सोमवार, एप्रिल 28, 2025
Home Blog Page 1643

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे मुंबईत आगमन

मुंबई, दि.26 : भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे दोन दिवसाच्या मुंबई भेटीसाठी आज येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई दलाच्या खास विमानाने आगमन झाले.

राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे आणि मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी त्यांचे स्वागत केले.

पुण्यात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसात १४ जणांचा मृत्यू; ९ बेपत्ता

प्रशासनातर्फे मदत व बचाव कार्य सुरू;आज रात्रीही पावसाचा इशारा

पुणे,दि.26:पुणे शहरासह जिल्ह्यातील5तालुक्यांना काल रात्री मुसळधार पावसाचा फटका बसला. शहरासह ग्रामीण परिसरातील सखल भागातील घरात पाणी शिरले. नदी-नाल्यांना पूर आले. या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील14जण दगावले असून9जण बेपत्ता आहेत. पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून बचाव व मदतीसाठी एनडीआरएफची5पथके कार्यरत आहेत. प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी मदत करण्यात येईल,अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज दिली.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले,यावर्षी22वर्षानंतर प्रथमच ऑगस्ट महिन्यात धरणे भरली. काल रात्रीचा पाऊस मात्र खूपच होता. यावर्षी जिल्ह्यात सरासरी180टक्के पाऊस झाला आहे. कालच्‍या पावसामुळे जिल्ह्यात14जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये पुणे शहरातील6,हवेली तालुक्यातील6,पुरंदर तालुक्यातील2जणांचा समावेश आहे.

या पावसाचा फटका जिल्ह्यातील15तालुक्यांपैकी5तालुक्यांना बसला आहे. पाच तालुक्यातील59गावे बाधित झाली आहेत. नाझरे धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे कऱ्हा नदीच्या पात्रात85हजार क्युसेक पाणी वाहत होते. या कऱ्हा नदीच्या पाण्यामुळे बारामती शहराला फटका बसला. दक्षतेचा उपाय म्हणून बारामती शहरात38निवारा शिबिरांची उभारणी करण्यात आली आहे. या शिबिरात2हजार500नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले. तर पुणे शहरातील3हजार नागरिकांना काही काळासाठी सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले. जिल्ह्यातील1हजार1कुटुंबांतील 3 हजार65लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यात दरड कोसळून5रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले होते. या ठिकाणी तातडीने यंत्रणा पाठवून या रस्त्यांवरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे. जिल्ह्यात एनडीआरएफची5पथके तैनात करण्यात आली असून275जवान मदत कार्य करत आहेत. त्यापैकी बारामती तालुक्यात एनडीआरएफची दोन पथके कार्यरत आहेत. या आपत्कालीन स्थितीची माहिती निवडणूक आयोगाला कळवून त्यांच्या सूचनांनुसार प्रशासनाच्या वतीने बाधित नागरिकांना मदत देण्यात येणार आहे. आचारसंहितेचा कोणताही अडसर मदत व बचाव कार्यात येणार नसल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या पर्यटन दिनानिमित्त विशेष कार्यक्रम

मुंबई, दि. २६ : जागतिक पर्यटन दिन २७ सप्टेंबर रोजी साजरा केला जात आहे. त्यानिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित’जय महाराष्ट्रकार्यक्रमात विशेष कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात  येणार आहे. या कार्यक्रमात पर्यटन विभागाच्या सचिव विनिता वेद-सिंगल, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे, पर्यटन संचालक दिलीप गावडे, सहसंचालक धनंजय सावळकर आणि पर्यटन व्यावसायिक अवधूत मोरे  यांचा सहभाग आहे. हा माहितीपर कार्यक्रम दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर शुक्रवार दिनांक २७ सप्टेंबर २०१९रोजी  रात्री9 वाजता प्रसारित होईल. या कार्यक्रमाचे निवेदन  रेश्मा बोडके  यांनी केले आहे.

या कार्यक्रमात महाराष्ट्रातील पर्यटनाची बलस्थाने, आधुनिक काळातील पर्यटनाचे बदलते  स्वरूप, महाराष्ट्राला लाभलेली पर्यटन स्थळे, पर्यटनामुळे निर्माण होणारा रोजगार, महाराष्ट्र पर्यटन विकास  महामंडळाने विकसित केलेली पर्यटनस्थळे, तीर्थक्षेत्र, सागरी, वन्यजीव, कृषी, पावसाळी पर्यटन यासह पर्यटनामुळे राज्याच्या आर्थिक विकासाला मिळत असलेली चालना आदी विषयांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.        

निवडणुकीत पैशाच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी सतर्क राहण्याचे विशेष खर्च निरीक्षक मधू महाजन यांचे निर्देश

मुंबई, दि. 26 : विधानसभा निवडणुकीमध्ये पैशाचा गैरवापर रोखण्यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे, असे निर्देश राज्यासाठीच्या विशेष खर्च निरीक्षक श्रीमती मधू महाजन यांनी आज दिले.

निवडणुकीच्या अनुषंगाने श्रीमती महाजन आणि प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीत आढावा घेऊन सूचना देण्यात आल्या. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त प्राजक्ता लवंगारे- वर्मा, परिवहन आयुक्त शेखर चन्ने, वस्तू आणि सेवा कर आयुक्त ए. शैलजा आदी उपस्थित होते.

आयकर विभाग, उत्पादन शुल्क विभाग व महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विभागांनी निवडणुकीत मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी पैशाचा आणि मद्याचा वापर याला आळा घालण्यासाठी तसेच अवैधरित्या मद्य आणि रोकड वाहतूक यावर लक्ष ठेवण्याची सक्षम यंत्रणा कार्यान्वित करावी अशा सूचना दिल्या.

रोख रक्कमेची वाहतूक, पैशाचे हस्तांतरण यावर लक्ष ठेवावे. उमेदवारांचा निवडणूक खर्च आणि अवैध पैशांचा वापर याबाबत काटेकोर पर्यवेक्षण करण्यात यावे, आदी सूचना देण्यात आल्या.

यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभाग, आयकर विभाग तसेच एमजीएसटी विभागाने केलेली चेकपोस्ट, भारतीय टपाल विभाग आदींच्या व्यवस्थेचाही आढावा घेण्यात आला.

००००

सचिन गाढवे/वि.सं.अ./दि.26.9.2019

भारताची विश्वगुरू बनण्याच्या दिशेने वाटचाल – उपराष्ट्रपती

प्रा. यशवंतराव केळकर स्मृतीनिमित्त’नेशन फर्स्ट’या विषयावर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे व्याख्यान

मुंबई, दि. 26:भारत देश झपाट्याने आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करीत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील वित्तीय संस्थांनीसुद्धा ही बाब मान्य केली आहे. अनेक बाबींसाठी देश आज जगभर ओळखला जातो. गेल्या काही वर्षात विश्वगुरू बनण्याच्या दिशेने देशाची वाटचाल सुरू आहे, असे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी सांगितले.

प्रा.यशवंतराव केळकर स्मृतीनिमित्त आयोजित प्रथम व्याख्यान कार्यक्रमात’नेशन फर्स्ट’या विषयावर श्री.नायडू यांनी आपले विचार व्यक्त केले. मुंबई शेअर बाजारच्या सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अध्यक्षस्थानी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी तर प्रमुख पाहुणे म्हणून बीएसईचे मुख्य आर्थिक अधिकारी नयन मेहता, सुनिल आंबेकर, आशिष चव्हाण आदी उपस्थित होते.

प्रा.यशवंतराव केळकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ व्याख्यानमाला सुरू केल्याबद्दल उपराष्ट्रपतींनी मराठीतून आयोजकांचे कौतुक केले. प्रो. केळकर यांच्यासोबत विद्यार्थीदशेतच काम करण्याची संधी मिळाली. ते अनेकांचे मार्गदर्शक आणि चांगले मित्र होते, असे उपराष्ट्रपती श्री.नायडू म्हणाले.

‘नेशन फर्स्ट’असे म्हणत असताना केवळ देश प्रथम असाच त्याचा अर्थ नाही. सर्वांना समान संधी, समाजातील शेवटच्या घटकांचा विकास, महिलांना बरोबरीचे स्थान, गरिबी निर्मूलन, एक देश, एक नागरिक आणि देशाबद्दल प्रत्येकाच्या मनात असलेला आदर या बाबी सुद्धा महत्त्वाच्या आहेत.

‘नेशन फर्स्ट’चा विचार मांडताना प्रत्येकाने रचनात्मक, सकारात्मक कामाने देशाच्या विकासासाठी कसे योगदान देऊ शकू, याचा विचार केला पाहिजे. यासोबतच देशाच्या भविष्यासाठी प्रकृती, संस्कृती आणि एकात्मतेचा विचारही आवश्यक आहे. देशाला विकासाच्या दिशेने घेऊन जात असताना काही आव्हानेसुद्धा आहेत. त्या आव्हानांचा सामनासुद्धा करावा लागणार असल्याचे उपराष्ट्रपती म्हणाले.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले. सुरुवातीस मराठी भाषेतून त्यांनी प्रो.यशवंतराव केळकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. प्रत्येक युवक पदाने मोठा व्यक्ती होऊ शकत नसला तरी चांगला राष्ट्रपुत्र मात्र बनू शकतो. आपल्या सकारात्मक दृष्टीकोनातून उद्योग, व्यवसाय, सामाजिक क्षेत्र आणि राजकारणातसुद्धा चांगली संधी निर्माण करू शकतो, असेही राज्यपाल म्हणाले.

०००००००

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील नागरिकांना विनाशुल्क बदली मतदार ओळखपत्रे

मुंबई दि.25 : पूरग्रस्त कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 1 लाख 56 हजार 60 नागरिकांना तर सांगली जिल्ह्यातील एकूण 4 लाख 35 हजार 422 नागरिकांना विनाशुल्क बदली ओळखपत्रे देण्यात येणार आहेत. कोल्हापूर आणि सांगली जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्यामार्फत महापुराने बाधित क्षेत्रातील विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार छायाचित्रासह ओळखपत्र विनाशुल्क देण्याची कार्यवाही केली जाईल.

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात महापूर आला होता. या महापुरात या दोन जिल्ह्यातील गावे बाधित झाली होती. या महापुरात या दोन जिल्ह्यातील नागरिकांचे संसारोपयोगी साहित्य, महत्त्वाचे दस्तऐवज यांचे नुकसान झाले. ही बाब लक्षात घेऊन ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी या दोन जिल्ह्यातील नागरिकांना आता बदली मतदार ओळखपत्रे पुरविण्यात येणार आहेत.

००००

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील मतदार संख्येत २१ लाखांनी वाढ

मुंबई, दि. 25 : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील एकूण मतदारांमध्ये 21 लाख 15 हजार 575 एवढी वाढ झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज्यात एकूण 8 कोटी 73 लाख 30 हजार 484 मतदार होते तर आता 31 ऑगस्टपर्यंत 8 कोटी 94 लाख 46 हजार 211 एवढी मतदार नोंदणी झाली आहे.

लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी भारत निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत विशेष प्रयत्न करण्यात आले. जुलै-ऑगस्ट 2019 या कालावधीत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण हा कार्यक्रम राबविण्यात आला. सुट्ट्यांच्या दिवशी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले. त्यातून अधिकाधिक नागरिकांनी मतदार यादीत नावे नोंदवावी, यासाठी प्रयत्न करण्यात आले. सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या माध्यमातूनही शहरी भागातील मतदार जोडण्यात आले.

मार्चमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी4 कोटी 57 लाख 02 हजार 579 पुरुष मतदार व 4 कोटी 16 लाख 25 हजार 819 महिला मतदार होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी 31 ऑगस्ट 2019 रोजी प्रकाशित अंतिम मतदारयादीमध्ये पुरुष मतदारामध्ये दहा लाख 35 हजार 262 नव्या पुरुष मतदारांची वाढ होऊन ती 4 कोटी 67 लाख 37 हजार 841 एवढी झाली आहे. तर महिला मतदारांमध्ये 10 लाख 79 हजार 958 एवढी वाढ होऊन ती आता 4 कोटी 27 लाख 5 हजार 777 झाली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी2 हजार 86 तृतीयपंथी मतदार होते त्यामध्ये 507 मतदार वाढून ते आता 2 हजार 593 एवढे झाले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर एकूण मतदारांमध्ये 21 लाख 15 हजार 575 एवढी वाढ झाली आहे.

००००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/25.9.2019

Number of voters in the state rise by 21lakhs 

compared to Lok Sabha polls

Mumbai Sept.25 – The number of voters in the state has increased by 21 lakh 15 thousand and 575 after the recently held Lok Sabha elections. The total number of voters in the state which was 8 crore 73 lakh 30 thousand 484 has by August 31st has reached to 8 crores 91 lakh 46 thousand 211.

Election Commission of India (ECI) and office of the chief election officer had made special efforts to increase voting and in the month of July-August special drive for brief review of voters’ list was conducted. Special drives were held on holidays so that people can register their names in voter’s list. In urban areas, the efforts were made through cooperative housing societies for the same.

There were 4.57 crore 2 thousand 579 male voters and 4 crore16 lakh 25 thousand 819 female voters during the Lok Sabha elections held in the month of March 2019. The final voter’s list published on August 31’st 2019 before the assembly elections  has increase in the male voters by 10 lakh 35 thousand 262 taking total number of male voters to 4.67 crores 37 thousand 841. There is rise of 10 lakh 79 thousand 958 in number of female voters taking total number of female voters in the state to 4.27 crores 5 thousand 777.

There were 2086 transgender voters in the state during Lok Sabha elections. This number has also increased now and it has become 2593. There has been a rise of 21 lakh 15 thousand 575 voters in the state as compared to Lok Sabha elections.

राज्याच्या जलसंपदा विभागाला ‘राष्ट्रीय जल अभियान पुरस्कार’

          

नवी दिल्ली, 25 :एकात्मिक जलसंपदा व्यवस्थापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाला आज केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते‘राष्ट्रीय जल अभियान पुरस्कारा’ने गौरविण्यात आले.नाशिक जिल्ह्यातील शेतकरी बापु साळुंखे यांनाही प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने येथील विज्ञान भवनात सुरु असलेल्या6व्या राष्ट्रीय जल सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशीच्या शेवटच्या सत्रात‘राष्ट्रीय जल अभियान पुरस्कारांचे’वितरण करण्यात आले.जलशक्ती राज्यमंत्री रतनलाल कटारिया  आणि विभागाचे सचिव यू.पी.सिंह,राष्ट्रीय जल अभियानाचे संचालक जी.अशोक कुमार  यावेळी मंचावर उपस्थित होते.

केंद्र शासनाच्या वतीने वर्ष2011पासून देशभर‘राष्ट्रीय जल अभियान’राबविण्यात येते. यावर्षी प्रथमच या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करणारे विविध राज्यांचे विभाग,खाजगी क्षेत्रातील संस्था आणि व्यक्तींना‘राष्ट्रीय जल अभियान पुरस्कार’प्रदान करण्यात आले.यावेळी राष्ट्रीय जल अभियानाअंतर्गत ठरवून देण्यात आलेल्या5उद्देशांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एकूण9श्रेणींमध्ये23पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

गोदावरी खोरे आणि उपखोरे अंतर्गत येणाऱ्या धरणांच्या पाण्याचे एकात्मिक जल व्यवस्थापन करून जलसंरक्षणात दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी महाराष्ट्राच्या जलसंपदा विभागाला एकात्मिक जलसंपदा व्यवस्थापन श्रेणी अंतर्गत दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.राज्याच्या जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय.एस.चहल यांच्यासह विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 1लाख50हजार रूपये,सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

उपलब्ध पाण्याचा प्रभावी उपयोग करून जलव्यवस्थापन व जलसंरक्षणात दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्याच्या वडनेर(भैरव)येथील  शेतकरी बापु साळुंखे यांना शेतकऱ्यांच्या श्रेणीत प्रथम पुरस्काराने गौरविण्यात आले. 2लाख रूपये,सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.नाशिक जिल्ह्याच्या दुष्काळी भागातील शेतकरी श्री.साळुंखे यांच्या मालकीच्या एकूण25एकर शेतीतील केवळ2एकर शेतीलाच पाणी उपलब्ध होते.मात्र,या स्थितीवर मात करण्यासाठी  वर्ष2004पासून सूक्ष्म जलसिंचन पद्धतीचा प्रभावी अवलंब करून श्री.सांळुखे यांनी आपली25एकर शेती ओलिताखाली आणली असून या जमिनीवर ते द्राक्ष उत्पादन घेत आहेत.त्यांच्या या कार्याची दखल राष्ट्रीय जल अभियान पुरस्कारासाठी घेण्यात आली.             

०००००

रितेश भुयार/वृत विशेष क्र.225 /दि.25.09.2019

मतदारांच्या सुविधेसाठी ५ हजार ४०० मतदान केंद्र तळमजल्यावर स्थलांतरित

मुंबई, दि. 24 : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तयारी सुरु असून लोकसभा निवडणुकीच्या वेळी पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर असलेली सुमारे पाच हजार चारशे मतदान केंद्र तळमजल्यावर आणण्यात आली आहेत. यामुळे दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक यांना मतदानासाठी सहभाग घेणे सुलभ होईल.

मुंबई, मुंबई उपनगरे, ठाणे, नाशिक, पुणे यासारख्या महानगरांमध्ये जागेच्या मर्यादेमुळे लोकसभा निवडणुकीसाठी काही ठिकाणी पहिल्या किंवा दुसऱ्या मजल्यावर मतदान केंद्र ठेवण्यात आली होती. विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांना सोयीचे व्हावे, म्हणून पहिल्या अथवा दुसऱ्या मजल्यावरील सुमारे 5400 मतदान केंद्रे तळमजल्यावर स्थलांतरित करण्यात आली असून जेथे लिफ्टची सुविधा आहे अशाच ठिकाणची मतदान केंद्र पहिल्या अथवा दुसऱ्या मजल्यावर ठेवण्यात आली आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली आहे.

2014 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान राज्यात 91 हजार 329 मतदान केंद्रे होती. त्यात 5 हजार 325 मतदान केंद्रांची वाढ झाली आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत 96 हजार 454 मतदान केंद्र आहेत. तेथे रॅम्प, व्हिल चेअर, पिण्याचे पाणी या आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात येतील.

भारत निवडणक आयोगाने या वर्षी दिव्यांग मतदारांचा सहभाग वाढावा यासाठी‘सुलभ निवडणुकाहे घोषवाक्य जाहीर केले आहे. यावर्षीच्या मतदार यादीमध्ये आतापर्यंत 3 लाख 60 हजार 885 दिव्यांग मतदार समाविष्ट आहेत. त्यांच्या सुलभतेसाठी मतदान केंद्रांवर रॅम्प, व्हिलचेअर यांची सुविधा करण्यात येईल.

००००

अजय जाधव/विसंअ

चला मतदान करुया! माधुरी दीक्षितसह सदिच्छादूतांचे आवाहन

मुंबई दि.24 : ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अधिकाधिक मतदारांनी सहभाग घ्यावा यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत मतदार जनजागृतीचा व्यापक कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्यामार्फत चला मतदान करुयाही मोहीम चित्रफितीच्या रुपाने राबविण्यास सुरुवात झाली आहे.

या चित्रफितीद्वारे श्रीमती दीक्षित या लोकशाही प्रक्रिया आणि देशाच्या विकासात जागरुक मतदारांच्या भूमिकेचे महत्त्व समजावून सांगताहेत. मतदार जागृतीच्या मोहिमेला कला, क्रीडा, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील विविध  मान्यवरांची सदिच्छादूतम्हणून साथ मिळाली आहे.

या सदिच्छादूतांमध्ये पद्मभूषण आणि महाराष्ट्रभूषण सन्मानित अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, अभिनेते प्रशांत दामले, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, डॉ.निशिगंधा वाड, राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित अभिनेत्री उषा जाधव, महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना, अर्जुन पुरस्कार सन्मानित महिला धावपटू ललिता बाबर, अर्जुन पुरस्कार सन्मानित जलतरणपटू वीरधवल खाडे, कॉमनवेल्थ गेम्समधील सुवर्णपदक विजेत्या नेमबाज राही सरनोबत, तृतीयपंथी कार्यकर्त्या गौरी सावंत, दिव्यांग कार्यकर्ता नीलेश सिंगीत यांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे, 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळीही याच 12 सदिच्छादूतांनी मतदारांना मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजाविण्याचे आवाहन केले होते. समाजमाध्यमे, मुद्रित माध्यमे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांबरोबरच जाहिरात फलक, भित्तीपत्रकाद्वारे हे सदिच्छादूत लोकशाही सुदृढ करण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत.

ताज्या बातम्या

मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा कार्यालयाच्यावतीने विविध खेळांची विनामूल्य उन्हाळी प्रशिक्षण शिबिरे

0
मुंबई दि. 28 :  मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व विविध क्रीडा संस्थांच्या संयुक्त विद्यमाने दि. २८ एप्रिल ते ९ मे २०२५ या...

‘वेव्हज परिषद-२०२५’ निमित्त ‘जय महाराष्ट्र’कार्यक्रमात सचिव डॉ. अन्बळगन पी. यांची मुलाखत

0
मुंबई दि. 28 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’कार्यक्रमात ‘ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट’वेव्हज-2025 परिषदेनिमित्त उद्योग विभागाचे सचिव डॉ. अन्बळगन पी. यांच्या...

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल’ – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती

0
मुंबई, दि. 28 :- पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी राज्य शासनाने ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल (पर्यटन मित्र)’ स्थापन करण्याचा निर्णय...

हेरिटेज दर्जा कायम ठेवून बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या ऑडिटोरियमचा पुनर्विकास करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
मुंबई दि. २९ : - पुण्यातील बी. जे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय हे स्वातंत्र्यापूर्वीपासूनचे राज्यातील नामवंत असे शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालय आहे....

माळशेज घाटात सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर स्कायवॉक उभारण्यासाठी महिन्याभरात एकत्रित प्रस्ताव सादर करावा – उपमुख्यमंत्री...

0
मुंबई दि. २९ : - माळशेज घाट हे ठाणे आणि पुणे जिल्ह्यांच्या सीमेवर, कल्याण-नगर महामार्गावर वसलेले पश्चिम घाटातील एक निसर्गरम्य पर्यटनस्थळ आहे. या ठिकाणचे...