शनिवार, एप्रिल 19, 2025
Home Blog Page 1614

नेदरलँड्सच्या शाही दांपत्याचे राजभवन येथे स्वागत

मुंबई, दि. 17 : नेदरलँड्सचे राजे विलेम-अलेक्झांडर आणि राणी मॅक्सिमा  यांनी आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.  यावेळी शासनाच्या वतीने राज्यपालांनी शाही दांपत्याचे स्वागत केले.

नेदरलँडमध्ये अनेक भारतीय वंशाचे लोक राहत असून तेथील उद्योग,माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात योगदान देत असल्याचे राजे विलेम-अलेक्झांडर यांनी सांगितले. भारतीय योग नेदरलँडमध्ये अतिशय लोकप्रिय असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कृषी व फलोत्पादन  पायाभूत सुविधा,जागतिक पर्यावरणातील बदल,सांस्कृतिक संबंध या विषयांवर चर्चा झाली.

महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी देशातील सर्वांत पसंतीचे राज्य असल्याचे राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी यावेळी सांगितले.

बैठकीनंतर राज्यपालांनी  शाही दांपत्याला राजभवन परिसराची सैर करविली. ०००००

King Willem – Alexander and Queen Maxima of Netherlands meet Maharashtra Governor

Mumbai dated 17:King Willem-Alexander and Queen Maxima of the Netherlands met the Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari at the Governor’s sea-side residence Raj Bhavan in Mumbai on Thursday (17th Oct).

King Willem – Alexander told the Governor India and Netherlands have shared a long history of trade and cooperation. He said many Indian companies, especially those from the Information Technology sector are  operating from the Netherlands.

The King said Netherland has a large population of Indian expats who are making handsome contribution to the economy of his country.

Issues of mutual cooperation in the areas of agriculture, horticulture, water and sanitation and climate change were discussed during the meeting. The King and Queen of the Netherlands were accompanied by a high level delegation.

The Governor told the royal dignitaries that Maharashtra is the most investment – friendly destination in the country offering avenues of cooperation in several areas.

The Royal visitors are currently on a State visit to India on the invitation of President of India Ram Nath Kovind. They were accompanied by the Dutch Minister of Foreign Affairs Stef Blok and a high level official delegation.

Information provided by the Consulate of the Netherlands in Mumbai

His Majesty King Willem-Alexander and Her Majesty Queen Máxima are in the Republic of India for a State Visit at the invitation of President Ram Nath Kovind. The visit is taking place from14to18October, and includes the cities of New Delhi, Mumbai and the state of Kerala. The State Visit is set to reaffirm the excellent relations between India and the Netherlands. It will focus on key sectors like water technology, maritime development, healthcare, sustainable agriculture, social initiatives & cultural heritage. The King and Queen will be accompanied on their visit by Stef Blok, Minister of Foreign Affairs & the Minister for Foreign Trade and Development Cooperation, Sigrid Kaag depending on the programs. The State Visit will have a broad parallel trade mission to India which is set to explore potential for further economic partnerships between both countries. Also visiting with the trade mission are the Minister for Healthcare, Bruno Bruins, and the State Secretary for Economic Affairs and Climate Policy, Mona Keijzer.

००००

जिल्हास्तरीय युवा महोत्सवासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

मुंबई,दि. 17 : मुंबई उपनगर जिल्ह्यातील कलाकारांना व्यासपीठ मिळावे व त्यांच्या कलागुणांना वाव मिळावाए यासाठी मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने नोव्हेंबर  महिन्यात  जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व शाळा- कॉलेजमधील इच्छुक कलावंत स्पर्धकांनी जास्तीत जास्त संख्येने या युवा महोत्सवाच्या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. ही स्पर्धा १५ ते २९ वयोगटातील कलाकारांसाठी आहे.

लोकनृत्य, लोकगीत,एकांकिका, शास्त्रीय गायन, शास्त्रीय संगीत, सितार, गिटार, बासरी, तबला, वीणा, मृदुंग, हार्मोनियम, शास्त्रीय नृत्य, मणीपूरी, ओडिसी, भरतनाट्यम, कथ्थक, कुचीपुडी, वक्तृत्व यात सहभागी होणाऱ्या कलावंतांनी 15नोव्हेंबर 2019 पर्यंत आपल्या प्रवेशिका dsomumbaisub@gmail.com या ईमेलवर पाठवाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

मुंबई, दि. 17 – महाराष्ट्र विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. अधिकाधिक मतदान व्हावे, यासाठी मतदार जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. लोकशाहीच्या या महाउत्सवाच्या तयारीवर एक दृष्टीक्षेप…

एकूण मतदार

·      महाराष्ट्रात पुरुष, महिला, तृतीयपंथी, दिव्यांग असे एकूण 8 कोटी 98 लाख 39 हजार 600 मतदार.

·      महाराष्ट्रात एकूण 8 कोटी 98 लाख 39 हजार 600 मतदार आहेत.

·      यामध्ये पुरुष मतदार – 4 कोटी  68 लाख 75 हजार, 750

·      महिला मतदार- 4 कोटी 28 लाख 43 हजार 635,

·      तृतीयपंथी मतदार-  2 हजार 634 आहेत.

·      दिव्यांग मतदार – 3 लाख 96 हजार आहेत

·      सर्व्हिस मतदार- 1 लाख 17 हजार 581 आहेत

 मतदार जनजागृती

·      आतापर्यंत 20.8 लाख नागरिकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. त्यापैकी 14.40 लाख मतदारांनी या यंत्रावर प्रत्यक्ष मतदानाची तालीम घेतली.

 जनजागृतीसाठी सदिच्छादूत

·      मतदार जागृतीच्या मोहिमेत‘सदिच्छादूतम्हणून अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, अभिनेत्री माधुरी दीक्षित, अभिनेते प्रशांत दामले, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, डॉ.निशिगंधा वाड, अभिनेत्री उषा जाधव, महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना, महिला धावपटू ललिता बाबर, अर्जुन पुरस्कार सन्मानित जलतरणपटू वीरधवल खाडे, नेमबाज राही सरनोबत, तृतीयपंथी कार्यकर्त्या गौरी सावंत, दिव्यांग कार्यकर्ता नीलेश सिंगीत यांचा समावेश आहे.

मतदान केंद्रे 

·      विधानसभा निवडणूक 2019 मध्ये 96 हजार 661 मतदान केंद्रे आहेत.

मुख्य मतदान केंद्र– 95, 473

सहायक मतदान केंद्र– 1,188

·      खास महिलांसाठी, महिलांकडून संनियंत्रण करणारी आणि व्यवस्थापनावर भर देणारी 352सखी मतदान केंद्रेस्थापन केली जातील.

मतदारांसाठी सोयी-सुविधा

·      किमान अत्यावश्यक सुविधांमध्ये पिण्याचे पाणी, विद्युत पुरवठा, प्रकाश योजना, ब्रेल भाषेतील मतपत्रिका, शौचालय, दिव्यांग मित्र आदी सर्व किमान सुविधा पुरविण्यात येतील.

·      दिव्यांग मतदारांना मतदार नोंदणी करणे, मतदान केंद्राचा शोध घेणे, व्हिलचेअरची मागणी नोंदविणे यासाठी PwD ॲपची सुविधा देण्यात आली आहे.

·      सर्व मतदान केंद्रांवर दिव्यांग तसेच वयोवृद्ध मतदारांकरिता व्हील चेअर व रॅम्पची व्यवस्था

·      दिव्यांग तसेच जेष्ठ नागरिक मतदारांकरिता वेगळ्या रांगेची व्यवस्था.

·      अंध मतदारांच्या सोयीकरिता मतदान केंद्रांवरील सूचनाफलक आणि मतदार यादी, ब्रेल लिपीमध्ये तयार करण्यात आली आहे. मतदान यंत्रावर ब्रेल लिपी मुद्रित केली असल्याने त्यांना कोणाच्याही मदतीखेरीज मतदान करता येणे शक्य.

·      लहान मुलासह मतदानास येणाऱ्या महिला मतदारांच्या मुलांकरिता पाळणाघराची व्यवस्था करण्यात आली आहे.

 दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक मतदारांच्या सुविधेसाठी मतदान केंद्राची रचना

·      ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांना सोयीचे व्हावे, म्हणून पहिल्या अथवा दुसऱ्या मजल्यावरील सुमारे 5400 मतदान केंद्रे तळमजल्यावर स्थलांतरीत.

·      पहिल्या वा दुसऱ्या मजल्यावर असलेल्या मतदान केंद्रासाठी आहे, तिथे लिफ्टची व्यवस्था. 

यंत्रणा सज्ज

·      विधानसभा निवडणुकीसाठी  1 लाख 79 हजार 895 मतदान यंत्र (बॅलेट युनिट)  आणि 1 लाख 26 हजार 505 नियंत्रण युनिट (कंट्रोल युनिट) तर सुमारे एक लाख 35 हजार 21 व्हीव्हीपॅट  (व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट्रेल) यंत्रे पुरवण्यात आली. त्यात राखीव यंत्रांचा देखील समावेश आहे.

·      विधानसभा निवडणुकीसाठी सुमारे 6.50 लाख कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व शांततेत, निर्भयपणे व पारदर्शीपणे निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज आहे.

 मतदान केंद्राची माहिती अशी मिळवा

·      मतदारांना एका क्लिकवर मतदान केंद्र व मतदार यादीतील त्यांची माहिती मिळविण्याची सुविधा भारत निवडणूक आयोगाच्याhttps://electoralsearch.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

·      या संकेतस्थळावर स्वतःची संपूर्ण माहिती नमूद केल्यास माहितीचा शोध घेता येतो. माहिती भरताना नाव, वडील/पतीचे नाव, वय अथवा जन्मतारीख, लिंग, राज्य, जिल्हा, विधानसभा मतदारसंघ या बाबींचा समावेश करावा. मतदार ओळख क्रमांक व राज्याचे नाव टाकल्यानंतर मतदारांची माहिती मिळविण्याची दुसरी सुविधाही या संकेतस्थळावर आहे.

मतदारांच्या सुविधेसाठी

·      आचारसंहितेसंबंधात तक्रारी करण्यासाठी सी-व्हिजील ॲपची सुविधा उपलब्ध.

·      ईव्हीएम व्हीव्हीपॅट वाहतुक करणाऱ्या वाहनांच्या नियंत्रणाकरिताGPS Tracking App,

·      मतदारांच्या मदतीसाठी‘व्होटर हेल्पलाईन-1950. या क्रमांकावर एसएमएस करून मतदारांना माहिती मिळवता येईल.

·      मतदारांसाठी‘व्होटर हेल्पलाईन ॲपही सुरु.

·      दिव्यांग मतदारांना मतदार नोंदणी करणे, मतदान केंद्राचा शोध घेणे, व्हिलचेअरची मागणी नोंदविणे यासाठी PwD ॲपची सुविधा.

मतदानासाठी आवश्यक ओळखपत्र

·      मतदानासाठी मतदार यादीत नाव आवश्यक.

·      भारत निवडणूक आयोगाचे ओळखपत्र नसेल अशावेळी पुढील अकरा प्रकारे आयोगाने ग्राह्य केलेल्या ओळखपत्रांच्या माध्यमातून मतदारास आपला हक्क बजावता येईल.

1.  पासपोर्ट (पारपत्र)

2. वाहन चालक परवाना

3 छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (राज्य/केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम,

  सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे ओळखपत्र)

4.                       छायाचित्र असलेले बँकांचे/टपाल कार्यालयाचे पासबूक

5.                        पॅनकार्ड 

6. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्ट्रेशन) अंतर्गत महसूल निर्मिती

निर्देशांक (रेव्हेन्यू जनरेशन इंडेक्स) द्वारे दिलेले स्मार्टकार्ड

7.                       मनरेगा जॉबकार्ड

8.कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड

9. छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज

10.                   खासदार/आमदार/विधानपरिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र

11.                    आधारकार्ड

००००

दिव्यांगांकडून होणार १०६ मतदार केंद्रांचे संचालन; मतदान केंद्राध्यक्षासह सर्वच कामांसाठी दिव्यांगांची नियुक्ती

मुंबई, दि. 17 : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील 106 मतदान केंद्रे ही दिव्यांगांद्वारे संनियंत्रित केली जाणार आहेत. यामध्ये सर्वाधिक 8 मतदान केंद्रे ही लातूर शहर मतदारसंघातील असून त्या खालोखाल उदगीर मतदारसंघात 6 मतदान केंद्रे ही दिव्यांग संचालित असतील.

निवडणूक आयोगाने दिव्यांग व्यक्तींना निवडणूकविषयक कामे देऊ नये, असे निर्देश दिले असले तरी दिव्यांग व्यक्ती सक्षमपणे सर्व कामे करू शकतात ही बाब सिद्ध करण्यासाठी निवडणूकविषयक कामात त्यांना सहभागी करून घेतले जात आहे.

विद्यार्थ्यांचे सहाय्य

मतदान केंद्रांवर वयोवृद्ध व दिव्यांग मतदारांना त्यांच्या शारीरिक मर्यादा/विकलांगतेमुळे मतदान केंद्रापर्यंत पोहोचून मतदान करण्यात अडथळे येऊ नये, त्यांना सुलभपणे मतदान करता यावे, यासाठी प्रत्येक केंद्रावर स्वयंसेवकांची नियुक्ती करण्याचे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिले आहेत.

शाळा, महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्रसेना (एनसीसी), नेहरू युवा केंद्र, स्काऊट गाईडचे विद्यार्थी यांची स्वयंसेवक म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. त्याबरोबरच नागरी संरक्षण विभाग, आपत्त्कालीन परिस्थितीत काम करणारे स्वयंसेवक व गृहरक्षक दल यांची मदतनीस/स्वयंसेवक म्हणून निवड करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मतदान केंद्रावर दिव्यांग आल्यानंतर त्यांच्या वाहनापासून मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर परत त्या वाहनापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी हे स्वयंसेवक पार पाडतील. मतदान केंद्रावर व्हिलचेअर उपलब्ध करून देणे, पाणी, गरज भासल्यास प्रसाधनगृह व प्रथमोपचार यांची उपलब्धता करून देण्याचे काम हे स्वयंसेवक करतील. या अनुषंगाने या स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्याच्या सूचना सर्व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. 

००००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/17.10.2019

‘जय महाराष्ट्र’ व ‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांची मुलाखत

मुंबई,दि.१७ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित‘जय महाराष्ट्र’व  ‘दिलखुलास’कार्यक्रमात प्रधानसचिव  व मुख्य  निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांचीविधानसभा निवडणूक तयारीया विषयावर विशेष मुलाखत घेण्यात आली आहे.  ही विशेष मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरउद्याशुक्रवार दिनांक १८ ऑक्टोबर २०१९ रोजी रात्री ९ वाजता प्रसारित होईल.तसेच ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून शुक्रवार दि. १८ आणि सोमवार  दि. २१ ऑक्टोबर २०१९ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल.   ‘दिलखुलास’हा कार्यक्रम  प्रसारभारतीच्या’न्यूज ऑन एअर’या ॲपवरही  शुक्रवार दि. १८ आणि सोमवार  दि. २१ ऑक्टोबर  २०१९  रोजी सकाळी ७.२५ ते ७.४०या वेळेत  ऐकता येईल.  निवेदक हेमंत बर्वे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

    

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांकरिता मतदारसंघातील तयारी,विधानसभा मतदारसंघात मतदार जनजागृतीवर देण्यात येणारा भर,मतदानात युवक व महिलांची टक्केवारी वाढण्यासाठी सुरु असलेले प्रयत्न,भारत निवडणूक आयोगाच्या’स्वीप’या उपक्रमाचे यश,राज्यात मतदार जनजागृतीसाठी सदिच्छादूतांचा सहभाग,राज्यातील एकूण मतदार संख्या,मतदार केंद्रे,प्रत्यक्ष मतदानादिवशी मतदारांना पुरविण्यात येणाऱ्या  सोयीसुविधा,  दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक मतदारांच्या सुविधेसाठी मतदान केंद्राची रचना,ईव्हीएम-व्हीव्हीपॅट बद्दलचा संभ्रम दूर करण्याकरिता होत असलेले प्रयत्न,राज्यातील  सर्व्हिस वोटरची संख्या,  या विषयांची माहिती श्री.बलदेव सिंह यांनी’जय महाराष्ट्र’आणि  ‘दिलखुलास’कार्यक्रमातून दिली आहे.

नवउद्यमींच्या आत्मविश्वासू, नाविन्यपूर्ण संकल्पनामुळे देशाच्या आर्थिक विकासात भर – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

आयओडी एमएसएमई समीट २०१९चे उद्घाटन

मुंबई, दि. १६ : देशाच्या आर्थिक विकासात उद्यमशीलतेचे मोठे योगदान आहे. त्यामुळे नवउद्योजकांचा आत्मविश्वास आणि नाविन्यपूर्ण संकल्पना यामुळे देशाच्या आर्थिक विकास वाढीत भर पडेल, असा विश्वास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केला.  केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विकास मंत्रालय, एसडीए बोकोनी- एशिया सेंटर यांच्या सहकार्याने इन्स्टिट्यूट ऑफ डायरेक्टर्स यांनी आयोजित केलेल्या पहिल्या आयओडी एमएसएमई समीट२०१९या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकता क्षेत्राशी निगडीत शिखर परिषदेचे राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.

राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विकासाच्या दृष्टीने अनेकविध प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी विविध योजना आखण्यात आल्या आहेत. त्यामुळे नवउद्योजकांसाठी या क्षेत्रात अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. उद्योजकांनाही स्वयं..मृगेंद्रताया उक्तीनुसार आत्मविश्वासाने प्रवेश करावा लागेल. त्यासाठी अलीकडच्या काळातील स्टार्ट-अपची उदाहरणेही प्रेरणादायी आहेत.  प्रामाणिक प्रयत्न आणि चिकाटीच त्यांना या क्षेत्रात यश देऊ शकते, हे पुढे आले आहे. अशा नवउद्योजकांना वित्तीय पुरवठाही सुलभपणे उपलब्ध करून देण्याची व्यवस्था उभी करण्यात आली आहे. उद्योग वाढीसाठी आवश्यक अशा विविध पायाभूत आणि दळणवळणाच्या सुविधा देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे नवउद्योजकांनी आता नाविन्यपूर्ण संकल्पना घेऊन या क्षेत्रात आत्मविश्वासानेच प्रवेश करावा, असेही त्यांनी सांगितले.

उद्घाटन सत्रात एसडीए बोकोनी-एशिया सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक अलेसांड्रो गुईलियानी यांनी प्रास्ताविक केले. आयओडीच्या पश्चिम विभागाचे अध्यक्ष शैलेश हरीभक्ती यांनी परिषदेची संकल्पना स्पष्ट केली. एसडीए-बोकोनीचे अधिष्ठाता डेव्हीड बार्दोले, सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विभागाचे संचालक ए. आर. गोखे यांची भाषणे झाली. आयओडीचे पश्चिम विभागीय संचालक विकेश वालिया यांनी स्वागत केले आणि आभार मानले.

डीकोडींग एमएसएमई ग्रोथ ऑपर्च्युनिटीजया संकल्पनेवर आधारित या एक दिवसीय परिषदेत या क्षेत्रातील तज्ज्ञ, अभ्यासक आदी मान्यवर पाच विविध सत्रात मांडणी करणार आहेत. 

मतदानाच्या तसेच अगोदरच्या दिवशी वृत्तपत्रात प्रसिद्ध करावयाच्या राजकीय जाहिराती पूर्वप्रमाणित करुन घेणे बंधनकारक

मुंबई, दि. 16 : राज्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान दि. 21 ऑक्टोबर रोजी होत असून त्या दिवशी आणि त्याच्या अगोदरच्या (दि. 20 ऑक्टोबर) दिवशी वृत्तपत्रे तसेच सर्व मुद्रित माध्यमांतून प्रसिद्ध करावयाच्या राजकीय जाहिराती माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समितीकडून (एमसीएमसी) पूर्व प्रमाणित करून घेणे बंधनकारक असल्याचे भारत निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

अफवा पसरवणाऱ्या आणि आक्षेपार्ह स्वरूपाच्या राजकीय जाहिराती मतदानाच्या दिवशी व त्या अगोदरच्या दिवशी प्रसिद्ध झाल्यास पूर्ण निवडणूक प्रक्रियेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. असे प्रकार यापूर्वी झाल्याचे आयोगाच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे. अशा जाहिराती प्रसिद्ध झाल्यास प्रतिपक्षाच्या उमेदवाराला स्पष्टीकरणाची संधीच मिळत नसून त्यामुळे त्याच्यावर एक प्रकारे अन्याय होऊ शकतो. या बाबींना आळा घालण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने संविधानाच्या कलम324 नुसार प्राप्त झालेल्या तसेच आयोगाला असलेल्या इतर अधिकारांचा वापर करून हे आदेश काढले आहेत. त्यानुसार कोणताही राजकीय पक्ष, उमेदवार, संघटना किंवा व्यक्तीला मतदानाच्या तसेच त्याच्या अगोदरच्या दिवशी प्रसिद्ध करावयाच्या जाहिराती नियमानुसार जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती (एमसीएमसी) करून प्रमाणित करून घेतल्याशिवाय प्रसिद्ध करता येणार नाही.

००००

सचिन गाढवे/वि.सं.अ./दि.16 ऑक्टोबर 2019

मतदान दिवस के साथ- साथ एक दिन पहले समाचार पत्र में प्रकाशन के लिए

राज्य के विज्ञापनों पूर्व-प्रमाणित करना अनिवार्य

मुंबई, दि. 16 : भारत निर्वाचन आयोग ने कहा है कि राज्य में विधानसभा चुनाव के लिए 21 अक्टूबर के दिन होने वाले मतदान और उसके पहले (दि. 20 अक्टूबर) को अखबारों के साथ-साथ सभी मुद्रित मीडिया में प्रकाशन के लिए राजनीतिक विज्ञापन मीडिया प्रमाणन और नियंत्रण समिति (MCMC) को पूर्व-प्रमाणित करना अनिवार्य है।

यदि मतदान के दिन या एक दिन पहले अफवाह और आपत्तिजनक राजनीतिक विज्ञापन जारी किए जाते हैं तो पूरी चुनावी प्रक्रिया पर प्रतिकूल प्रभाव पड़ सकता है। आयोग को बताया गया है कि यह पहले भी हो चुका है।

यदि ऐसे विज्ञापन जारी किए जाते हैं, तो विपक्ष के उम्मीदवार को स्पष्टीकरण का अवसर नहीं मिलने पर यह एक तरह से उसके साथ अन्याय हो सकता है। इन मामलों को दरकिनार करने के लिए, भारत के चुनाव आयोग ने संविधान के अनुच्छेद 324 के अनुसार और आयोग ने अन्य अधिकारों का प्रयोग  कर आदेश जारी किया है। इसके अनुसार, किसी भी राजनीतिक दल, उम्मीदवार, संगठन या व्यक्ति को मतदान के दिन या उसके एक दिन पहले कोई भी विज्ञापन तब तक जारी नहीं किया जाएगा जब तक कि उसे जिलास्तरीय या राज्य स्तरीय मीडिया प्रमाणन और नियंत्रण समिति (MCMC) द्वारा प्रमाणित नहीं किया जाता है।

००००

 

Taking pre-approval mandatory for political advertisements to be published in the newspaper one day before and on the poll day

Mumbai, date.16th: Polls for State Assembly Election will take place on 21st October. EC has declared that political print advertisements that will be published on poll day and preceding day (date. 20th October) should be pre-approved by Media Monitoring and Controlling Committee (MCMC).

If rumor spreading and objectionable political advertisements are published on the poll day or one day before, it might affect whole election process in a negative way. Similar cases were reported to EC in the past. An opposite candidate doesn’t get the chance to explain anything and that could be unjust in a way. EC has used its rights based on Article 324 and other rights to prevent such things. As per its rights, no political party, candidate, organization or person can publish an advertisement on poll day or one day before it unless pre-approved by Media Monitoring and Controlling Committee (MCMC).

0000

नेदरलँडचे राजे विलेम-अलेक्झांडर आणि राणी मेक्सिमा यांची मुंबईतील टिनी मिरॅकल्सला भेट

मुंबई, दि.16 : नेदरलँड्सचे राजे विलेम-अलेक्झांडर आणि राणी मेक्सिमा यांच्या भारत भेटी अंतर्गत मुंबईतील पहिल्या कार्यक्रमात शाही दांपत्याने आज टिनी मिरॅकल्सला भेट दिली. टिनी मिरॅकल्सही संस्था डच उद्योजक लॉरेन मेटर यांनी स्थापन केलेली आहे.

डच विदेश व्यापार आणि विकास सहकार मंत्री सिग्रीड काग यांच्यासोबत शाही दांपत्य टिनी मिरॅकल्स, मुंबई येथे पोहोचले असता टिनी मिरॅकल्सचे संस्थापक लॉरेन मेटर व संचालिका श्रीमती ग्रेस जोसेफ यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांनी प्रथम परदेशी महिलानिर्मित उत्पादनांचे विशेष प्रदर्शन पाहिले. त्यानंतर प्रत्यक्षात उत्पादने तयार केली जातात, ते शिक्षण-प्रशिक्षण केंद्र पाहण्यासाठी गेले. त्यांनतर शाही दांपत्याने इथे काही महिलांशी चर्चा केली व काही डच डिझाइन उत्पादने स्वतः बनवण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर, त्यांनी जवळपासच्या शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधला, जेथे टिनी मिरॅकल्ससाठी काम करणाऱ्या महिलांची मुले शाळेत जातात. टिनी मिरॅकल्सच्या महिला कामगारांसोबत एक फोटो काढून या भेटीची सांगता झाली. 

टिनी मिरॅकल्सचे संस्थापक लॉरेन मेटर म्हणाले,“जगातील दारिद्र्याचा प्रश्न कसा सोडवता येऊ शकतो यावर मॅजेस्टी किंग विलेम-अलेक्झांडर व क्वीन मेक्सिमा यांच्याशी चर्चा करण्याची व मते मांडण्याची मिळालेली संधी हा आमच्यासाठी एक बहुमानच आहे.”

भारत भेट

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या निमंत्रणाला मान देत महामहिम राजे विलेम-अलेक्झांडर आणि क्वीन मेक्सिमा भारत भेटीसाठी आले आहेत. दिनांक १४ ते १८ ऑक्टोबर दरम्यान ते भारत भेटीवर आहेत व यात नवी दिल्ली, मुंबई आणि केरळ राज्यांचा समावेश आहे. भारत आणि नेदरलँड्समधील जुने संबंध घनिष्ठ करणे हा या भारत भेटीमागील उद्देश आहे. या भेटीमध्ये जल तंत्रज्ञान, सागरी विकास, आरोग्य सेवा, शाश्वत शेती, सामाजिक उपक्रम आणि सांस्कृतिक वारसा यासारख्या प्रमुख बाबींवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

परराष्ट्र व्यवहार मंत्री स्टेफ ब्लोक (ज्यांचे गुरुवारी आगमन होईल) आणि परराष्ट्र व्यापार व विकास सहकार मंत्री सिग्रीड काग हे कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार शाही दांपत्याच्या सोबत असतील. ह्या भारत भेट दौऱ्यामध्ये एक समांतर व व्यापक व्यापार अभियानदेखील समाविष्ट आहे, ज्यात दोन्ही देशांमधील भविष्यकालीन आर्थिक भागीदारीच्या संभाव्य शक्यतांचा शोध घेण्यात येईल. तसेच आरोग्यसेवा मंत्री ब्रुनो ब्रुइन्स व आर्थिक व्यवहार व हवामान धोरण राज्य सचिव मोना केइझर हेदेखील या भेट दौऱ्यात असणार आहेत.

शाही दांपत्य राजा विलेम-अलेक्झांडर आणि राणी मेक्सिमा यांचे रविवारी (१३ ऑक्टोबर) रोजी दिल्लीत आगमन झाले. शाही दांपत्याने सोमवारी राष्ट्रपती राम नाथ कोविंद आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी त्यांचे स्वागत केले.

मौलाना आझाद मोफत शिकवणी व संबद्ध योजनेसाठी ६ जिल्ह्यातील प्रशिक्षण संस्थांची निवड

मुंबई दि. 16: राज्यातील अल्पसंख्याक समूहातील उमेदवारांकरिता विविध स्पर्धा परीक्षा, सामाईक प्रवेश परीक्षा  आणि इयत्ता दहावी बारावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोफत शिकवणीसाठी मोफत प्रशिक्षण देण्याकरिता मौलाना आझाद मोफत शिकवणी व संबद्ध योजना अल्पसंख्याक विकास विभागामार्फत राबविण्यात येत आहे.या योजनेच्या अंमलबजावणीसाठी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, अमरावती व नागपूर या जिल्ह्यातील प्रशिक्षण संस्थांची निवड करण्यात आली आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र उमेदवारांनी निवड केलेल्या संस्थेकडे आवश्यक कागदपत्रांसह संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  या योजनेअंतर्गत सन 2019-20 करिता मुंबई शहर जिल्ह्यातील प्रबोधन बहुउद्देशीय शिक्षण संस्था, एम.टी.एज्युकेअर लिमिटेड, सिद्दीकी एज्यूकेशन अँड वेलफेअर ट्रस्ट या संस्थांची अभ्यासक्रमनिहाय निवड करण्यात आली आहे.

राज्यातील अल्पसंख्याक लोकसमूहातील उमेदवारांना शासकीय/निमशासकीय सेवेत रोजगारांच्या पुरेशा संधी उपलब्ध करून देणे. केंद्रीय लोकसेवा आयोग/महाराष्ट्र लोकसेवा आयोग/बँकिंग सेवा इत्यादी स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमामधील प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. इयत्ता 10वी 12वी अनुत्तीर्ण अल्पसंख्याक उमेदवारांसाठी विशेष शिकवणी वर्ग सुरू करणे या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेबाबत अधिक माहितीसाठी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय सेथे संपर्क साधावा, असे आवाहन प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

७ ते १३ जानेवारीदरम्यान होणार राज्य कला प्रदर्शन

मुंबई, दि. 16 : कला संचालनालयामार्फत 60 व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे आयोजन 7 ते 13 जानेवारी 2020 दरम्यान करण्यात येणार आहे. हे प्रदर्शन कला संचालनालयाच्या व्यावसायिक कलाकार विभागामार्फत भरविण्यात येणार आहे.

या प्रदर्शनात चित्रकला, शिल्पकला, उपयोजित कला, मुद्राचित्रण आणि दिव्यांग या विभागासाठी महाराष्ट्राचा रहिवासी असलेल्या कलावंतांकडून कलाकृती मागविण्यात येत आहेत. या प्रदर्शनात बक्षीसपात्र कलाकृतींना प्रत्येकी दहा हजार रुपये याप्रमाणे एकूण 15 पारितोषिके देण्यात येणार आहेत.

इच्छुक कलावंतांनी दिनांक 5 आणि 6 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत या कालावधीत कला संचालनालयाचे सर ज.जी. कला दालन, कला शाळा आवार, डॉ. दा.नौ. मार्ग, मुंबई 400001 येथे आपल्या कलाकृती सादर कराव्यात, असे आवाहन प्रभारी कला संचालक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

ताज्या बातम्या

धुळ्यातील गुंतवणूक परिषदेस उद्योजकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – पालकमंत्री जयकुमार रावल

0
धुळे, दिनांक 19 एप्रिल, 2025 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्यात उद्योग व्यवसायास पूरक वातावरण असून पायाभूत सोयी सुविधा, कुशल मनुष्यबळाची मोठी उपलब्धता असल्यामुळे आगामी...

कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करुन फळबागांची आधुनिक शेती करावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
सातारा दि. 19: कृत्रिम बुद्धिमत्ता( एआय) तंत्रज्ञानाचा सगळ्या क्षेत्रात वापर व्हायला लागला आहे. राज्य सरकारनेही अनेक विभागांमध्ये त्याचा अंतर्भाव केला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये 500...

भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाच्या तयारीसाठी सुवर्णसंधी; एसएसबी कोर्ससाठी मोफत प्रशिक्षण

0
मुंबई, दि.19 : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्याची इच्छा असलेल्या महाराष्ट्रातील युवक-युवतींसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र,...

सांस्कृतिक कार्यक्रमातून विश्वरत्न डॉ.बाबासाहेबांना मानवंदना; मुंबईत गेट व ऑफ इंडिया येथे २० एप्रिलला कार्यक्रम

0
मुंबई, दि. 19 :- संविधान अमृत महोत्सव आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्ताने महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागातर्फे रविवार, 20 एप्रिल,...

नारळी सप्ताहाच्या माध्यमातून समाज घडविण्याचे मोलाचे कार्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
बीड, दि. 19 :  बीड जिल्ह्याला नारळी सप्ताह, अध्यात्म व विचारांची मोठी परंपरा लाभली आहे. संत वामनभाऊ यांनी सुरू केलेली सप्ताहाची परंपरा अखंडपणे 93...