शनिवार, जुलै 26, 2025
Home Blog Page 1807

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे राजभवन येथे आगमन

नागपूर, दि.16 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे 16 डिसेंबर रोजी नागपूर विमानतळ येथून शासकीय वाहनाने राजभवन येथे आगमन झाले. यावेळी पोलिस बँड पथकाने राष्ट्रगीताची धून वाजून राज्यपालांना मानवंदना दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विद्याधर सरदेशमुख आणि कार्यकारी अभियंता जनार्दन भानुसे यांनी पुष्पगुच्छ देऊन राज्यपालांचे स्वागत केले. याप्रसंगी राज्यपालांचे राजभवन येथील पारिवारिक प्रबंधक रमेश येवले प्रामुख्याने उपस्थित होते.राज्यपाल यांचा शनिवार, दिनांक 21 डिसेंबर पर्यंत राजभवन येथे मुक्काम आहे.

****

लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच योजनांमध्ये कालानुरूप सुधारणा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अमरावती जिल्ह्यातील विकासकामांचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा

                                 

नागपूर, दि. 16 :राज्यात अवेळी झालेल्या पावसाने बाधित शेतपिकांच्या नुकसान भरपाईसाठी 5 हजार 300 कोटी रुपयांची मदत वितरित होत आहे. नैसर्गिक संकटांवर मात करण्यासाठी प्रभावी उपाययोजनांसह सध्याच्या जलसंधारणासह विविध योजनांमध्ये लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन सुधारणा करण्यात येतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज येथे केले.

विधानभवनातील मंत्री परिषद सभागृहात अमरावती जिल्ह्याच्या विविध विकासकामांचा आढावा मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी घेतला, त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. आमदार श्रीमती यशोमती ठाकूर, श्रीमती सुलभाताई खोडके, बच्चू कडू, रवी राणा, देवेंद्र भुयार, राजकुमार पटेल, प्रताप अडसड, बळवंत वानखडे, मुख्य सचिव अजोय मेहता, विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी संजय पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, विविध नैसर्गिक संकटे समोर आली तरी परिस्थितीचा सामना करत आपल्याला पुढे जावे लागेल. यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या योजनांमध्ये नव्या उपाययोजनांचा समावेश करावा लागेल. त्यासाठी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन नव्या योजनांची भर घालण्यात येईल. विदर्भासाठी वेगळ्या उपाययोजनांचा विचार करून जनतेला न्याय देऊ, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

अवेळी पावसामुळे शेतपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना पिक विम्याचा आधार असतो. मात्र, कंपन्याकडून शेतकऱ्यांना पिक विम्याचा लाभ मिळण्यास समाधानकारक प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे पिक विमा धोरणात सुधारणा करण्यात येतील. शेतकऱ्यांना हक्काचा लाभ मिळाला पाहिजे, अशी शासनाची भूमिका आहे. शेतकऱ्यांना सरसकट लाभ मिळण्यासाठी शासकीय यंत्रणेने केलेले पंचनामे आणि पावसाची आकडेवारी ग्राह्य मानण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच कर्जमाफीची रक्कम जिल्हा बँकेसह विविध बँकांकडून लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न करण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

अवेळी पावसाने बाधित झालेल्या जाहीर क्षेत्रात वरुड, मोर्शी या तालुक्यांचा समावेश नसल्याची बाब समोर आल्यानंतर ही बाब जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून शासकीय नियमाप्रमाणे मदत करण्यात येईल, असे श्री. मेहता यांनी सांगितले. वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानाला आळा घालण्यासाठी सामूहिक कुंपण योजना राबविण्याचा विचार करण्यात येईल. तसेच वन्यप्राण्यांमुळे  होणाऱ्या अपघातानंतर मदतीच्या निकषांमध्ये रोही (नीलगाय) या प्राण्याचा समावेश करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यात पोकरा योजनेतून वैयक्तिक लाभाच्या योजना राबविल्या जातात. त्यांना सामूहिक योजनांची जोड देण्यात येईल. सामूहिक शेततळ्याची योजना व्यापकपणे राबविण्यात येईल, जेणेकरून शेतकऱ्यांना रब्बीसाठीही पाणी मिळेल. यामुळे पावसामध्ये खंड पडला तरी शेतकऱ्यांच्या हाती निश्चित उत्पन्न येण्यास मदत होईल. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत 256. 42 कि. मी. लांबीचे 41 रस्ते पूर्ण करण्यात आले. 362.15 कि. मी. लांबीच्या रस्त्यांची 90 कामे प्रगतीत आहेत. तथापि, ग्रामीण रस्त्यांमध्ये व्यापक सुधारणांसाठी निधी वाढविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

कृषी विभागाची सुमारे 47 पदे रिक्त आहेत. ती भरण्याची कार्यवाही सुरु आहे. प्रत्येक तालुक्यात  कृषी अधिकारी उपलब्ध करून दिला जाईल. जिल्ह्यात मृद व जलसंधारणाच्या 105 योजना पूर्ण होऊन 28 हजार 594 टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला. या कामांना गती देण्यासाठी काही निकषांत बदल करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी श्री. पवार यांनी यावेळी जिल्ह्यातील विविध विकासकामांचे सादरीकरण केले. ते म्हणाले, जिल्ह्यात 2019 मध्ये खरीपाचे क्षेत्र 6 लाख 82 हजार हेक्टर व प्रत्यक्ष पडलेला पाऊस 778.84 मि. मि. होता. ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवेळी पावसाचे एकूण प्रमाण 67.92 मि. मि. एवढे आहे. अवेळी पावसाने 3 लाख 73 हजार 550 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले, तर बाधित शेतकऱ्यांची संख्या 3 लाख 75 हजार 398 आहे. ऑक्टोबरमधील अवेळी पावसाने शेतपिकांचे नुकसान झाल्याने 91 हजार 278 शेतक-यांना 72 कोटी 26 लाख अनुदान वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे, जिल्ह्याला 230 कोटी 62 लाख रू. अनुदान प्राप्त असून, त्याचे वाटप होत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

जिल्ह्यात जलशक्ती अभियानात चांदूर बाजार, अचलपूर, मोर्शी व वरूड तालुक्यात 3 हजार 653 छतावरील पाणी संकलन योजना पूर्ण झाल्या. रोहयोमध्ये जलसंधारण प्रकारातील 24 हजार 495 कामे हाती घेण्यात आली. त्यातील 16 हजार 678 कामे पूर्ण झाली. त्याचप्रमाणे, 7 हजार 847 सिंचन विहीरींपैकी 4 हजार 828 विहीरी पूर्ण झाल्या. ‘मग्रारोहयो’ची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल जिल्ह्याला राष्ट्रीय पातळीवरचा पुरस्कार मिळाला आहे, असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील विविध विभागप्रमुख आढावा बैठकीला उपस्थित होते. 00000

Chronological improvement in development plans will be done only after taking people’s representatives into confidence – Chief Minister Uddhav Thackeray

Chief Minister reviews the development works in Amravati district

Nagpur, The. 16: “Aid of Rs. 5,300 crore is being distributed to compensate the affected farmers due to untimely rains in the state. To tackle the natural calamities some improvement will be done in present scheme of water conservation along with other various influential schemes. But implementation of all these schemes will be take place after taking People’s representatives into confidence” said Chief Minister Uddhav Thackeray.

He was speaking in a meeting organized to take review of various development works of Amravati District at the Ministerial Council Hall in Legislative Assembly.

Chief Minister further said that despite various natural disasters, we have to face the situation and move on. For this, existing plans would have to incorporate new solutions. For this, new schemes would be added by taking the representatives of the people into confidence. The state government would give justice to the people by considering different measures for Vidarbha.

“Farmers have crop insurance support in case of loss arise due to untimely rains. However, farmers do not get satisfactory response from insurance companies to get crop insurance benefits. Therefore, crop insurance policies will be revised and improved. The government’s role is to ensure that farmers get the benefit of their rights. The farmers have been advised to accept the Panchnama (survey) and rain statistics by the government system for immediate benefit. Besides, efforts will be made to take the amount of loan waiver to the beneficiaries from various banks including the District Banks informed Chief Minister.

“Warud and Morshi taluka will not be included in list of affected sector due untimely rain. But when this matter came in front government tried to provide help according to rule after discussion with Collector. It will be considered to implement a collective fence plan to prevent the loss occur due to wild animals. The criteria of assistance would be to include Rohi (Blue bull) animal after the accident caused by wild animals” said Mr. Ajoy Mehta.

He further stated that individual beneficiary schemes are implemented through the PoCRA scheme in the saline area of the district. They would be given a combination of collective plans. The scheme of mass farming would be implemented widely, so that the farmers can get water for Rabbi Crop too. This would help farmers get a fixed income even in condition of irregular rain. Under the Chief Minister’s Gram Sadak Yojana, 41 long roads of 256. 42 km were completed. Around 90 works of 362.15 km of lengthy roads are in progress. However, funds would be raised for comprehensive reforms in rural roads.

“About 47 posts in Agriculture Department are vacant. The process of filing these posts is underway. Agricultural officers will be made available in each taluka. With the completion of 105 schemes of soil and water conservation in the district, 28, 594 TCM water reservoirs were created. Some criteria will be changed to speed up these work” informed Mr. Mehta.

Collector, Sanjay Pawar presented various development works in the district. He said that in 2019, the area of Kharif in the district was 6.82 lakhs hectares and the actual rainfall was 778.84 mm. The total rainfall during the months of October and November is 67.92 mm. Due to unseasonal rains, 3,73,550 hectare area was damaged, while the number of affected farmers is 3,75, 398. About Rs 230.62 crore subsidy is being received and distribution of the aid is going on for 91,278 farmers who faced loss in agriculture due to untimely rain in October.

In the district, 3, 653 rooftop water collection schemes were completed in Chandpur Bazar, Achalpur, Morshi and Warud talukas under the Jalshakti Abhiyan.  Through EGS, 24,495 works of water conservation were undertaken. Of these, 16,678 works were completed. Similarly, out of 7,847 irrigation wells, work of 4,828 wells were completed.The district received a national award for the effective implementation of ‘Maharashtra Rural Employment Guarantee Scheme’.

MLAs Yashomati Thakur, Sulbhatai Khodke, Bachchu Kadu, Ravi Rana, Devendra Bhuiar, Rajkumar Patel, Pratap Adasad, Balwant Wankhede, Chief Secretary Ajay Mehta, Divisional Commissioner Piyush Singh, Collector Sanjay Pawar, Chief Executive Officer Amol Yedge and the heads of various departments of the district attended the review meeting.

यवतमाळ जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्पासाठी प्राधान्याने निधी -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली यवतमाळ जिल्ह्यातील विकासकामांबाबत आढावा बैठक

नागपूर दि. 16 : यवतमाळ जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांद्वारे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच अपूर्ण प्रकल्प तातडीने पूर्ण करण्यासाठी लवकरात लवकर निधी उपलब्ध करून  दिला जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

विधिमंडळ सभागृहात यवतमाळ जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी विधानपरिषदेचे आमदार सर्वश्री वजाहत मिर्झा, ख्वाजा बेग, निलय नाईक, विधानसभेचे आमदार सर्वश्री संजय राठोड, इंद्रनील नाईक, मदन येरावार, डॉ. संदीप धुर्वे, डॉ. अशोक उईके, नामदेव ससाणे, संजीवरेड्डी बोदकुरवार, किशोर तिवारी आदी उपस्थित होते.

यवतमाळ हा कृषिक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांचा जिल्हा आहे, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, प्रश्न सर्वांच्या सहकार्याने सोडविण्यात येतील. अधिवेशन काळात विदर्भातील जिल्ह्यांच्या आढावा बैठकांचे नियोजन करण्यात येते, स्थानिक पातळीवर तातडीने निर्णय होण्यासाठी राज्यातील इतरही भागात जिल्हानिहाय आढावा बैठका घेण्यात येतील. अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासकीय मदतीचा निधी जिल्ह्यांना पोहोचला आहे. यवतमाळ जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 102 कोटींचे वाटप झाले असून द्वितीय टप्प्यातील 222 कोटींची मदत वाटपाची कार्यवाही तालुका स्तरावर सुरू आहे. जिल्ह्यातील अल्पसंख्याक विकासाचा निधी उपलब्ध करून देऊ, असेही ते म्हणाले.

अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान व उपाययोजना, जलसंधारणाच्या प्रकल्पांची प्रगती, जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतीतील रस्त्यांची स्थिती, दुरुस्ती व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामांची सद्यस्थिती, जिल्ह्यातील अपूर्ण जलसिंचन प्रकल्पाचा आढावा, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, कृषी पंपाचा विज पुरवठा, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ महाराष्ट्र अभियान, मुख्यमंत्री पेयजल योजना आदींबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सादरीकरण केले. यावेळी आमदारांनी सिंचन, रस्ते, अपूर्ण प्रकल्प, प्रधानमंत्री आवास योजनेचा निधी, अल्पसंख्यांकाबाबतचा निधी, शेतकऱ्यांना नियमित वीज पुरवठा करणे, खनिज विकास निधी, पैनगंगा अभ्यायारण्यातील 40 गावांतील रस्त्यांचा प्रश्न, वसंतराव नाईक स्मृती स्थळासाठी निधी, पावरग्रीडसाठी जमीन भुसंपादन, माळपठारावरील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी तोडगा काढणे आदी समस्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या.

बैठकीला मुख्य सचिवांसह विविध विभागाचे प्रधान सचिव, वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते. 00000

Funds will be given with priority

for incomplete irrigation projects in the district

– Chief Minister Uddhav Thckeray

Review meeting about developmental works in Yavatmal district

Nagpur, December 16 : Chief Minister Mr Uddhav Thackeray assured that funds will be made available with priority for completing the incomplete irrigation projects that supply water to the farm of the farmers in the Yavatmal district.

He was speaking in a meeting organized for taking stock of the Yavatmal district in the legislature hall. MLC Wajahat Mirza, Khwaja  Baig, Nilay Naik, MLA Sanjay Rathod, Indranil Naik, Madan Yerawar, Dr Sandeep Dhurve, Dr Ashok Uikey, Namdev Sasane, Sanjiv Reddy Bodkurwar, Kishor Tiwari and others were present on the occasion.

Chief Minister Thackeray further said that Yavatmal is the district of the father of Agricultural Revolution Vasantrao Naik. He said that the problems of this region will be resolved with the help of all. The review meetings are organized for the districts of Vidarbha during the legislative session and similarly such sort of meetings will be organized for other districts for taking stock of the development works. The Chief Minister also said that the financial assistance for the farmers affected by unseasonal rains has reached the district. In Yavatmal district 102rupees have been distributed in the first phase and the process for distribution of another 222 crore rupees in the second phase has begun at Taluka level.

Mr Thackeray also assured that the minority development funds will also be made available for this district. Presentation on the topics like loss due to unseasonal rain and measures to overcome it, the progress of water resources projects, the situation and repairing of roads under Zilla Parishad jurisdiction, present situation of Chief Minister gram Sadak Yojana, review of incomplete irrigation projects in the district, rehabilitation of the project affected people, electricity supply to Agricultural pumps, Prime Minister Awas Yojana, swachh Maharashtra campaign, Chief Minister peyjal Yojana was made by the Chief executive officer and care taker district magistrate Jalaj Sharma.

The members of Legislative assembly and Council presented various problems of the district including that of irrigation, roads, incomplete projects, funds for Pradhan Mantri Awas Yojana, funds for minorities, continuous power supply for farmers, mineral development funds, problem of 40villages under the PenGanga sanctuary, funds for Vasantrao Naik Memorial, acquisition of land for power grid, water problems in the plateau region etc. They demanded permanent solution for all these problems faced by the districts since long. The meeting was also attended by chief secretary and principal secretaries, senior officers of various departments.

0000

राजधानीत २१ ते २३ डिसेंबर दरम्यान ‘महाराष्ट्रीय स्नेह संवर्धक समाज’शताब्दी महोत्सव

तीन दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील सर्वात जुनी मराठी संस्था म्हणून लौकिक असलेल्या महाराष्ट्रीय स्नेह संवर्धक समाजाच्या शताब्दी वर्षानिमित्त २१ ते २३ डिसेंबर २०१९ या कालावधीत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्राची संस्कृती,परंपरा जपण्यासाठी व राज्यातील उत्सव साजरे करण्यासाठी मराठी माणसांनी मिळून राजधानी दिल्लीत १९१९ मध्ये‘महाराष्ट्र स्नेह संवर्धक समाज’या संस्थेची स्थापना केली. सांस्कृतिक,सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या या संस्थेचे यावर्षी शताब्दी वर्ष असून यानिमित्ताने शताब्दी महोत्सवात तीन दिवसांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी २१ डिसेंबर २०१९ ला पहाडगंज स्थित महाराष्ट्र रंगायन सभागृहात सायंकाळी ६.३० वाजता मुग्धा वैशंपायन आणि धनंजय म्हसकर यांच्या गायनाचा कार्यक्रम सादर होणार आहे. दिल्ली स्थित इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राचे सदस्य सचिव डॉ. सच्चिदानंद जोशी हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत.

महोत्सवात दुसऱ्या दिवशी २२ डिसेंबरला महाराष्ट्र रंगायन सभागृहात सायंकाळी ५.३० वाजता गोव्यातील मोले येथील पाईकदेव भोलानाथ संस्था निर्मित‘संगीत करवीर सौदामिनी’नाटकाचे सादरीकरण होणार आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील.

महोत्सवाच्या समारोपीय दिवशी २३ डिसेंबरला महाराष्ट्र रंगायन सभागृहात सायंकाळी ६.३० वाजता‘मैफल सुरांची आणि गप्पांची’हाप्रसिद्धअभिनेते प्रशांत दामले यांच्या गप्पांचा कार्यक्रम सादर होणार आहे. यानंतर शताब्दी वर्षानिमित्त प्रकाशित विशेष स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण व संस्थेच्या सभासदांचा सत्कार करण्यात येणार आहे.

संस्थेविषयी…

१९१९ मध्ये स्थापन झालेल्या‘महाराष्ट्र स्नेह संवर्धक समाज’या संस्थेने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातही आपले योगदान दिले आहे. व्यवसाय व नोकरीनिमित्त दिल्लीत निवासी मराठी माणसांना आपल्या पाल्यांना मराठीतून शिक्षण देता यावे म्हणून संस्थेने‘महाराष्ट्रीय शैक्षणिक,सांस्कृतिक संस्थेची’स्थापना करून पहाडगंज भागात १९२९ मध्ये नूतन मराठी प्राथमिक शाळेची स्थापना केली. आज वरिष्ठ माध्यमिक शाळेत याचे रुपांतर झाले आहे. या शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,प्रसिद्धकलाकार उत्तरा बावकर,प्रसिद्धउद्योजक अशोक शिंदे आणि ज्येष्ठ सनदी अधिकारी आनंद कुलकर्णी यांचा समावेश आहे.

विविध कामांनिमित्त तसेच पर्यटनासाठी दिल्लीत येणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेची रास्त दरात निवासी व्यवस्था व्हावी या उद्देशाने संस्थेने पहाडगंज भागात‘दिल्ली महाराष्ट्रीय समाज ट्रस्ट’ची स्थापना करून बृह्नमहाराष्ट्र हे अतिथीगृह उभारले.

‘जय महाराष्ट्र’कार्यक्रमात उद्या ‘कांदळवन संरक्षण व संवर्धन’या विषयावर मुलाखत

मुंबई,दि.16 :माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित’जय महाराष्ट्र’कार्यक्रमात‘कांदळवन संरक्षण व संवर्धन’या विषयावर कांदळवन कक्षाचे अपर मुख्य वनसंरक्षक एन. वासुदेवन यांची विशेष मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून मंगळवार दि.17डिसेंबर रोजी संध्याकाळी7.30वाजता प्रक्षेपित होणार आहे.

कांदळवनाचे महत्त्व,महाराष्ट्रातील कांदळवनाचे क्षेत्र आणि त्याची व्याप्ती,खाजगी क्षेत्रातील कांदळवन,कांदळवन कक्षामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजना,रंगीत मासे उत्पादनाबरोबर उपजीविकेचे साधन म्हणून कांदळवनांची उपयुक्तता,गेल्या तीन वर्षात राज्यात कांदळवनात लावण्यात आलेली रोपे,भारतीय वनसर्वेक्षण अहवाल2017नुसार राज्यातील कांदळवन स्थिती आणि कांदळवन पार्कया विषयांची माहिती एन. वासुदेवन यांनी‘जय महाराष्ट्र’कार्यक्रमात दिली आहे. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

इंग्रजीतील कायदे मराठीत आणणारे भाषा संचालनालय (विशेष वृत्त)

नागपूर, दि. 16 :विधिमंडळाचे सर्वात महत्त्वाचे काम असते ते कायदे करणे. विधी व न्याय विभागाच्या मदतीने राज्य शासनाने केलेल्या इंग्रजी मसुद्याच्या मराठी अनुवादाची महत्त्वाची जबाबदारी भाषा संचालनालयाची असून  विधिमंडळात सादर केले जाणारे सर्वच मसुद्यांचे मराठीकरण संचालनालय करते. नागपूर अधिवेशन काळातही शिबीर कार्यालयाच्या माध्यमातून संचालनालयाचे कार्य सुरू आहे.

राजभाषा मराठीचा वापर व विकास करण्याच्या उद्देशाने6 जुलै 1960 रोजी भाषा संचालनालयाची स्थापना करण्यात आली. शासन व्यवहारात तसेच विधी व न्याय व्यवहारात राजभाषा मराठीची वापर करण्याच्या दृष्टीने मराठी अनुवाद व परिभाषा निर्मिती  या प्रमुख जबाबदाऱ्या भाषा संचालनालय पार पाडत आहे. विशेषतः राज्यातील सर्वसामान्य जनतेला कायदे समजावेत यासाठी ते मराठी भाषेतच उपलब्ध करून द्यावेत यासाठी महाराष्ट्र राजभाषा अधिनियम, 1964 चे कलम 5 ची अंमलबजावणी करण्यात आली आहे.  त्यामुळे भाषा संचालनालयाद्वारे राज्य विधिमंडळात सादर करण्यात येत असलेली सर्व शासकीय विधेयके, राज्यपालांचे अध्यादेश यांचा मराठी व हिंदी भाषेत अनुवाद भाषा संचालनालयातर्फे केला जातो. याबरोबरच विधिमंडळात सादर केली जाणारी खर्चाची पूरक विवरणपत्रे, अर्थसंकल्पविषयक निवेदन, अर्थसंकल्पीय अंदाज व अधिक खर्चाची विवरणपत्रे, भारताचे नियंत्रक व महालेखापाल यांच्या अहवालाचेही मराठी अनुवादाचे काम संचालनालय करते. राज्यपालांच्या अभिभाषणांचे अनुवादही संचालनालयच करते.

राज्य अधिनियम, विधेयके आणि अध्यादेश मराठी भाषेत विधिमंडळात सादर करणे हे महाराष्ट्र राजभाषा अधिनियमानुसार बंधनकारक आहे. त्यामुळे अधिवेशनात मांडली जाणारी सर्व विधेयके मराठी भाषेतच मांडली जातात.  त्यामुळे प्रत्येक अधिवेशनाअगोदर जी विधेयके मांडली जाणार आहेत, त्यांचा मराठी व हिंदी अनुवाद करण्याचे महत्त्वाचे काम संचालनालय करते. त्यामुळे अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच संचालनालयाचे काम सुरू होते. त्याचबरोबर या विधेयकात विधिमंडळातील चर्चेनुसार काही बदल झाला तर तो बदल स्वीकारून नवे विधेयक मांडले तर ते त्याचेही भाषांतर तातडीने करून द्यावे लागते. संचालनालयाचे सचिव अतुल पाटणे यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक नंदा राऊत, भाषा उपसंचालक(विधि) अरूण गिते, भाषा अधिकारी (हिंदी) वि.ध. उंबरकर, सहायक भाषा संचालक (अर्थसंकल्पीय प्रकाशने) सं. पु. सैंदाणे व सहायक भाषा संचालक (विधि) व. नि. निकुंभ आदी नागपूर शिबीर कार्यालयात अनुवादाचे काम करीत आहेत.

पीएमसी बँकेच्या खातेदारांना न्याय देण्यासाठी राज्य शासन योग्य कार्यवाही करेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई,दि.15 :  पंजाब महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेच्या(पीएमसी बँकेच्या) खातेदारांना न्याय देण्यासाठी राज्य शासन योग्य ती कार्यवाही करेल, असे आश्वासन मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांनी आज दिले.

पंजाब महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेच्या खातेदारांनी आज मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी खातेदारांचे म्हणणे ऐकून घेतले आणि कार्यवाहीबद्दल आश्वस्त केले.

विधिमंडळ अधिवेशन तयारीचा सभापती, अध्यक्षांनी घेतला आढावा

नागपूर, दि. 15 : उद्यापासून सुरु होणाऱ्यामहाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळ सुरक्षा, निवास, वाहन, संपर्क, वाहतूक आदीविषयक व्यवस्थेचा आढावा विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि विधानपरिषदेच्या उपसभापती श्रीमती नीलम गोऱ्हे यांनी  आज वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतला.

विधान मंडळाच्या सभागृहात आयोजित पूर्वतयारी आढावा बैठकीस विधान मंडळाचे सचिव (कार्यभार) राजेंद्र भागवत, पोलिस सहआयुक्त रविंद्र कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता व्ही.डी.सरदेशमुख, शासकीय मुद्रणालयाचे व्यवस्थापक सुदेश मेश्राम, विधानसभेचे अवर सचिव रविंद्र जगदाळे,  विधीमंडळाचे प्रमुख सुरक्षा अधिकारी महेश चिमटे  यांच्या सह विविध  शासकीय विभागाचे प्रतिनिधी व संबधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

विधान मंडळाच्या  हिवाळी अधिवेशनानिमित्त करावयाच्या विविध कामांचा आढावा यावेळी घेण्यात आला. मागील बैठकीत चर्चा करण्यात आलेल्या बाबींवर केलेली कार्यवाही विषयक माहिती देण्यात आली. यामध्ये विधान भवन आमदार निवास व रविभवन तसेच महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून 54 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आल्याची माहिती पोलिस सहआयुक्त रविंद्र कदम यांनी दिली. तसेच मोर्चाच्या ठिकाणी पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यावर्षी 45 मोर्चाची निवेदन व 33 धरणे आंदोलनाची नोंद झालेली असून त्याठिकाणी सुरक्षा आणि इतर आवश्यक व्यवस्था करण्यात येणार असल्याचे श्री. कदम यांनी सांगितले.

रविभवन येथील मंत्र्यांचे कॉटेजेस अधिवेशनानंतर फारसे वापरात येत नाही. त्यामुळे त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी आणि कॉटेज उत्तम राहण्यासाठी ते भाड्याने देण्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना सभापती रामराजे निंबाळकर यांनी दिल्या. त्याचबरोबर पुढील काळात विधान भवन नागपूर अशी आस्थापना निर्माण करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

महिला आमदारांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या निवासस्थानी महिला सेविका आणि पर्यवेक्षक नेमावे अशी सूचना उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केली. यावेळी त्या म्हणाल्या, आमदार निवासी राहणार असणाऱ्या आणि नसणाऱ्या महिला आमदारांची नोंद घेऊन त्याच्या सहमतीने  राहत असलेल्या इतर व्यक्तीची नोंदवहीत नोंद घेण्यात यावी. त्याबरोबर अधिवेशनाच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी तैनात असणाऱ्या महिला पोलिसांना आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या सूचना श्रीमती गोऱ्हे यांनी केल्या.

विधानमंडळ परिसर, आमदार निवास, रविभवन तसेच कर्मचाऱ्यांची निवासस्थाने असलेल्या परिसरात स्वच्छतेसोबतच पाणीपुरवठ्याच्या आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. विविध कामांची गुणवत्ता सांभाळावी तसेच आमदार निवासाच्या उपाहारगृहातील खाद्यपदार्थाचा दर्जा राखण्याचेही निर्देश त्यांनी  दिले. विधिमंडळ परिसरात निर्माणाधीन असलेल्या वास्तूच्या उभारणीत विविध सुरक्षाविषयक उपाययोजनांसाठी संबंधित विभागांनी आपापसात समन्वय साधून विधिमंडळ सुरक्षेसाठी सर्वतोपरी खबरदारी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

अधिवेशन  कालावधीत अधिकृत सुरक्षा पासेसशिवाय परिसरात प्रवेश राहणार नाही. त्यामुळे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आणि संबंधितांनी सुरक्षा पास जवळ बाळगावेत. विधानभवन परिसरात सुरक्षिततेच्या दृष्टीने संपूर्ण खबरदारी घेण्यात आली असून, मुख्य प्रवेशद्वारावर डिजिटल छायाचित्र घेणारी अत्याधुनिक यंत्रणा स्थापित करण्यात आली आहे. स्कॅनर्स मशीनसुद्धा बसविण्यात आल्याची माहिती विधिमंडळ सचिवालयाचे सचिव राजेंद्र भागवत यांनी दिली.

अधिवेशन काळात विधान भवन, विधान भवनाबाहेरील परिसर, आमदार निवास, रविभवन, 160 खोल्यांचे गाळे आदी ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने अंतर्गत व बाह्य सुरक्षा चोख ठेवण्यात आली असून, गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्थासुध्दा करण्यात आल्याचे पोलिस सहआयुक्त रविंद्र कदम यांनी सांगितले.

विधान भवन, रविभवन, आमदार निवास, 160 खोल्यांचे गाळे, सुयोग पत्रकार भवन येथे वैद्यकीय सेवा सुरु करण्यात आली आहे. तसेच 211 डॉक्टर, नर्सेस यांचे वैद्यकीय पथक अधिवेशनात उपलब्ध करुन देण्यात आले असून रुग्णवाहिका उपलब्ध असणार आहे असे वैद्यकीय उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल यांनी सांगितले.

शेतकरी कर्जमुक्तीसोबतच चिंतामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरु – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

जनतेच्या आशाआकांक्षा पूर्ण करणार

नागपूर, दि. 15 : जनतेच्या आशीर्वादाने आणि पाठबळावर हे सरकार आले असून त्यांना दिलेली वचने व त्यांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करु, अशी ग्वाही देतानाच राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तच नाहीतर चिंतामुक्त करण्याच्या दिशेने वाटचाल सुरु असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले.

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रामगिरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. वित्तमंत्री जयंत पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, ग्रामविकासमंत्री छगन भुजबळ, सार्वजनिक बांधकाम (सार्व.उपक्रम वगळून) डॉ.नितीन राऊत, आमदार अशोक चव्हाण, दिवाकर रावते आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, नागपूर मध्ये मुख्यमंत्री म्हणून प्रथमच आलो आहे. राज्याच्या उपराजधानीत उद्यापासून सुरु होणाऱ्या विधीमंडळाच्या अधिवेशनापासून मुख्यमंत्री म्हणून कारकीर्द सुरु होत आहे. राज्यातल्या माता-भगिनींच्या शुभेच्छा, त्यांचे आशीर्वाद हे आमचं पाठबळ असून त्या शक्तीच्या जोरावर जनतेच्या अपेक्षा पूर्ण करु, अशी ग्वाही श्री.ठाकरे यांनी यावेळी दिली.

अधिवेशनाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यातील जनतेला त्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असून शेतकऱ्यांना कर्जमुक्तच नाहीतर चिंतामुक्त करण्याच्या दिशेने पावले टाकीत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. जनतेला दिलेली वचने पूर्ण करणार असून त्यांच्या प्रश्नांना कृतीतून उत्तरे देऊ असेही त्यांनी सांगितले. राज्यातील कुठल्याही विकासकामांना स्थगिती दिली नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

हिवाळी अधिवेशन, नागपूर-2019

प्रस्तावित विधेयकांची यादी

प्रस्तावित विधेयके

(1)     महाराष्ट्र परगणा व कुलकर्णी वतने नाहीशी करण्याबाबत महाराष्ट्र (समाजाला उपयुक्त) सेवा इनामे रद्द करण्याबाबत महाराष्ट्र विलीन प्रदेश किरकोळ वुमाला वहिवाटी नाहीशा करण्याबाबत महाराष्ट्र गावची कनिष्ठ वतने नाहीशी करण्याबाबत आणि महाराष्ट्र मुलकी पाटील (पद रद्द करणे) (सुधारणा) अध्यादेश, 2019, (महसूल व वन विभाग) (इनाम जमिनींवरल गुंठेवारी नियमाधीन करताना आकारण्यात येणारी नजराण्याची व द्रव्यदंडाची रक्कम कमी करण्याबाबत) (अध्यादेश क्रमांक 16/2019 चे रूपांतर)

(2)  महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता (सुधारणा) अध्यादेश, 2019 (ग्राम विकास विभाग)  (अधिनियमातील अनर्हतेबाबतच्या तरतुदी नगर पंचायतीच्या सदस्यांना देखील लागू होण्याकरिता सुधारणा) (अध्यादेश क्रमांक 17/2019 चे रूपांतर)

(3)  महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती (सुधारणा) अध्यादेश, 2019, (ग्राम विकास विभाग) (पीठासीन अधिकाऱ्यांची पदे एकाच वेळी रिक्त झाल्यास त्यांची कर्तव्ये चार महिन्यांहून अधिक नसेल इतक्या कालावधीकरिता देण्याची तरतूद) (अध्यादेश क्रमांक 21/2019 चे रूपांतर)

(4) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (राज्य विधानसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांमुळे विवक्षित जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व त्यांच्या विषय, समित्यांचे सभापती आणि विवक्षित पंचायत समित्यांचे सभापती व उप सभापती पदांच्या) निवडणुका तात्पुरत्या पुढे ढकलणे अध्यादेश, 2019, (ग्राम विकास विभाग) (जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व त्यांच्या विषय, समित्यांचे सभापती आणि विवक्षित पंचायत समित्यांचे सभापती व उप सभापती पदांच्या निवडणुका तात्पुरत्या पुढे ढकलणे.) (ग्राम विकास विभाग) (अध्यादेश क्रमांक 22/2019 चे रूपांतर)

(5) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (सुधारणा) अध्यादेश, 2019, (महसूल व वन विभाग) (गौण खनिजे बेकायदेशीर पणे काढल्यास व त्यांची वाहतूक करण्याकरिता वापरलेली यंत्रसामग्री व साधन सामग्री सरकार जमा करण्याचे अधिकार सर्व महसुली अधिकाऱ्यांना प्रदान करणे ) (अध्यादेश क्रमांक 24/2019 चे रूपांतर)

(6)  महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) विधेयक, 2019

(7)   महाराष्ट्रमहानगरपालिका(सुधारणा) विधेयक 2019 (महानगरपालिकांमध्ये एकसदस्यीय प्रणाली पुन्हा चालू करणे) (नगरविकास विभाग)

(8)  सन २०१९ चे विधानसभा विधेयक क्र. – महाराष्ट्र (तृतीय पुरवणी) विनियोजन विधेयक, २०१९

—–000—–

अजय जाधव/विसंअ/15.12.19 0000

Aspirations of people would be fulfilled

Farmers of the state will be debt free and also relieved from worries

– Chief Minister Uddhav Thackeray

Nagpur, December 15 :- ‘The present government is in power due to blessings of people and their support and it will try to fulfill all the expectations and aspirations of the people. The farmers of the state will not only be free from debt but they will also get respite from worries and this journey has begun’, stated Chief Minister Mr Uddhav Thackeray, here today.

He was addressing a Press Conference at Ramgiri on the eve of the beginning of the winter session of the state legislature. Finance Minister Mr Jayant Patil, revenue minister Balasaheb Thorat, Home minister Mr. Eknath Shinde, minister of industries Subhash Desai, rural development Minister Chhagan Bhujbal, Public Works Department (excluding public undertaking) Dr Nitin Raut, MLA Ashok Chavan, Diwakar Raute and other dignitaries were present on the occasion.

Speaking further, the Chief Minister Mr Thackeray said, ‘I am visiting Nagpur the first time after taking charge as chief minister and I am going to start my tenure from this second capital of the state from tomorrow onwards with the winter session.’ He also said that the blessings and compliments of mothers and sisters of the state are a great support for us and on the basis of this energy, we are going to fulfill the expectations of the common people.

 He further said that through the medium of the session, the government will try to give justice to the people of entire state and the farmers will not only be relieved from the debt but they will also shed their worries and we have begun a journey in this direction. He said that we are going to fulfill the promises given to the  people and the questions will be practical solved. No progressive works have been stayed in the state, clarified Mr Thackeray.

संदर्भ आधीच पोहोचले… 10 डिसेंबरपासून विधिमंडळ ग्रंथालयाचे काम सुरू

नागपूर,दि. 15 :  विधिमंडळाचे अधिवेशन म्हणजे राज्याच्या प्रश्नांबाबत सदस्यांना आपली मते मांडण्याचे हक्काचे आणि कायदेशीर व्यासपीठ. सदस्यांना आपले मत अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडण्यासाठी संदर्भ मिळविण्यात मदत होते ती विधिमंडळ ग्रंथालयाची. त्यामुळे सोमवार (दि.१६ डिसेंबर) पासून सुरू होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनाच्या तयारीला खऱ्या अर्थाने सुरूवात होते ती येथे सुरू होणाऱ्या ग्रंथालयाच्या कामकाजापासून. १०डिसेंबरपासूनच येथील ग्रंथालयाचे काम सुरू झाले आहे.

विधिमंडळाचे कामकाज हे नियम, प्रथा आणि परंपरेनुसार चालते. विधिमंडळात पहिल्यांदाच आलेल्या नव्या सदस्यांना यापूर्वी विधिमंडळाचे कामकाज कसे चालले,कोणत्या विषयावर अध्यक्ष,सभापतींनी काय निर्देश दिले आदी माहिती मिळविण्याचे हक्काचे स्थान म्हणजे हे ग्रंथालय आहे. मुंबईतील ग्रंथालयात लाखांहून अधिक पुस्तके आहेत. कायदे करणे हे विधिमंडळाचे महत्त्वाचे काम असल्याने कायदा या विषयाला वाहिलेलीच बहुतांश पुस्तके येथे आहेत. नागपूरच्या अधिवेशनावेळी ही सर्व पुस्तके आणणे आणि परत मुंबईला घेऊन जाणे शक्य नसल्यामुळे आवश्यक ती पुस्तके आणली जातात. विशेषतः राज्याच्या स्थापनेपासूनची विधिमंडळाची कार्यवाही उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे आपल्या पूर्वसुरींनी राज्याचा एखादा प्रश्न कसा मांडला,त्यावर काय उत्तर देण्यात आले हे विधिमंडळ सदस्यांना कळण्यास मदत होते. विधिमंडळात उच्चारलेला आणि कामकाजात घेतलेला प्रत्येक शब्द टिपला जातो आणि तो ग्रंथालयामार्फत उपलब्ध करून दिला जातो. हे ग्रंथालय केवळ विधिमंडळ सदस्यांसाठीच नाही तर विविध विभागाचे अधिकारी,कर्मचारी,पत्रकार आणि राज्यशास्त्राच्या अभ्यासकांसाठी महत्त्वपूर्ण ठरत असून विधिमंडळ ग्रंथालयाचे कामकाजातील योगदान नक्कीच मोलाचे आहे.

००००

ताज्या बातम्या

कोल्हापुरी चप्पल : देशी हस्तकलेचा अनमोल वारसा

0
भारतातील सर्वात जुन्या पारंपरिक हस्तकलांपैकी एक असलेल्या अशा कोल्हापुरी चपला आज पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या वलयात येत आहेत. त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण कारागिरीचं आकर्षण महाराष्ट्रात आणि देशात...

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आयोगाची तयारी सुरू; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

0
मुंबई, दि.२५ : भारताच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या आवश्यक प्रक्रियेसाठी भारत निवडणूक आयोगाने नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. संविधानातील अनुच्छेद ३२४ नुसार, उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचे आयोजन...

राज्यातील विकास प्रकल्पांसाठी मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीत अनेक नेत्यांच्या भेटी

0
गावांना सिमेंट रस्त्यांनी जोडणार, सांडपाणी प्रक्रिया, बांबू क्लस्टर, विदर्भात खतांचा प्रकल्प, एनसीडी स्क्रिनिंगसाठी एआय, अनेक प्रकल्पांना गती नवी दिल्ली, दि. 25 : राज्यातील विविध विकास...

प्राचार्यांचे निवृत्ती वय ६५ करण्यासाठी सकारात्मक – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा...

0
अमरावती, दि. २५ :  नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०च्या प्रभावी अंमलबजावणीत प्राध्यापक आणि प्राचार्यांची भूमिका महत्त्वपूर्ण असून, देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांनी धोरणाचे सर्व पैलू...

विदर्भ ज्ञान संस्थेला स्वायत्त विद्यापीठ दर्जासाठी सहकार्य करणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री...

0
अमरावती, दि. 25 (जिमाका) : शहराच्या हृदयस्थानी 167 एकरावर आणि साडेतीनशे विविध वनस्पती असलेल्या शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेला स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा मिळवण्यासाठी सहकार्य...