शनिवार, मे 3, 2025
Home Blog Page 1661

राष्ट्रपतींच्या हस्ते शारदा दाते यांना वयोश्रेष्ठ प्रतिष्ठित माता राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली,03 : कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील शारदा दाते यांना राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते आज‘वयोश्रेष्ठ प्रतिष्ठित माता राष्ट्रीय पुरस्कार’प्रदान करण्यात आला.

केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या वतीने 1 ऑक्टोबर या आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात‘वयोश्रेष्ठ  पुरस्कार-2019’प्रदान करण्यात आले. केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री थावरचंद गहलोत,राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर आणि विभागाच्या सचिव निलम साहनी,अतिरिक्त सचिव उपमा श्रीवास्तव  यावेळी मंचावर उपस्थित होत्या.

उल्लेखनीय योगदानासाठी 12 श्रेणींमध्ये देशातील व्यक्ती व संस्थांना यावेळी एकूण  15 पुरस्कार प्रदान करण्यात आले. स्वत:च्या असाध्य रोगावर मात करत आपल्या गतिमंद मुलाला इंटरनॅशनल सेलिब्रेटी बनविण्याची किमया करणाऱ्या इचलकरंजी येथील शारदा दाते यांना यावेळी‘वयोश्रेष्ठ प्रतिष्ठित माता पुरस्काराने गौरविण्यात आले. 2 लाख 50 हजार रुपये आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

शारदा दाते स्वत: कर्करोगाने ग्रस्त असून लग्नानंतर तब्बल 10 वर्षांनी त्यांच्या पोटी प्रथमेश हा गतिमंद मुलगा जन्माला आला. अशा कठीण समयी डगमगून न जाता  त्यांनी परिस्थितीचा  समर्थपणे सामना केला. आपल्या गतिमंद मुलाच्या प्रगतीसाठी त्यांनी कष्ट उपसले व मुलाला घडवत मातृत्वाचा आदर्श निर्माण केला. मुलावर उपचार सुरु असतानाच त्याचे शिक्षणही पूर्ण केले आणि त्याला स्वत:च्या पायावर उभे केले. प्रथमेश सारख्या गतिमंद मुलांच्या कल्याणासाठी कार्यरत संस्थांसोबत गेल्या 10 वर्षांपासून श्रीमती दाते जुळल्या असून आपले योगदान देत आहेत.

इचलकरंजी येथील डी.के.टी.ई. संस्थेच्या टेक्स्टाइल इंजिनिअरींग कॉलेजमध्ये गेल्या 11 वर्षांपासून प्रथमेश हा ग्रंथपाल सहायक म्हणून कार्यरत आहे. त्याच्या कर्तृत्वाचा सन्मान म्हणून प्रथमेशला राष्ट्रीय दिव्यांग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. प्रथमेशच्या आदर्शवत कार्याचे कौतुक म्हणून त्याला स्वानुभव कथनासाठी देश-विदेशातून आमंत्रणही येतात तो आता इंटरनॅशनल सेलिब्रेटी  झाला आहे.  

शारदा दाते यांनी समाजापुढे घालून दिलेल्या आदर्शामुळेच त्यांना या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले .

00000

रितेश भुयार /वृत विशेष क्र.227 / दि.03.10.2019                             

आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी शासकीय विभागांनी सक्रिय व्हावे – अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांचे आवाहन

मुंबई,दि.3 :शासकीय विभागांनी निवडणूक प्रक्रियेदरम्यान आदर्श आचारसंहितेच्या चौकटीत निर्णय घ्यावेत;तसेच आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करुन निवडणूक प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी सहयोग द्यावा,असे आवाहन अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी आज केले.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेसंदर्भात प्रशासकीय विभागांची कार्यशाळा मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव,वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे,सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे,सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव अंशु सिन्हा,संसदीय कार्य विभागाचे सचिव राजेंद्र भागवत आदी उपस्थित होते.

आदर्श आचारसंहिता अस्तित्वात असताना काय करावे आणि काय करु नये यासंदर्भात माहिती देण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी सुरू असलेले उपक्रम,योजना सुरू ठेवता येतील;तथापि,नव्याने सुरू करता येणार नाहीत. आपत्तीच्या प्रसंगी व पुनर्वसन कार्याबाबत प्रचलित नियमानुसार मदतकार्य  करता येईल,असे श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी पुण्याचे अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. त्यांनी सांगितले की,निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्याच्या27ऑक्टोबर या दिवसापर्यंत आदर्श आचारसंहिता लागू राहणार आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर शासकीय तसेच अधिनस्त कार्यालये,महामंडळांच्या संकेतस्थळावरील राजकीय व्यक्तींची छायाचित्रे त्यांचे संदेश तसेच प्रसिद्धीपत्रके काढून टाकण्यात आल्याबाबत खात्री करावी.

शासकीय इमारतींवर कोणत्याही प्रकारचे राजकीय प्रचारसाहित्य लावलेले नाही याची खात्री करुन घ्यावी. अद्यापही कार्यवाही झालेली नसल्यास ते काढून टाकण्यासह गुन्हा दाखल करावा. तसेच शासकीय मालमत्तेचे विद्रुपीकरण,ध्वनिक्षेपकांचा वापर,शासकीय वाहनांचा वापर,उमेदवारांच्या निवडणूक खर्चाचा हिशोब ठेवणे,सभांचे चित्रीकरण,निवडणूक आयोगाकडून विकसित केलेले‘सी-व्हिजिल’ॲपवर येणाऱ्या तक्रारींना प्रतिसाद देणे आदी बाबतच्या तरतुदींची माहिती यावेळी देण्यात आली.

बैठकीस सहमुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड यांच्यासह विविध मंत्रालयीन विभागांचे सहसचिव,उपसचिव उपस्थित होते.

०००

सचिन गाढवे/वि.सं.अ./दि.3.10.2019

Government departments should be active for the implementation of the model code of conduct in the state – Additional Chief Election Officer, Dilip Shinde

Mumbai, 3.Oct.19: “Government departments should make decisions during the election process within the framework of the model code of conduct. The code of conduct should be implemented in the state in order to make the election process successful” appealed the Additional Chief Election Officer Dilip Shinde.

He was speaking in the workshop of the administrative departments organized to inform about model code of conduct at the Ministry on behalf of the Chief Election Officer in accordance with the assembly elections. In this workshop information provided on does and don’ts when the model code of conduct exists in the state during the whole election process.

Additional Chief Secretary of Revenue Department Manukumar Srivastav, Principal Secretary of Forest Department Vikas Kharge, Principal Secretary of the department of Social Justice, Dinesh Waghmare, Secretary of General Administration Department Anshu Sinha, Secretary of Parliamentary Affairs Department, Rajendra Bhagwat and others concern officers were prominently present.

Mr. Shinde further stated that activities and projects that were ongoing before the start of the election process can be continued; however, new ones cannot be started. Assistance can be taken if there are any kind of disaster and rehabilitation works as per prevailing norms.

“Model code of conduct will remain in force until 27th October, when the entire election process is completed. Admistration should be ensure that photographs of political persons and their messages on the websites of corporations , government and subordinate offices are removed after the code of conduct is implemented in the state “ said Additional Collector of Pune, Sahebrao Gaikwad. He gave the information through a presentation.

Mr. Gaikwad further told that system make sure there should not be any kind of political propaganda is placed on government buildings. If there is still no action taken in this concern then remove such material immediately and take strict action against it.

In this workshop, information provided about the disinvestment of government property, use of sound cameras, use of government vehicles, keeping track of candidates’ election expenditure, filming of meetings, responding to complaints on the C-Vigil app developed by the Election Commission.

The meeting was attended by Deputy Chief Electoral Officer, Shirish Mohod, along with several secretaries and deputy secretaries of various departments of ministry.

00000

आदर्श आचारसंहिता के क्रियान्वयन के लिए सरकारी विभाग सक्रिय हो जाए -अतिरिक्त मुख्य चुनाव अधिकारी दिलीप शिंदे

मुंबई, दि. 3 : सरकारी विभागों ने चुनाव प्रक्रिया के दौरान आदर्श आचारसंहिता के नियमों में रहकर ही निर्णय लेना चाहिए, साथ ही आचारसंहिता का सूक्ष्म तरीके से क्रियान्वयन कर चुनाव प्रक्रिया सफल करने के लिए सहयोग देने का आवाहन अतिरिक्त मुख्य चुनाव अधिकारी दिलीप शिंदे ने आज किया। मंत्रालय में विधानसभा चुनाव के मद्देनजर आदर्श आचारसंहिता के संदर्भ में प्रशासकीय विभागों की कार्यशाला मुख्य चुनाव अधिकारी कार्यालय की ओर से आयोजित की गई थी। इस दौरान राजस्व विभाग के अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तववन विभाग के प्रधान सचिव विकास खारगे, सामाजिक न्याय विभाग के प्रधान सचिव दिनेश वाघमारेसामान्य प्रशासन विभाग की सचिव अंशु सिन्हासंसदीय कार्य विभाग के सचिव राजेंद्र भागवत आदि उपस्थित थे।

कार्यशाला में आदर्श आचारसंहिता अस्तित्व में रहते हुये क्या करना चाहिए और क्या नहीं, इस संदर्भ में जानकारी देने के लिए आयोजित की गई थी। श्री. शिंदे  ने इस दौरान बताया कि चुनाव प्रक्रिया शुरू होने से पहले जो उपक्रम, योजनाएं शुरू रख सकते है, लेकिन नए से शुरू नहीं कर सकेंगे।  आपदा के समय एवं पुनर्वसन कार्य को लेकर प्रचलित नियमों के अनुसार मददकार्य किया जा सकेगा। 

इस दौरान पुणे के अपर जिलाधिकारी साहेबराव गायकवाड ने प्रस्तुतिकरण के द्वारा उपस्थितों को जानकारी दी।  चुनाव की प्रक्रिया पूरी होने की यानि की 27 अक्तूबर इस दिन तक आदर्श आचारसंहिता लागू रहेगी। आचारसंहिता लागू होने के बाद शासकीय एवं अधिनस्त कार्यालय, महामंडल की वेबसाइट की राजनीतिक व्यक्ति के फोटो, उनके संदेश और  प्रसिद्धीपत्रक हटाने को लेकर खातरजमा करें।

शासकीय इमारतों पर किसी भी प्रकार का राजकीय प्रचारसाहित्य तो लगाया नहीं है, इस बात की भी खारतजमा करें। अभी तक कार्यवाही नहीं हुई हो, तब उसे निकालने समेत मामला दर्ज करे। साथ ही सरकारी मालमत्ता का विद्रुपीकरण, ध्वनीक्षेपका का उपयोग, सरकारी वाहनों का उपयोग, उम्मीदवारों का चुनाव खर्च का हिसाब रखना, सभा का चित्रीकरण, चुनाव आयोग की ओर से विकसित किए गए सी-विजिलॲप पर प्राप्त शिकायतों को  प्रतिसाद देना आदि को लेकर प्रावधान की जानकारी भी इस दौरान दी गई।

बैठक में सहमुख्य चुनाव अधिकारी शिरीष मोहोड समेत विविध मंत्रालयीन विभागों के सहसचिव, उपसचिव उपस्थित थे।

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आज १ हजार ४२३ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल

अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी श्री. दिलीप शिंदे यांची  माहिती

मुंबई, दि. ०३ : विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यात विविध मतदारसंघांमध्ये १ हजार ४२३ उमेदवारांनी १ हजार ९६९ नामनिर्देशनपत्रे दाखल केली. आजपर्यंत एकूण १ हजार ७९२ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी श्री. दिलीप शिंदे यांनी दिली. नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याची अंतिम मुदत उद्या ४ ऑक्टोबर २०१९ पर्यंत आहे

नंदुरबार जिल्ह्यात आज ४ मतदारसंघात १५ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केली. धुळे जिल्ह्यात ५ मतदारसंघात १६ उमेदवार, जळगाव जिल्ह्यात ११ मतदारसंघात ५२ उमेदवार, बुलढाणा जिल्ह्यात ७ मतदारसंघात २६ उमेदवार, अकोला जिल्ह्यात ५ मतदारसंघात ३४ उमेदवार, वाशिम जिल्ह्यात ३ मतदारसंघात १५ उमेदवार, अमरावती जिल्ह्यात ८ मतदारसंघात ३९ उमेदवार, वर्धा जिल्ह्यात ४ मतदारसंघात २० उमेदवार, नागपूर जिल्ह्यात १२ मतदारसंघात ४० उमेदवार, भंडारा जिल्ह्यात ३ मतदारसंघात २० उमेदवार, गोंदिया जिल्ह्यात ४ मतदारसंघात २२ उमेदवार, गडचिरोली जिल्ह्यात ३ मतदारसंघात १० उमेदवार, चंद्रपूर जिल्ह्यात ४ मतदारसंघात २१ उमेदवार, यवतमाळ जिल्ह्यात ७ मतदारसंघात ३७ उमेदवार, नांदेड जिल्ह्यात ९ मतदारसंघात ९० उमेदवार, हिंगोली जिल्ह्यात ३ मतदारसंघात १७ उमेदवार, परभणी जिल्ह्यात ४ मतदारसंघात २६ उमेदवार, जालना जिल्ह्यात ४ मतदारसंघात ४६ उमेदवार, औरंगाबाद जिल्ह्यात ९ मतदारसंघात ५९ उमेदवार, नाशिक जिल्ह्यात १५ मतदारसंघात ६० उमेदवार, पालघर जिल्ह्यात ६ मतदारसंघात २६ उमेदवार, ठाणे जिल्ह्यात १८ मतदारसंघात ६४ उमेदवार, मुंबई उपनगर जिल्ह्यात २६ मतदारसंघात ९८ उमेदवार, मुंबई शहर जिल्ह्यात १० मतदारसंघात ३० उमेदवार, रायगड जिल्ह्यात ७ मतदारसंघात ४० उमेदवार, पुणे जिल्ह्यात २१ मतदारसंघात १०१ उमेदवार, अहमदनगर जिल्ह्यात १२ मतदारसंघात ५० उमेदवार, बीड जिल्ह्यात ६ मतदारसंघात ६४ उमेदवार, लातूर जिल्ह्यात ६ मतदारसंघात ३३ उमेदवार, उस्मानाबाद जिल्ह्यात ४ मतदारसंघात २२ उमेदवार, सोलापूर जिल्ह्यात ११ मतदारसंघात ८० उमेदवार, सातारा जिल्ह्यात ८ मतदारसंघात ३१ उमेदवार, रत्नागिरी जिल्ह्यात ५ मतदारसंघात १३ उमेदवार, सिंधुदूर्ग जिल्ह्यात ३ मतदारसंघात ५ उमेदवार, कोल्हापूर जिल्ह्यात १० मतदारसंघात ६५ उमेदवार, सांगली जिल्ह्यात ८ मतदारसंघात ३७ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केली.

अर्कांसास गव्हर्नर एसा हचिंसन आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट

मुंबई, दि. 2 ऑक्टोबर :अमेरिकेच्या दक्षिणेला असलेल्या अर्कांसास राज्याचे गव्हर्नर एसा हचिंसन यांनी आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली.

अर्कांसास हे भात शेती आणि कापूस उत्पादनात देखील अग्रेसर आहे. कापूस उत्पादन क्षेत्रात महाराष्ट्राला सहकार्य करण्यास अर्कांसास तयार असल्याचे एसा हचिंसन यांनी यावेळी सांगितले.

अर्कांसास येथे मुख्यालय असलेल्या वॉलमार्ट या बहुराष्ट्रीय कंपनीच्या भारतात 27 शाखा असून भारतातील वेलस्पन तसेच अनेक माहिती तंत्रज्ञान कंपन्या देखील अर्कांसास राज्यात कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र व अर्कांसासमध्ये सहाकार्याचे पर्व सुरु झाल्याने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी यावेळी आनंद व्यक्त केला.

अर्कांसास गव्हर्नर यांचे सोबत आलेल्या शिष्टमंडळात वेलस्पण कंपनीचे अर्कांसास येथील मुख्य अधिकारी राजेश चोखाणी उपस्थित होते. 0 0 0 0

Arkansas and Maharashtra can collaborate in cotton growing’ : Governor Asa Hutchinson

Mumbai, २nd Octomber : The Governor of America’s southern State of Arkansas Asa Hutchinson today expressed the willingness for cooperation with Maharashtra in the area of cotton growing.

Stating that Arkansas is America’s largest producer of rice and a leader in the production of cotton, he said Arkansas can collaborate with Maharashtra in growing cotton.

The Arkansas Governor was speaking to the Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan, Mumbai on Wednesday (२ Oct).

The Arkansas Governor told Maharashtra Governor that global retail leader Walmart was headquartered in Arkansas. He informed that Walmart has २७ stores in India. He told the Governor that Indian company Welspun is based in Arkansas and so did many Information Technology companies.

Governor Koshyari expressed the hope that business collaboration between Maharashtra and Arkansas will open new vistas of development.

The high level delegation accompanying the Arkansas Governor included the Chief Operating Officer of Welspun Rajesh Chokhani.

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांना जयंतीदिनी अभिवादन

मुंबई,दि.२ ऑक्टोबर :महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त तसेच दिवंगत पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या ११५ व्या जयंतीनिमित्त आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.यावेळी अमेरिकेतील अर्कांसास राज्याचे गव्हर्नर एसा हचिन्सन हे शिष्टमंडळासह विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

विधानभवन

विधानभवन येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या१५०व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानमंडळ सचिवालयाचे उपसचिव विलास आठवले, उपसचिव ऋतूराज कुरतडकर, सभापतींचे सचिव महेंद्र काज, विधानसभा अध्यक्षांचे सचिव राजकुमार सागर, अवर सचिव रवींद्र जगदाळे, अवर सचिव सुनील झोरे आदी उपस्थित होते.

वर्षा निवासस्थान

राष्ट्रपिता महात्मा गांधी व दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्षा या शासकीय निवासस्थानी पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. यावेळी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

नवी दिल्ली

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी  प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांची जयंती आज महाराष्ट्र सदनात साजरी करण्यात आली. सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी येथील सांगली मेस वस्तीमध्ये जागरूकता अभियानही राबविण्यात आले.

कस्तुरबा गांधी मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त समीर सहाय यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी गुंतवणूक व राजशिष्टाचार आयुक्त श्यामलाल गोयल, सहायक निवासी आयुक्त सुमन चंद्रा, विजय कायरकर, महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांच्यासह महाराष्ट्र सदन तसेच महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

गुंतवणूक व राजशिष्टाचार आयुक्त श्यामलाल गोयल यांनी उपस्थित अधिकारी – कर्मचाऱ्यांना सिंगल यूज प्लास्टिकचा उपयोग टाळण्याबाबत शपथ दिली. यावेळी, उपसंचालक श्री. कांबळे यांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या योगदानाबाबत उपस्थिताना मार्गदर्शन केले.

सिंगल प्लास्टिक यूजला गुडबायकरण्याचा संदेश

तत्पूर्वी, महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधत महाराष्ट्र सदनाच्या परिसरातील सांगली मेस वसतीमध्ये सिंगल प्लास्टिक यूज टाळण्यासाठी जागरूकता अभियाही राबविण्यात आले. गुंतवणूक व राजशिष्टाचार आयुक्त श्यामलाल गोयल आणि निवासी आयुक्त समीर सहाय यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी कर्मचारी या अभियानात सहभागी झाले होते. सांगली मेस वस्तीच्या प्रत्येक घरात जावून त्यांना यावेळी कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले आणि सिंगल प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर टाळण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

गांधींचे विचार आचरणात आणा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

श्री. षण्मुखानंद फाइन आर्ट आणि संगीत सभेचा महात्मा गांधीजींच्या 150व्या जयंतीनिमित्त  विशेष कार्यक्रम

मुंबई, २ ऑक्टोबर : गांधींवर आजपर्यंत खूप साहित्य लिहिल्या गेले अनेक थोर लेखकांनी त्यांच्या शब्दातून महात्माजींचे जीवन उलगडले परंतु तरीही आपण गांधींना विसरलो असे परखड मत व्यक्त करून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महात्मा गांधींना खरे अभिवादन करायचे असल्यास त्यांना आचरणात आणण्याचा मोलाचा सल्ला दिला.

सायन स्थित षण्मुखानंद हॉल येथे षण्मुखानंद फाइन आर्ट आणि संगीत सभेच्या वतीने महात्मा गांधीजींच्या 150व्या जयंतीनिमित्त एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात नृत्य आणि संगीताचे शानदार कार्यक्रम प्रस्तूत झाले. कार्यक्रमाला पंडित कल्याणसुंदरम्, गांधीजींचे पणतू डॉ. आनंद गोकानी, डॉ. वी शंकर आणि लक्ष्मी रामास्वामी यांची उपस्थिती होती.

राज्यपाल म्हणाले, गांधीजींच्या जयंतीनिमित्त असे कार्यक्रम आयोजित करण्यासोबतच आपण त्यांच्या प्रत्यक्ष विचारांवर चालायला शिकलो पाहिजे. यासाठी आपण स्वच्छतेचा आग्रह धरायला हवा. सोबतच आपण भारतीय संस्कृतीची जपवणूक करायला हवी. पाश्चात्यांचे अनुसरण करणे चुकीचे आहे. महात्माजींनी परदेशात शिक्षण घेऊनही भारतीय संस्कृती त्यागली नाही. त्यांचे अनुकरन करून आपण आध्यात्म आणि भारतीय संस्कृतीकडे वळायला हवे असे विचार राज्यपालांनी व्यक्त केले.

गांधीजींचे पणतू डॉ. आनंद गोकानी म्हणाले, गांधीजी प्रत्येक माणसात अस्तित्वात आहे. पण त्याला ओळखण्याची गरज आहे. सत्य आणि धैर्य या दोन गोष्टी जर प्रत्येकाने अंगिकारल्या तर गांधीजींचे स्वप्न साकार होईल. गांधी काळाची गरज आहे, आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना जोपासा असे ते म्हणाले. यावेळी डॉ. वी शंकर यांनी देखील विचार व्यकत केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.

मंत्रालयात सिंगल यूज प्लास्टिकला ‘गुडबाय’; मुख्य सचिवांसह अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली प्लास्टिकमुक्तीची शपथ

मुंबई, दि. १ : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्ताने ‘ स्वच्छता एक सेवाहा उपक्रम राज्यभर राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत मंत्रालयात प्लास्टिक वस्तूंचा त्याग करून पर्यावरणाच्या रक्षणात योगदान देण्याची  शपथ आज राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी घेतली तसेच मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांनाही शपथ दिली.

‘स्वच्छता ही सेवा’ ही मोहिम ११ सप्टेंबर ते २७ ऑक्टोबर २०१९ या कालावधीत राबविला जात आहे. मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात नगरविकास विभागाने आयोजित केलेल्या’गुडबाय सिंगल यूज प्लास्टिक‘या उपक्रमात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शपथ घेतली.

यावेळी मुख्य सचिव श्री. मेहता म्हणाले की, आजपासून मी सिंगल यूज प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर करणार नाही. मी सिंगल यूज प्लास्टिकच्या वस्तूंचा त्याग करुन विश्व पर्यावरण रक्षणात माझेही योगदान देईन. माझी हीच कृती बापूजींच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांना वाहिलेली आदरांजली असेल, असेही श्री.महेता यांनी सांगितले.

यावेळी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक,  पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव अनिल डिग्गीकर, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती मनिषा म्हैसकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक, उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार, पदुम विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग सचिव दिनेश वाघमारे, वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, अल्पसंख्याक विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे, सचिव विनिता वेद-सिंगल आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सिंगल युज प्लास्टिकला गुडबाय करण्याच्या या मोहिमेमुळे नागरिकांत जागृती होईल. ‘आता आपल्यामुळेच फरक पडेल’, असे घोषवाक्य वापरत सिंगल युज प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन नगरविकास विभागामार्फत करण्यात आले आहे. 0000

मंत्रालय में सिंगल यूज प्लास्टिक कोगुडबाय

मुख्य सचिव समेत अधिकारी-कर्मचारियों ने ली प्लास्टिक मुक्ति की शपथ

मुंबई, दि. १ : राष्ट्रपिता महात्मा गांधी की १५० वीं जयंति के उपलक्ष्य में स्वच्छता एक सेवायह उपक्रम पूरे राज्य में चलाया जा रहा है।  इस उपक्रम के अंतर्गत मंत्रालय में प्लास्टिक वस्तुओं का त्याग कर पर्यावरण की सुरक्षा में योगदान देने की शपथ आज राज्य के मुख्य सचिव अजोय मेहता ने ली और मंत्रालय के वरिष्ठ  अधिकारी एवं कर्मचारियों को  शपथ दिलाई।

स्वच्छता ही सेवायह अभियान ११ सितंबर से २७ अक्तूबर २०१९ इस अवधि तक चलाया जा रहा है। नगरविकास विभाग द्वारा मंत्रालय के त्रिमुर्ती प्रांगण में आयोजित गुडबायसिंगल यूज प्लास्टिक’  इस उपक्रम में अधिकारी एवं कर्मचारियों ने शपथ ली।

इस दौरान मुख्य सचिव श्री. मेहता ने कहा कि आज से मैं सिंगल यूज प्लास्टिक के वस्तुओं का उपयोग नहीं करूंगा। मैं सिंगल यूज प्लास्टिक के वस्तुओं का त्याग कर विश्व पर्यावरण सुरक्षा में मैं अपना योगदान दूंगा। यहीं मेरा कार्य बापुजीं के १५० वीं जयंति के अवसर पर उन्हें दी हुई आदरांजली रहेगी।

कार्यक्रम में राजस्व विभाग के अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, कौशल विकास एवं उद्योजकता विभाग के अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिकपर्यावरण विभाग के प्रधान सचिव अनिल डिग्गीकर, नगरविकास विभाग की प्रधान सचिव श्रीमती मनिषा म्हैसकर, सार्वजनिक निर्माणकार्य विभाग के प्रधान सचिव मनोज सौनिक, उद्योग, उर्जा एवं कामगार विभाग के प्रधान सचिव राजेश कुमार, पदुम विभाग के प्रधान सचिव अनुप कुमार, सामाजिक न्याय एवं विशेष सहाय विभाग के सचिव दिनेश वाघमारे, वन विभाग के प्रधान सचिव विकास खारगे, अल्पसंख्यक विभाग के प्रधान सचिव श्याम तागडे, सचिव श्रीमती विनीता वेद-सिंघल समेत मंत्रालय के विविध विभागों के वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे। 

सिंगल युज प्लास्टिक को गुडबाय करने की इस अभियान से नागरिकों में पर्यावरण की सुरक्षा के प्रति जनजागरण होगा।‘अब हमसे ही होगा परिवर्तन’ (आता आपल्यामुळेच फरक पडेल’) इस घोषवाक्य का आवाहन नगरविकास विभाग की ओर से किया गया है।

००००

शारदा दाते यांना वयोश्रेष्ठ प्रतिष्ठित माता राष्ट्रीय पुरस्कार; गुरुवारी राष्ट्रपतींच्या हस्ते होणार सन्मान

नवी दिल्ली, 01 : कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील शारदा दाते यांची वयोश्रेष्ठ प्रतिष्ठित माता राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली असून 3 ऑक्टोबर 2019 रोजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या वतीने उल्लेखनीय योगदानासाठी दरवर्षी वयोश्रेष्ठ पुरस्कार प्रदान करण्यात येतात. स्वत:च्या असाध्य रोगावर मात करत आपल्या गतिमंद मुलाला इंटरनॅशनल सेलिब्रेटी बनविण्याची किमया करणाऱ्या इंचलकरंजी येथील शारदा दाते यांची या वर्षीच्या वयोश्रेष्ठ  प्रतिष्ठित माता पुरस्कारासाठी निवड झाली आहे. २ लाख ५० हजार रुपये आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

शारदा दाते स्वत: कर्करोगाने ग्रस्त असून त्यांच्या पोटी प्रथमेश हा गतिमंद मुलगा जन्माला आला. असाध्य रोगाच्या यातना असतानाही मुलाच्या  गतिमंदत्वाने डगमगून न जाता  शारदा दाते यांनी या दोन्हींचा समर्थपणे सामना केला. आपल्या गतिमंद मुलाच्या प्रगतीसाठी त्यांनी जीवाचे रान करत मातृत्वाचा आदर्श निर्माण केला. मुलावर उपचार सुरु असतानाच त्याचे शिक्षणही पूर्ण केले आणि त्याला स्वत:च्या पायावर उभे केले.

इचलकरंजी येथील डी.के.टी.ई. संस्थेच्या टेक्स्टाइल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेल्या ११ वर्षांपासून प्रथमेश हा ग्रंथपाल  सहायक म्हणून कार्यरत आहे. त्याच्या याच कर्तृत्वाचा सन्मान म्हणून प्रथमेशला राष्ट्रीय दिव्यांग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.  प्रथमेशच्या आदर्शवत कार्याचे कौतुक म्हणून त्याला स्वानुभव कथनासाठी देश-विदेशातून आमंत्रणही येतात तो आता इंटरनॅशनल सेलिब्रेटी  झाला आहे.

शारदा दाते या आईच्या कष्टाचेच हे फळ असून गौरवाची बाब म्हणजे या मुलाला घडवत त्याला राष्ट्रीय पुरस्कार विजेता बनविणाऱ्या मातेलाही आता राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. शारदा दाते यांनी समाजापुढे घालून दिलेल्या श्रेष्ठ मातेच्या आदर्शामुळेच त्यांची या पुरस्कारासाठी‍ निवड झाली आहे.

येथील विज्ञान भवनात ३ ऑक्टोबर २०१९ रोजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते शारदा दाते यांना  गौरविण्यात येणार आहे.

०००००

रितेश भुयार /वृत विशेष क्र.225 / दि.01.10.2019

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात १ लाख ३५ हजार ‘व्हीव्हीपॅट’ यंत्र उपलब्ध

मुंबई, दि. 1 : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी96 हजार 661 मतदान केंद्रांसाठी 1 लाख 79 हजार 895 मतदान यंत्र (बॅलेट युनिट)  आणि 1 लाख 26 हजार 505 नियंत्रण युनिट (कंट्रोल युनिट) तर सुमारे एक लाख 35 हजार 21 व्हीव्हीपॅट  (व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट्रेल) यंत्र देण्यात आले आहेत. त्यामध्ये राखीव यंत्रांचा देखील समावेश आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणेची लगबग सुरु आहे. मतदानासाठी बॅलेट युनिट (बीयू) आणि कंट्रोल युनिट (सीयू) महत्त्वाची भूमिका बजावतात. त्याच्या जोडीला यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात प्रथमच व्हीव्हीपॅटचा वापर होणार आहे. यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वप्रथम व्हीव्हीपॅट वापरण्यात आले होते.

या सर्व यंत्रांची राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमक्ष प्रथमस्तरीय तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. यंत्रांची पुरेशी उपलब्धता असून राखीव यंत्रांचा देखील त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली आहे.

००००

अजय जाधव/विसंअ/1.10.2019 0000

विधानसभा चुनाव के लिए1 लाख 35 हजार व्हीव्हीपॅट

मुंबई, दिनांक 1: राज्य के विधानसभा सभा चुनाव में 96 हजार 661 मतदान केंद्रों पर 1 लाख 79 हजार 895 बॅलेट युनीट (बीयू) और 1 लाख 26 हजार 505 कंट्रोल यूनिट (सीयु) उपलब्ध कराई गई हैं। साथ ही एक लाख 35 हजार 255 व्हीव्हीपॅट उपकरण प्रदान किये गये हैं। इसमें से कुछ मशीनों को रिजर्व करके भी रखा जाएगा।

विधानसभा चुनाव के लिए प्रशासनिक व्यवस्था शुरू हो गई है। मतदान के लिए बैलेट यूनिट (बीयू) और कंट्रोल यूनिट (सीयू) महत्वपूर्ण भूमिका निभाती है। इनकी जोड़ी के लिए पहली बार इस साल राज्य के विधानसभा चुनाव में व्हीव्हीपॅटी का प्रयोग किया जाएगा। इसी साल सम्पन्न हुए लोकसभा चुनाव में पहली बार व्हीव्हीपॅटी का प्रयोग किया गया था।

इन सभी उपकरणों का राजनीतिक दलों के प्रतिनिधियों के समक्ष पहले स्तर का निरीक्षण को पूरा कर लिया गया हैं। ईवीएम और वीवीपीएटी उपकरण पर्याप्त रूप से उपलब्ध हैं और इनमें रिजर्व रखें गए उपकरण भी शामिल हैं।

0000

Use of 1 lakh 35 thousand VVPAT for Assembly elections

Mumbai,1:For the assembly election, 1,79,895 ballet units & 1,26,50 Control units have been provided for 96, 661 polling booths in the state. 1, 35,255 VVPAT devices have been provided, including reserve devices.

The administrative system for assembly elections is under way. The ballot unit (BU) and the control unit (CU) play an important role in voting. VVPAT will be used for the first time in the state assembly elections this year. VVPAT was first used in this year’s for the Lok Sabha elections.

All these instruments have been completed at the first level inspection before the representatives of the political parties. EVMs and VVPAT devices are sufficiently available and reserve devices are also included, in the election process.

0000

महात्मा गांधी यांना स्वच्छतेतून आदरांजली वाहण्याचे राज्यपालांचे जनतेला आवाहन

मुंबई, दि. 1 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यातील जनतेला स्वच्छता, वृक्षारोपण तसेच परोपकारी कृतींमधून महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्याचे आवाहन केले आहे.

महात्मा गांधी यांची 150 वी जयंती त्यांच्या सत्य, अहिंसा व स्वावलंबन या शिकवणीचे स्मरण देते. गांधीजींनी जीवनात वैयक्तिक तसेच परिसर स्वच्छतेला अतिशय महत्त्व दिले. त्यामुळे स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण तसेच दिन-दुबळ्यांची सेवा आदी परोपकारी कृतींमधून महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्याचे आवाहन करीत आहे, असे राज्यपालांनी संदेशात म्हटले आहे. 0000

150th Birth Anniversary of Mahatma Gandhi

Governor Koshyari appeals to people to pay respects to Mahatma through cleanliness

Mumbai,Dated 1:The Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari has appealed to the people to pay respects to Mahatma Gandhi through cleanliness, tree plantation and simple acts of goodness to the poor.

In a tribute to the Father of the Nation, the Governor has said:

“The 150th Birth Anniversary of Mahatma Gandhi reminds us of ideals of Satya, Ahimsa and Self Reliance preached and practiced by him.

Gandhiji laid utmost thrust on cleanliness of the mind, body and surroundings. I appeal to the people to pay their respects to Mahatma Gandhi through cleanliness drives, tree plantation and simple acts of kindness to the poor and the needy.”

०००००

ताज्या बातम्या

जागतिक माध्यम संवाद २०२५ : सदस्य राष्ट्रांद्वारे वेव्हज जाहीरनाम्याचा स्वीकार

0
‘एआय’च्या युगात सर्जनशीलतेला प्रोत्साहन देताना परंपरा आणि वारशाला अभिव्यक्ती देण्यासाठी दर्शवली सहमती पक्षपात कमी करत, सामग्रीचे लोकशाहीकरण करून आणि नीतिमत्तेला प्राधान्य देताना उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या जबाबदार...

नवी मुंबईतील ‘एज्युकेशन सिटी’मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठांच्या माध्यमातून शिक्षण मिळेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. २ - विकसित भारताच्या उभारणीसाठी आखण्यात आलेल्या नवीन शैक्षणिक धोरणामुळे भारताचे दरवाजे जगासाठी खुले झाले आहेत. नवी मुंबईत आकाराला येत असलेल्या ‘एज्यूकेशन...

अखिल भारतीय सिनेमा दंतकथा नाही; चित्रपट उद्योगातील दिग्गजांचा भारतीय चित्रपटातील एकतेवर भर

0
कोविडनंतर चित्रपट पाहण्यातील बदलते कल अनुपम खेर यांनी केले अधोरेखित ज्यावेळी आपली परस्पर सामायिक संस्कृती, गाणी, कथा, माती याचा आदर करता, त्यावेळी तो...

‘वेव्हज्’ने मांडली जागतिक स्ट्रीमिंग आणि चित्रपट अर्थव्यवस्थेत भारताची विकसित होणारी भूमिका

0
“आशयाने खऱ्या अर्थाने सीमा ओलांडून प्रवास करावा यासाठी भारताने स्टुडिओ संबंधित पायाभूत सुविधा, निर्मिती केंद्रे आणि तंत्रज्ञान-चालित प्रणालीमध्ये गुंतवणूक केली पाहिजे” - शिबाशिष सरकार सर्जनशीलतेत...

जगाचे आशय निर्मिती केंद्र बनण्याकरिता भारतासाठी उत्तम काळ  – अभिनेत्री श्रद्धा कपूर

0
भारत आशय निर्मितीत अभूतपूर्व वाढ अनुभवत आहे -  इंस्टाग्राम प्रमुख अॅडम मोसेरी वेव्हज्‌ २०२५ मध्ये अनौपचारिक संभाषणात कल आणि व्हायरल होणे यावर विचारमंथन मुंबई,...