गुरूवार, ऑगस्ट 21, 2025
Home Blog Page 1881

‘मिशन इंद्रधनुष’ मोहिमेचे शंभर टक्के उद्दिष्ट साध्य करण्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांचे निर्देश

78 हजार 64 बालके आणि 11 हजार 977 गर्भवती महिलांना लसीकरणाचे नियोजन 

मुंबई, दि. 5 : राज्यात मिशन इंद्रधनुष विशेष मोहिमेचा दुसरा टप्पा सुरु झाला असून 25 जिल्हे आणि 20 महानगरपालिका क्षेत्रातील 78 हजार 64 बालके आणि 11 हजार 977 गर्भवती महिलांना लसीकरण करण्यात येणार आहे. या मोहिमेचे 100 टक्के उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे. त्याचबरोबर समाजातील विविध घटकांना, सामाजिक नेत्यांना सोबत घेऊन ही मोहीम यशस्वी करावी, असे निर्देश मुख्य सचिव अजोय मेहता यांनी दिले.

या लसीकरण मोहिमेचा आढावा घेण्यासाठी सुकाणू समितीची बैठक मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. मुख्य सचिवांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधला.

अहमदनगर, औरंगाबाद, अकोला, अमरावती, बीड, बुलढाणा,चंद्रपूर, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नंदुरबार, उस्मानाबाद, परभणी, पालघर-वसई-विरार, रायगड-पनवेल, रत्नागिरी, सातारा, सोलापूर, सिंधुदूर्ग, वर्धा, वाशिम, नाशिक-मालेगाव, ठाणे-कल्याण डोंबिवली, मिरा-भाईंदर, भिवंडी, नवी मुंबई, उल्हासनगर, बृहन्मुंबई या जिल्हा आणि महापालिका क्षेत्रांमध्ये ही मोहीम राबविण्यात येत असून 0 ते 2 वर्षे वयोगटातील बालके आणि गर्भवती महिलांचे लसीकरण केले जाणार आहे.

डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या चार महिन्यांमध्ये आठवडाभर ही मोहीम राबविण्यात येणार आहे. मोहिमेकरिता निवडलेल्या जिल्ह्यांचे सर्वेक्षण करण्यात आले असून लसीकरणापासून वंचित राहिलेली बालके आणि गर्भवती महिलांची आकडेवारी निश्चित करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्हा आणि महापालिकेला लसीकरणाचे उद्दिष्ट दिले असून त्याच्या 100टक्के पूर्ततेसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी संनियंत्रण करावे, लसीकरण झालेल्या ठिकाणी अचानक भेटी देऊन लसीकरणाची खात्री करावी, असे निर्देश मुख्य सचिवांनी यावेळी दिले.

ज्या भागात ऊसतोड अथवा अन्य कामांसाठी स्थलांतर झाले आहे. अशा स्थलांतरीत बालक आणि महिलांची यादी आरोग्य विभागाला द्यावी जेणेकरुन त्यांच्या माध्यमातून त्याठिकाणी जाऊन लसीकरण पूर्ण केले जाईल. काही भागात लसीकरणाला विरोध आहे तेथे समुदायाला विश्वासात घेऊन तसेच समाजातील मान्यवरांची मदत घेऊन लसीकरण करुन घेण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असेही मुख्य सचिवांनी सांगितले.

बैठकीस आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास, गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव संजय मुखर्जी, ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता, माहिती व जनसंपर्क विभागाचे सचिव ब्रिजेश सिंह, आरोग्य आयुक्त अनुपकूमार यादव, एकात्मिक बालविकास प्रकल्प संचालक श्रीमती इंद्रा मालो जैन, आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील, डॉ. साधना तायडे आदी उपस्थित होते.

००००

मिशन इंद्रधनुष मुहिम को 100 प्रतिशत उद्देश्य हो प्राप्त

78 हजार 64 बच्चों और 11 हजार 977 गर्भवती महिलाओं के लिए टीकाकरण की योजना मुख्य सचिव अजय मेहता

मुंबई, दि. 5: राज्य में मिशन इंद्रधनुष विशेष अभियान का दूसरा चरण शुरू हो गया है और 25 जिलों और 20 महानगरपालिका क्षेत्रों में 78 हजार 64 बच्चे और 11 हजार 977 गर्भवती महिलाओं का टीकाकरण किया जाएगा। अभियान के 100% उद्देश्य को प्राप्त करने के लिए, जिला कलेक्टर, नगर आयुक्त और जिला कार्यकारी परिषद के मुख्य कार्यकारी अधिकारियों को ध्यान देना चाहिए। वहीं, मुख्य सचिव अजय मेहता ने निर्देश दिया कि समाज के विभिन्न वर्गों और सामाजिक नेताओं को साथ लेकर अभियान को सफल बनाया जाना चाहिए। यह टीकाकरण अभियान की समीक्षा के लिए मुख्य सचिव की अध्यक्षता वाली संचालन समिति की बैठक में बोल रहे थे। मुख्य सचिव ने वीडियो कांफ्रेंसिंग के जरिए जिलाधिकारी से बातचीत की।

अहमदनगर, औरंगाबाद, अकोला, अमरावती, बीड, बुलढाणा, चंद्रपुर, गोंदिया, हिंगोली, जलगाँव, जालना, लातूर, नंदुरबार, उस्मानाबाद, परभणी, पालघर-वसई-विरार, रायगढ़-पनवेल, रत्नागिरी, सतारा, वर्धा, सोलापुर,  वाशिम, नासिक-मालेगाँव, ठाणे-कल्याण डोंबिवली, मीरा-भयंदर, भिवंडी, नवी मुंबई, उल्हासनगर, बृहन्मुंबई इन जिलों और महानगरपालिका क्षेत्रों में चल रहे अभियान में 0 से 2 वर्ष तक के बच्चों और गर्भवती महिलाओं को टीका लगाया जाएगा।

अभियान चार सप्ताह – दिसंबर, जनवरी, फरवरी और मार्च के लिए आयोजित किया जाएगा।  अभियान के लिए चयनित जिलों का सर्वेक्षण किया गया है, और टीकाकरण से वंचित बच्चों और गर्भवती महिलाओं की संख्या पर आंकड़े निर्धारित किए गए हैं।  मुख्य सचिव ने निर्देश दिया कि प्रत्येक जिले और नगरपालिका को टीके के 100% एकत्र करने के उद्देश्य से टीका लगाया जाना चाहिए, यह सुनिश्चित करने के लिए कि टीकाकरण वाले स्थान पर अचानक दौरा करके जिला कलेक्टरों को टीकाकरण सुनिश्चित किया जाना चाहिए।

ऐसे क्षेत्र जहां लोग सिंचाई या अन्य काम के लिए पलायन कर गए हैं।  ऐसे प्रवासी बच्चों और महिलाओं की सूची स्वास्थ्य विभाग को दी जानी चाहिए ताकि वे उस जगह से गुजर सकें और टीकाकरण पूरा कर सकें।  मुख्य सचिव ने यह भी कहा कि कुछ क्षेत्रों में टीकाकरण का विरोध किया जाता है वहां समुदाय के गणमान्य लोगों की मदद से समुदाय को विश्वास में लेकर जिला अधिकारियों को कुछ क्षेत्रों में टीकाकरण कराने का प्रयास करना चाहिए।

इस बैठक में स्वास्थ्य विभाग के प्रमुख सचिव डॉ. प्रदीप व्यास, गृह विभाग के प्रधान सचिव, अमिताभ गुप्ता,  वैद्यकीय शिक्षण विभाग के प्रमुख सचिव संजय मुखर्जी, ग्रामीण विकास विभाग के सचिव, असीम गुप्ता, सूचना एवं जनसंपर्क विभाग के सचिव, बृजेश सिंह, स्वास्थ्य आयुक्त अनूप कुमार यादव, एकीकृत बाल विकास परियोजना की निदेशक श्रीमती इंद्रा मालो जैन, स्वास्थ्य निदेशक डॉ. अर्चना पाटिल, डाॅ. साधना तायडे उपस्थित थीं।

००००

Mission Rainbow should be 100% successful

Vaccination  planned for 78 thousand 64 children and 11 thousand 977 pregnant women

– Chief Secretary Ajay Mehta

Mumbai, The. 5: The second phase of Mission Rainbow Special Campaign has begun in the state and 78 thousand 64 children and 11 thousand 977 pregnant women from 25 districts and 20 municipalities will be vaccinated. Chief Secretary Ajay Mehta directed that the District Collector, Municipal Commissioner and Chief Executive officers of Zilla Parishad should take a special interest in the cause to achieve the 100% objective of the campaign.  He also said that this mission should be made successful in taking the help of various social units and social leaders.

A meeting of the Sukanu committee was held under the Presidency of Chief Secretary to review the vaccination campaign. He spoke at the meeting. The Chief Secretary interacted with the District Collector through video conferencing.

This vaccination campaign is being implemented in district and municipality area of Ahmednagar, Aurangabad, Akola, Amravati, Beed, Buldhana, Chandrapur, Gondia, Hingoli, Jalgaon, Jalna, Latur, Nandurbar, Osmanabad, Parbhani, Palghar-Vasai-Virar, Raigad Panvel, Ratnagiri, Satara, Solapur, Sindh, Nashik-Malegaon, Thane-Kalyan Dombivali, Mira-Bhayander, Bhiwandi, Navi Mumbai, Ulhasnagar and Brihan Mumbai.  Children in the 0-2 age group and pregnant women will be vaccinated under this campaign.

The campaign will continue for a week in four months – December, January, February, and March. The selected districts have been surveyed for the campaign and statistics on the number of children and pregnant women deprived of vaccination have been determined. Every district and municipality has been given a vaccination aim to achieve and the Chief Secretary directed that District Collectors should monitor the campaign and visit the campaign location unannounced for its 100% success.

Areas- where the people have migrated for sugarcane cutting or other work, a list of such immigrated children and women, should be provided to the health department so that they can go to the place and complete the vaccination. The Chief Secretary also said that the District Collector should try to achieve vaccination targets by taking the help of eminent personalities in the society and winning the trust of the society where there is opposition to vaccination. 

Principal Secretary of Health Department Dr. Pradeep Vyas, Principal Secretary of Home Department Amitabh Gupta, Principal Secretary of Medical Education Department Sanjay Mukherjee, Secretary of Rural Development Department Asim Gupta, Secretary of Information and Public Relations Department Brijesh Singh, Health Commissioner Anupkumar Yadav and Director of Integrated Child Development Project Smt. Indra Malo Jain, Health Director Archana Patil, Dr. Sadhana Taide were present in the meeting.

०००० 

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या उद्योग संचालनालयाचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांची विशेष मुलाखत

मुंबई, दि. 5 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘राष्ट्रनिर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान’ या विषयावर उद्योग संचालनालयाचे विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही विशेष मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर शुक्रवार दिनांक 6 डिसेंबर 2019 रोजी संध्याकाळी 7. 30 वाजता प्रसारित होईल. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

देशाच्या जडणघडणीत डॉ. बाबासाहेबांचे योगदान, कामगार मंत्री म्हणून डॉ. बाबासाहेबांनी केलेले कार्य त्याचबरोबर औरंगाबादमध्ये झालेली तीन दिवसीय जागतिक बौध्द धम्म परिषदेची माहिती डॉ. कांबळे यांनी ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमातून दिली आहे.

कृषी व विज्ञान क्षेत्रात भरारीसाठी नव्या पिढीने सज्ज होण्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन

महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा चौतीसावा पदवीप्रदान समारंभ

अहमदनगर, दि. ५ : भारत हा कृषि प्रधान देश असून प्राचीन काळात या देशाने जगासमोर आदर्श ठेवला. तोच वारसा आपल्या सर्वांचा आहे. दुर्देवाने परकीय गुलामगिरीत आपण तो वारसा विसरलो. आता पुन्हा एकदा त्या संपन्न वारशानुसार अनुकरण करण्याची गरज आहे. कृषी, विज्ञान क्षेत्रात पुन्हा भरारी घेऊन जगाचे नेतृत्व करण्यासाठी नव्या पिढीने सज्ज झाले पाहिजे. त्यासाठी कृषि पदवीधरांनी दृढ निश्चय, अनुशासन आणि प्रामाणिक कष्ट या त्रिसुत्रीचा अवलंब केला तर यश निश्चित मिळेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा चौतीसावा पदवीप्रदान समारंभ पार पडला. त्यावेळी राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी स्नातकांना अध्यक्षस्थानावरुन मार्गदर्शन केले. व्यासपीठावर कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा, अधिष्ठाता (कृषि) डॉ. अशोक फरांदे, कुलसचिव सोपान कासार, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.दिलीप पवार याचबरोबर महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष हरिभाऊ जावळे, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य प्रकाश गजभिये,  तुषार पवार, नाथाजी चौगुले, सुनिता पाटील, डॉ.पंकजकुमार महाले, दत्तात्रय पानसरे, विभागीय वनाधिकारी कीर्ती जमदाडे, संशोधन संचालक तथा विस्तार शिक्षण संचालक डॉ.शरद गडाख आणि विद्या शाखेचे उपकुलसचिव पी.टी. सुर्यवंशी उपस्थित होते.

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, आपल्या भारताचा इतिहास हा खूप समृद्ध आहे. भारतातील छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, स्वामी विवेकानंद यांनी जगात भारताचा गौरव वाढविला. आज सर्व जग भारताकडे आशेने बघत आहे. योगाची संकल्पना ही भारताने संपूर्ण जगाला दिलेली अमुल्य अशी भेट आहे. गौरवशाली परंपरा असलेल्या आपल्या भारत देशाला अजून पुढे न्यायचे असेल तर आपल्या सर्वांना नाविन्यपूर्ण असे संशोधन करावे लागेल. हा देश शेतकऱ्यांचा आणि कृषि पदवीधरांचा आहे. कृषि पदवीधरांनी नोकरीच्या मागे न लागता नोकरी देणारे झाले पाहिजे, असे ते म्हणाले.

यावेळी त्यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आल्या. यामध्ये ५२ विद्यार्थ्यांना पीएच.डी., ३०८ विद्यार्थ्यांना पद्व्युत्तर पदवी व ४७०७ विद्यार्थ्यांना पदवी असे एकूण ५०६७ पदव्या प्रदान करण्यात आल्या. सन २०१८-१९ मध्ये बी.एस्सी. (कृषि) पदवीत प्रथम आलेल्या मोहीनी अशोक जगताप, बी.एस्सी. (उद्यान विद्या) मध्ये प्रथम आलेल्या गायत्री पांडुरंग चव्हाण, कृषि अभियांत्रिकीमध्ये प्रथम आलेला अभिजीत राजेंद्र जाधव यांना सुवर्णपदक व इतर यशस्वी विद्यार्थ्यांना पदके प्रदान करण्यात आली.

यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.के.पी.विश्वनाथा यांनी विद्यापीठाचा कृषि शिक्षण, संशोधन व विस्तार शिक्षणाचा अहवाल सादर केला. ते म्हणाले, यावर्षी विद्यापीठाने विविध पिकांचे आठ वाण, एक कृषि यंत्र व औजारे आणि एकूण  तंत्रज्ञान शिफारशी विकसित करुन शेतकऱ्यांसाठी प्रसारीत केलेल्या आहेत. विद्यापीठाने आत्तापर्यंत विविध पिकांचे 263 वाण, 36 कृषि यंत्रे व अवजारे आणि 1518 तंत्रज्ञान शिफारशी शेतकऱ्यांना दिल्या आहेत. राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्पांतर्गत अद्ययावत कृषि हवामान व जल व्यवस्थापन हा रु. 19.90 कोटीचा प्रकल्प सन 2017-18 ते 2020-21 या कालावधीकरीता मंजूर केलेला असून त्या अंतर्गत पदव्युत्तर आचार्य पदवी तसेच पदविका अभ्यासक्रम लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

पदवीप्रदान समारंभापूर्वी विद्यापीठात आगमन झाल्यानंतर राज्यपाल कोश्यारी यांनी कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रातील प्रदर्शनाला भेट देऊन विविध बाबींची माहिती घेतली.

दरम्यान, सकाळी मुंबईहून कृषी विद्यापीठाच्या हेलीपॅडवर आगमन झाल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा, जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी त्यांचे स्वागत केले.

समारंभाला विद्यापीठाचे विद्या परिषद सदस्य, माजी कुलगुरू डॉ.किसनराव लवांडे, डॉ.वेंकट मायंदे, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, कृषि संचालक कैलास कोते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप, नियंत्रक विजय कोते, विद्यापीठ अभियंता मिलिंद ढोके, कृषी भूषण सुरसिंग पवार, सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, अधिकारी, शास्त्रज्ञ, प्रगतीशील शेतकरी, विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.बापुसाहेब भाकरे आणि डॉ.आनंद सोळंके यांनी केले.

३४ ग्रामपंचायतींसाठी ९ जानेवारीला मतदान

मुंबई, दि. 5 (रा.नि.आ.) : राज्यातील विविध 8 जिल्ह्यांमधील 34 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक; तर 9 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी 9 जानेवारी 2020 रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे.

श्री.मदान यांनी सांगितले की, संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. सर्व ठिकाणी नामनिर्देशनपत्रे 19 ते 24 डिसेंबर 2019 या कालावधीत स्वीकारले जातील. शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यांची छाननी 26 डिसेंबर 2019 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 30 डिसेंबर 2019 पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान 9 जानेवारी 2020 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 10 जानेवारी 2020 रोजी होईल.

सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या :अहमदनगर- 8, नाशिक- 6, ठाणे- 2, जळगाव- 7, यवतमाळ- 4, नागपूर- 2, औरंगाबाद- 2, आणि सातारा- 3. एकूण- 34.

महाराष्ट्राला दोन ‘फ्लोरेंस नाईटिंगेल पुरस्कार’

नवी दिल्ली, दि. 5 : चंद्रपूर जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या परिचारिका छाया पाटील आणि जळगाव जिल्ह्यातील लासूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सहाय्यक आशा गजरे यांना आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय फ्लोरेंस नाईटिंगेल पुरस्काराने’ गौरविण्यात आले.

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्यावतीने येथील विज्ञान भवनात राष्ट्रीय फ्लोरेंस नाईटिंगेल पुरस्कार – 2019 चे वितरण करण्यात आले. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन, राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे आणि मंत्रालयाच्या सचिव प्रीती सुदान यावेळी मंचावर उपस्थित होत्या.

या समारंभात देशभरातील एकूण 35 परिचारिका, परिचारिका सहाय्यक आणि महिला आरोग्य सहायकांना आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी गौरविण्यात आले. केरळ मधील कोझीकोड येथील परिचारिका लिनी साजीश यांना मरणोत्तर हा पुरस्कार जाहीर झाला, त्यांच्या पतीने हा पुरस्कार स्वीकारला. महाराष्ट्रातून चंद्रपूर जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या परिचारिका छाया पाटील आणि जळगाव जिल्ह्यातील लासूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सहाय्यक आशा गजरे यांना या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

चंद्रपूर जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या परिचारिका छाया पाटील या गेल्या 29 वर्षांपासून आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी जिल्ह्यातील आदिवासी भागांमध्ये 17 वर्ष सेवा दिली तर 10 वर्ष त्या शहरी भागातील आरोग्य सेवेते कार्यरत होत्या. चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी व नक्षलप्रभावीत भागांमध्ये पायी तर कधी सायकलवर प्रवास करून त्यांनी लसीकरण कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केली. श्रीमती पाटील यांनी कुटुंब नियोजन कार्यक्रम, मलेरिया लसीकरण, रूग्णालयांमध्ये प्रसुतीसाठी प्रोत्साहन देणे आदी केंद्र शासनाच्या महत्त्वपूर्ण आरोग्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीत सक्रिय सहभाग घेवून उल्लेखनीय काम केले आहे. वर्ष 2015-16 मध्ये महाराष्ट्र राज्याच्या लसीकरण अभियानात श्रीमती पाटील यांनी महत्त्वपूर्ण भूमिका वठवली आहे. तसेच, 1991-92 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात साथीचे रोग नियंत्रण करण्यासाठी राबविण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात श्रीमती पाटील यांनी उल्लेखनीय कार्य केले. आरोग्य क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आज सन्मानित करण्यात आले.

जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील लासूर प्राथमिक केंद्रातील आरोग्य सहाय्यक आशा गजरे या गेल्या 33 वर्षांपासून आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी सर्वाधिक 28 वर्ष शहरी भागात तर 5 वर्षे आदिवासी भागात आरोग्य सेवा प्रदान केली. श्रीमती गजरे यांनी कुष्ठरोग नियत्रंण कार्यक्रम, क्षयरोग, मनोविकार, संसर्गजन्य रोग, लसीकरण आदी केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी आरोग्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांनी कौशल्य विकासासाठी विविध प्रशिक्षणही पूर्ण केले आहे. लासूर प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांनी एमएमआर (गालगुंड, गोवर, रुबेला लसीकरण कार्यक्रमाद्वारे) शून्य टक्क्यांवर आणला तर नवजात बालकांच्या मृत्युदरावर नियंत्रण आणले. श्रीमती गजरे यांचे आरोग्य सेवेप्रती समर्पण व उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

स्टार्टअपस्‌ना पाठबळ देण्यासाठी मायक्रोसॉफ्टचा उपक्रम

मुंबई, दि. 5 : राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या सहकार्याने ‘मायक्रोसॉफ्ट फॉर स्टार्टअपस्’ ने 17 डिसेंबर, 2019 रोजी पुण्यात कॉलेज ऑफ इंजिनिअरींग येथे ‘हायवे टू अ हंड्रेड युनिकॉर्न’ हा उपक्रम आयोजित केला आहे.

या कार्यक्रमात स्टार्टअप असणारे उद्योजक आणि व्यावसायिक सहभागी होऊ शकतील. कार्यशाळेत सहभागी होणाऱ्यांना अज़्यूर, मशीन लर्निंग व अर्टिफिशियल इंटेलिजेंस याबाबत मार्गदर्शन मिळेल. युनिकॉर्न बनण्यासाठी इच्छुक असलेल्या स्टार्टअपना https://aka.ms/H2100-pune वेबसाईटवर अर्ज करता येतील.

नवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी स्टार्टअपना मदत करण्याकरिता मायक्रोसॉफ्टने ‘हायवे टू अ हंड्रेड युनिकॉर्न’ ही कार्यक्रम मालिका सुरु केली आहे. यामुळे स्टार्टअपसना आंतरराष्ट्रीय स्तरावरील ग्राहकांपर्यंत पोहचविण्यास मदत होईल.

महाराष्ट्रातील स्टार्टअपनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक यांनी केले आहे. महाराष्ट्र हे देशात स्टार्टअपबाबत आघाडीवर आहे.

मायक्रोसॉफ्टचा हा उपक्रम राज्यातील स्टार्टअपना चांगली संधी असल्याचे महाराष्ट्र राज्य नाविन्यता संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेन्द्र सिंह कुशवाह यांनी सांगितले. मायक्रोसॉफ्ट उपक्रमाच्या भारताच्या प्रमुख श्रीमती लतिका पै यांनी या उपक्रमाद्वारे नवनिर्मिती करणाऱ्या स्टार्टअप उपक्रमाद्वारे भारतात पहिल्यांदाच संवाद साधला जात असल्याचे सांगितले.

पोषण अभियानांतर्गत महाराष्ट्राला ५६६ कोटींचा निधी

                

नवी दिल्ली, दि.५ : केंद्र शासनाच्या पोषण अभियानांतर्गत महाराष्ट्राला गेल्या अडीच वर्षात५६६ कोटी २३ लाख हजारांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.

केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाच्यावतीने देशातील अंगणवाड्यांमध्ये पूरक पोषण आहार देऊन कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने‘पोषण अभियानराबविण्यात येत आहे. देशातील ३७ राज्य व केंद्रशासीत प्रदेशांमध्ये या अभियानांतर्गत गेल्या अडीच वर्षात  एकूण४ हजार २२३ कोटी ९० लाख ३९ हजार रूपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षात केंद्राने राज्यांना वितरीत केलेल्या निधीमध्ये मागील दोन वर्षांच्या तुलनेत ९५० कोटींनी वाढ झाली आहे.

महाराष्ट्राला चालू आर्थिक वर्षात३३० कोटी  

महाराष्ट्राला पोषण अभियानांतर्गत चालू आर्थिक वर्ष २०१९-२० दरम्यान आतापर्यंत ३३० कोटी ६१ लाख ४७ हजार रूपयांचा निधी वितरीत झाला आहे. राज्याला वर्ष २०१७-१८ आणि २०१८-१९ या मागील दोन आर्थिक वर्षात एकूण २३५ कोटी ६१ लाख ५९ हजार रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.    

         

वर्ष२०१७-१८ ते २०१८-१९ या मागील दोन आर्थिक वर्षात देशातील ३राज्य व केंद्रशासीत प्रदेशांमध्ये या पोषण अभियानांतर्गत हजार १४० कोटी ४७ लाख ९५ हजारांचा निधी वितरीत करण्यात आला.

तर चालू आर्थिक वर्ष २०१९-२० दरम्यान आतापर्यंत हजार ८३ कोटी ४२ लाख ४४ हजारांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.

केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

सर्वांसाठी घरे, झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी एकच नियोजन प्राधिकरण नेमण्याचा विचार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबई, दि. ५ : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांचा तसेच मुंबई २०३० अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांचा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला. झोपडपट्टीमुक्त मुंबई करण्यासाठी सर्वांसाठी घरे मिळावीत, यासाठी एकच नियोजन प्राधिकरण नेमण्यासंदर्भात तसेच परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी नियमांमध्ये शिथिलता आणणे आदी विविध विषयांवरही यावेळी चर्चा झाली.

बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये आज झालेल्या आढावा बैठकीत महापालिकेच्या आवश्यक प्रकल्पांसाठी आर्थिक स्वावलंबन, बदलत्या हवामानास तोंड देण्यासाठी तयारी, पुराचे पाणी वाहून जाण्यासाठी भुयारी टनेल बांधणे, नागरिकांच्या तक्रारीसंदर्भात महापालिकेने केलेली कार्यवाही, बेस्टची व्यवस्था, खड्डेमुक्त रस्त्यासंदर्भातील कार्यवाही, आदींबाबत सादरीकरण करण्यात आले. तसेच गारगाई धरण प्रकल्प, मुंबई मलनिःस्सारण प्रकल्प, मुंबई किनारा रस्ता प्रकल्प, गोरेगाव मुलुंड लिंक रोड, बेस्टच्या अर्थसहाय्यासाठी विद्युत निर्मिती प्रकल्प या पालिकेच्या नियोजित प्रकल्पांबद्दलही यावेळी चर्चा झाली. महापालिका आयुक्त प्रविण परदेशी यांनी सादरीकरण केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील. तसेच परवडणारी घरे बांधण्यासाठी झोपडपट्टी प्राधिकरण, महापालिका, म्हाडा, नगर विकास अशा विविध यंत्रणा काम करत आहेत. याऐवजी मुंबईसाठी एकच प्राधिकरण करण्यासंदर्भात विचार करण्यात येईल. मुंबईच्या जनतेला पिण्याचे स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा, यासाठी जुने पाईपलाईन बदलण्याची गरज आहे. स्ट्रिट फर्निशिंग अंतर्गत मुंबईतील रस्त्यांवरील चिन्हेही एकसमान असावीत. तसेच रस्त्यांची, मंडईची रचना एकसमान करता येईल का याबद्दलही विचार करण्यात यावा.

पश्चिम व पूर्व द्रुतगती मार्गाच्या उड्डाण पुलाखालील जागांची स्वच्छता करण्यात यावी. याठिकाणी सार्वजनिक शौचालये उभारावीत अथवा त्या जागांचे सौंदर्यीकरण करावे, अशा सूचनाही मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी यावेळी केल्या. पर्यटन वाढीसाठी विविध उपाययोजनांवरही यावेळी चर्चा झाली.

मंत्री जयंत पाटील यांनी मुंबईतील रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याची सूचना यावेळी केली.

या बैठकीस मंत्री जयंत पाटील, महापौर किशोरी पेडणेकर, आमदार आदित्य ठाकरे, मुख्य सचिव अजोय मेहता, महानगरपालिका आयुक्त प्रवीण परदेशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, सभागृहनेत्या विशाखा राऊत, आरोग्य समिती अध्यक्ष अमय घोले यांच्यासह राज्य शासनाचे तसेच महानगरपालिकेचे विविध अधिकारी उपस्थित होते.

महानगरपालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, पाणीपुरवठा आदी विषयांवरील चित्रफितीचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. तसेच या चित्रफितीमध्ये काम केलेल्या महापालिका कर्मचाऱ्याचा मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ०००

सभी को आवास और झोपड़ीमुक्त मुंबई के लिएएकही नियोजन प्राधिकरणका विचार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

बीएमसी के विभिन्न परियोजनाओं का जायजा

मुंबई, दिसंबर 5: बृहन्मुंबई महानगर निगम की विभिन्न परियोजनाओं तथा मुंबई 2030 अंतर्गत किए जाने वाले कार्यों का आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने जायजा लिया. मुंबई को झुग्गी- झोपड़ियों से मुक्त करने हेतु सभी के लिए आवास निर्माण करने की तथा इसके लिए एक ही नियोजन प्राधिकरण गठित करने की और विभिन्न नियमों में रिहाई देने के विषय पर भी इस समय चर्चा की गई.

बृहन्मुंबई महानगर निगम की आज संपन्न हुई जाएजा बैठक में महानगर निगम की आवश्यक परियोजनाओं को आर्थिक स्वावलंबन बनाने, परिवर्तित मौसम का मुकाबला करने की तैयारी, बाढ़ का पानी बहने के लिए भूमिगत टनल का निर्माण, नागरिकों की शिकायतों पर महानगर निगम की ओर से की गई कार्रवाई, बेस्ट का प्रबंधन, शहर को गड्ढो से मुक्त रखने को लेकर हुई कार्रवाई आदि विषयों पर प्रस्तुतीकरण किया गया. साथ ही गारगाई बांध परियोजना, मुंबई मल:निसरण परियोजना, मुंबई किनारा रस्ता परियोजना, गुडगाँव- मुलुंड लिंक रोड की आर्थिक सहायता के लिए बिजली निर्माण परियोजना जैसे महत्वपूर्ण मुद्दों पर इस समय चर्चा की गई. महानगर निगम आयुक्त प्रवीण परदेसी ने प्रस्तुतीकरण किया.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने कहा कि झोपड़पट्टी मुक्त मुंबई का सपना साकार करने के लिए कुछ महत्वपूर्ण निर्णय लेने होंगे और साथ ही झोपड़पट्टी प्राधिकरण, महानगर निगम, म्हाडा नगर विकास जैसे सस्ते घर निर्माण करने वाले सभी प्राधिकरणों को इकट्ठा कर केवल एक प्राधिकरण बनाने पर विचार-विमर्श किया जाएगा. उन्होंने कहा कि मुंबई की जनता को पीने का साफ पानी उपलब्ध आने के लिए जुनी पाइप लाइन बदलनी होगी. स्ट्रीट फर्निशिंग के तहत मुंबई के रास्तों पर लगे चिह्न को एक समान बनाना तथा रस्ते और मंडी की रचना को भी एक जैसा करने पर विचार मंथन करने की बात माननीय मुख्यमंत्री ने कही.

पश्चिम एवं पूर्व एक्सप्रेस वे पर निर्मित उड़ान फूलों के नीचे साफ़ सफाई करने का सुझाव भी मुख्यमंत्री ने दिया. इस स्थान पर सार्वजनिक शौचालय का निर्माण अथवा सौंदर्यीकरण करने की सूचना उन्होंने दी. श्री ठाकरे ने पर्यटन की वृद्धि के लिए विभिन्न उपायों पर भी चर्चा की. मंत्री जयंत पाटील ने मुंबई के रास्तों में सुधार लाने के लिए नई प्रौद्योगिकी का उपयोग करने की सूचना दी.

इस बैठक में मंत्री जयंत पाटील, महापौर किशोरी पेड्नेकर, विधायक आदित्य ठाकरे, मुख्य सचिव अजोय मेहता, महानगर निगम आयुक्त प्रवीण परदेसी, सार्वजनिक निर्माण विभाग के अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सोनी, एम एम आर डी ए महानगर आयुक्त आर ए राजीव, नगर विकास विभाग के अतिरिक्त मुख्य सचिव नितिन करीर, कौशल्य विकास विभाग के प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, स्थाई समिति के सभापति यशवंत जाधव, सभागृह के नेता विशाखा राउत, स्वास्थ्य समिति के अध्यक्ष अमे घोले सहित राज्य सरकार तथा महानगर निगम के अधिकारी उपस्थित थे.

महानगर निगम की ओर से तैयार किए गए स्वास्थ्य, शिक्षा, स्वछता, जलापूर्ति जैसे विषयों पर बनाई गई डॉक्यूमेंट्री का विमोचन किया गया. साथ ही इस में काम करने वाले महानगर निगम के कर्मचारियो को मुख्यमंत्री महोदय के हाथों सम्मानित किया गया.

००००

Think to appoint Single Planning Authority for

the Homes for all and Slum-free Mumbai

 Chief Minister Uddhav Thackeray

Reviewed various projects of BMC

Mumbai, December 5:- Chief Minister Mr Uddhav Thackeray today took a review of various projects of Municipal Corporation of Greater Mumbai (MCGM) including the proposed work to be done under Mumbai 2030 program. The chief minister discussed on various topics including slum-free Mumbai and providing homes for all. He suggested that only one single planning authority should be appointed for the cause and rules should be relaxed.

The meeting held today at the MCGM discussed and revived various topics of the Municipal Corporation. The presentation including financial independence, preparation for facing the changing climate, construction of sub-way tunnel for carrying flood water, action initiated by the Civic body on complaints of citizens, action related to pothole free roads and other subjects. The canal project, Mumbai sanitation project, Mumbai Coastal Road project, Goregaon- Mulund Link Road, electricity generating project for financial assistance of BEST were also discussed in the meeting. Commissioner of Municipal Corporation Praveen Pardeshi made a presentation.

Speaking on the occasion Chief Minister Mr Uddhav Thackeray said that taking policy decisions for making Mumbai free from the clutches of slum is extremely necessary. He said that various authorities like slum authority, Municipal Corporation, MHADA, Urban Development are working for construction of affordable houses but one single authority should be constituted and measures should be taken to chalk out the modalities in this direction. He said that in order to give clean and pure water to the citizens of Mumbai, the old pipeline is required to be replaced. He also said that under the street Furnishing, all the symbols on Mumbai road should be made uniform. Similarly, the design of roads and market may also be made to look similar.

Mr Thackeray also said that the space beneath the flyover on west and east highway should be cleaned. He suggested that either public toilet should be erected in this place, or it should be beautified. Discussions on various options for attracting tourism, was also held during the meet. Minister Jayant Patil suggested using of new technology for ameliorating the roads in Mumbai.

Mr Jayant Patil, mayor Kishori Pednekar, MLA Aditya Thackeray, chief secretary Ajoy Mehta, commissioner of Municipal Corporation Praveen Pardeshi, additional chief secretary of Public Works Department Manoj Saunik, Commissioner of MMRDA R A Rajeev, additional chief secretary of Urban Development department Nitin Kareer, principal secretary of skill development department Manisha Mhaiskar, chief of standing committee Yashwant Jadhav, house leader Visakha Raut, chief of health committee Amay Ghole and officers of State Government and Municipal corporations were present on the occasion.

The audio-visual documentary prepared on various issues including health, education, cleanliness and water supply by the Municipal Corporation was also released on the occasion. All the employees of Municipal Corporation who played various roles in this documentary, were also felicitated by the hands of Chief Minister Mr Uddhav Thackeray.

००००

मुंबई उपनगरात सतरा लाखांचे अवैध विदेशी मद्य जप्त

मुंबई, दि. ५ : राज्य उत्पादन शुल्क विभाग, मुंबई उपनगर अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई उपनगरातील साकीनाका व काळबादेवी परिसरातील १७ लाख रुपयांचे अवैध विदेशी मद्य जप्त करण्यात आले असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे.

चांदिवली येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकाच्या समोर रस्त्यावर, साकीनाका, याठिकाणी एका इसमास 06 X 1000 मि.ली ब्लॅक लेबल बनावट मद्याची वाहतूक करीत असताना अटक करण्यात आली. तपासात त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे एच.डी.05, शर्मा कंम्पाऊंड सिद्धीविनायक सोसायटीच्यासमोर मोहली व्हीलेज लक्ष्मीनारायण मंदिर रोड साकीनाका या ठिकाणी छापा टाकून 71 X 1000 मि.ली. बनावट विदेशी मद्याच्या विविध ब्रॅण्डच्या तयार बाटल्या, भारतीय बनावटीचे विदेशी मद्य, बनावट बुचे, मोनो कार्टुन विदेशी मद्याच्या विविध ब्रॅण्डच्या रिकाम्या बाटल्या, पॅकींगसाहित्य, फनेल, टोचा, ड्रायर मशीन इत्यादी वस्तू जप्त करण्यात आल्या.

या ठिकाणी उपस्थित राहुल प्रल्हाद परमार, वय 24 वर्षे व या इसमास मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 65 (अ), (ब), (क), (ड), (ई) 81, 83, 108 अन्वये अटक करण्यात आलेली असून या गुन्ह्यातील एकूण मुद्देमालाची किंमत 12 लाख 67 हजार 870 एवढी आहे.

तसेच दुसऱ्या कारवाई अंतर्गत सांताक्रुझ (पू.) येथून पाठलाग करुन ओम साई कार्गो फॉरवर्डस मल्हारराव वाडी, दारीसेठ अग्यारी लेन काळबादेवी रोड, येथे रमनिकलाल भुरालाल शाह, वय 56 वर्षे, यास 6 X 1000 मि.ली. ब्लॅक लेबल विदेशी मद्य व ब्लॅक लेबल विदेशी मद्य ब्रॅण्डचे 1000 बनावट बुचे (कॅपसह) मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 65(ई), (अ) 108 अन्वये अटक करुन रुपये 4 लाख 61 हजार 500 एवढ्या किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. उपरोक्त दोन्ही कारवाईत मिळून एकूण अंदाजे किंमत रु. 17 लाख 29 हजार 370 एवढ्या किंमतीचा दारुबंदी गुन्ह्यांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

मद्य तस्कर व भेसळ

या गुन्ह्यामध्ये विदेशी मद्याच्या विविध ब्रॅण्डच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये हलक्या प्रतीचे भारतीय बनावटीचे विदेशी मद्य भरुन त्यास बनावट बुचाच्या सहाय्याने सिलबंद केले जाते व हे बनावट मद्य उच्चभ्रु वस्तीतील गिऱ्हाईकांना ड्युटी फ्री शॉपचे मद्य आहे असे सांगुन विक्री केली जाते. डिसेंबर महिन्यामध्ये नाताळ व नविन वर्ष या पार्श्वभूमीवर राज्याच्या सीमेलगत गोवा, दिव-दमण, दादरानगर हवेली (सिल्वासा) येथून हलक्या प्रतीचे उत्पादन शुल्क बुडवुन आणलेले मद्य, बनावट मद्य, अवैध हातभट्टी गावठी दारु, स्पिरीट, ड्युटी फ्री मद्य, याचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होतो.

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांच्या आदेशान्वये राज्यात अवैध मद्य व्यापार विरोधात मोठी मोहीम सुरु करण्यात आलेली आहे. विभागाच्या संचालक श्रीमती उषा वर्मा, विभागीय उपआयुक्त कोकण विभाग सुनील चव्हाण व उपनगर अधीक्षक श्रीमती स्नेहलता श्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगरचे निरीक्षक जे.एम.खिल्लारे व श्री.माळवे, दुय्यम निरीक्षक सर्वश्री गोसावी, कोळी तसेच जवान सर्वश्री शिवापुरकर, होलम, पिसाळ, सोनटक्के, काळोख, कसबे, महिला जवान श्रीमती गाडीलकर या पथकाने ही कामगिरी केली आहे.

इंदू मिल येथील डॉ.बाबासाहेबांचे नियोजित स्मारक जगाला प्रेरणा देणारे ठरेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. 5 : दादर येथील इंदू मिलच्या जागेवर राज्य शासनाच्यावतीने उभारण्यात येणारे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक जगाला अन्यायाविरुद्ध तसेच विषमतेविरुद्ध लढण्यासाठी प्रेरणा देणारे ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन करताना दिलेल्या संदेशात श्री.ठाकरे म्हणतात, डॉ. बाबासाहेबांनी विषमतेविरुद्ध लढा पुकारला, त्यांचे जीवन हे धगधगते अग्निकुंड होते. माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी लढा उभारला. इंदू मिल येथील नियोजित स्मारक त्यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करणारे आगळेवेगळे स्मारक ठरेल. अन्यायग्रस्त, वंचित, आयुष्याची लढाई हरलेल्या माणसाला विषमतेविरुद्ध आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची तसेच जिंकण्याची प्रेरणा या स्मारकातून मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

हे सरकार सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे. बाबासाहेबांनी दिलेला समतेचा, न्याय आणि बंधुतेचा विचारांच्या दिशेने शासनाची वाटचाल राहील. त्यांना अभिप्रेत असलेली लोकशाही प्रणाली अस्तित्वात यावी आणि सामान्य माणसाचे जीवन सुसह्य व्हावे, त्याला त्याचे हक्क मिळावे यासाठी शासन प्रयत्नशील राहील.

या कार्यासाठी प्रेरणादायी ठरणारे इंदू मिल येथील स्मारकाचे काम पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर येणारे नागरिक आणि भीमसैनिकांचे त्यांनी स्वागत केले आहे.

००००

विश्व के लिए प्रेरणादायी साबित होगाइंदू मिल स्थित डॉ. बाबासाहब का नियोजित स्मारक- मुख्यमंत्री

मुंबई, दि. 5 : दादर स्थित इंदू मिल की जगह पर राज्य सरकार की ओर से बनाए जा रहे भारतरत्न डॉ. बाबासाहब आंबेडकर का अंतरराष्ट्रीय स्मारक विश्व को अन्याय एवं विषमता के खिलाफ लड़ने के लिए प्रेरणादायी साबित होगा, यह विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने व्यक्त किया।

भारतरत्न डॉ. बाबासाहब आंबेडकर के महापरिनिर्वाण दिन के उपलक्ष्य में उनकी स्मृति को अभिवादन करते हुए दिए गए संदेश में श्री. ठाकरे ने कहा कि डॉ. बाबासाहब ने विषमता के खिलाफ आवाज उठाई, एक प्रकार से उनका जीवन ही ज्वाला था। मनुष्य को जीवन जीने का अधिकार दिलाने के लिए वे लड़े। इंदू मिल स्थित नियोजित स्मारक उनके विचारों का प्रचार एवं प्रसार का एक अनोखा स्मारक साबित होगा।

अन्यायग्रस्त, वंचित, अपने जीवन से हार गए ऐसे मनुष्य को विषमता एवं अन्याय के खिलाफ लड़ने एवं जीतने की प्रेरणा इस स्मारक से ही मिलेगी, यह विश्वास मुख्यमंत्री ने इस दौरान व्यक्त किया।

उन्होंने कहा कि यह सरकार आम जनता की सरकार है। बाबासाहव ने दिए हुए समता, न्याय और बंधुता के विचारों से सरकार की दिशा होगी। उन्हें अभिप्रेत ऐसी लोकशाही प्रणाली अस्तित्व में आए और आम लोगों का जीवन सुसह्य हो, उन्हें उनका हक मिले, इसके लिए यह सरकार हमेशा प्रयासरत रहेगी।

मुख्यमंत्री ने इस कार्य के लिए प्रेरणादायी ऐसी इंदू मिल स्थित स्मारक का काम पूरा किया जाएगा, यह ग्वाही भी दी। महापरिनिर्वाण दिन के अवसर पर चैत्यभूमि पर आनेवाले नागरिक और भीमसैनिकों का उन्होंने स्वागत भी किया है।

००००

Monument of Dr. Babasaheb Ambedka at Indu Millwill be the inspiration for the world

– Chief Minister

Mumbai, Dec 5:“This international monument of Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar, erected on behalf of the state government at the site of Indu Mill in Dadar, will inspire the world to fight against injustice and inequality”said Chief Minister Uddhav Thackeray.

He was speaking while offering salutation to Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar on the occasion of Mahaparinirvana day.

Mr. Thackeray further stated that Dr. Babasaheb fought against inequality. His life was nothing but a blazing fire. He called a big fight to gain the right to live as a human. The planned monument of Dr. Ambedkar at Indu Mill would be helpful to promote his thoughts and policies. This monument would inspire the unjust and deprived to fight against the odds and injustice.

“This is the government of the general public. This government will proceed towards the ideas of equality, justice and brotherhood given by Babasaheb. We will strive to ensure that the democratic system that Babasaheb was intending to exist in and to ensure that the common man’s life will be comfortable and public will get their all rights”said honorable Chief Minister.

The Chief Minister also said that the monuments at Indu Mill would be completed. This monument would give inspiration to government to follow the direction shown by Dr. Babasaheb Ambedkar. He welcomed all Bhimsainik and the people who came to the Chaityabhoomi on the occasion of Mahaparinirvana Day.

००००

ताज्या बातम्या

जीआय नामांकन प्राप्त पिकांच्या पॅकेजींग व ब्रँडींगसाठी मदत करण्यास शासन सकारात्मक फलोत्पादन मंत्री –...

0
पुणे दि.२१ : राज्यामध्ये उत्पादित होत असलेल्या फळ पिकाची निर्यात वाढविण्यासाठी फळ पिकाचे क्लस्टर वाढवावेत तसेच जीआय नामांकन प्राप्त पिकांच्या पॅकेजींग व ब्रँडींगसाठी मदत...

पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडून पूरग्रस्तांसाठी तातडीने मदत साहित्य उपलब्ध

0
नांदेड दि. २१ ऑगस्ट : जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी तातडीने औषधे व जीवनोपयोगी साहित्य उपलब्ध करून दिले आहे. शासनासह विविध...

मुख्यमंत्री सहायता निधीमुळे दुर्धर आजारांवर झाला उपचार

0
आता जिल्ह्यातच मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष यवतमाळ, दि.२१ (जिमाका) : मुख्यमंत्री सहायता निधी अनेक रुग्णांसाठी आधार ठरला आहे. जिल्ह्यात योजनेचा कक्ष सुरु झाल्यापासून हा निधी...

महानगरपालिकेच्या आरोग्य वर्धिनी केंद्राची विभागीय आयुक्तांकडून पाहणी

0
अमरावती, (दि. २१ ऑगस्ट) : विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी आज महानगरपालिकेच्या रहाटगाव येथील आरोग्य वर्धिनी केंद्राला भेट देऊन तेथील आरोग्य सेवा-सुविधांचा सखोल आढावा...

जिल्ह्यात औद्योगिक विकासासाठी सदैव कटिबद्ध – मंत्री छगन भुजबळ

0
नाशिक, दि. २१ ऑगस्ट, (जिमाका वृत्तसेवा): नाशिक जिल्ह्यात नवीन मोठ्या उद्योगांसह मोठे प्रकल्प येण्यासाठी  पोषक वातावरण असून औद्योगिक विकासासाठी सदैव सकारात्मक व कटिबद्ध आहे,...