शुक्रवार, जून 6, 2025
Home Blog Page 1726

अकोला जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली नुकसानग्रस्‍त शेतीची पाहणी

अकोला,दि. 3 : ऑक्टोंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे अकोला जिल्ह्यातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी आज केली. शेतकऱ्यांच्या शेतात भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय मानव संसाधन, माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे, पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील, सर्वश्री आमदार गोवर्धन शर्मा, रणधीर सावरकर, प्रकाश भारसाकळे, महापौर विजय अग्रवाल, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर आदी उपस्थित होते.

आपल्या या पाहणी दौऱ्यात मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी लाखनवाडा येथील संजय त्र्यंबक अघडते यांच्या शेताला भेट दिली. त्यांच्या चार एकर शेतातील कापूस पिकाचे नुकसान झाले आहे. अघडते यांच्या शेतात सोयाबीनची नुकसानग्रस्त गंजीही मुख्यमंत्र्यांनी पाहिली. समोरच असलेल्या केशव नामदेव गावंडे यांच्या शेतातील उभ्या असलेल्या ज्वारीच्या कणसांना पावसामुळे कोंब फुटले आहेत. तसेच मनोहर गावंडे यांच्या शेतातील सोयाबीन पावसामुळे खराब झालेले आढळून आले.  यावेळी श्री.फडणवीस यांनी शेतकऱ्यांची आस्थेने विचारपूस करुन त्यांना मदतीसाठी आश्वस्त केले. त्यानंतर मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी कापशी रोड येथील गोपाल राऊत यांच्या शेताला भेट दिली.

गोपाल राऊत यांच्या शेतातील सोयाबीनचे पिक त्यांनी कापणी करुन तयार केले होते. त्यांच्या शेतात असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये त्यांनी गंजी लावून ठेवली होती. परंतु सततच्या अवकाळी पावसामुळे त्यांच्या सोयाबीनच्या तयार दाण्याना कोंब फुटले व पत्रा शेड गळून पावसाचे पाणी गेल्यामुळे सर्व सोयाबीन खराब झाले आहे.

चिखलगाव येथील कृष्णकांत नारायणराव तिवारी यांच्या कापूस व विनोद नामदेव थोरात यांच्या सोयाबीनच्या पिकाची मुख्यमंत्र्यांनी भेट देवून पाहणी केली. परतीच्या प्रवासात मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी म्हैसपूर फाट्यावर जमलेल्या शेतकऱ्यांची भेट घेतली व त्यांचे गाऱ्हाणे ऐकून त्यांना मदतीसाठी आश्वस्त केले.

मुख्यमंत्री ने क्षतिग्रस्त खेती का किया निरीक्षण

अकोला : अक्टूबर के महीने में हुई बैमौसम बारिश ने अकोला जिले की फसलों को गंभीर रूप से नुकसान पहुंचाया है। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने आज क्षतिग्रस्त क्षेत्र का निरीक्षण किया। किसानों के खेतों में जाकर, मुख्यमंत्री ने किसानों को आश्वस्त किया। केंद्रीय मानव संसाधन, सूचना और प्रौद्योगिकी राज्य मंत्री संजय धोत्रे, पालक मंत्री डॉ. रणजीत पाटिल, विधायक गोवर्धन शर्मा, रणधीर सावरकर, प्रकाश भारसाकले, महापौर विजय अग्रवाल, जिलाधिकारी जितेंद्र पापलकर एवं अन्य उपस्थित थे।

अपने इस निरीक्षण दौरे में , मुख्यमंत्री फडणवीस ने लाखनवाड़ा में संजय त्र्यंबक अघडते के खेत का दौरा किया। उनके चार एकड़ कपास के खेतों को नुकसान पहुंचा है। अघडते के खेत में उन्होंने क्षतिग्रस्त सोयाबीन को देखा। इसके सामने ही केशव नामदेव गावंडे के खेत में खड़ी ज्वार के दाने बारिश की वजह से अंकुरित हो गये हैं। इसी तरह, मनोहर गावंडे के खेत में सोयाबीन बारिश के कारण खराब हो गया है। इस अवसर पर श्री फड़नवीस ने किसानों से पूछताछ की और उन्हें मदद का आश्वासन दिया।

इसके बाद मुख्यमंत्री फडणवीस ने कापशी रोड पर गोपाल राउत के खेत का दौरा किया। गोपाल राउत ने अपने खेत से सोयाबीन की कटाई की थी। उन्होंने अपने खेत में स्थित टीन के शेड में फसल के ढेर लगाए थे। लगातार बेमौसम बारिश के कारण, सोयाबीन की फलियों में दाने उग आए और टिन शेड गल जाने के कारण बारिश के पानी से पूरी सोयाबीन फसल खराब हो गयी।

मुख्यमंत्री ने चिखलगांव में कृष्णकांत नारायणराव तिवारी की कपास की फसल और विनोद नामदेव थोरात की सोयाबीन की फसल का निरीक्षण किया। अपने वापसी दौरे में मुख्यमंत्री फडणवीस म्हैसपुर फाटा पर इकट्ठा हुए किसानों से मिले और उनकी बात सुनी तथा उन्हें आश्वस्त किया।

०००

Chief minister Fadnavis inspects the damaged crops in Akola

Akola, November 3:- The crops in Akola district had faced tremendous loss due to unseasonal rains that lashed the district in the month of October. Chief Minister Devendra Fadnavis today took a review of the damage crops in the district. He visited various farms and met farmers giving them solace.

Union minister of state for human resources and information technology minister Mr Sanjay Dhotre, Guardian minister Dr Ranjit Patil, Legislature Govardhan Sharma, Randhir Savarkar, Prakash Bharsakale, Mayor Vijay Agrawal, district magistrate Jitendra Papalkar were also present during the inspection.

The Chief Minister Mr Fadnavis visited the farm of Sanjay Trimbak Aghadte in Lakhanwada village. He reviewed the loss of cotton crops in his four acres of land and also took a stock of the loss to Soybean crop. Opposite to his farm, the CM also visited Keshav Namdev Gawande’s farm where the Jowar crops were sprouted  due to the unseasonal rains that caused havoc in the district.

Mr Fadnavisalso saw the damaged crops of Soyabean in Manohar Gawande’s farm. The chief minister had interaction  with them and assured them of providing financial assistance at the earliest. Later, the Chief Minister visited the farm of Gopal Raut on Kapshi road. Raut had harvested the soybean crops and stored it in a shed in his farm which was also damaged because of dripping of the rain water from the tin shed.

He also took stock of the destroyed soybean crops which were left useless. Mr Fadnavis visited the crops of Krishnakant Narayan Tiwari at Chikhalgaon and Kapashi. He took a stock of the damaged soybean crops of Vinod Namdev Thorat. While returning, the Chief Minister also met the farmers near Mhaispur fata and gave a patience hearing to their grievances. He assured them of sufficient financial assistance at the earliest.

महा चक्रीवादळामुळे उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह अतिवृष्टीचा इशारा

मुंबई, दि. 3 : भारतीय हवामान खात्याकडून प्रसिद्ध झालेल्या सुचनेनुसार अरबी समुद्रात निर्माण झालेल्या महा (MAHA) चक्रीवादळामुळे दि. 6 नोव्हेंबर 2019 ते 8 नोव्हेंबर 2019 पर्यंत उत्तर कोकणासह उत्तर मध्य महाराष्ट्राला मेघगर्जनेसह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच समुद्रामध्ये वाऱ्याचा वेग जास्त राहणार असल्याने मच्छिमारांना देखील सतर्कतेचा इशारा दिलेला आहे.

समुद्रात गेलेल्या मच्छिमारांना पुन्हा समुद्र किनारपट्टीवर येण्याचे देखील या सूचनेत कळविण्यात आले आहे. याबाबत योग्य त्या उपाययोजनेसह तयारीत राहण्याबाबत सर्व विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकारी यांना सूचना देण्यात आल्याचे व कोणत्याही मदतीसाठी मंत्रालय नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आल्याचे मंत्रालय नियंत्रण कक्षाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते कवी संमेलनाचे उद्घाटन

पासबान-ए-अदब या संस्थेतर्फे आयोजित अनुभूती कवी संमेलन

मुंबई, दि.3: पासबान-ए-अदब या संस्थेतर्फे आयोजित अनुभूती कवी संमेलनाचे उद्घाटन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलनाने झाले. श्री.कोश्यारी यांनी या संमेलनाला शुभेच्छा दिल्या.

प्रारंभी सर्व कवींचा राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. माजी खासदार तथा यु.पी. हिंदी संस्थानचे अध्यक्ष डॉ.उदय प्रताप सिंह यांना राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. संयोजक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, पोलीस महानिरीक्षक कैसर खालिद यांच्या‘शऊरे अस्र आणि दश्त ए जाँ या पुस्तकांचे प्रकाशन राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या हस्ते झाले.

हे संमेलन भारतीय भाषा आणि साहित्याच्या प्रचार व प्रसारासाठी दरवर्षी आयोजित करण्यात येत असल्याचे श्री.खालिद यांनी सांगितले.

कवि संमेलनात कवी प्रा. अशोक चक्रधर, माजी खासदार तथा यु.पी.हिंदी संस्थानचे अध्यक्ष डॉ. उदय प्रताप सिंह, इंदिरा गांधी सेंचर फॉर आर्टस नवी दिल्लीचे निदेशक डॉ. सच्चिदानंद जोशी, दीक्षित दनकौरी, हस्तीमल हस्ती, माया गोविंद, संदीप नाथ, रणजित चौहान, अभिनेते राजपाल यादव उपस्थित होते.

कवी अथर शकील यांच्या तु रश्के जमी, तु रश्के जहाँ मेरे ही हिंदोस्ता… या शेरने काव्य संमेलनाला प्रारंभ झाला. त्यानंतर डॉ. उदय प्रताप सिंह यांच्या साँस खिंचने की पूर्व ठिक से विचार करे…न मेरा है न तेरा है, हिंदुस्तान सबका है…या काव्यपक्तीने श्रोत्यांच्या टाळ्या घेतल्या.

दीक्षित दनकरी यांनीही श्रोत्यांना खिळवून ठेवले. त्यांच्या ए गझल पास ना आ… गुनगुना लू तुझे… तू सवारे मुझे…मैं सवारे तुझें…या कवितेने श्रोते मंत्रमुग्ध झाले. प्रा. अशोक चक्रधर यांनीही आपल्या कविता सादर केल्या.

अवकाळी पाऊस पीक नुकसान भरपाईसाठी दहा हजार कोटींची तरतूद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत निर्णय, केंद्राकडेही निधीची मागणी

मुंबई, दि. 2 : राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीच्या भरपाईसाठी दहा हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.

राज्यातील अवकाळी पाऊस आणि खरीप हंगामातील पीक नुकसानीबाबत आज मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा शासकीय निवासस्थानी बैठक संपन्न झाली. बैठकीनंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी माध्यमांना माहिती दिली.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले की, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश यापूर्वीच देण्यात आले आहेत. त्यानुसार प्रशासन आणि संबंधित यंत्रणा क्षेत्रीय स्तरावर सक्रिय झाल्या आहेत. याशिवाय जिथे कुठे यंत्रणा पोहोचली नसेल, अशा ठिकाणच्या शेतकऱ्यांनी मोबाईलवर फोटो अपलोड केल्यास, ते पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.  नुकसानीचा अहवाल प्राप्त होताच पिकनिहाय भरपाई निश्चित करून ती थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. या आपत्तीच्या निवारणासाठी केंद्र सरकारकडेही वित्तीय सहाय्य मागणीचा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.  तथापि, केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकार आपल्या निधीतून मदत देईल. राज्यातील सुमारे पन्नास लाख शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला आहे. त्यांनाही विमा कंपन्यांनी तात्काळ मदत करावी, त्यासाठी संबंधित कंपन्यांना निर्देश देण्यात आले आहेत.

मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत राज्यातील अवकाळी पावसामुळे पीक नुकसानीचा विस्तृत आढावा घेण्यात आला. यामध्ये पिकनिहाय नुकसानीचे अंदाजित क्षेत्र, विविध फळपिके, मच्छिमारांचे नुकसान याबाबतही चर्चा झाली. ही विशेष परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. नुकसानीची अंतिम आकडेवारी निश्चित होईपर्यंत प्रशासनाने या भरपाईसाठी सुमारे दहा हजार कोटी रुपयांची तरतूद करावी असे निर्देश देण्यात आले. क्षेत्रीय स्तरावरून पंचनामा अहवाल प्राप्त होताच कोणत्या पिकांसाठी किती मदत द्यायची हे निश्चित केले जाईल. येत्या तीन-चार दिवसांत याबाबतचा अंतिम निर्णय होईल. त्यानंतर थेट शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा केली जाणार आहे. शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी क्षेत्रीय स्तरावर विविध यंत्रणांनी समन्वयाने पंचनामे करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश देण्यात आले. त्यासाठी महसूल, कृषी, कृषी महाविद्यालये, पशुसंवर्धन अशा विविध यंत्रणातील मनुष्यबळाचा प्रभावी वापर करण्याबाबत चर्चा झाली.

बैठकीस महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीष महाजन, कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे, सामाजिक न्यायमंत्री डॉ. सुरेश खाडे, पदुममंत्री महादेव जानकर, सहकारमंत्री सुभाष देशमुख, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक, सहकार विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, ग्राम विकास विभागाचे सचिव असीमकुमार गुप्ता, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोर राजे निंबाळकर आदी उपस्थित होते. ०००००

अकाली बारिश से हुए फसल के नुकसान के मुआवजे के लिए

दस हजार करोड़ रूपए का प्रावधान

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मंत्रिमंडल उपसमिति की बैठक में निर्णय,केंद्र की ओर भी की निधि की मांग

मुंबई,दि. 2 : राज्य में अकाली बारिश के कारण हुए फसलों की नुकसान के मुआवजे (भरपाईसाठी) के लिए दस हजार करोड़ रूपए का प्रावधान करने का निर्णय मंत्रिमंडल उपसमिति की बैठक में लिया गया है,यह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने आज बैठक में बताया।

राज्य में अकाली बारिश और खरीप हंगाम के फसल की नुकसान को लेकर आज मंत्रिमंडल उपसमिति की बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की अध्यक्षता में वर्षा शासकीय निवासस्थान पर बैठक संपन्न हुई। बैठक के बाद मुख्यमंत्री श्री. फडणवीस ने सूचना प्रसार माध्यमों को यह जानकारी दी।         मुख्यमंत्री श्री. फडणवीस ने कहा कि अकाली बारिश के कारण किसानों का बहुत नुकसान हुआ है। इस नुकसान तथा क्षतिग्रस्त फसलों का पंचनामा करने के निर्देश इसके पहले ही दिए गए है। उसके अनुसार प्रशासन और संबंधित यंत्रणा क्षेत्रीयस्तर पर सक्रिय हुई है। इसके अलावा जहां पर यंत्रणा पहुंची नहीं होगी,ऐसे जगहों पर भी किसानों ने मोबाईल पर फोटो अपलोड करने पर उसे सबूत के रूप में ग्राह्य मानने के निर्देश भी दिए गए है। नुकसान की रिपोर्ट प्राप्त होते ही फसल के अनुसार मुआवजा (भरपाई) निश्चित कर वह सीधे किसानों के खाते में जमा किए जाएंगे। इस आपदा के निवारण के लिए केंद्र सरकार की ओर भी वित्तीय सहायता की मांग का प्रस्ताव भेजा जा रहा है। लेकिन अभी केंद्र के मदद की राह न देखते हुए राज्य सरकार अपने निधि से ही मदद दे रही है। राज्य के तकरीबन पचास लाख किसानों ने पीक बीमा लिया है। उन्हें भी बीमा कंपनियां तत्काल मदद करें,इसके लिए संबंधित कंपनियों को निर्देश दिए गए है।

मंत्रिमंडल उपसमिति की बैठक में राज्य के अकाली बारिश के कारण फसल के नुकसान का विस्तार से जायजा लिया गया। इसमें फसल के अनुसार नुकसान का अनुमानित क्षेत्र,विविध फल के फसल,मछुआरों के नुकसान पर भी चर्चा हुई,हालांकि यह विशेष स्थिति है। इस कारण किसानों को अधिक से अधिक मदद देने को लेकर भी निर्णय लिया गया। नुकसान की अंतिम आकडेवारी निश्चित होने तक प्रशासन ने इस मुआवजे के लिए  तकरीबन दस हजार करोड़ रूपए का प्रावधान करने के निर्देश दिए गए। क्षेत्रीय स्तर पर पंचनामा रिपोर्ट प्राप्त होते ही किसी भी फसलों के लिए कितनी मदद देना है,इसे निश्चित किया जाएगा। आगामी तीन-चार दिनों में इस संदर्भ को लेकर अंतिम निर्णय होगा। उसके बाद सीधे किसानों के खाते में नुकसान मुआवजा (भरपाई) की राशि जमा की जाएगी। किसानों को तत्काल मदद मिले,इसके लिए क्षेत्रीय स्तर पर विविध यंत्रणा ने समन्वय से पंचनामा करने के लिए प्रयास करने के निर्देश दिए गए है। इसके लिए राजस्व,कृषि,कृषि महाविद्यालय,पशू संवर्धन ऐसे विविध यंत्रणा के मानव संसाधन का प्रभावपूर्ण तरीके से उपयोग करने के संदर्भ में भी चर्चा हूई है।

बैठक में राजस्व मंत्री चंद्रकांतदादा पाटिल,जलसंपदा मंत्री गिरीश महाजन,कृषि मंत्री डॅा. अनिल बोंडे,सामाजिक न्याय मंत्री डॅा. सुरेश खाडे,पदुम मंत्री महादेव जानकर,सहकार मंत्री सुभाष देशमुख,जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे,कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत,राज्य के मुख्य सचिव अजोय मेहता,वित्त विभाग के अपर मुख्य सचिव संजय कुमार,राजस्व विभाग के अपर मुख्य सचिव मनुकूमार श्रीवास्तव,मुख्यमंत्री के प्रधान सचिव भूषण गगराणी,सार्वजनिक निर्माणकार्य विभाग के प्रधान सचिव मनोज सौनिक,सहकार विभाग की प्रधान सचिव आभा शुक्ला,कृषि विभाग के सचिव एकनाथ डवले,ग्राम विकास विभाग के  सचिव असीमकुमार गुप्ता,मदद एवं पुनर्वसन विभाग के सचिव किशोर राजे निंबालकर आदि उपस्थित थे।

०००

Provision of rupees ten crore for crop damage reimbursement caused due to erratic rainfall

CM Devendra Fadnavis

A decision was taken in the meeting of cabinet’s subcommittee, financial aid requested at the Centre also

Mumbai, date.2nd: CM Devendra Fadnavis told today that a decision was taken in the meeting of cabinet’s subcommittee. According to the decision, the provision of ten crore rupees is made to reimburse crop damage occurred due to erratic rainfall.

A meeting of cabinet’s subcommittee was held today at official residence Varsha. The meeting took place under the presidency of CM Devendra Fadnavis and the meeting was held regarding the erratic rainfall in the state and crop damage in Kharif season.  CM Shri. Devendra Fadnavis gave the informed media after the meeting.

CM Devendra Fadnavis told, farmers had to suffer loss in a great deal due to erratic rainfall. The creation of damage reports is ordered already.  Administration and related systems are activated on their level. It is also directed that if farmers from such places where system is not accessible upload photos on mobile, it should be accepted as proof.   Crop-wise reimbursement will be decided as soon as damage report is received and the amount of reimbursement will be directly transferred to the farmers’ account. A prospect will be sent to the Central Government requesting financial aid to redress this calamity.   But the State Government will not solely depend on the Central Government’s help and will provide financial aid form its own fund.  Around fifty lakh farmers are crop insured in the state.  Insurance companies should also help them immediately. Related companies are given related instructions.

Crop damage situation in the state due to erratic rainfall was reviewed in the meeting of Cabinet’s subcommittee.  Crop-wise damaged filed, various fruit crops, loss bared by anglers were also in the meeting. This is a crucial situation. Therefore, decision was taken to provide maximum help to the farmers.  Provision of ten crore rupees is directed by the administration as reimbursement until the final damage report is made. As soon as zonal crop damage report is received, reimbursement for each crop will be decided. A final decision will be taken in upcoming few days. Reimbursement will directly transferred to the farmers’ account after that.  Systems on zonal areas are directed to coordinate for reports so farmers will get timely help. Utilizing human resources from Revenue Department, Agriculture Department, agriculture colleges, and animal husbandry were also discussed.

Revenue Minister Chandrakantdada Patil, Water Irrigation Minister Girish Mahajan, Agriculture Minister Dr. Anil Bonde, Social Justice Minister Dr. Suresh Khade, Animal Husbandry Minister  Mahadev Jankar, Co-operation Minister Subhash Deshmukh, Water Irrigation Minister for State Vijay Shivtare, Agriculture Minister for state Sadabhau Khot, Chief Secretary of the state Ajoy Mehta, Upper Chief Secretary of Finance Department Sanjay Kumar, Upper Chief Secretary of Revenue Department Manukumar Srivastava, CM’s Principal Secretary Bhushan Gagrani, Principal Secretary of PWD Manoj Saunik, Principal Secretary of Cooperation Department Abha Shukla,  Secretary of Agriculture Department Eknath Davle, Secretary of Rural Development Department Asimkumar Gupta, Secretary of Relief and Rescue Department  Kishor Raje Nimbalkar were present in the meeting.

०००००

राज्यपालांची बाणगंगा तलावाला भेट; जीर्णोद्धार कार्याची घेतली माहिती

मुंबई, दि. 2 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज वाळकेश्वर येथील ऐतिहासिक बाणगंगा तलाव परिसराला भेट दिली तसेच तेथील जीर्णोद्धार व वारसा जतन कार्याची माहिती घेतली.

त्यानंतर राज्यपालांनी जवळच असलेल्या कवळे मठाच्या शांतादुर्गा मंदिरालादेखील भेट दिली. जीएसबी मंदिर विश्वस्तांच्या वतीने यावेळी राज्यपालांचा सत्कार करण्यात आला.

मलबार हिलचे आमदार मंगलप्रभात लोढा, नगरसेविका ज्योत्स्ना मेहता, महापालिकेचे उपायुक्त प्रवीण गायकवाड, बाणगंगा जतन कार्यात सहकार्य करणाऱ्या आरपीजी फाउंडेशनचे अधिकारी, बाणगंगा तलाव जीएसबी टेम्पल ट्रस्टचे विश्वस्त प्रवीण कानविंदे तसेच कवळे मठाचे विश्वस्त भूषण ज्याक आदी उपस्थित होते. 

००००

Governor visits historic Banganga Tank;

takes stock of restoration work

Mumbai Dated 2 : Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari today visited the historic Banganga Tank at Walkeshwar and obtained information about the heritage conservation work being carried out.

The Governor also visited the Kavale Math Shanta Durga Temple for a darshan. He was felicitated by the GSB Temple trustees on the occasion.

Malabar Hill MLA Mangal Prabhat Lodha, Corporator Jyotsna Mehta, Deputy Municipal Commissioner of BMC Pravin Gaikwad, officials of RPG Foundation, Trustee of GSB Temple Trust Pravin Kanvinde and Secretary Bhushan Jack were present.

परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडून अवकाळीग्रस्त भागाची पाहणी; जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या समस्या

मुंबई दि. 2 : अवकाळी पावसाने तसेच अतिवृष्टीने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून  शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी परिवहन व खारभूमी विकासमंत्री दिवाकर रावते हे पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. श्री.रावते शेतकऱ्यांच्या समस्या जाणून परिस्थितीची पाहणी करत आहेत.

वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड, खासदार प्रतापराव जाधव, भावनाताई गवळी, आमदार श्रीकांत देशपांडे, गोपीकिशन बाजोरिया, डॉ. संजय रायमुलकर, संजय गायकवाड आणि नितीन देशमुख हे लोकप्रतिनीधीही संबंधित जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या समस्या जाणून परिस्थितीची पाहणी करत आहेत. पाहणीनंतर ते मंत्री दिवाकर रावते यांच्यासमवेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याच्या अनुषंगाने विभागीय आयुक्तांकडील बैठकीत चर्चा  करणार आहेत.

शेतीपिकांच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने तातडीची मदत जाहीर करावी, 3 महिन्याचे वीज देयक माफ करण्याचा निर्णय, शासनाचा पंचनामा ग्राह्य धरत पीक विम्याची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने जमा करण्याचे आदेश संबंधित विमा कंपन्यांना देण्यात यावेत.  या संदर्भातील निवेदन श्री. रावते यांनी मुख्यमंत्री यांना सादर केले आहे.

छट महापर्व तेजस्वी परंपरा- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई, दि. 2 : आपल्या देशाला मोठी सांस्कृतिक परंपरा लाभली असून सूर्यपुजनाचे विशेष महत्व असणारे छट महापर्व ही त्यापैकीच एक तेजस्वी परंपरा असल्याचे उद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काढले.

छट उत्सव महासंघातर्फे जुहूबीच, अंधेरी येथे छट पुजेचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार अमित साटम, श्वेता शालिनी, मनीष झा व मान्यवर उपस्थित होते.

राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, आपल्या देशाला मोठी सांस्कृतिक परंपरा लाभली असून विविध सण, उत्सव हे त्याचेच प्रतिक आहेत. निसर्गातील विविध शक्तींचे पूजन आपल्या संस्कृतीत केले जाते. छट महापर्वालाही मोठी परंपरा आहे. यामध्ये सूर्यपुजनाचे विशेष महत्व आहे. उगवत्या सूर्याबरोबरच मावळत्या सूर्याच्या पूजनाचे महत्वही नमूद करण्यात आले आहे. देशभर हे महापर्व मोठ्या उत्साहात साजरे केले जात असल्याचेही श्री.कोश्यारी यांनी सांगितले.

यावेळी छट उत्सव महासंघातर्फे या महापर्वानिमित्त आयोजित विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली.

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार तत्काळ मदत

दहा हजार कोटींची तरतूद

मुंबई, दि. 2 : राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यात येणार असून पीक नुकसानीच्या भरपाईसाठी दहा हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला.

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यापूर्वीच दिले आहेत. त्यानुसार प्रशासन आणि संबंधित यंत्रणा क्षेत्रीयस्तरावर सक्रिय झाल्या आहेत. याशिवाय जिथे कुठे यंत्रणा काही तांत्रिक कारणांमुळे पोहोचली नसेल, अशा ठिकाणच्या शेतकऱ्यांनी मोबाईलवर फोटो अपलोड केल्यास, ते पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नुकसानीचा अहवाल प्राप्त होताच पीकनिहाय भरपाई निश्चित करून ती थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. राज्यातील सुमारे 50 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला आहे. त्यांनाही तत्काळ मदत करावी, त्यासाठी संबंधित विमा कंपन्यांना निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

थेट शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानभरपाई जमा केली जाणार आहे. शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळावी यासाठी क्षेत्रीयस्तरावर विविध यंत्रणांनी समन्वयाने पंचनामे करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश देण्यात आले. त्यासाठी महसूल, कृषी, कृषी महाविद्यालये, पशुसंवर्धन अशा विविध यंत्रणातील मनुष्यबळाचा प्रभावी वापर करण्यात येवून तातडीने पंचनामे करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहे. ज्या ठिकाणी बाधित क्षेत्राचे पंचनामे झाले नाही त्या शेतकऱ्यांनी ग्राम किंवा तालुका स्तरावरील कृषी अधिकाऱ्याला तातडीने कळवावे.

सर्व आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मदत दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी शेतकऱ्यांना आश्र्वस्त केले आहे.

अवकाळी पावसामुळे पीक नुकसानीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला तपशीलवार आढावा

राज्य सरकार खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठिशी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

मुंबई, दि. 1 : अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत यंत्रणांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून, त्यांना जास्तीत जास्त दिलासा देता येईल असे प्रयत्न करावेत.  क्षेत्रीय स्तरावरील सर्वच यंत्रणांनी या काळात अत्यंत संवेदनशीलतेने कार्यवाही करावी. पंचनामे करण्यासाठी योग्य समन्वय ठेवावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.  

अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि शासनाच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजना यांचा सविस्तर आढावा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आज वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत घेतला. शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत मंत्रिमंडळ उपसमितीची उद्या (शनिवारी) बैठक बोलविण्यात आल्याचेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

बैठकीस मुख्य सचिव अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक, सहकार विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, कृषी व पदुम विभागाचे सचिव एकनाथ डवले, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोर राजे निंबाळकर, कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड, यांच्यासह विविध विभागांचे सचिव, भारतीय हवामान विभाग आणि विविध विमा कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याशी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधून अत्यंत तपशीलवाररित्या पीक परिस्थितीची माहिती घेतली. नुकसानीची स्थानिक शेतकऱ्यांनी काढलेली छायाचित्रेसुद्धा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याचे निर्देश त्यांनी दिले.

मुख्यमंत्री म्हणाले, यावर्षी प्रचंड पाऊस झाला आहे. अरबी समुद्रातील सुपरसायक्लॉनसह चार वादळांचा फटका बसला. या पावसाची तीव्रता ऑक्टोबरच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात अधिक होती.  त्यामुळे प्रशासनाने ही संपूर्ण स्थिती अत्यंत संवेदनशीलतेने आणि सर्वोच्च प्राधान्य देत हाताळावी. प्रत्येक शेतकऱ्याची समस्या ऐकून घ्यावी. यासाठी दुष्काळाच्या काळात उभारली, तशी यंत्रणा उभारावी, व्हॉटसअ‍ॅप क्रमांकसुद्धा संपर्कासाठी उपलब्ध करून देण्यात यावेत. शासनाचे या स्थितीवर संपूर्णपणे लक्ष असून, पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन स्थितीचे अवलोकन करावे. ज्वारी, मका, धान, तूर, कापूस, सोयाबीन आणि फळपिके यामुळे बाधित झाली आहेत. प्रभावित भागाचे तात्काळ ड्रोन सर्वेक्षण करण्याचे आदेशही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले.

व्हिडीओ कॅान्फरन्सिंगद्वारे घेण्यात आलेल्या आढाव्यानुसार आणि प्राथमिक माहितीनुसार  राज्यात सुमारे 325 तालुक्यांमधील 54 लाख 22 हजार हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत.

विभागनिहाय जे नुकसान झाले आहे, ते पुढीलप्रमाणे : कोकण (46 तालुके/97 हजार हेक्टर), नाशिक (52 तालुके/16 लाख हेक्टर), पुणे (51 तालुके/1.36 लाख हेक्टरहून अधिक), औरंगाबाद (72 तालुके/22 लाख हेक्टर), अमरावती (56 तालुके/12 लाख हेक्टर), नागपूर (48 तालुके/40 हजार हेक्टर).

साधारणत: 53 हजार हेक्टरवर फळपिके, 1 लाख 44 हजार हेक्टरवर भात, 2 लाख हेक्टरवर ज्वारी, 2 लाख हेक्टरवर बाजरी, 5 लाख हेक्टरवर मका, 19 लाख हेक्टरवर सोयाबीन आणि सुमारे तितक्याच हेक्टरवरील कापूस पिकाचे नुकसान झाले आहे.

००००

मुंबईत एकता दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना दिली राष्ट्रीय एकता दिनाची शपथ

मुंबई, दि. 31 : माजी उपप्रधानमंत्री व गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यासाठी एकता दौड (रन फॉर युनिटी) कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मुंबईत आज सकाळी एनसीपीए (नॅशनल सेंटर फॉर परफार्मिंग आर्ट्स) येथून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून एकता दौडचा आरंभ करण्यात आला.

राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त महाराष्ट्र शासन व मुंबई महापालिकेच्यावतीने’रन फॉर युनिटीया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार राहुल नार्वेकर, आमदार राहुल कुल, मुख्य सचिव अजोय मेहता, कोकण विभागाचे आयुक्त शिवाजी दौंड, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी बन्सी गवळी, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे आदी उपस्थित होते. राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकता दिनाची शपथ देऊन शुभेच्छा दिल्या.

एकता दौड आरंभानंतर मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, भारताला एकसंघ ठेवण्याचे काम सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले, म्हणूनच त्यांना लोहपुरुष म्हटले जाते. त्यांच्या जन्मदिनी सर्व भारतीय एकतेची शपथ घेतात. एक भारत श्रेष्ठ भारतहा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संकल्प पुढे नेण्याचे काम करीत आहोत.

केंद्र सरकारने370 कलम हटवून जम्मू काश्मिर आणि लद्दाख हे केंद्रशासित प्रदेश केले, हे भारताचे अविभाज्य अंग आहेत. सरदार पटेल यांचे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानून सर्वांना एकता दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

एकता दौडमध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय खेळाडू, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय कॅडेट कोर, जलद कृती दल (क्यूआरटी), कमांडो, पोलीस पथके, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक यांचे कर्मचारी, विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी, स्काऊट गाईडसह क्रीडा अधिकारी, प्रशिक्षक यांच्यासह बालकांपासून वृद्धांपर्यंत नागरिक सहभागी झाले होते. सर्वांनी उत्साहाने दौडचा आनंद घेतला.

तत्पूर्वी महेश नावले कराटे अॅन्ड डान्स असोसिएशन आणि एसएनडीटी महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सांस्कृतिक कार्यक्रमातून राष्ट्रीय एकतेचा संदेश दिला. एकता दौडचा समारोप मरीन ड्राईव्ह येथील ग्रँट मेडिकल कॉलेज जिमखाना येथे झाला.

000

ताज्या बातम्या

व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. ६ :- भारतीय संस्कृती आणि संत वाङ्मयाचे वैभव आपल्या लेखनातून, व्याख्यानातून दृग्गोचर करणारा व्यासंगी परंपरेचा एक मोठा दुवा निखळला आहे, अशा शोकभावना...

वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार...

0
सातारा दि. ६ :  संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची संख्या मोठी असणार आहेत. वारकऱ्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही यासाठी प्रत्येक...

“पालखी सोहळ्याचे काटेकोर नियोजन; महिलावर्गाची विशेष काळजी घेणार” – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
जळगाव, दि. ६ – राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुक्ताईनगर येथील कोथळी गावातील संत मुक्ताबाई मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यानंतर पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या...

बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा

0
मुंबई, ६ : बकरी ईद अर्थात ईद-उल-अजहाच्या पवित्र पर्वानिमित्त जनतेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण आपल्या जीवनात शांतता, समृद्धी,...

‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा

0
मुंबई, दि. ०६ :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील नागरिकांना ‘ईद-उल-अज़हा’ अर्थात ‘बकरी ईद’च्या शुभेच्छा दिल्या असून, या पर्वाच्या निमित्ताने सामाजिक ऐक्य, सलोखा, सौहार्द...