रविवार, जून 8, 2025
Home Blog Page 1655

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या ‘विकासपर्वाचे शंभर दिवस’ या मुलाखतीचा दुसरा भाग

मुंबई,दि.16 :माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित’जय महाराष्ट्र’कार्यक्रमात’विकासपर्वाचे शंभर दिवस’या विषयावर मुलाखत घेण्यात आली आहे. या कार्यक्रमात’द फ्री प्रेस जर्नल’चे राजकीय संपादक संजय जोग, ‘दै.लोकसत्ता’चे राजकीय संपादक संतोष प्रधान व’दै.सकाळ’चे मुख्य प्रतिनिधी संजय मिस्कीन यांचा सहभाग असलेली मुलाखत’जय महाराष्ट्र’कार्यक्रमात मंगळवार दि.17मार्च2020रोजी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून संध्याकाळी7.30ते8.00या वेळेत प्रक्षेपित होईल. निवेदक नरेंद्र बेडेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात होत असलेला दिशा कायदा,महिला व बालकल्याण विकास विभागाच्या अनुषंगाने घेण्यात आलेले निर्णय,पर्यटन विकासाच्या अनुषंगाने घेतलेले निर्णय,पाच दिवसांचा आठवडा,पोलीस विभागाचे सक्षमीकरण,मुंबई24तास,आरोग्य विभागाचे सक्षमीकरण हा उपक्रम आदी विषयांची सविस्तर माहिती श्री.जोग,श्री.प्रधान व श्री.मिस्कीन  यांनी’जय महाराष्ट्र’कार्यक्रमातून दिली आहे.

0000

सर्वधर्मियांच्या प्रार्थनास्थळांवर भाविकांची गर्दी बंद करा; राजकीय स्वरूपाचे कार्यक्रम, मेळावे थांबवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे निर्देश

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास सर्वोच्च प्राधान्य

मुंबई, दि. 16 : कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविणे यास सर्वोच्च प्राधान्य असून राज्यशासनाने उचललेल्या पावलांमुळे अद्याप तरी राज्यात परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र, गर्दी थांबविण्यासाठी काटेकोर प्रयत्न करावेच लागतील. यादृष्टीने सर्व धर्मियांच्या प्रार्थनास्थळांवर नियमित पूजा-अर्चा सुरु ठेवून भाविकांची गर्दी मात्र थांबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले. साथरोग प्रतिबंध कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची असून रोगाचे हे संकट टळल्यानंतर धार्मिक सण,उत्सव पूर्ववत साजरे करता येतील. याक्षणी जनतेचे आरोग्य हे एकमेव प्राधान्य आहे. कोणत्याही पक्ष संघटनांचे राजकीय कार्यक्रम,समारंभ,मेळावे रोगाचा प्रादुर्भाव असल्यामुळे होऊच नयेत, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, मुख्य सचिव अजोय मेहता, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदिप व्यास उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, एखादी व्यक्ती कोरोनाग्रस्त असली तरी ती काही गुन्हेगार नाही. तिला योग्य औषधोपचार आणि मानसिक आधारही द्या. राज्यात लागू असलेला साथरोग प्रतिबंध कायदा जनतेच्या हितासाठी असून त्यांच्यात जागृती आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोहिमा हाती घ्याव्यात. नागरिकांमध्ये भीती आहे. जे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले त्यांच्यासाठी मानसिक आधार देण्याची आवश्यकता असून क्वॉरंटाईन केलेल्या ठिकाणी त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. राज्यात जे रुग्ण दाखल आहेत त्यातील उपचाराला प्रतिसादही देत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

नियम सर्वांना सारखे असून धार्मिक सण-उत्सव, समारंभांसोबतच राजकीय कार्यक्रमांनाही परवानगी देऊ नका, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. ज्या नागरिकांना होम क्वॉरंटाईन सांगितले आहे त्यांनी स्वत:हूनच घरी राहून स्वत:बरोबरच इतरांचीही काळजी घ्यावी. ग्रामीण भागातील शाळा बंद करतानाच सार्वजनिक स्वच्छतागृह या ठिकाणी सॅनिटायजर, साबण आणि पाणी उपलब्ध राहील यांची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. परदेशातील टुर्सना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. राज्य शासन कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करीत आहे. नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

कोरोनाचा प्रादुर्भाव पसरु नये याकरिता राज्यातील सर्व धार्मिक उत्सव रद्द करावेत. सर्व धर्मिय प्रार्थनास्थळांमध्ये दैनंदिन पूजाअर्चा व धार्मिक विधी शिवाय भाविकांसाठी तेथे प्रवेशास काही दिवस प्रतिबंध करावा. व्यापक जनहित लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी कायद्याचा वापर प्रभावीपणे करावा. राज्यातील ग्रामीण भागातील सर्व शाळा बंद कराव्यात. ग्रामपंचायत व नगरपालिकेच्या निवडणूका तीन महिने पुढे ढकलण्याचा प्रस्ताव दिला आहे. कोरोनाच्या आपत्कालीन उपाययोजनांसाठी तातडीच्या निधीचा पहिला हप्ता  म्हणून 45 कोटी रुपये विभागीय आयुक्तांना देण्यात येणार असून ज्या प्रवाशांना घरी राहून क्वॉरंटाईन करण्याच्या सूचना दिल्या आहेत त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. ही सर्व कार्यवाही करताना त्याला मानवी चेहरा असावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले.

यावेळी घेण्यात आलेले महत्त्वपूर्ण निर्णय असे :

·      राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका तीन महिने पुढे ढकलण्याचा प्रस्ताव

·      ग्रामीण भागातीलही शाळा बंद ठेवणार.

·      कोरोनाच्या उपाययोजनांसाठी तातडीच्या निधीसाठी कोकण आणि पुणे विभागीय आयुक्तांना प्रत्येकी 15 आणि 10 कोटी तर नागपूर, अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक विभागीय आयुक्तांना प्रत्येक 5 कोटी रुपये असे 45 कोटींचा पहिला हप्ता देणार.

·      ज्यांना 100 टक्के घरी क्वॉरंटाईनच्या सूचना आहेत त्यांच्या डाव्या हातावर शिक्का मारावा जेणेकरुन समाजात या व्यक्ती वावरताना आढळल्यास त्याची ओळख पटेल.

·      केंद्र शासनाने ज्या सात देशांचा प्रवास करुन आलेल्यांना सक्तीचे क्वॉरंटाईन करण्याच्या सूचना केल्या आहे त्यामध्ये राज्य शासनाकडून दुबई, सौदी अरेबिया आणि अमेरिका यांचाही समावेश करण्यात आला.

·      आवश्यकता भासल्यास व्हेंटिलेटर आणि अन्य उपकरणे स्थानिक बाजारातून खर्च करण्याचे जिल्हा प्रशासनाला अधिकार.

·      उद्यापासून मंत्रालयात अभ्यांगतांना प्रवेश न देण्याचा निर्णय.

·      नागरिकांनी शासकीय कार्यालयात गर्दी न करता ई-मेलच्या माध्यमातून तक्रारी, अर्ज पाठवावेत. त्यावर जिल्हा प्रशासनाने सात दिवसात कार्यवाही करावी.

·      होम क्वॉरंटाईन असलेल्या व्यक्तींची विचारपूस करण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी.

·      धर्मगुरु, लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घेऊन व्यापक जनहितासाठी कायद्याचा प्रभावी वापर करावा.

००००

Highest priority to prevent spread of Corona infections

Stop crowds of devotees at all the religious worship places

Stop political programs and conventions

Chief Minister directs to district collectors

Mumbai, March 16- Stating that preventing Corona virus spread was highest priority and situation was under control so far because of steps taken by state Government, chief minister Uddhav Thackeray has directed all the district collectors to prevent crowds at religious places during regular daily religious rituals. Chief Minister made it clear that it was responsibility of collectors to ensure that prevention of epidemic act was strictly implemented and after the calamity of Corona disease was over the religious festivities and celebrations can take place as usual. He also directed that for preventing spread of disease, no convention or program of political organizations and parties should take place.

Chief Minister on Monday had a video conference with all the divisional commissioners, district collectors from his official residence Varsha bungalow. Minister for industries Subhash Desai, health minister Rajesh Tope, minister for tourism Aditya Thackeray, minister of state Rajendra Patil-Yadravkar, chief secretary Ajoy Mehta, principal secretary to the health department Dr Pradeep Vyas were present.

Stating that any person who is infected with Corona virus was not a criminal, chief minister directed the officials to ensure treatment as well as counselling for such a patient. He asked the officials to undertake campaign to create awareness among people towards prevention of epidemic act since it was in the interest of people. He said that those who have been found positive and are quarantined need to be provided with necessary facilities and counselling. He also informed that the patients in the state who are admitted to hospitals are giving response to the treatment.

Chief Ministers directed the district administration that law and rules were for everyone and there should not be any permission for either political programs or religious festivities or celebrations. He said that citizens who have been advised to be home quarantines need to stay at home and take care of others in addition to themselves. He told that while closing down schools in rural places, it was to be ensured that sanitisers and soap as well as water are available at public toilets. By stating that state Government was taking all the measures to prevent Corona virus impact, chief minister appealed to citizens to remain alert.

Asking the officials to ban all the religious festivities to prevent spread of Corona virus infection, the devotees need to be stopped at religious places with an exception of daily worships and religious rituals. Asking the district collectors to effectively implement law in larger public interest, chief minister told to close down all the schools in rural areas. He told that elections to the village Panchayats and local bodies have been postponed by three months. Stating that divisional commissioners would be given total of Rs. 45 crores as first instalment for implementing emergency measures to prevent Corona virus infections. By asking the officials to implement home quarantine for the travellers who have been told to go for home quarantine, chief minister appealed the officials to undertake these measures with maintaining the human face of the same.

Important decisions taken

Local body elections postponed for three months

Rural schools also to be closed down

Divisional commissioners to be given Rs 45 crores for undertaking emergency measures including Rs. 15 crores and Rs. 10 crorss to Konkan and Pune divisional commissioner while Rs. 5 crores each to Nagpur, Amravati, Aurangabad and Nashik divisions as first instalment.

Provide facilities of food, TV sets, carrom boards at quarantine places

To identify persons who have been asked to be home quarantined, a stamp would be imprinted on their left hand to prevent them from coming to open places. Dubai, US and Saudi Arabia also included in the list of seven countries declared by Union Government for quarantine.

District administration asked to spend for ventilator and other equipment if needed by availing from local markets.

Visitors would not be allowed in Mantralaya from tomorrow which is Tuesday

Citizens asked to approach district administration by using mails for their grievances and district administration asked to respond to such mails in seven days

staff from local police stations to be appointed for approaching to those who have been home quarantined

taking participation of religious leaders and elected representatives for effective implementation of law for larger public interest.

0000

अजय जाधव/विसंअ/16.3.2020

‘लोकराज्य’चा महिला विशेषांक प्रकाशित

मुंबई,दि.16 :माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या लोकराज्यचा मार्च महिन्याचा अंक महिला विशेषांक म्हणून प्रकाशित करण्यात आला आहे. या अंकाच्या अतिथी संपादक महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर (सोनावणे) या आहेत.

जागतिक महिला दिनाच्या औचित्याने प्रसिद्ध करण्यात आलेल्या या विशेषांकात विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेल्या महिलांच्या यशोगाथा,महिला विकासासाठी शासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध योजना व उपक्रमांची माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर महिलांसाठीचे महत्त्वपूर्ण कायदे,दिल्लीतील महाराष्ट्रीय कर्तृत्त्ववान महिला,बचतीच्या संधी,महिलांचे आरोग्य,इंटरनेट व सोशल मीडियाचा वापर करताना घ्यावयाची खबरदारी याबाबतच्या लेखांचा यात समावेश करण्यात आला आहे. शिवाय प्रेरणा,गडकिल्ले या माहितीपूर्ण सदरांसोबतच शासकीय घडामोडींच्या माहितीचाही या अंकात समावेश आहे. अंकाची किंमत10रुपये असून हा अंक सर्वत्र उपलब्ध आहे.

0000

मंत्रालयात अभ्यागतांना प्रवेश नाही; बायोमेट्रिक हजेरी प्रणालीही बंद

मुंबई,दि.16 : ‘कोरोना’विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांच्या गर्दीवर नियंत्रण आणण्याचे शासनाने ठरविले आहे. त्यासाठी ‘व्हिजिटर्स पास मॅनेजमेंट सिस्टीम’ (व्हीपीएमएस) प्रणालीद्वारे मंत्रालय प्रवेश देण्याची प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात येत असल्याचे परिपत्रक आज गृह विभागाने जारी केले.

अतिमहत्त्वाच्या कामांसाठी मंत्री,राज्यमंत्री यांच्याकडे येणाऱ्या महत्त्वाच्या10व्यक्तींना तर मुख्य सचिव तसेच अन्य विभागीय सचिव यांच्याकडे येणाऱ्या5व्यक्तींना प्रतीदिन प्रवेश देण्यात येईल. परंतू,प्रवेश देण्यापूर्वी या व्यक्तींचा विमानतळावर करण्यात येणाऱ्या वैद्यकीय तपासणीप्रमाणे तपासणी करुनच प्रवेश दिला जाईल. मंत्री,राज्यमंत्री कार्यालय तसेच मुख्य सचिव व विभागीय सचिवांच्या कार्यालयाच्या पत्रानुसार या व्यक्तींना सर्व तपासणीअंती प्रवेश देण्यात येईल.

क्षेत्रीय कार्यालयातून दैनंदिन कामकाजासाठी येणारे अधिकारी,कर्मचाऱ्यांनाही यापुढे मंत्रालयात प्रवेश देण्यात येणार नाही. गृह विभागामार्फत 1 वर्षाच्या कालावधीसाठी वितरीत करण्यात आलेल्या तात्पुरत्या प्रवेशपास धारकांपैकी ज्यांचे कार्यालय मंत्रालय इमारतीत आहे अशाच व्यक्तींना मंत्रालयात प्रवेश देण्यात येणार आहे. इतर तात्पुरत्या प्रवेशपास धारकांनाही मंत्रालयात प्रवेश देण्यात येणार नाही. अत्यंत तातडीचे टपाल,संदेश इमेलद्वारे पाठवावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. दैनंदिन टपाल व इतर महत्त्वाच्या कामासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी मंत्रालय प्रवेशद्वारावरच टपाल स्वीकारण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना सर्व विभागांना देण्यात आल्या आहेत.

बायोमेट्रिक हजेरी बंद

‘कोरोना’च्या प्रसारास प्रतिबंध घालण्यासाठी मंत्रालयासोबत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती नोंदविण्यासाठीची बायोमेट्रिक हजेरी प्रणालीही पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आली आहे. त्याऐवजी प्रत्येक विभागाने आस्थापना शाखेत हजेरीपट ठेवून त्याद्वारे कर्मचाऱ्यांची हजेरी नोंदवावी,असेही परिपत्रकात म्हटले आहे.

0000

सचिन गाढवे/वि.सं.अ./दि. 16.3.2020

शिवस्मारकाचे काम पारदर्शक पद्धतीनेच झाले पाहिजे – आढावा बैठकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे निर्देश

मुंबई,दि.16 :छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक झाले पाहिजे,हीच प्रत्येकाची इच्छा आहे. मात्र या स्मारकाच्या उभारणीत जनतेचा पैसा लागणार असल्याने हे काम पारदर्शक पद्धतीनेच झाले पाहिजे,असे स्पष्ट निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले आहेत.

अरबी समुद्रात नियोजित शिवस्मारकाच्या सद्यःस्थितीचा आढावा घेण्यासाठी अशोक चव्हाण यांनी आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. मंत्रालयात झालेल्या या बैठकीला सचिव (बांधकामे) अजित सगणे यांच्यासह अनेक प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

स्मारकाच्या कामाची सध्याच्या स्थितीची माहिती घेऊन अशोक चव्हाण म्हणाले की,छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाच्या निविदा प्रक्रियेवर कॅगने गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. न्यायालयात याचिका दाखल झालेल्या आहेत. पर्यावरणासंदर्भात केंद्र शासनाकडून अनुमती मिळवताना विहित प्रक्रियेचे पालन झाले नसल्याच्या तक्रारी आहेत. स्मारक आणि पर्यटकांच्या सुरक्षेसंदर्भात अजूनही शंका व्यक्त केल्या जात आहेत. यासंदर्भात विधिमंडळातही प्रश्न उपस्थित झालेले आहेत. या पार्श्वभूमीवर या सर्व मुद्यांचे निराकरण तातडीने व्हावे;जेणेकरून स्मारकाच्या कामाला गती देता येईल,अशी स्पष्ट भूमिका त्यांनी या बैठकीत मांडली. प्रकल्प अधिकाऱ्यांनी या सर्व मुद्यांवर आपला अहवाल तयार करावा,असे निर्देशही सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी यावेळी दिले.

००००

कोकणातील विविध कामांचा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडून आढावा

मुंबई,दि. 16 : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज त्यांच्या विभागांतर्गत येणाऱ्या कोकणातील विविध कामांचा आढावा घेतला.

चव्हाण यांनी आज मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत कोकण प्रादेशिक विभागाची आढावा बैठक बोलाविली होती.

यावेळी श्री.चव्हाण यांनी धार्मिक स्थळे व स्मारके यांचे नुतनीकरण सुरू असलेल्या सर्व कामांची तातडीने यादी तयार करण्याचे निर्देश दिले. सार्वजनिक बांधकाम विभागात अनेक ठिकाणी मनुष्यबळाची कमतरता असल्याच्या मुद्यावरही यावेळी चर्चा झाली. हाजी मलंग,पालघर येथील शासकीय विश्रामगृह,नियोजन भवन,अलिबाग,पनवेल येथील 100 खाटांचे ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय,क्रीडा संकुल,कर्जत येथील आश्रमशाळा,रत्नागिरी जिल्हा न्यायालय,मनोर येथील वारली हट,पालघर येथील 200 खाटांचे रुग्णालय तसेच निर्माणाधीन असलेल्या इतरही अनेक शासकीय इमारतींच्या कामाचा यावेळी आढावा घेण्यात आला.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) सी. पी. जोशी,सचिव (बांधकाम) अजित सगणे,मुख्य अभियंता पी. के. इंगोले,ठाणे जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता आर. टी. पाटील,रायगड जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता आर. एस. पाटील,रत्नागिरी जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता जे. डी. कुलकर्णी यांच्यासह अनेक प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

००००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/16.3.2020

अभियानाबाबत सजगता दाखवून जलस्त्रोतांची सक्रियपणे जपणूक करा- जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे आवाहन

आजपासून २२ मार्चपर्यंत जलजागृती अभियान मुंबई, दि. 16 : संपूर्ण जगात कोरोनाची साथ सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व नागरिक जागृत आहेत. ही बाब महत्त्वाची असून नागरिकांनी जलजागृती अभियानाबाबतही सजगता दाखवून जलस्त्रोतांची सक्रियपणे जपणूक करावी, असे आवाहन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले.

नैसर्गिक व मानवनिर्मित जलस्त्रोतांची जपणूक आपलेपणाने व्हावी, याबाबत लोकसहभागाबाबतची जागृती वाढविण्याच्या भूमिकेतून राज्यात जलजागृतीबाबत दिनांक 16 ते 22 मार्च या काळात अभियान राबविण्यात येत आहे. या जलजागृती सप्ताहाच्या निमित्ताने घरगुती, उद्योगधंद्यातील आणि शेतीसह हॉटेल-पर्यटन व्यवसायात काटकसरीने पाणी वापर करण्याचा आचार-विचार रुजवायचा आहे.

महाराष्ट्र राज्याचा विचार करता, राज्याच्या 307 लक्ष हेक्टर क्षेत्रफळापैकी लागवड योग्य क्षेत्रफळ 225 एवढे आहे. त्यापैकी 50.36 एवढ्या क्षेत्राला सिंचन प्रकल्पाचे पाणी लाभते आहे. आपल्या राज्याला गोदावरी, तापी, नर्मदा, कृष्णा आणि पश्चिम वाहिनी नद्यांची जलसंपत्ती लाभलेली आहे. या जलसंपत्तीची जोपासना करणे आपले कर्तव्य आहे, असेही श्री.पाटील यांनी सांगितले.

राज्यातील जलसंपदा वाढविण्यासाठी शासनाकडून चालू व पूर्णत्वाच्या मार्गावर असलेल्या प्रकल्पांना निधी उपलब्ध करुन हे प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्याचे काम सुरु आहे. तसेच राज्यातील नदीजोड प्रकल्प स्वबळावर पूर्ण करुन नेहमीच दुष्काळ असलेल्या मराठवाड्यासाठी कोकणातून पाणी वळविणे, मराठवाड्याच्या पिण्याच्या पाण्याची तहान भागविण्यासाठी बंद नलिका पाणी पुरवठा प्रणाली पूर्ण करणे. पाण्याचा पुनर्वापर तसेच पाण्याच्या पुनर्भरणाची व्याप्ती वाढविणे. हवाई सर्वेक्षणाच्या सहाय्याने अचूक सिंचन क्षेत्र निश्चित करणे. सिंचनासंबंधीचा प्रादेशिक अनुशेष दूर करणे, जलविद्युत ऊर्जा निर्माण करणे अशी कामे सुरु आहेत.

महत्त्वाचे म्हणजे पूर व हवामान बदलाचे संकेत तातडीने मिळण्याची व्यवस्था करणे. धरण पुनर्स्थापना व वितरण प्रणाली दुरुस्तीचे काम पूर्ण करुन प्रत्यक्ष सिंचनात वाढ करणे. सिंचन प्रकल्पाचे क्षेत्र पर्यटनस्थळे व्हावीत व त्या उत्पन्नातून देखभालीचा खर्च भागावा यासाठी पायाभूत उभारणी करणे ही कामे देखील सुरु आहेत.

जलजागृती सप्ताहाच्या प्रेरणेतून महाराष्ट्राला सर्वार्थाने सुजलाम् सुफलाम् करण्याचे स्वप्न प्रत्यक्ष कार्यानेच पूर्ण होणार आहे. आपल्या परिसराचे पाणी, पीक व पर्यावरणाचे ज्ञान, सामुहिक समन्वयाने आराखडा आणि शास्त्रशुद्ध कृती या चार तत्त्वांवर हे व्रत आपण अंगिकारल्यास भविष्यातील पिढ्या आनंदाने जलसमृद्धीत नांदू शकतील, असे आवाहन जलसंपदा मंत्री श्री.पाटील यांनी केले आहे.

000

यवतमाळ आणि नवी मुंबई येथे कोरोनाचा प्रत्येकी एक नवा रुग्ण; राज्यातील एकूण रुग्ण संख्या ३९ वर -आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

राज्यात १०८ लोक विलगिकरण कक्षात दाखल

मुंबई, दि.१६ : राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३९ झाली आहे. राज्यात १०८ लोक विलगिकरण कक्षात दाखल असून १०६३ होम क्वारंटाईन असून त्यापैकी ४४२ जणांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. यवतमाळ येथे कोरोना बाधित आढळलेली ५१ वर्षाची महिला ही दुबई सहलीला गेलेल्या चमूतील आहे. यामुळे यवतमाळ येथे आढळलेल्या रुग्णांची संख्या ३ झाली आहे. दुबईला गेलेल्या ४० जणांच्या चमूतील एकूण १५ जण कोरोना बाधित आढळले असून २२ जण निगेटिव्ह आढळले आहेत. या चमूतील बेळगाव येथील ३ जणांना कोणतीही लक्षणे नसल्याने त्यांना घरात विलग करण्यात आले आहे.

आज कोरोना बाधित आढळलेला दुसरा रुग्ण हा नवी मुंबई येथे आला होता, तो फिलिपाईन्सचा नागरिक आहे. आजपर्यंत फिलिपाईन्सहून नवी मुंबईत आलेल्या या १० जणांच्या चमूतील ३ जण कोरोना बाधित आढळले असून इतर ७ जण कोरोना निगेटिव्ह आढळले आहेत.

पिंपरी चिंचवड मनपा ९, पुणे मनपा ७, मुंबई ६, नागपूर ४, यवतमाळ, नवी मुंबई, कल्याण ३, रायगड, ठाणे, अहमदनगर, औरंगाबाद प्रत्येकी १ असे एकूण ३९ रुग्ण आढळून आले आहेत.

राज्यात आज ३१ संशयित रुग्णांना भरती करण्यात आले आहे. १६ मार्चपर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर १६६३ विमानांमधील १लाख ८९ हजार ८८८ प्रवासी तपासण्यात आले आहेत.

राज्यात आजपर्यंत राज्यात बाधित भागातून एकूण १०६३ प्रवासी आले आहेत. १८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत ७९४ जणांना भरती करण्यात आले आहे. आज पर्यंत भरती करण्यात आलेल्यांपैकी ७१७ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ३९ जण पॉझिटिव्ह आले आहेत.

केंद्र सरकारच्या सूचनेनुसार सर्व देशातील प्रवाशांची तपासणी विमानतळावर करण्यात येऊन त्यातील लक्षणे असणाऱ्या प्रवाशांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात येत आहे

राज्य नियंत्रण कक्ष ०२०/२६१२७३९४ टोल फ्री क्रमांक १०४

00000

अजय जाधव..१६.३.२०२०

किनारपट्टीच्या भागात जलवाहतूक सुरू करण्यास प्राधान्य – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती

भाऊचा धक्का ते मांडवा जेट्टी रो रो सेवेला सुरुवात

उद्घाटनाच्या औपचारिकतेपेक्षा सेवा सुरू होणे महत्त्वाचे 

मुंबई, दि. 15 : भाऊचा धक्का ते मांडवा जेट्टी ही रो रो सेवा म्हणजे महाराष्ट्राच्या जलवाहतुकीच्या सेवेतील मैलाचा दगड ठरेल. राज्याच्या किनारपट्टीमध्ये अशी जलवाहतूक फायदेशीर ठरेल हे लक्षात घेऊन अशी सेवा सुरू करण्यास प्राधान्य देण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

भाऊचा धक्का ते मांडवा रो पॅक्स फेरी सेवा आणि मांडवा टर्मिनल सेवा आजपासून सुरू झाली आहे.

कोरोना संदर्भातील परिस्थिती लक्षात घेता भाऊचा धक्का ते मांडवा रो रो सेवेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होणार नाही, असे कालच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. मात्र कार्यक्रमाच्या औपचारिकतेसाठी न थांबता प्रवाशांच्या सोयीसाठी लगेच ही सेवा सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. या सेवेस त्यांनी आज आपल्या शुभेच्छाही दिल्या.

या सेवेसाठी केंद्र आणि राज्य शासनाने मिळून मांडवा जेट्टी येथे 150 कोटी रुपये खर्चून सुविधा निर्माण केल्या आहेत. नवी मुंबईतील नेरुळ, बेलापूर येथून देखील लवकरच जलवाहतूक सुरू करण्याची तयारी आहे. भाईंदर ते डोंबिवली अशा जलवाहतुकीच्या आराखड्यास अंतिम मंजुरी मिळून दोन वर्षांत तीही सेवा सुरू होईल. एकूणच जलवाहतुकीच्या माध्यमातून पर्यटन व रोजगार वाढविला जाईल, असेही मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात.

भाऊचा धक्का ते मांडवा हे समुद्री अंतर 19 किमी असून या जलवाहतुकीने एक तासात कापता येते. रस्त्याने जाण्यासाठी चार तास लागतात. रो पॅक्सची क्षमता एकावेळी 500 प्रवासी आणि 145 वाहने नेण्याची आहे

रो रो सेवेची माहिती

भाऊचा धक्का ते मांडवा रो –पॅक्स सेवेमुळे प्रवासाचा वेळ तसेच इंधन खर्चात बचत होणार आहे. नवी मुंबई, पनवेल परिसरातील वाहतुकीची कोंडीही कमी होण्यास मदत होणार असून पर्यटनालाही चालना मिळणार आहे. भाऊचा धक्का येथील जेट्टी व टर्मिनलचे बांधकाम मुंबई पोर्ट ट्रस्टमार्फत करण्यात आलेले असून मांडवा येथील जेट्टीवर टर्मिनलचे बांधकाम महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डामार्फत करण्यात आले आहे .केंद्र शासनाची  सागरमाला योजना आणि राज्य शासनाकडून 50-50 टक्के या प्रमाणात निधी यासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. भाऊचा धक्का ते मांडवा दरम्यानच्या रो-पॅक्स सेवेसाठी एमटूएम जहाज मुंबईत दाखल झाले आहे. ०००

भाऊचा धक्का से मांडवा जेट्टी रो रो सेवा शुरू

उद्घाटन की औपचारिकता से जरूरी है यह सेवा शुरू होना

किनारपट्टी के परिसर में जलवाहतूक शुरू करने के लिए प्राथमिकता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. 15 : भाऊचा धक्का से मांडवा जेट्टी रो रो सेवा यानि महाराष्ट्र की जलवाहतुक की सेवा की मिल का पत्थर है। राज्य की किनारपट्टी में इस तरह की जलवाहतूक सेवा फायदेमंद साबित होगी, इस बात को ध्यान में रखते हुए यह सेवा शुरू करने के लिए प्राथमिकता दी गई है, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने इस दौरान कहा।

भाऊचा धक्का से मांडवा रो पैक्स फेरी सेवा और मांडवा टर्मिनल सेवा आज से शुरू हुई है ।

कोरोना संदर्भ की स्थिति को ध्यान में रखते हुए भाऊचा धक्का से मांडवा रो रो सेवा का उद्घाटन समारोह नहीं होगा, यह गत शनिवार को ही मुख्यमंत्री ने घोषित किया था। लेकिन कार्यक्रम की औपचारिकता के लिए न रुकते हुए यात्रियों की सुविधा हेतु यह सेवा तत्काल ही शुरू करने के निर्देश भी उन्होंने दिए। इस दौरान उन्होंने शुभाकांनाएं भी दी।

मुख्यमंत्री  ने अपने संदेश में कहा कि इस सेवा के लिए केंद्र और राज्य सरकार ने मिलकर मांडवा जेट्टी में 150 करोड़ रूपए खर्च करते हुए सुविधाओं का निर्माण किया है। नई मुंबई के नेरु, बेलापूर में भी जल्द ही जलवाहतूक शुरू करने की तैयारी में है। भाईंदर से डोंबिवली इस जलवाहतुक के प्रारूप को अंतिम मंजुरी मिलकर दो साल में वह भी सेवा शुरू होगी। पूरी स्थिति को देखते हुए जलवाहतुक के माध्यम से पर्यटन एवं रोजगार में वृद्धि होगी।

भाऊचा धक्का से मांडवा यह समुद्री दूरी (अंतर) 19 किमी है और यह दूरी जलवाहतुक से एक घंटे में पूरा की  जा सकती है। हालांकि रास्ते से जाने के लिए चार घंटे लगते है। इसके अलावा रो पॅक्स की एक समय में 500 यात्री और 145 वाहन ले जाने की क्षमता भी इसमें है।

रो रो सेवा की जानकारी

भाऊचा धक्का से मांडवा रो पॅक्स सेवा से यात्रा का समय और इंधन खर्च में  बचत होगी।  मुंबई, पनवेल परिसर के वाहतुक की समस्या कम होने में भी मदद होने के साथ-साथ पर्यटन को भी गति मिलेगी। भाऊचा धक्का स्थित जेट्टी एवं टर्मिनल का निर्माणकार्य मुंबई पोर्ट ट्रस्ट के जरिये किया गया है और मांडवा स्थित जेट्टीवर टर्मिनल का निर्माणकार्य महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड के जरिये किया गया है। केंद्र सरकार की सागरमाला योजना और राज्य सरकार की ओर से 50-50 फीसदी इस मात्रा में निधि इसके लिए उपलब्ध कराया गया है। भाऊचा धक्का से मांडवा की रो-पॅक्स सेवा के लिए एमटूएम जहाज मुंबई में दाखिल हुआ है

0000

Ro-Ro jetty service began from Bhaucha Dhakka to Mandawa

It is more important to start the service than to formal inauguration

Preference to start water transport in coastal areas- Chief Minister Uddhav Thackeray

Mumbai,15.March.20: Ro ro service from Bhaucha Dhakka to Mandawa Jetty will be a milestone in Maharashtra’s shipping service. Priority will be given to launch such service, considering that such transport will be beneficial in the coastal area of the state said Chief Minister Uddhav Thackeray.

Bhaucha Dhakka to Mandawa Row Pax ferry service and Mandawa Terminal services have started from today.

Taking into account the situation in the context of the Corona, the Chief Minister had yesterday announced that the inauguration program of this service would not be conducted.  However, he had instructed to start this service immediately for the convenience of the travelers, without stopping for the formality of the program. He also extended his best wishes to this service today

For this service, the Central and State Government have jointly created facilities at Mandawa Jetty at a cost of Rs 150 crore. Preparations are also underway to start the service from Nerul, Belapur in Navi Mumbai. The same service will be launched in two years with final approval for the transport of Bhainder to Dombivali. The Chief Minister said in his message that tourism and employment would be increased through overall transportation.

The distance of Bhaucha Dhakka to Mandawa is 19 km. It can be covered in one hour by this freight. It takes four hours to reach by the road. The Row Packs have the capacity to carry 500 passengers and 145 vehicles at a time

Ro ro Service Information

Bhaucha Dhakka to Mandawa ro-pax service will save travel time and fuel costs. It will reduce the traffic congestion in the Panvel and Navi Mumbai area and also boost tourism. The jetty and terminal at Bhaucha Dhakka has been constructed by the Mumbai Port Trust and the terminal has been constructed on the Jetty at Mandawa by the Maharashtra Maritime Board .The Central Government has provided the Sagarmala scheme and 50-50 percent funds from the State Government. The M2M ship has landed in Mumbai for Ro-Pax service between Bhaucha Dhakka to Mandawa.

०००

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सदानंद फुलझेले यांच्या निधनाने समर्पित नेतृत्व पडद्याआड- उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. १५ : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सदानंद फुलझेले यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुःख व्यक्त केले असून, समर्पित नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे, अशा शब्दात त्यांनी श्रद्धांजली वाहिली.

उपमुख्यमंत्री श्री. पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सदानंद फुलझेले यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव म्हणून केलेलं काम सर्वांच्या स्मरणात राहील. नागपूर दीक्षाभूमीसाठी त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी, सच्चे अनुयायी अशी त्यांची ओळख होती. सर्वसामान्य कुटूंबातील मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी प्रयत्न केले. संपूर्ण आयुष्य त्यांनी समाज हितासाठी वाहिलं. त्यांचे विचार, कार्य सदैव स्मरणात राहील.

ताज्या बातम्या

प्लास्टिकचे वापर टाळा, कापडी पिशवी वापर करा, पर्यावरणाचे संरक्षण करा -पंकजाताई मुंडे

0
सोलापूर, दि. ७ - श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट येथे पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी भेट देऊन प्लास्टिक बंदी बाबत सर्व भक्तांना आवाहन...

नवउद्योजकांसाठी डॉ.प्रमोद चौधरी यांचे पुस्तक प्रेरक ठरेल-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पुणे, दि. ७ : भारताची भविष्यातील  वाटचाल आणि कार्बनचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी आवश्यक वाटचालीचा रोडमॅप डॉ. प्रमोद चौधरी यांच्या पुस्तकातून मांडण्यात आला आहे. पुस्तकात...

मॉडेल सोलर व्हिलेज योजना

0
सूर्यघर मुफ्त बिजली योजनेंतर्गत ‘मॉडेल सोलर व्हिलेज’ ही गावांना प्रोत्साहन देणारी योजना राबवित आहे. या योजनेविषयी ही माहिती... आपला भारत देश‌ पर्यायाने महाराष्ट्र राज्य आणि...

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कामांना वेळेत पूर्ण करा -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे...

0
नागपूर, दि.७ : ज्यांना निवारा नाही त्यांना साध्या दोन खोलीच्या घराची अपेक्षा असते. गावठान व गावठाणांच्या बाहेर घरकुलांसाठी समान न्यायांची भुमिका शासनाची आहे. घरकुलासाठी...

सामाजिक न्याय विभागाचे विविध पुरस्कार जाहीर

0
मुंबई, दि. ७ जून : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, राज्यातील एकूण...