन शास्त्र यंत्रणेचे कार्य यासंदर्भात माहिती दिली. दक्षिण मुंबई ग्राहक निवारण मंचाच्या अध्यक्षा श्रीमती स्नेहा म्हात्रे यांनी वस्तू व सेवा खरेदीमध्ये होणारी ग्राहकांची फसवणूक व त्यांचे निराकरण, ग्राहक संरक्षण कायदा 2019 अंतर्गत ग्राहकांचे विविध हक्क व रेरा कायदा या संदर्भात न्यायिक प्रक्रिया यासंदर्भात मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे उद्घाटन श्री. देशपांडे यांनी तर कार्यक्रमाचे समारोप श्री.जवंजाळ यांनी करुन सर्व उपस्थितांचे आभार मानले.

आरे कारशेडच्या कामांना स्थगिती; आढाव्यानंतर पुढील निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. 29 : राज्य शासनाचा कोणत्याही विकास कामांना विरोध नाही. मात्र, वैभव गमावून विकास कामे होणार नाहीत. त्यामुळे आरेमधील मेट्रोच्या कारशेडच्या कामाला स्थगिती दिली असून या कामाचा पूर्णपणे आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केली.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी मंत्रालयातील पत्रकार कक्षात पत्रकारांशी संवाद साधला. आमदार आदित्य ठाकरे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यावेळी उपस्थित होते. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक श्री. सिंह यांनी मुख्यमंत्री महोदयांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पत्रकार संघाच्या वतीने अध्यक्ष दिलीप सपाटे यांनी मुख्यमंत्र्यांचे तर कार्यवाह विवेक भावसार यांनी आदित्य ठाकरे यांचे स्वागत केले.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, शिवसेनाप्रमुखांपासून पत्रकार संघाशी जे ऋणानुबंध आहेत, माझ्यापासून ते ‌अजून दृढ होत आहेत, याचा आनंद आहे. शासन चालविण्याचे आव्हान मोठे असून महागाई, टंचाई, भ्रष्टाचार यासारख्या समस्यांचा सामना करायचा आहे. पत्रकारांची टीका सकारात्मक हवी. त्यासाठी पत्रकारांनी या शासनाचे कान, नाक, डोळे होऊन सरकारच्या घोषणांच्या अंमलबजावणीमध्ये येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी शासनासोबत यावे. तसेच हे काम करणारे सरकार असून या शासनाच्या योजनांची योग्य अंमलबजावणी होण्यासाठी पत्रकारांनी विधायक सूचना करुन सहकार्य करावे, असेही आवाहन यावेळी त्यांनी केले.

हे आपल्या सगळ्यांचे सरकार आहे. जनतेच्या पैशातून विविध योजनांवर खर्च केला जातो. त्यामुळे योजनांवर खर्च करताना हा करदात्याचा पैसा आहे, हे लक्षात ठेवून उधळपट्टी होणार नाही, याकडे लक्ष देण्याच्या सूचना आज झालेल्या सचिवांबरोबरच्या बैठकीत केल्या आहेत. आरे कारशेडच्या कामाला स्थगिती दिली आहे. त्या कामाचा आढावा घेतला जाईल. पुढील निर्णय होईपर्यंत तेथे वृक्षतोडीस स्थगिती दिली आहे, असेही त्यांनी सांगितले.   

मी मुंबईत जन्मलेला पहिलाच मुख्यमंत्री असल्यामुळे मुंबईसाठी काय करता येईल, याचा विचार सुरू आहे. मात्र, त्याबरोबरच राज्यातील इतर शहरांसाठीही कोणत्या गोष्टी करायच्या याबद्दलही विचार करत आहे. शेतकऱ्यांसाठीही निर्णय घेण्याची घोषणा केली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे यांनी प्रास्ताविकात संघाच्या परंपरेची माहिती देऊन, राज्याच्या विकासात पत्रकारांनी सहकार्य करावे, या मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या आवाहनानुसार सर्व पत्रकार सहकार्य करतील, असे सांगितले.

मंत्रालय व विधीमंडळ वार्ताहर संघाचे उपाध्यक्ष दीपक भातुसे, कोषाध्यक्ष महेश पावस्कर आदी यावेळी उपस्थित होते.

००००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/29.11.2019

विश्वासदर्शक ठराव, विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसाठी शनिवारी आणि रविवारी महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन

विधानमंडळ सचिवालयाची माहिती

मुंबई,दि.29 :नवीनमंत्रीमहोदयांचापरिचयआणिमंत्रिमंडळावरीलविश्वासदर्शकठरावघेण्यासाठीमहाराष्ट्रविधानसभेचीबैठकशनिवार,दिनांक30नोव्हेंबर, 2019रोजीदुपारी02.00वाजताविधानभवन,मुंबईयेथेआयोजितकरण्यातआल्याची माहितीमहाराष्ट्रविधानमंडळसचिवालयाचेसचिव(कार्यभार)राजेंद्रभागवतयांनीएकाप्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

विधानसभेच्यासर्वसदस्यांनीविधानभवन,मुंबईयेथेविधानसभेच्याबैठकीसउपस्थितरहावे,असेआवाहनकरण्यात आले आहे. तसेचमहाराष्ट्रविधानसभेच्याअध्यक्षपदाचीनिवडणूकरविवार,दिनांक01डिसेंबर, 2019रोजीसकाळी11.00वाजताविधानसभासभागृहातघेण्यातयेणारआहे.

यानिवडणुकीसाठीनामनिर्देशनपत्रशनिवार,दिनांक30नोव्हेंबर, 2019रोजीदुपारी12.00वाजेपर्यंतकक्षक्र.021,तळमजला,विधानभवन,मुंबईयेथेसचिव(कार्यभार),महाराष्ट्रविधानसभा,विधानभवन,मुंबईयांच्याकडेपोहोचतील,अशाबेतानेपाठविण्यातयावेत.नामनिर्देशनपत्रांचीछाननीत्याचदिवशीदुपारी12.00वाजताकरण्यातयेणारअसूनउमेदवारीअर्जमागेघेण्याचीमुदतरविवार,दिनांक01डिसेंबर, 2019रोजीसकाळी10.00वाजेपर्यंतअसेल.नामनिर्देशनपत्रआणिउमेदवारीमागेघेण्याच्याअर्जाच्याप्रतीमहाराष्ट्रविधानमंडळसचिवालयाच्याकक्ष,अकरावामजला,विधानभवन,मुंबईयेथेउपलब्धअसूनयानिवडणुकीचाकार्यक्रम,नोटीस,नामनिर्देशनपत्र,उमेदवारीमागेघेण्याच्याअर्जाचानमूनाइत्यादीसर्वकागदपत्रेविधानसभासदस्यांनात्यांच्याई-मेलपत्त्यावरतसेचजिल्हाधिकारीकार्यालयामार्फतपाठविण्याचीव्यवस्थाकरण्यातआलीआहे.याचबरोबरयाप्रतीमहाराष्ट्रविधीमंडळाच्यासंकेतस्थळावरसुद्धाउपलब्धकरूनदेण्यातआल्याअसल्याचेश्री.भागवतयांनीएकाप्रसिद्धीपत्रकाद्वारेजाहीरकेलेआहे.

रामायण अध्ययन प्रेरणादायी- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

आंतरराष्ट्रीय रामायण संमेलनाचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई, दि. 28 : रामायण जीवनाचा आधार आहे, रामायण एकता आहे, रामायण विश्वबंधुत्वाचा संदेश देते. रामायण अध्ययन प्रेरणादायी असून त्या माध्यमातून आपण एक आदर्श समाज निर्माण करु शकतो, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करुन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज आंतरराष्ट्रीय रामायण संमेलनाचे उद्घाटन केले.

मुंबई विश्व विद्यालय आणि भागवत परिवार यांच्यातर्फे ग्रीन टेक्नोलॉजी सभागृह, मुंबई विश्वविद्यालय, कलिना येथे तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय रामायण संमेलनाचे आयोजन करण्यात आले, त्याप्रसंगी राज्यपाल श्री.कोश्यारी बोलत होते.यावेळी भागवताचार्य रमेशभाई ओझा, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुहास पेडणेकर, उपकुलगुरु डॉ.रवींद्र कुलकर्णी, दीपक मुकादम, जपानच्या हिन्दी भाषा अभ्यासक श्रीमती डॉ.तोमोको किकुची तसेच अन्य देशातील आणि महाविद्यालयातील हिन्दी भाषेतील तज्ज्ञ उपस्थ‍ित होते.

नानकदेव तसेच अन्य संतांनीही आपापल्या वाडमयात रामायणाचा उल्लेख केला आहे. आज रामायणाचा अंगिकार सर्व देश करत आहे. सर्वांनी उत्तम गुणांचा अंगिकार केल्यास, समाज निश्चितपणे रामराज्याकडे वाटचाल करील, असा विश्वास कोश्यारी यांनी यावेळी व्यक्त केला.

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांची मुलाखत

मुंबई, दि. 28 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.  ही विशेष मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर शुक्रवार दिनांक 29 नोव्हेंबर 2019 रोजी संध्याकाळी 7. 30 वाजता प्रसारित होईल. निवेदिका शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

वन विभागाला मिळालेला अर्थ केअर पुरस्कार, या पुरस्काराचे स्वरूप, पुरस्कारासाठीचे निकष, वृक्षलागवडीसाठी व्यापक लोकसहभाग, वृक्षलागवडीची लॅण्ड बँक कशाप्रकारे निश्चित करण्यात आली, वृक्षलागवडीसाठी माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग, डिजिटल प्लॅटफॉर्मवर लावलेली रोप नोंदवणे, 50 कोटी वृक्षलागवडीचे फलित आणि भविष्यातील वाटचाल कशा प्रकारची असेल आदी विषयांची माहिती श्री. खारगे यांनी ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमातून दिली आहे.

ताज्या बातम्या

पालकमंत्री डॉ.अशोक वुईके यांच्या हस्ते डायलेसिस विभागातील विस्तारीत कक्षाचे उद्घाटन

0
रुग्णांना वेळेवर आणि योग्य उपचारासाठी होईल मदत चंद्रपूर, दि. 10 जून : जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे डायलेसिस विभागातील विस्तारीत कक्षाचे उद्घाटन पालकमंत्री डॉ. अशोक...

पूरपरिस्थितीवर मात करण्यासाठी प्रयत्नशील – राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर

0
सांगली, दि. 10, (जि. मा. का.) : पर्यावरणातील बदलामुळे व मोठ्या प्रमाणातील अतिवृष्टी एकावेळी झाल्यामुळे 2019, 2021 मध्ये सांगली, कोल्हापूरमध्ये हजारो कोटींचे नुकसान सहन...

वरळी येथील शासकीय वसतिगृहांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

0
मुंबई, दि. १० : मुंबई शहर जिल्ह्यात सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयांतर्गत वरळी येथील  मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतीगृह व संत...

पुणे महानगरपालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांना तातडीने योग्य प्रमाणात पाणीपुरवठा करा –  विधानपरिषदेचे...

0
मुंबई, दि. 10 :-  पुणे महानगरपालिकेने शहरातील पाणीपुरवठा योग्य प्रमाणात होण्यासाठी सन-2018 मध्ये 24x7 योजना आणून देखील अद्याप कात्रज, कोंढवा, येवलेवाडी, पिसोळी या विभागात अपुऱ्या प्रमाणात पाणीपुरवठा होत...

पेरण्यांची घाई नको; पंधरा जून नंतरच मोसमी पाऊस

0
मुंबई, दि. १० : राज्यात पंधरा जून नंतरच मोसमी पाऊस पूर्णपणे सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या करण्याची घाई करू नये, असे आवाहन राज्याच्या कृषि...