शनिवार, जून 7, 2025
Home Blog Page 1740

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते ‘पुण्यभूषण’ पुरस्कार प्रदान

देशाचा सांस्कृतिक-ऐतिहासिक वारसा युवा पिढीपर्यंत पोहोचण्याची गरजउपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू

पुणे, दि. 26 : भारताला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक मोठा वारसा आहे. हा वारसा पुरातत्व शास्त्राच्या माध्यमातून वर्तमानाशी जोडला जातो. हा वारसा आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज असून भारताला समृद्ध करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आज केले.

        

येथील बालगंधर्व रंगमंदिराच्या सभागृहात‘पुण्यभूषण फाऊंडेशनआणि पुणेकरांच्या वतीने दिला जाणारा पुण्यभूषण पुरस्कारज्येष्ठ पुरातत्वतज्ज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांना उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते देण्यात आला. एक लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिक्षणतज्ज्ञ एस. बी. मुजुमदार, ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे, भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार चंदू बोर्डे, डॉ. के. एच. संचेती उपस्थित होते.

उपराष्ट्रपती श्री. नायडू म्हणाले, पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. पुणे हे देशातील सर्वात सुंदर शहर आहे. शैक्षणिक केंद्र असणाऱ्या या शहराला छत्रपती शिवाजी महाराजांसह फुले दाम्पत्य, लोकमान्य टिळक, गोपाळकृष्ण गोखले, महर्षी कर्वे यांच्यासह थोर समाजसुधारकांचा वारसा आहे. या शहरातील पुण्यभूषण पुरस्कार हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार असून या माध्यमातून समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांना प्रेरणा मिळेल.  

या वर्षीचा पुरस्कार पुरातत्वज्ज्ञ डॉ. देगलूरकर यांना दिल्याने या निमित्ताने पुरातत्व शास्त्राचा गौरव झाला आहे. पुरातत्व शास्त्र हे खरा इतिहास समोर आणण्यासाठी उपयुक्त ठरते. त्याचबरोबर आपला सांस्कृतिक इतिहास उजेडात आणण्याचे काम करते. देशातील ऐतिहासिक स्थळे आणि स्मृतिस्थळे आजच्या पिढीला प्रेरणा देण्याचे काम करत असतात, त्यामुळे हा समृद्ध वारसा जपण्याचे काम सर्व देशवासियांनी एकत्रितपणे करण्याची आवश्यकता आहे. आजच्या पिढीला इतिहासाशी जोडण्यासाठी, त्यांना देशाच्या संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांच्या ऐतिहासिक स्थळांना भेटींचे आयोजन शैक्षणिक संस्थांनी करून देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

भारताची65 टक्के लोकसंख्या 35 वर्षाखालील असल्याने हा युवा वर्ग आपल्या देशाचे शक्तिस्थान आहे. या युवकांना इतिहासातून प्रेरणा मिळून त्यांना योग्य दिशा दाखविण्यासाठी कौशल्याधारित शिक्षण देण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर आजच्या युवा पिढीने आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन श्री. नायडू यांनी यावेळी केले.

पुरस्काराला उत्तर देताना डॉ. देगलूरकर म्हणाले, हा पुरस्कार मिळाल्याचा विशेष आनंद आहे. हा पुरस्कार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वादच मी मानतो. हा पुरस्कार पुरातत्व शास्त्राचा सन्मान आहे. भारतीय संस्कृती सर्वात प्राचीन आणि समृद्ध आहे, ती सर्वात प्रवाही आहे. या संस्कृतीची नव्याने ओळख करून देण्याचे काम पुरातत्व शास्त्र करते.

यावेळी वीरमाता लता नायर, स्वातंत्र्यसैनिक मोहंमद चांद शेख, सीमेवर लढताना जखमी झालेले सैनिक नाईक फुलसिंग, हवालदार गोविंद बिरादार यांचा उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या जीवनावर आधारित चित्रफित दाखविण्यात आली.

प्रास्ताविक पुण्यभूषण फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी केले तर आभार डॉ. प्रभा अत्रे यांनी मानले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

दूरदर्शन, आकाशवाणीवर राजकीय पक्षांना प्रचारासाठी मिळणार १३ तास ५० मिनिटे!

मुंबई दि.26 : राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी 6 राष्ट्रीय आणि 3 राज्यस्तरीय पक्षांसाठी प्रादेशिक दूरदर्शन वाहिनी आणि आकाशवाणीवर प्रचारासाठी 13 तास 50 मिनिटांचा कालावधी (810 मिनिटे) उपलब्ध करुन दिला जाणार आहे. यामध्ये राष्ट्रीय पक्षाला 8 तास 22 मिनिटे आणि राज्यस्तरीय पक्षाला 5 तास 28 मिनिटांचा समावेश आहे. हा कालावधी संबंधित पक्षांना टप्प्याटप्प्याने दिला जाणार आहे.

राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पक्षांना दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या प्रादेशिक वाहिनीवर प्रचार करताना त्यांना दिलेला कालावधी लक्षात घ्यावा लागेल. नामनिर्देशनाचा शेवटचा दिवस ते मतदानाच्या दोन दिवस अगोदरपर्यंत पक्षांना दूरदर्शन आणि आकाशवाणीवरुन प्रचार करता येईल.

आयोगामार्फत6 राष्ट्रीय आणि 3 राज्यस्तरीय पक्षांसाठी दूरदर्शन आणि आकाशवाणीवर प्रचाराचे तास कसे असतील हे ठरवून देण्यात आले आहे. 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांना मिळालेल्या जागांनुसार आयोगाने दूरदर्शन आणि आकाशवाणीसाठी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पक्षांना वेळ आखून दिला आहे.

भारत निवडणूक आयोगाकडून मान्यताप्राप्त असलेले पक्ष जेव्हा आपल्या पक्षाचा प्रचार व प्रसार दूरदर्शन किंवा आकाशवाणीवरुन करतील तेव्हा त्यांनी त्या संबंधित माहितीची किंवा भाषणाची एक लिखित प्रत दूरदर्शन आणि आकाशवाणी यांच्याकडे देणे आवश्यक आहे. दूरदर्शन आणि आकाशवाणी यांच्यामार्फत ती माहिती पडताळून पाहिली जाईल. या माहितीमध्ये निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमांविरुद्ध लिखाण असल्यास त्यातील काही वाक्य, संदर्भ किंवा परिच्छेद वगळणे बंधनकारक असेल.

राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पक्षांनी दूरदर्शन आणि आकाशवाणीवरुन प्रचार करीत असताना प्रसारभारती महामंडळाला त्यांच्या प्रचारासाठी देण्यात आलेला वेळ, प्रचार साहित्य यांचे वेळापत्रक देणे आवश्यक असून त्याबाबत मान्यता घ्यावी लागेल. याशिवाय या पक्षांनी देश, जात-धर्म तसेच न्यायालय किंवा व्यक्तीविरोधात टीका करु नये असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

००००

Political parties will get 13 hours 50 minutes for campaign on television and radio

Mumbai 26.Sep.19: Provision of 13 hours 50 minutes (810 minutes) will be made available for 6 national and 3 state level parties for their campaign of assembly election, on regional television and radio. This includes 8 hours 22 minutes to the national party and 5 hours 28 minutes to the state level party. This period will be provided to these parties in step by step manner.

National and state-level parties have to take into account the time given to them while propagating on the regional channels of television and radio. From the last day of the nomination up to two days before the voting, the parties can do campaign on television and on air.

The Election Commission of India has decided how the broadcasting hours for television and air will be for these six national and three state level parties. According to the seats won by political parties in the 2014 assembly elections, the commission has given time to national and state level parties for their campaign on television and radio.

When the parties accredited by the Election Commission of India doing their campaign on television and on air, they must give a written copy of the relevant information or speech to Television and Radio. This information will be verified through television and radio. If this information is written against the rules laid down by the Election Commission of India, it is obligatory to exclude certain sentences, references or paragraphs.

While the national and state parties are propagating through television and radio, it is compulsory to submit their approved time table and material for their propaganda towards Prasar Bharti. Besides, it has been expressly directed that these parties should not criticize the country, caste or religion as well as court or individual.

0000

राजनीतिक दलों को दूरदर्शन, आकाशवाणी पर

प्रचार के लिए मिलेंगे 13 घंटे 50 मिनट

मुंबई दि. 26 : राज्य की विधानसभा चुनाव के लिए 6 राष्ट्रीय और 3 राज्यस्तरीय दलों के लिए प्रादेशिक दूरदर्शन चैनल और आकाशवाणी पर प्रचार के लिए 13 घंटे 50 मिनट का समय (810 मिनट) उपलब्ध कराए जाएँगा। इसमें राष्ट्रीय दल को 8 घंटे 22 मिनट और राज्यस्तरीय दल को 5 घंटे 28 मिनट मिलेंगे। यह समय संबंधित दलों को चरणबद्ध तरीके से दिया जाएगा।

राष्ट्रीय और राज्यस्तरीय दलों को दूरदर्शन और आकाशवाणी के प्रादेशिक चैनल पर प्रचार करते समय उन्हें दिया हुआ समय को ध्यान में रखना होगा। नामनिर्देशन के अंतिम दिन से मतदान के दो दिन पहले तक राजनीतिक दल दूरदर्शन और आकाशवाणी पर प्रचार कर सकेंगे।

आयोग के जरिए  6 राष्ट्रीय और 3 राज्यस्तरीय दलों के लिए दूरदर्शन और आकाशवाणी पर प्रचार का समय (तास) किस तरह से रहेगा, यह तय कर दिया है। वर्ष  2014 में हुए विधानसभा चुनाव में राजकीय दलों को मिले हुए सीटों के अनुसार आयोग ने दूरदर्शन और आकाशवाणी के लिए राष्ट्रीय और राज्यस्तरीय दलों के लिए समय तय कर दिया है।

भारत चुनाव आयोग की ओर से मान्यताप्राप्त दल जब अपने पार्टी का प्रचार एवं प्रसार दूरदर्शन तथा आकाशवाणी से करेंगे तब उन्हें वह विषय से संबंधित जानकारी तथा भाषण की एक लिखित प्रत दूरदर्शन और आकाशवाणी की ओर से देना जरूरी है। दूरदर्शन और आकाशवाणी के जरिए वह जानकारी जाँची जाएगी। इस जानकारी में चुनाव आयोग ने जो नियम दिए है, उसका उल्लंघन किया हो या फिर यह उसके खिलाफ होने पर उसमें से कुछ वाक्य, संदर्भ तथा परिच्छेद को हटाना अनिवार्य रहेगा।

राष्ट्रीय और राज्यस्तरीय दलों ने दूरदर्शन और आकाशवाणी से प्रचार करते समय प्रसारभारती महामंडल को उनके प्रचार के लिए दिया गया समय, प्रचार साहित्य का समयसारिणी देना आवश्यक है और इस संदर्भ में मंजूरी लेनी होगा। इसके अलावा इन दलों को देश, जाति-धर्म एवं न्यायालय तथा व्यक्ति के खिलाफ टिप्पणी (टीका) न करने के स्पष्ट निर्देश भी दिए गए है।

००००

‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या महाराष्ट्र सायबरचे पोलीस अधीक्षक बाळसिंग राजपूत यांची मुलाखत

मुंबई, दि. २६ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित दिलखुलासकार्यक्रमात महाराष्ट्र सायबरचे पोलीस अधीक्षक तथा विधानसभा निवडणुका-२०१९ सोशल मीडिया मॉनिटरिंगचे राज्य समन्वयक बाळसिंग राजपूत यांची सोशल मीडिया व निवडणुका या विषयावर  विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून शुक्रवार दि.२७ सप्टेंबर आणि सोमवार दि. ३० रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. निवेदक हेमंत बर्वे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

      

निवडणूक प्रक्रियेत केला जाणारा सोशल मीडियाचा वापर, धार्मिक, जातीय तेढ किंवा द्वेष निर्माण करणाऱ्या पोस्टला प्रतिबंध करण्यासाठी निवडणूक आयोगाने घेतलेली दक्षता, फेक जाहिराती, क्रियाशील सायबर संस्कृती म्हणजे काय, सोशल मीडियासंदर्भातील तक्रारीसंदर्भात कुठे संपर्क साधावा, या विषयांची माहिती श्री. राजपूत  यांनी दिलखुलासया कार्यक्रमातून दिली आहे.

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे मुंबईत आगमन

मुंबई, दि.26 : भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे दोन दिवसाच्या मुंबई भेटीसाठी आज येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई दलाच्या खास विमानाने आगमन झाले.

राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे आणि मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी त्यांचे स्वागत केले.

पुण्यात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसात १४ जणांचा मृत्यू; ९ बेपत्ता

प्रशासनातर्फे मदत व बचाव कार्य सुरू;आज रात्रीही पावसाचा इशारा

पुणे,दि.26:पुणे शहरासह जिल्ह्यातील5तालुक्यांना काल रात्री मुसळधार पावसाचा फटका बसला. शहरासह ग्रामीण परिसरातील सखल भागातील घरात पाणी शिरले. नदी-नाल्यांना पूर आले. या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील14जण दगावले असून9जण बेपत्ता आहेत. पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून बचाव व मदतीसाठी एनडीआरएफची5पथके कार्यरत आहेत. प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी मदत करण्यात येईल,अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज दिली.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले,यावर्षी22वर्षानंतर प्रथमच ऑगस्ट महिन्यात धरणे भरली. काल रात्रीचा पाऊस मात्र खूपच होता. यावर्षी जिल्ह्यात सरासरी180टक्के पाऊस झाला आहे. कालच्‍या पावसामुळे जिल्ह्यात14जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये पुणे शहरातील6,हवेली तालुक्यातील6,पुरंदर तालुक्यातील2जणांचा समावेश आहे.

या पावसाचा फटका जिल्ह्यातील15तालुक्यांपैकी5तालुक्यांना बसला आहे. पाच तालुक्यातील59गावे बाधित झाली आहेत. नाझरे धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे कऱ्हा नदीच्या पात्रात85हजार क्युसेक पाणी वाहत होते. या कऱ्हा नदीच्या पाण्यामुळे बारामती शहराला फटका बसला. दक्षतेचा उपाय म्हणून बारामती शहरात38निवारा शिबिरांची उभारणी करण्यात आली आहे. या शिबिरात2हजार500नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले. तर पुणे शहरातील3हजार नागरिकांना काही काळासाठी सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले. जिल्ह्यातील1हजार1कुटुंबांतील 3 हजार65लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यात दरड कोसळून5रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले होते. या ठिकाणी तातडीने यंत्रणा पाठवून या रस्त्यांवरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे. जिल्ह्यात एनडीआरएफची5पथके तैनात करण्यात आली असून275जवान मदत कार्य करत आहेत. त्यापैकी बारामती तालुक्यात एनडीआरएफची दोन पथके कार्यरत आहेत. या आपत्कालीन स्थितीची माहिती निवडणूक आयोगाला कळवून त्यांच्या सूचनांनुसार प्रशासनाच्या वतीने बाधित नागरिकांना मदत देण्यात येणार आहे. आचारसंहितेचा कोणताही अडसर मदत व बचाव कार्यात येणार नसल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या पर्यटन दिनानिमित्त विशेष कार्यक्रम

मुंबई, दि. २६ : जागतिक पर्यटन दिन २७ सप्टेंबर रोजी साजरा केला जात आहे. त्यानिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित’जय महाराष्ट्रकार्यक्रमात विशेष कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात  येणार आहे. या कार्यक्रमात पर्यटन विभागाच्या सचिव विनिता वेद-सिंगल, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे, पर्यटन संचालक दिलीप गावडे, सहसंचालक धनंजय सावळकर आणि पर्यटन व्यावसायिक अवधूत मोरे  यांचा सहभाग आहे. हा माहितीपर कार्यक्रम दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर शुक्रवार दिनांक २७ सप्टेंबर २०१९रोजी  रात्री9 वाजता प्रसारित होईल. या कार्यक्रमाचे निवेदन  रेश्मा बोडके  यांनी केले आहे.

या कार्यक्रमात महाराष्ट्रातील पर्यटनाची बलस्थाने, आधुनिक काळातील पर्यटनाचे बदलते  स्वरूप, महाराष्ट्राला लाभलेली पर्यटन स्थळे, पर्यटनामुळे निर्माण होणारा रोजगार, महाराष्ट्र पर्यटन विकास  महामंडळाने विकसित केलेली पर्यटनस्थळे, तीर्थक्षेत्र, सागरी, वन्यजीव, कृषी, पावसाळी पर्यटन यासह पर्यटनामुळे राज्याच्या आर्थिक विकासाला मिळत असलेली चालना आदी विषयांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.        

निवडणुकीत पैशाच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी सतर्क राहण्याचे विशेष खर्च निरीक्षक मधू महाजन यांचे निर्देश

मुंबई, दि. 26 : विधानसभा निवडणुकीमध्ये पैशाचा गैरवापर रोखण्यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे, असे निर्देश राज्यासाठीच्या विशेष खर्च निरीक्षक श्रीमती मधू महाजन यांनी आज दिले.

निवडणुकीच्या अनुषंगाने श्रीमती महाजन आणि प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीत आढावा घेऊन सूचना देण्यात आल्या. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त प्राजक्ता लवंगारे- वर्मा, परिवहन आयुक्त शेखर चन्ने, वस्तू आणि सेवा कर आयुक्त ए. शैलजा आदी उपस्थित होते.

आयकर विभाग, उत्पादन शुल्क विभाग व महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विभागांनी निवडणुकीत मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी पैशाचा आणि मद्याचा वापर याला आळा घालण्यासाठी तसेच अवैधरित्या मद्य आणि रोकड वाहतूक यावर लक्ष ठेवण्याची सक्षम यंत्रणा कार्यान्वित करावी अशा सूचना दिल्या.

रोख रक्कमेची वाहतूक, पैशाचे हस्तांतरण यावर लक्ष ठेवावे. उमेदवारांचा निवडणूक खर्च आणि अवैध पैशांचा वापर याबाबत काटेकोर पर्यवेक्षण करण्यात यावे, आदी सूचना देण्यात आल्या.

यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभाग, आयकर विभाग तसेच एमजीएसटी विभागाने केलेली चेकपोस्ट, भारतीय टपाल विभाग आदींच्या व्यवस्थेचाही आढावा घेण्यात आला.

००००

सचिन गाढवे/वि.सं.अ./दि.26.9.2019

भारताची विश्वगुरू बनण्याच्या दिशेने वाटचाल – उपराष्ट्रपती

प्रा. यशवंतराव केळकर स्मृतीनिमित्त’नेशन फर्स्ट’या विषयावर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे व्याख्यान

मुंबई, दि. 26:भारत देश झपाट्याने आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करीत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील वित्तीय संस्थांनीसुद्धा ही बाब मान्य केली आहे. अनेक बाबींसाठी देश आज जगभर ओळखला जातो. गेल्या काही वर्षात विश्वगुरू बनण्याच्या दिशेने देशाची वाटचाल सुरू आहे, असे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी सांगितले.

प्रा.यशवंतराव केळकर स्मृतीनिमित्त आयोजित प्रथम व्याख्यान कार्यक्रमात’नेशन फर्स्ट’या विषयावर श्री.नायडू यांनी आपले विचार व्यक्त केले. मुंबई शेअर बाजारच्या सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अध्यक्षस्थानी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी तर प्रमुख पाहुणे म्हणून बीएसईचे मुख्य आर्थिक अधिकारी नयन मेहता, सुनिल आंबेकर, आशिष चव्हाण आदी उपस्थित होते.

प्रा.यशवंतराव केळकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ व्याख्यानमाला सुरू केल्याबद्दल उपराष्ट्रपतींनी मराठीतून आयोजकांचे कौतुक केले. प्रो. केळकर यांच्यासोबत विद्यार्थीदशेतच काम करण्याची संधी मिळाली. ते अनेकांचे मार्गदर्शक आणि चांगले मित्र होते, असे उपराष्ट्रपती श्री.नायडू म्हणाले.

‘नेशन फर्स्ट’असे म्हणत असताना केवळ देश प्रथम असाच त्याचा अर्थ नाही. सर्वांना समान संधी, समाजातील शेवटच्या घटकांचा विकास, महिलांना बरोबरीचे स्थान, गरिबी निर्मूलन, एक देश, एक नागरिक आणि देशाबद्दल प्रत्येकाच्या मनात असलेला आदर या बाबी सुद्धा महत्त्वाच्या आहेत.

‘नेशन फर्स्ट’चा विचार मांडताना प्रत्येकाने रचनात्मक, सकारात्मक कामाने देशाच्या विकासासाठी कसे योगदान देऊ शकू, याचा विचार केला पाहिजे. यासोबतच देशाच्या भविष्यासाठी प्रकृती, संस्कृती आणि एकात्मतेचा विचारही आवश्यक आहे. देशाला विकासाच्या दिशेने घेऊन जात असताना काही आव्हानेसुद्धा आहेत. त्या आव्हानांचा सामनासुद्धा करावा लागणार असल्याचे उपराष्ट्रपती म्हणाले.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले. सुरुवातीस मराठी भाषेतून त्यांनी प्रो.यशवंतराव केळकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. प्रत्येक युवक पदाने मोठा व्यक्ती होऊ शकत नसला तरी चांगला राष्ट्रपुत्र मात्र बनू शकतो. आपल्या सकारात्मक दृष्टीकोनातून उद्योग, व्यवसाय, सामाजिक क्षेत्र आणि राजकारणातसुद्धा चांगली संधी निर्माण करू शकतो, असेही राज्यपाल म्हणाले.

०००००००

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील नागरिकांना विनाशुल्क बदली मतदार ओळखपत्रे

मुंबई दि.25 : पूरग्रस्त कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 1 लाख 56 हजार 60 नागरिकांना तर सांगली जिल्ह्यातील एकूण 4 लाख 35 हजार 422 नागरिकांना विनाशुल्क बदली ओळखपत्रे देण्यात येणार आहेत. कोल्हापूर आणि सांगली जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्यामार्फत महापुराने बाधित क्षेत्रातील विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार छायाचित्रासह ओळखपत्र विनाशुल्क देण्याची कार्यवाही केली जाईल.

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात महापूर आला होता. या महापुरात या दोन जिल्ह्यातील गावे बाधित झाली होती. या महापुरात या दोन जिल्ह्यातील नागरिकांचे संसारोपयोगी साहित्य, महत्त्वाचे दस्तऐवज यांचे नुकसान झाले. ही बाब लक्षात घेऊन ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी या दोन जिल्ह्यातील नागरिकांना आता बदली मतदार ओळखपत्रे पुरविण्यात येणार आहेत.

००००

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील मतदार संख्येत २१ लाखांनी वाढ

मुंबई, दि. 25 : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील एकूण मतदारांमध्ये 21 लाख 15 हजार 575 एवढी वाढ झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज्यात एकूण 8 कोटी 73 लाख 30 हजार 484 मतदार होते तर आता 31 ऑगस्टपर्यंत 8 कोटी 94 लाख 46 हजार 211 एवढी मतदार नोंदणी झाली आहे.

लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी भारत निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत विशेष प्रयत्न करण्यात आले. जुलै-ऑगस्ट 2019 या कालावधीत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण हा कार्यक्रम राबविण्यात आला. सुट्ट्यांच्या दिवशी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले. त्यातून अधिकाधिक नागरिकांनी मतदार यादीत नावे नोंदवावी, यासाठी प्रयत्न करण्यात आले. सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या माध्यमातूनही शहरी भागातील मतदार जोडण्यात आले.

मार्चमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी4 कोटी 57 लाख 02 हजार 579 पुरुष मतदार व 4 कोटी 16 लाख 25 हजार 819 महिला मतदार होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी 31 ऑगस्ट 2019 रोजी प्रकाशित अंतिम मतदारयादीमध्ये पुरुष मतदारामध्ये दहा लाख 35 हजार 262 नव्या पुरुष मतदारांची वाढ होऊन ती 4 कोटी 67 लाख 37 हजार 841 एवढी झाली आहे. तर महिला मतदारांमध्ये 10 लाख 79 हजार 958 एवढी वाढ होऊन ती आता 4 कोटी 27 लाख 5 हजार 777 झाली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी2 हजार 86 तृतीयपंथी मतदार होते त्यामध्ये 507 मतदार वाढून ते आता 2 हजार 593 एवढे झाले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर एकूण मतदारांमध्ये 21 लाख 15 हजार 575 एवढी वाढ झाली आहे.

००००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/25.9.2019

Number of voters in the state rise by 21lakhs 

compared to Lok Sabha polls

Mumbai Sept.25 – The number of voters in the state has increased by 21 lakh 15 thousand and 575 after the recently held Lok Sabha elections. The total number of voters in the state which was 8 crore 73 lakh 30 thousand 484 has by August 31st has reached to 8 crores 91 lakh 46 thousand 211.

Election Commission of India (ECI) and office of the chief election officer had made special efforts to increase voting and in the month of July-August special drive for brief review of voters’ list was conducted. Special drives were held on holidays so that people can register their names in voter’s list. In urban areas, the efforts were made through cooperative housing societies for the same.

There were 4.57 crore 2 thousand 579 male voters and 4 crore16 lakh 25 thousand 819 female voters during the Lok Sabha elections held in the month of March 2019. The final voter’s list published on August 31’st 2019 before the assembly elections  has increase in the male voters by 10 lakh 35 thousand 262 taking total number of male voters to 4.67 crores 37 thousand 841. There is rise of 10 lakh 79 thousand 958 in number of female voters taking total number of female voters in the state to 4.27 crores 5 thousand 777.

There were 2086 transgender voters in the state during Lok Sabha elections. This number has also increased now and it has become 2593. There has been a rise of 21 lakh 15 thousand 575 voters in the state as compared to Lok Sabha elections.

ताज्या बातम्या

व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. ६ :- भारतीय संस्कृती आणि संत वाङ्मयाचे वैभव आपल्या लेखनातून, व्याख्यानातून दृग्गोचर करणारा व्यासंगी परंपरेचा एक मोठा दुवा निखळला आहे, अशा शोकभावना...

वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार...

0
सातारा दि. ६ :  संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची संख्या मोठी असणार आहेत. वारकऱ्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही यासाठी प्रत्येक...

“पालखी सोहळ्याचे काटेकोर नियोजन; महिलावर्गाची विशेष काळजी घेणार” – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
जळगाव, दि. ६ – राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुक्ताईनगर येथील कोथळी गावातील संत मुक्ताबाई मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यानंतर पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या...

बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा

0
मुंबई, ६ : बकरी ईद अर्थात ईद-उल-अजहाच्या पवित्र पर्वानिमित्त जनतेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण आपल्या जीवनात शांतता, समृद्धी,...

‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा

0
मुंबई, दि. ०६ :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील नागरिकांना ‘ईद-उल-अज़हा’ अर्थात ‘बकरी ईद’च्या शुभेच्छा दिल्या असून, या पर्वाच्या निमित्ताने सामाजिक ऐक्य, सलोखा, सौहार्द...