रविवार, जून 8, 2025
Home Blog Page 1730

मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण; पंचवीस हजारावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती

अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांची माहिती

मुंबई, दि. 23 : राज्यात 288 विधानसभा मतदारसंघांच्या सार्वत्रिक आणि सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या उद्या होणाऱ्या मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. यासाठी  पंचवीस हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांची मतमोजणीसाठी नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी आज दिली.

मतमोजणी उद्या सकाळी8 वाजता सुरू होईल. दरम्यान सर्व मतमोजणी कर्मचाऱ्यांना मतमोजणीचे 2 वेळा प्रशिक्षण देण्यात आले आहे. 269 ठिकाणी 288 केंद्रावर ही मतमोजणी होणार आहे. एका मतदारसंघासाठी मतदान केंद्राच्या संख्येच्या प्रमाणात 14 ते 20 टेबल ठेवण्यात येतात. एका टेबलसाठी एक पर्यवेक्षक (सुपरवायझर), दोन सहाय्यक असे तीन मतमोजणी कर्मचारी आणि प्रत्येकी एक सूक्ष्म निरीक्षक असतो. मतदारसंघातील 5 बूथच्या व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची मोजणी केली जाते. हे पाच बूथ चिठ्ठी टाकून उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी आणि निरीक्षक यांच्या उपस्थितीत निवडले जातात. व्हीव्हीपॅट मधील चिट्ठीतील मते आणि ईव्हीएमवरील मतांची पडताळणी यावेळी केली जाते. प्रारंभी टपाली मते आणि बारकोडद्वारे ईटीपीबी (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट) मोजली जातील.

प्रत्येक टेबलला मतमोजणीसाठी उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित राहू शकतात. प्रत्येक टेबलला स्ट्राँग रूमपासून ईव्हीएम ने-आण करण्यासाठी वेगळे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

स्ट्राँग रूम तसेच मतमोजणी केंद्रामध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. स्ट्रॉंगरूम मधून मतपेट्या बाहेर काढणे मतमोजणी व नंतर पेट्या स्ट्राँग रूममध्ये जमा करणे या सर्व बाबींचे व्हिडिओ चित्रीकरण केले जाणार आहे.

संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेदरम्यान भारत निवडणूक आयोगाचे निरीक्षक (ऑब्झर्व्हर) उपस्थित राहतील. फेरीनिहाय मतमोजणीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी करतील.  सर्वसामान्यांना मतमोजणीची माहिती मिळावी यासाठी मतमोजणी केंद्राबाहेर ध्वनिक्षेपक लावण्यात आले आहेत.

मतमोजणी केंद्रावर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. स्ट्राँग रूमला केंद्रीय सशस्त्र पोलीस बल, राज्य राखीव पोलीस बल आणि स्थानिक पोलीस अशी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली आहे.

मंत्रालयात एलईडीवर निकाल प्रदर्शित करणार

मंत्रालयात निकालाची माहिती देण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने व्यवस्था केली आहे. मंत्रालयासमोरील माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या एलईडी स्क्रीनवरही निकाल प्रदर्शित करण्यात येतील. प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्राबाहेर पत्रकारांना तात्काळ निकाल उपलब्ध करून देण्यासाठी माध्यम कक्ष उभारण्यात आले आहेत.

भारत निवडणूक आयोगाच्याresults.eci.gov.in या संकेतस्थळावर तसेच ‘Voter Helpline’ या गुगल प्लेस्टोअरवर उपलब्ध असलेल्या अँड्रॉइड ॲपवर मतदारसंघाचे फेरीनिहाय निकाल, संपूर्ण राज्यातील पक्षनिहाय आघाडीवरील उमेदवार, विजयी उमेदवार, पक्षनिहाय मतदानाची टक्केवारी आदी माहितीदेखील उपलब्ध होणार आहे.

००००

सचिन गाढवे/वि.सं.अ./दि.23.10.2019

मतगणना की सभी तैयारियां पूरी;

पच्चीस हजार से अधिक कर्मचारियों की नियुक्ति

अतिरिक्त मुख्य चुनाव अधिकारी दिलीप शिंदे ने दी जानकारी

मुंबई, दि. 23 : राज्य में 288 विधानसभा निर्वाचन क्षेत्र के सार्वत्रिक और सातारा लोकसभा निर्वाचन क्षेत्र के उपचुनाव के दि. 24 को हो रहे मतगणना की सभी तैयारियां पूरी हो चुकी है। इसके लिए पच्चीस हजार से अधिक अधिकारी-कर्मचारियों की मतगणना के लिए नियुक्ति किए जाने की जानकारी अतिरिक्त मुख्य चुनाव अधिकारी दिलीप शिंदे ने आज दी।

मतगणना कल  (गुरुवार) को सुबह8 बजे शुरू होगी। इस बीच सभी मतगणना कर्मचारियों को मतगणना का 2 बार प्रशिक्षण दिया गया है। 269 जगहों पर 288 केंद्रों पर यह मतगणना होगी। एक निर्वाचन क्षेत्र के लिए मतदान केंद्र की संख्या के अनुसार 14 से 20 टेबल रखे जाते है। एक टेबल के लिए एक पर्यवेक्षक (सुपरवायझर), दो सहायक ऐसे तीन मतगणना कर्मचारी और प्रत्येकी एक सूक्ष्म निरीक्षक होता है। निर्वाचन क्षेत्र के  5 बूथ के वीवीपॅट के पर्ची की गणना की जाती है। यह पाँच बूथ पर्ची लगाकर उम्मीदवार तथा किंवा उनके प्रतिनिधि और निरीक्षक की उपस्थिति में चयनित किए जाते है। वीवीपॅट के पर्ची के मत और ईवीएमव के मतों जांच इस समय की जाती है।  प्रारंभ में टपाली मत और बारकोड के द्वारा इटीपीबी (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट) के मत गिने जाएंगे।

प्रत्येक टेबल पर मतगणना के लिए उम्मीदवारों के प्रतिनिधि उपस्थित रह सकते है।  प्रत्येक टेबल को स्ट्रॉंग रूम से ईवीएम लाने-ले जाने के लिए अलग से कर्मचारी नियुक्त किए गए है।

स्ट्रॉंगरूम एंव मतगणना केंद्रों में  सीसीटीवी लगाए गए है।  स्ट्रॉंगरूम से मतपेटी बाहर निकालना, मतगणना और उसके बाद पेटियाँ स्ट्रॉंग रूम जमा करना, इन सभी बिन्दुओं का वीडियो बनाए जाएंगे।

मतगणना प्रक्रिया के दौरान भारत निर्वाचन आयोग के निरीक्षक (ऑब्झर्वर) उपस्थित रहेंगे। फेरीनिहाय मतगणना की घोषणा निर्वाचन निर्णय अधिकारी करेंगे। आम जनता को मतगणना की जानकारी मिले, इसके लिए मतगणना केंद्रों के बाहर ध्वनिक्षेपक लगाए गए है।

मतगणना केंद्रों पर आवश्यकता के अनुसार पुलिस का पहरा भी रखा गया है। स्ट्रॉंगरूम को केंद्रीय सशस्त्र पुलिस बल, राज्य राखीव पुलिस बल  और स्थानीय पुलिस ऐसे त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था उपलब्ध की गई है।

मंत्रालय में एलईडी पर परिणाम प्रदर्शित करेंगे

मंत्रालय में परिणामों की जानकारी देने के लिए मुख्य चुनाव अधिकारी कार्यालय ने व्यवस्था की है। मंत्रालय के सामने स्थित सूचना एवं जनसंपर्क महानिदेशालय के एलईडी स्क्रीन पर भी परिणाम प्रदर्शित किया जाएगा। प्रत्येक विधानसभा निर्वाचन क्षेत्र के मतगणना केंद्र के बाहर पत्रकारों को तत्काल परिणाम उपलब्ध कराने के लिए माध्यम कक्ष लगाया गया है।

भारत चुनाव आयोग के results.eci.gov.in  इस वेबसाइट पर और  ‘Voter Helpline’ इस गुगल प्लेस्टोअर पर उपलब्ध अँड्रॉइड ऍप पर निर्वाचन क्षेत्र के फेरीनिहाय परिणामराज्य के पक्षनिहाय जो आगे है उन (आघाडी) उम्मीदवार, विजयी उम्मीदवार, पक्षनिहाय मतदान का प्रतिशत आदि की जानकारी भी उपलब्ध होगी।

००००

 

All preparations of vote counting are complete;

More than twenty-five thousand employees have been appointment

Information by Additional Chief Electoral Officer Dilip Shinde

Mumbai, 23.Oct.19: “All preparations for the counting of votes of the general elections of 288 Assembly constituencies in the State and by-election of Satara Lok Sabha constituencies are completed. Results of both elections will be displayed on October 24. More than 25,000 officers and staff have been appointed for the counting. ” informed Additional Chief Electoral Officer, Dilip Shinde.

He further stated that counting begins at 8am on October 24. Meanwhile, all counting staff have been trained for counting for couple of times. Votes would be counted at 288 centers in 269 places. Around 14 to 20 tables are kept for the number of polling booths for a constituency. For a table there is a supervisor, two assistants, three counting staff, and one subordinate observer. Counting of VVPAT of five booths of the constituency take place on this occasion. These five booths are selected in the presence of candidates or their representatives and inspectors. Votes on VVPAT and on EVM would be verified. Initially, ETPB (electronically transmitted postal ballet) will be calculated by postal opinion and barcode.

“Candidate representatives can be present for each table which to be counted. Separate staff are assigned to move EVMs from the Strong Room to each table. CCTVs have been installed in the Strong room and vote counting centers. The video will be filmed showing the ballot box counting from the strong room and then keeping the boxes again to the strong Room.

Observers of the Election Commission of India will be present during the entire counting process. Round wise vote counting will be announced by Election decision officers. The soundtracks have been installed outside the counting center to allow the general public to get counting information” said Mr. Shinde.

He further informed that adequate police arrangements have been made at the counting center. Strong room has been provided with three-level security arrangements such as Central Armed Police Force, State Reserve Police Force and Local Police.

The results will display on the LED in the Ministry

The Chief Electoral Officer’s Office has made arrangements to inform the Ministry about the results of the election. The results will also be displayed on the LED screen of the Directorate General of Information and Public Relations. Media rooms have been set up outside the counting center of each constituency to provide immediate results to journalists.

Information will be available on the Election Commission of India’s website results.eci.gov.in as well as ‘Voter Helpline’ on Android app available on the Google play store. Information will also be available for the round wise results of the constituency, party-wise candidate from all over the state, the winning candidate, the percentage of the party-wise voting.

0000

मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी नेटवर्क जॅमर्सची आवश्यकता नाही-मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे स्पष्टीकरण

मुंबई, दि. 23 : ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट ही स्वतंत्र (स्टँड अलोन) यंत्रे आहेत. कोणतेही रेडिओ तरंग ग्रहण अथवा प्रसारित (ट्रान्समिट) करण्याची त्यांची क्षमता नाही. ही यंत्रे कोणत्याही वायरलेस, वायर, इंटरनेट, वायफाय किंवा अन्य कोणत्याही बाह्य यंत्रणेशी जोडली किंवा त्याद्वारे नियंत्रित केली जाऊ  शकत नाहीत. त्यामुळे मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी जॅमर्स लावण्याची आवश्यकता नाही, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

        

मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी’नेटवर्क जॅमर्सलावण्याच्या तसेच अन्य मुद्द्यांबाबत काँग्रेस पक्षाच्या मागणीच्या अनुषंगाने हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्यात पुढे माहिती देण्यात आली आहे की, मतमोजणी फेरीनिहाय केली जाते. त्या फेरीचे निकाल जाहीर झाल्यानंतरच पुढील फेरीच्या मतमोजणीच्या ईव्हीएम मतमोजणी केंद्रात आणल्या जातात.

        

व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची ईव्हीएममधील मतांशी पडताळणीसाठी निवडावयाची मतदान केंद्रे चिठ्ठी टाकून निवडली जातात. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिलेल्या कार्यपद्धतीचा अवलंब केला जातो. यासाठीच्या मतदान केंद्रांची निवड ही उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी आणि निरीक्षक यांच्या उपस्थितीत केली जाते.

        

फेरमतमोजणीबाबतची तरतूद’निवडणूक संचालन नियम, 1961′ च्या नियम 56-डीनुसार निर्धारित केलेली आहे. त्यानुसार आवश्यकतेप्रमाणे कार्यवाही केली जाते.

        

सर्वोच्च न्यायालयाने चंद्राबाबू नायडू आणि अन्य विरुद्ध भारत सरकार आणि अन्य या रिट याचिका क्र.273/2019 मध्ये दि. 8 एप्रिल 2019 च्या निकालातील निर्देशानुसार प्रत्येक मतदारसंघात 5 व्हीव्हीपॅटमधील मतांची पडताळणी केली जाते, असेही मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे आहे.

000

महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकाचा ‘ई-पंचायत राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान

राज्यातील जिल्हा परिषद,पंचायत समिती व ग्रामपंचायतींना एकूण18पुरस्कार

नवी दिल्ली दि. 23 : पंचायतराज क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागाला केंद्रीय पंचायतीराज मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते पहिल्या क्रमांकाच्या‘ई-पंचायत राष्ट्रीय पुरस्कारानेआज  गौरविण्यात आले.

अहमदनगर जिल्ह्यातील लोणी (बु) ग्रामपंचायतीला‘नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कारानेतर राज्यातील एक जिल्हा परिषद, दोन पंचायत समित्या आणि 14 ग्रामपंचायतींना दिनदयाल उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्काराने’  सन्मानित करण्यात आले.   

केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाच्या वतीने येथील पुसा परिसरातील सी सुब्रमन्यम सभागृहात आयोजित कार्यक्रमात ‘राष्ट्रीय पंचायत पुरस्कार-2019’  प्रदान करण्यात आले. यावेळी छत्तीसगड, कर्नाटक, आसाम आणि तामिळनाडू राज्यांचे पंचायतराज मंत्री तसेच केंद्रीय पंचायतीराज मंत्रालयाचे सचिव अमरजित सिन्हा, अपर सचिव संजयसिंह मंचावर उपस्थित होते.

या कार्यक्रमात पंचायतराज क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी एकूण 5 श्रेणींमध्ये देशातील विविध राज्य, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींना एकूण 246 पुरस्कार वितरित करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राला तीन श्रेणींमध्ये  एकूण 19  पुरस्कार प्रदान करण्यात आले.

पंचायतराज क्षेत्रात केंद्र व राज्य शासनाच्या विविध इलेक्ट्रॉनिक्स सेवांची प्रभावी अंमलबजावणी  केल्याबद्दल महाराष्ट्राच्या ग्रामीण विकास व पंचायतराज विभागाला देशातील पहिल्या क्रमांकाच्या‘ई-पंचायत राष्ट्रीय पुरस्कारानेगौरविण्यात आले. राज्याच्या ग्रामीण विकास व पंचायतराज विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

ग्रामसभांच्या माध्यमातून गावांचा सामाजिक व आर्थिक विकास केल्याबद्दल अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्याच्या लोणी (बु.) ग्रामपंचायतीला सन्मानित करण्यात आले. सरपंच लक्ष्मण बनसोडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

स्वच्छता,नैसर्गिक स्त्रोतांचे व्यवस्थापन, ई-प्रशासन यांच्यासह नागरिकांना उत्तमरित्या शासनाच्या सेवा पुरविल्याबद्दल कोल्हापूर जिल्हा परिषद, अहमदनगर जिल्ह्यातील राहाता पंचायत समिती आणि बुलढाणा  जिल्ह्यातील खामगाव पंचायत समितीला दिनदयाल उपाध्याय पंचायत सशक्तीकरणपुरस्काराने गौरविण्यात आले.

राज्यातील  14 ग्रामपंचायतींना‘दिनदयाल उपाध्याय पंचायत सशक्तीकरणपुरस्काराने गौरविण्यात आले. यात सांगली जिल्ह्यातील पलुस तालुक्याच्या अंकलखोप ग्रामपंचायत, गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनीमोरगाव तालुक्यातील सिरेगांव, नागपूर जिल्हयातील मौदा तालुक्याच्या चिरव्हा ग्रामपंचायत याच जिल्हयातील कामठी तालुक्याच्या कढोली ग्रामपंचायत, अहमदनगर जिल्ह्याच्या राहाता तालुक्यातील चंद्रपूर ग्रामपंचायत, गडचिरोली जिल्हयातील मुलचेरा तालुक्याच्या सुदंरनगर, रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील धौलवेलीअहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्याच्या खदांबे (खु.), भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील पालडोंगरी, सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्याच्या बनवडी, अमरावती जिल्ह्याच्या अमरावती तालुक्यातील पुसदा, सांगली जिल्ह्याच्या शिराळा तालुक्यातील कंसगली, बुलढाणा जिल्हयाच्या शेगाव तालुक्यातील मोरगाव डिग्रस आणि चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्याच्या वियाहद (खु)  या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

000000

रितेश भुयार /वृत विशेष क्र.238/ दि.23.10.2019

                   

दक्षता जागृती सप्ताह २८ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबरदरम्यान; यावर्षीची संकल्पना ‘इंटेग्रिटी- अ वे ऑफ लाईफ’

मुंबई, दि. 22 : राज्यात यावर्षीचा दक्षता जनजागृती सप्ताह दि. 28 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2019 या कालावधीत ‘ईमानदारी- एक जीवनशैली’(इंटेग्रिटी- अ वे ऑफ लाईफ) या संकल्पनेवर आधारित आयोजित करण्यात येणार आहे.

भ्रष्टाचाराविरुद्ध जागृती निर्माण करण्यासाठी राज्यात सन 2000 पासून दरवर्षी दक्षता जनजागृती सप्ताह आयोजित केला जातो. भ्रष्टाचार निर्मुलन, भ्रष्टाचाराविरुद्ध लढा तसेच भ्रष्टाचाराचे गंभीर परिणाम आणि धोके याविषयी परिणामकारक जनजागृतीचे माध्यम म्हणून केंद्रीय दक्षता आयोग (सीव्हीसी) जनजागृती सप्ताहाकडे विशेष लक्ष केंद्रित करते. यावर्षी आयोगाने ‘इंटेग्रिटी- अ वे ऑफ लाईफ’ या संकल्पनेनुसार जनजागृतीवर भर देण्याचे निश्चित केले आहे.

राज्य शासनाचे सर्व विभाग व त्यांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख, राज्य शासनाचे अंगीकृत उपक्रम, सहकारी संस्था व स्वायत्त संस्थांमार्फत सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे. दिनांक 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वा. भ्रष्टाचार निर्मुलनाची शपथ घेऊन कार्यक्रमाचा प्रारंभ होईल. त्यानंतर राज्यपालांचा संदेश उपस्थितांना वाचून दाखविण्यात येणार असून हा संदेश राज्यातील जनतेसाठी प्रसूत करण्यात येईल.

या सप्ताहाच्या निमित्ताने राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार कार्यालयाच्या दर्शनी भागात व मोक्याच्या ठिकाणी भित्तीपत्रक, कापडी फलक लावण्यात येणार आहेत. कार्यालये, शाळा, महाविद्यालयांमध्ये भ्रष्टाचाराच्या दुष्परिणामांवर प्रकाश टाकण्यासाठी चर्चासत्रे, वादविवाद स्पर्धा, व्याख्याने, निबंधस्पर्धा, कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. यानिमित्ताने विशेष पुस्तिकांचे प्रकाशन करणे तसेच केंद्रीय दक्षता आयोगाच्या http://www.cvc.nic.in या संकेतस्थळावरील जनजागृती साहित्याचे जनतेमध्ये वितरण करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्यातील अशासकीय संघटना, स्वयंसेवी संस्था तसेच नागरिकांनी दक्षता जनजागृती मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन सामान्य प्रशासन विभागामार्फत करण्यात आले आहे.

नवलेवाडी येथील मतदान प्रक्रिया सुरळित

सातारा, दि.22 :विविध इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमे व समाजमाध्यमांमध्ये मतदान केंद्र क्रमांक 250 नवलेवाडी ता. खटाव जिल्हा सातारा येथे 45 सातारा लोकसभा पोटनिवडणूक व 257 कोरेगांव विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 करिता मतदान प्रक्रियेबाबत बातमी प्रसिद्ध झाली. दिनांक 21 / 10 / 2019 रोजी सकाळी 5.30 वाजता उमेदवार प्रतिनिधी दीपक रघुनाथ पवार (एनसीपी) व दिलीप आनंदराव वाघ (एनसीपी) हे अभिरुप मतदानावेळी उपस्थित होते, अभिरूप मतदानावेळी व्हीव्हीपॅट मतदान चिठ्ठीच्या मुद्रणाबाबत दोन्ही प्रतिनिधींनी आक्षेप घेतला नाही. किंबहुना सकाळी 7.00 ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत मतदानप्रक्रिया सुरु असताना कोणत्याही मतदारांनी असा आक्षेप घेतला नाही. दीपक रघुनाथ पवार यांनी दुपारी आक्षेप घेतल्यानंतर त्यांना संबंधित केंद्राध्यक्ष यांनी चाचणी मतदानासाठी जोडपत्र 15 भरुन देणेबाबत सांगितले तथापी त्यांनी तसे करण्यास नकार दिला. तद्नंतर सदर मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरु होती.

सदर तक्रारीमध्ये कोणतेही तथ्य नाही. तसेच अशी कोणतीही घटना घडलेली नाही. असे कीर्ती नलावडे, निवडणूक निर्णय अधिकारी 257-कोरेगांव विधानसभा मतदारसंघ तथा उपविभागीय अधिकारी, कोरेगांव यांनी कळविले आहे.

राज्यात विधानसभेसाठी ६१.१३ टक्के मतदान – अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांची माहिती

सातारा लोकसभेसाठी 67.15 टक्के मतदान

मुंबई, दि. 22 : राज्यात 288 विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सरासरी 61.13 टक्के मतदान झाल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली. तसेच सातारा लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी 67.15 टक्के मतदान झाल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

मतदानाची अंतिम आकडेवारी आज मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने जाहीर केली. राज्यात 4 कोटी 68 लाख 65 हजार 385 पुरुष, 4 कोटी 28 लाख 35 हजार 374 स्त्रिया आणि 2 हजार 637 तृतीयपंथी अशा एकूण 8 कोटी 97 लाख 3 हजार 396 मतदारांपैकी एकूण 5 कोटी 48 लाख 38 हजार 514 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाचा हक्क बजावलेल्यांमध्ये 2 कोटी 94 लाख 73 हजार 184 पुरूष, 2 कोटी 53 लाख 64 हजार 665 स्त्रिया आणि 666 तृतीयपंथींचा समावेश आहे. या निवडणुकीत 62.89 टक्के पुरुष, 59.21 टक्के स्त्रिया आणि 25.26 टक्के तृतीयपंथींनी मतदानाचा हक्क बजावला, अशी माहिती देखील श्री. शिंदे यांनी यावेळी दिली.

सातारा लोकसभेसाठी 67.15 टक्के मतदान

सातारा लोकसभा मतदारसंघासाठीचे पुरुष, स्त्री, तृतीयपंथी आणि एकूण मतदार तसेच कंसात मतदानाचा हक्क बजावेले मतदार यांची आकडेवारी पुढीलप्रमाणे : पुरुष- 9 लाख 40 हजार 751 (6 लाख 45 हजार 248), स्त्री- 9 लाख 9 हजार 497 (5 लाख 94 हजार 287), तृतीयपंथी- 145 (13), एकूण- 18 लाख 50 हजार 393 (12 लाख 39 हजार 548). या निवडणुकीत पुरुष 68.71, स्त्री- 65.56, तृतीयपंथी- 27.83 याप्रमाणे एकूण 67.15 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.  

पोलीस स्मृती दिनानिमित्त राज्यपालांचे पोलीस हुतात्म्यांना अभिवादन

मुंबई, दि. 21 : गेल्या संपूर्ण वर्षात देशाच्या विविध पोलीस दलातील कर्तव्य बजावित असताना हौतात्म्य प्राप्त झालेले पोलीस अधिकारी व जवानांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी पोलीस स्मृती दिनानिमित्त पुष्पचक्र वाहून श्रध्दांजली वाहिली. देशाच्या विविध पोलीस दलामधील वीरगती प्राप्त झालेल्या 31 पोलीस अधिकारी आणि 261 पोलीस अंमलदारांची नावे यावेळी वाचून दाखविण्यात आली.

नायगाव पोलीस मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमात प्रारंभी राज्यपालांनी हुतात्म्यांच्या स्मृतीला अभिवादन करणारे निवेदन वाचून दाखवले. त्यानंतर त्यांनी शहिदांच्या कुटुंबियांची भेट घेतली. मुख्य सचिव अजोय मेहता,पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल व मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी पुष्पचक्र वाहिले.

कार्यक्रमाला विविध देशांचे राजनैयिक प्रतिनिधी तसेच पोलीस दलातील आजी व माजी ज्येष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0000

Maharashtra Governor pays tributes to police martyrs on Police Commemoration Day; meets family members of martyrs

Mumbai 21 :Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari today placed a wreath and offered tributes at the Police Martyrs’ Memorial on the occasion of Police Commemoration Day.

The Police Martyrs’ Commemoration Day function organised by the Directorate General of Maharashtra Police was held at the Naigaum Police Ground in Mumbai on Monday (21 Oct).

The Governor read out a message paying tributes to the brave police officers and personnel who laid down their lives in the line of duty on this occasion.  The Governor then met the family members of the police martyrs.

State Chief Secretary Ajoy Mehta, Director General of Maharashtra Police Subodh Jaiswal and Commissioner of Mumbai Police Sanjay Barve also laid wreaths at the Martyrs’ Memorial on the occasion.The Commemoration Day started with the presentation of ‘Shok Shastra’. Names of 31 police officers and 261 police personnel from across the country who laid down their lives in the line of duty last year were read out.

The parade presented a general salute and fired three rounds on this occasion. The programme concluded with the playing of the Bigular’s ‘Last Post’ and ‘Rouse’.Diplomats from various countries and senior serving and retired police officers were present on the occasion.

मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांनी मतदानाचा हक्क बजावला

मुंबई, दि. 21 : राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांनी आज सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला.

मलबार हिल मतदार संघाच्या रॅाकहील भागातील बालकल्याणी स्कूल या मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केले असून ‘मी मतदान केले, तुम्ही सुद्धा अवश्य करा’ असे आवाहनही  मतदारांना केले.

मुख्य सचिव अजोय मेहता यांनी केले मतदान

मुंबई दि. 21 :मुख्य सचिव अजोय मेहता यांनी सकाळी पावणे अकराच्या सुमारास सुपुत्र शिवाजी मेहता यांच्या समवेत पेडर रोडजवळील ॲक्टिव्हिटी हायस्कुलच्या केंद्रात जाऊन मतदान केले.मी मतदान केले आपणही आपल्या मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन मुख्य सचिवांनी यावेळी केले.

अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क

मुंबई, दि. 21 : लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावे असे आवाहन करीत राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी आज सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला.

कुलाबा विधानसभा मतदार संघातील के सी महाविद्यालय या मतदान केंद्रावर जावुन त्यांनी मतदान केले.त्यांच्यासह शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, माहिती तंञज्ञान विभागाचे प्रधान सचिव श्रीनिवास,सचिव श्रीमती कुंदन, सचिव पराग जैन, माजी पोलीस महासंचालक जावेद अहमद तसेच परिसरातील नव मतदार, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तसेच लोकशाहीसाठी मतदान अवश्य करा, असे आवाहनही मतदारांना केले.

ताज्या बातम्या

“आमची प्रक्रिया पारदर्शक आणि उत्तरदायित्वपूर्ण आहे” – भारत निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

0
मुंबई, ८ :  भारत निवडणूक आयोगाने काँग्रेस पक्षाला २४ डिसेंबर २०२४ रोजी सविस्तर उत्तर पाठवले असून, त्यात त्यांच्या उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांवर स्पष्ट आणि...

प्लास्टिकचे वापर टाळा, कापडी पिशवी वापर करा, पर्यावरणाचे संरक्षण करा -पंकजाताई मुंडे

0
सोलापूर, दि. ७ - श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट येथे पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी भेट देऊन प्लास्टिक बंदी बाबत सर्व भक्तांना आवाहन...

नवउद्योजकांसाठी डॉ.प्रमोद चौधरी यांचे पुस्तक प्रेरक ठरेल-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पुणे, दि. ७ : भारताची भविष्यातील  वाटचाल आणि कार्बनचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी आवश्यक वाटचालीचा रोडमॅप डॉ. प्रमोद चौधरी यांच्या पुस्तकातून मांडण्यात आला आहे. पुस्तकात...

मॉडेल सोलर व्हिलेज योजना

0
सूर्यघर मुफ्त बिजली योजनेंतर्गत ‘मॉडेल सोलर व्हिलेज’ ही गावांना प्रोत्साहन देणारी योजना राबवित आहे. या योजनेविषयी ही माहिती... आपला भारत देश‌ पर्यायाने महाराष्ट्र राज्य आणि...

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कामांना वेळेत पूर्ण करा -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे...

0
नागपूर, दि.७ : ज्यांना निवारा नाही त्यांना साध्या दोन खोलीच्या घराची अपेक्षा असते. गावठान व गावठाणांच्या बाहेर घरकुलांसाठी समान न्यायांची भुमिका शासनाची आहे. घरकुलासाठी...