शनिवार, मे 3, 2025
Home Blog Page 1664

मुंबई विमानतळाला पर्यटन पुरस्कार; पर्यटनमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

नवी दिल्ली,दि.27 :पर्यटन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री(स्वतंत्र प्रभार)प्रल्हादसिंह पटेल यांच्या हस्ते देशातील सर्वोत्कृष्ट पर्यटकपूरक विमानतळाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.राज्यातील अन्य तीन  संस्थांनाही सन्मानित करण्यात आले.

केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या वतीने जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून येथील विज्ञान भवनात‘राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार2017-18’  प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.यावेळी देशाच्या पर्यटन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे राज्य,संस्था व व्यक्तींना विविध श्रेणीत सन्मानित करण्यात आले.केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचे सचिव योगेंद्र त्रिपाठी  आणि  जागतिक पर्यटन संस्थेचे महासचिव झुराब पोलोलीकाशवीली यावेळी  मंचावर उपस्थित होते.  

विमानतळांच्या श्रेणीत देशातील दोन विमानतळांना सन्मानित करण्यात आले.मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला उच्च दर्जाच्या पर्यटक सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वोत्कृष्ट विमानतळाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.विमानतळाच्या एरो कमर्शियल विभागाचे उप महाव्यवस्थापक आदित्य पंसारी आणि सहायक महाव्यवस्थापक तन्वीर मौलवी  यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 

एकाच धावपट्टीवर1004हवाई उड्डाणाचा आपलाच विक्रम मोडीत काढणारे हे जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळ ठरले आहे.पर्यटकांना उत्तम सुविधा पुरविणाऱ्या या विमानतळाने ताश्कंद,मँचेस्टर,फुकेट,ग्वाँगझोवू,माले आणि दारेसलाम आदी शहरांसाठी  नवीन उड्डाण सेवा सुरु केली आहे.

नाशिक व मुंबई येथील हॉटेल्सचाही सन्मान

नाशिक शहरातील‘एक्सप्रेस इन हॉटेल’हे देशातील सर्वोत्कृष्ट तीन तारांकित हॉटेल ठरले आहे.आधुनिकतेसह पारंपरिक वास्तुशैलीचा उत्तम नमुना असलेले हे हॉटेल पर्यटक व अतिथींना उत्तम सुविधा देणारे हॉटेल ठरले आहे.

मुंबई येथील‘द ललित हॉटेल’हे वैविध्यपूर्ण बैठक व्यवस्था पुरविणारे देशातील सर्वोत्तम हॉटेल ठरले आहे.छोटेखानी बैठकीपासून,लग्न समारंभ,व्यावसायिक संमलेन आयोजनासाठी या हॉटेलने पुरविलेल्या वैविध्यपूर्ण सेवांची या पुरस्कारासाठी दखल घेण्यात आली.

ग्रामीण भागात कृषी पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन देण्यात अग्रणी असलेल्या मुंबई येथील‘कल्चर आंगन’या संस्थेला सर्वोत्कृष्ट ग्रामीण पर्यटन प्रकल्पाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘कल्चर आंगन’ही संस्था स्थानिक लोकांच्या मदतीने ग्रामीण भागात कृषी पर्यटन क्षेत्र विकसित करीत असून महाराष्ट्रासह,राजस्थान आणि आंध्र प्रदेशातही प्रकल्प राबवित  आहे.  

*****

रितेश भुयार/वृत विशेष क्र.224 /दि.27.09.2019

अमेरिका, पोलंडच्या वाणिज्यदूतांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई, दि. 27- अमेरिकेचे मुंबईतील वाणिज्यदूत डेव्हिड रॅन्झ तसेच पोलंडचे मुंबईतील वाणिज्यदूत डेमियन ईरझॅक यांनी आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे स्वतंत्रपणे सदिच्छा भेट घेतली. 

अमेरिकेचे मुंबईतील वाणिज्यदूत या नात्याने भारत व अमेरिकेतील विविध क्षेत्रातील संबंध सुदृढ करताना व्यापार व गुंतवणूक वाढविण्याबद्दल आपण विशेष प्रयत्नशील असल्याचे डेव्हीड रॅन्झ यांनी राज्यपालांना सांगितले.

भारतातील दोन लाख विद्यार्थी अमेरिकेत शिक्षण घेत असून ही संख्या अधिक वाढावी यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी व अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यात अलिकडेच झालेल्या भेटीमुळे उभय देशांमधील संबंध अधिक मजबूत झाले असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

भारत-पोलंड थेट विमानसेवा सुरु होणार

पोलंडचे मुंबईतील वाणिज्यदूत डेमियन ईरझॅक यांनी देखील शुक्रवारी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. 

भारत आणि पोलंडदरम्यान थेट विमानसेवा सुरु झाल्यास उभय देशातील प्रवासाला लागणारा वेळ कमी होऊन व्यापार,उद्योग व पर्यटनाला मोठी चालना मिळेल. त्यामुळे भारतातून पोलंडला थेट विमानसेवा सुरु करण्याबद्दल प्रयत्न सुरु असल्याचे डेमियन ईरझॅक यांनी सांगितले.

दुसऱ्या महायुद्धानंतर पोलंडमधील अनेक निर्वासित मुले भारतात आली होती व कोल्हापूर येथे त्यांना राजाश्रय मिळाला होता,असे डेमियन ईरझॅक यांनी सांगितले. येथे राहून गेलेल्या लोकांपैकी काही लोक आज नव्वदीपार झाले आहेत. त्यांच्यासाठी कोल्हापूर स्वर्ग असल्याचे त्यांनी सांगितले.

भारतातून युरोपला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे,परंतु पोलंडला फार कमी पर्यटक येतात असे सांगून ही संख्या वाढविण्यासाठी आपण प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

०००००

Consul General of United States and Poland call on Governor Koshyari

The Consul General of the United States of America David Ranz and the Consul General of the Republic of Poland Damian Irzyk today called on Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan, Mumbai separately.

The US Consul General told the Governor that while strengthening multilateral cooperation with Maharashtra, he is laying focus on increasing trade and investment between India and the United States. He told the Governor that about200,000Indian students are pursuing higher education in the United States.

The Governor said that the recent meeting between President Trump and Prime Minister Narendra Modi had further strengthened the relations between the two countries.

India – Poland to have direct air connectivity;

The Consul General of Poland in Mumbai Damian Irzyk told the Governor that many Polish companies are working in Maharashtra. He said direct air connectivity between India and Poland will enhance business, trade and tourism between the two countries.

The Consul General told the Governor that a group of Polish refugees had lived in Kolhapur after the Second World War. He said that the surviving refugees have fond memories of Kolhapur.

पहिल्या दिवशी राज्यात १४ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल

मुंबई,दि. 27: विधानसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास आज सुरुवात झाली. आज पहिल्या दिवशी राज्यात 14 मतदारसंघात 14 उमेदवारांनी  15 नामनिर्देशन पत्रे दाखल केल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.

०००

सचिन गाढवे/वि.सं.अ./दि.27.9.2019

मंत्रालयात पर्यटन दिन साजरा

मुंबई, दि. 27 : पर्यटन आणि त्यातून रोजगार निर्मितीही यंदाच्या पर्यटन दिनाची संकल्पना आहे. राज्यात पर्यटनातून रोजगार निर्मितीला वाव असल्याचे मंत्रालयात आज झालेल्या जागतिक पर्यटन दिन कार्यक्रमात सांगण्यात आले.

यावेळी पर्यटन सहसंचालक धनंजय सावळकर, ‘एमटीडीसी’चे महाव्यवस्थापक रवींद्र राजपूत, पर्यटन विभागाचे अवर सचिव रमेश कदम, ठाण्यातील शासकीय तंत्रनिकेतनमधील पर्यटन पदविका शाखेचे प्राचार्य अरविंद महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.

पर्यटन व प्रवास व्यवस्थापनया विषयावर मार्गदर्शन करताना अरविंद महाजन म्हणाले की, युनायटेड नेशन वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायजेशनची स्थापना २७ सप्टेंबर १९७० रोजी झाली. त्यानंतर १९८० पासून २७सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. पर्यटन क्षेत्रात दर्जेदार शैक्षणिक अभ्यासक्रम तयार होत आहेत. पर्यटन क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत. पर्यटन हे असे क्षेत्र आहे जे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या रोजगाराची संधी उपलब्ध करते. क्रुझ टुरिझम, हेरीडेज टुरिझम, ॲग्रो टुरिझम यांना खूप मोठ्या प्रमाणात वाव आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

पर्यटन सहसंचालक धनंजय सावळकर म्हणाले की, महाराष्ट्राला ऐतिहासिक, सांस्कृतिक व भौगोलिक वारसा लाभलेला आहे. त्यामुळे पर्यटकांची राज्याला प्रथम पसंती असते. राज्यात पर्यटक सर्व प्रकारच्या पर्यटनाचा आनंद घेऊ शकतात. राज्यात जंगले, वन्यजीव, समुद्रकिनारे, गडकिल्ले, पुरातन गुफा, वास्तू, तिर्थक्षेत्रे, थंड हवेची ठिकाणे तर आहेतच, पण त्याचबरोबर बॉलिवूड टुरिझम, मुंबईसारख्या महानगरांमधील टुरिझम, क्रुझ टुरिझम, ॲग्रो टुरिझम, हेरीटेज टुरिझम, एक्सपीरीएन्शिअल टुरिझम अशा विविध पर्यटन क्षेत्रास वाव आहे, असे त्यांनी सांगितले.

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते ‘पुण्यभूषण’ पुरस्कार प्रदान

देशाचा सांस्कृतिक-ऐतिहासिक वारसा युवा पिढीपर्यंत पोहोचण्याची गरजउपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू

पुणे, दि. 26 : भारताला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक मोठा वारसा आहे. हा वारसा पुरातत्व शास्त्राच्या माध्यमातून वर्तमानाशी जोडला जातो. हा वारसा आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज असून भारताला समृद्ध करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आज केले.

        

येथील बालगंधर्व रंगमंदिराच्या सभागृहात‘पुण्यभूषण फाऊंडेशनआणि पुणेकरांच्या वतीने दिला जाणारा पुण्यभूषण पुरस्कारज्येष्ठ पुरातत्वतज्ज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांना उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते देण्यात आला. एक लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिक्षणतज्ज्ञ एस. बी. मुजुमदार, ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे, भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार चंदू बोर्डे, डॉ. के. एच. संचेती उपस्थित होते.

उपराष्ट्रपती श्री. नायडू म्हणाले, पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. पुणे हे देशातील सर्वात सुंदर शहर आहे. शैक्षणिक केंद्र असणाऱ्या या शहराला छत्रपती शिवाजी महाराजांसह फुले दाम्पत्य, लोकमान्य टिळक, गोपाळकृष्ण गोखले, महर्षी कर्वे यांच्यासह थोर समाजसुधारकांचा वारसा आहे. या शहरातील पुण्यभूषण पुरस्कार हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार असून या माध्यमातून समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांना प्रेरणा मिळेल.  

या वर्षीचा पुरस्कार पुरातत्वज्ज्ञ डॉ. देगलूरकर यांना दिल्याने या निमित्ताने पुरातत्व शास्त्राचा गौरव झाला आहे. पुरातत्व शास्त्र हे खरा इतिहास समोर आणण्यासाठी उपयुक्त ठरते. त्याचबरोबर आपला सांस्कृतिक इतिहास उजेडात आणण्याचे काम करते. देशातील ऐतिहासिक स्थळे आणि स्मृतिस्थळे आजच्या पिढीला प्रेरणा देण्याचे काम करत असतात, त्यामुळे हा समृद्ध वारसा जपण्याचे काम सर्व देशवासियांनी एकत्रितपणे करण्याची आवश्यकता आहे. आजच्या पिढीला इतिहासाशी जोडण्यासाठी, त्यांना देशाच्या संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांच्या ऐतिहासिक स्थळांना भेटींचे आयोजन शैक्षणिक संस्थांनी करून देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

भारताची65 टक्के लोकसंख्या 35 वर्षाखालील असल्याने हा युवा वर्ग आपल्या देशाचे शक्तिस्थान आहे. या युवकांना इतिहासातून प्रेरणा मिळून त्यांना योग्य दिशा दाखविण्यासाठी कौशल्याधारित शिक्षण देण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर आजच्या युवा पिढीने आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन श्री. नायडू यांनी यावेळी केले.

पुरस्काराला उत्तर देताना डॉ. देगलूरकर म्हणाले, हा पुरस्कार मिळाल्याचा विशेष आनंद आहे. हा पुरस्कार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वादच मी मानतो. हा पुरस्कार पुरातत्व शास्त्राचा सन्मान आहे. भारतीय संस्कृती सर्वात प्राचीन आणि समृद्ध आहे, ती सर्वात प्रवाही आहे. या संस्कृतीची नव्याने ओळख करून देण्याचे काम पुरातत्व शास्त्र करते.

यावेळी वीरमाता लता नायर, स्वातंत्र्यसैनिक मोहंमद चांद शेख, सीमेवर लढताना जखमी झालेले सैनिक नाईक फुलसिंग, हवालदार गोविंद बिरादार यांचा उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या जीवनावर आधारित चित्रफित दाखविण्यात आली.

प्रास्ताविक पुण्यभूषण फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी केले तर आभार डॉ. प्रभा अत्रे यांनी मानले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

दूरदर्शन, आकाशवाणीवर राजकीय पक्षांना प्रचारासाठी मिळणार १३ तास ५० मिनिटे!

मुंबई दि.26 : राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी 6 राष्ट्रीय आणि 3 राज्यस्तरीय पक्षांसाठी प्रादेशिक दूरदर्शन वाहिनी आणि आकाशवाणीवर प्रचारासाठी 13 तास 50 मिनिटांचा कालावधी (810 मिनिटे) उपलब्ध करुन दिला जाणार आहे. यामध्ये राष्ट्रीय पक्षाला 8 तास 22 मिनिटे आणि राज्यस्तरीय पक्षाला 5 तास 28 मिनिटांचा समावेश आहे. हा कालावधी संबंधित पक्षांना टप्प्याटप्प्याने दिला जाणार आहे.

राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पक्षांना दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या प्रादेशिक वाहिनीवर प्रचार करताना त्यांना दिलेला कालावधी लक्षात घ्यावा लागेल. नामनिर्देशनाचा शेवटचा दिवस ते मतदानाच्या दोन दिवस अगोदरपर्यंत पक्षांना दूरदर्शन आणि आकाशवाणीवरुन प्रचार करता येईल.

आयोगामार्फत6 राष्ट्रीय आणि 3 राज्यस्तरीय पक्षांसाठी दूरदर्शन आणि आकाशवाणीवर प्रचाराचे तास कसे असतील हे ठरवून देण्यात आले आहे. 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांना मिळालेल्या जागांनुसार आयोगाने दूरदर्शन आणि आकाशवाणीसाठी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पक्षांना वेळ आखून दिला आहे.

भारत निवडणूक आयोगाकडून मान्यताप्राप्त असलेले पक्ष जेव्हा आपल्या पक्षाचा प्रचार व प्रसार दूरदर्शन किंवा आकाशवाणीवरुन करतील तेव्हा त्यांनी त्या संबंधित माहितीची किंवा भाषणाची एक लिखित प्रत दूरदर्शन आणि आकाशवाणी यांच्याकडे देणे आवश्यक आहे. दूरदर्शन आणि आकाशवाणी यांच्यामार्फत ती माहिती पडताळून पाहिली जाईल. या माहितीमध्ये निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमांविरुद्ध लिखाण असल्यास त्यातील काही वाक्य, संदर्भ किंवा परिच्छेद वगळणे बंधनकारक असेल.

राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पक्षांनी दूरदर्शन आणि आकाशवाणीवरुन प्रचार करीत असताना प्रसारभारती महामंडळाला त्यांच्या प्रचारासाठी देण्यात आलेला वेळ, प्रचार साहित्य यांचे वेळापत्रक देणे आवश्यक असून त्याबाबत मान्यता घ्यावी लागेल. याशिवाय या पक्षांनी देश, जात-धर्म तसेच न्यायालय किंवा व्यक्तीविरोधात टीका करु नये असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

००००

Political parties will get 13 hours 50 minutes for campaign on television and radio

Mumbai 26.Sep.19: Provision of 13 hours 50 minutes (810 minutes) will be made available for 6 national and 3 state level parties for their campaign of assembly election, on regional television and radio. This includes 8 hours 22 minutes to the national party and 5 hours 28 minutes to the state level party. This period will be provided to these parties in step by step manner.

National and state-level parties have to take into account the time given to them while propagating on the regional channels of television and radio. From the last day of the nomination up to two days before the voting, the parties can do campaign on television and on air.

The Election Commission of India has decided how the broadcasting hours for television and air will be for these six national and three state level parties. According to the seats won by political parties in the 2014 assembly elections, the commission has given time to national and state level parties for their campaign on television and radio.

When the parties accredited by the Election Commission of India doing their campaign on television and on air, they must give a written copy of the relevant information or speech to Television and Radio. This information will be verified through television and radio. If this information is written against the rules laid down by the Election Commission of India, it is obligatory to exclude certain sentences, references or paragraphs.

While the national and state parties are propagating through television and radio, it is compulsory to submit their approved time table and material for their propaganda towards Prasar Bharti. Besides, it has been expressly directed that these parties should not criticize the country, caste or religion as well as court or individual.

0000

राजनीतिक दलों को दूरदर्शन, आकाशवाणी पर

प्रचार के लिए मिलेंगे 13 घंटे 50 मिनट

मुंबई दि. 26 : राज्य की विधानसभा चुनाव के लिए 6 राष्ट्रीय और 3 राज्यस्तरीय दलों के लिए प्रादेशिक दूरदर्शन चैनल और आकाशवाणी पर प्रचार के लिए 13 घंटे 50 मिनट का समय (810 मिनट) उपलब्ध कराए जाएँगा। इसमें राष्ट्रीय दल को 8 घंटे 22 मिनट और राज्यस्तरीय दल को 5 घंटे 28 मिनट मिलेंगे। यह समय संबंधित दलों को चरणबद्ध तरीके से दिया जाएगा।

राष्ट्रीय और राज्यस्तरीय दलों को दूरदर्शन और आकाशवाणी के प्रादेशिक चैनल पर प्रचार करते समय उन्हें दिया हुआ समय को ध्यान में रखना होगा। नामनिर्देशन के अंतिम दिन से मतदान के दो दिन पहले तक राजनीतिक दल दूरदर्शन और आकाशवाणी पर प्रचार कर सकेंगे।

आयोग के जरिए  6 राष्ट्रीय और 3 राज्यस्तरीय दलों के लिए दूरदर्शन और आकाशवाणी पर प्रचार का समय (तास) किस तरह से रहेगा, यह तय कर दिया है। वर्ष  2014 में हुए विधानसभा चुनाव में राजकीय दलों को मिले हुए सीटों के अनुसार आयोग ने दूरदर्शन और आकाशवाणी के लिए राष्ट्रीय और राज्यस्तरीय दलों के लिए समय तय कर दिया है।

भारत चुनाव आयोग की ओर से मान्यताप्राप्त दल जब अपने पार्टी का प्रचार एवं प्रसार दूरदर्शन तथा आकाशवाणी से करेंगे तब उन्हें वह विषय से संबंधित जानकारी तथा भाषण की एक लिखित प्रत दूरदर्शन और आकाशवाणी की ओर से देना जरूरी है। दूरदर्शन और आकाशवाणी के जरिए वह जानकारी जाँची जाएगी। इस जानकारी में चुनाव आयोग ने जो नियम दिए है, उसका उल्लंघन किया हो या फिर यह उसके खिलाफ होने पर उसमें से कुछ वाक्य, संदर्भ तथा परिच्छेद को हटाना अनिवार्य रहेगा।

राष्ट्रीय और राज्यस्तरीय दलों ने दूरदर्शन और आकाशवाणी से प्रचार करते समय प्रसारभारती महामंडल को उनके प्रचार के लिए दिया गया समय, प्रचार साहित्य का समयसारिणी देना आवश्यक है और इस संदर्भ में मंजूरी लेनी होगा। इसके अलावा इन दलों को देश, जाति-धर्म एवं न्यायालय तथा व्यक्ति के खिलाफ टिप्पणी (टीका) न करने के स्पष्ट निर्देश भी दिए गए है।

००००

‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या महाराष्ट्र सायबरचे पोलीस अधीक्षक बाळसिंग राजपूत यांची मुलाखत

मुंबई, दि. २६ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित दिलखुलासकार्यक्रमात महाराष्ट्र सायबरचे पोलीस अधीक्षक तथा विधानसभा निवडणुका-२०१९ सोशल मीडिया मॉनिटरिंगचे राज्य समन्वयक बाळसिंग राजपूत यांची सोशल मीडिया व निवडणुका या विषयावर  विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून शुक्रवार दि.२७ सप्टेंबर आणि सोमवार दि. ३० रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. निवेदक हेमंत बर्वे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

      

निवडणूक प्रक्रियेत केला जाणारा सोशल मीडियाचा वापर, धार्मिक, जातीय तेढ किंवा द्वेष निर्माण करणाऱ्या पोस्टला प्रतिबंध करण्यासाठी निवडणूक आयोगाने घेतलेली दक्षता, फेक जाहिराती, क्रियाशील सायबर संस्कृती म्हणजे काय, सोशल मीडियासंदर्भातील तक्रारीसंदर्भात कुठे संपर्क साधावा, या विषयांची माहिती श्री. राजपूत  यांनी दिलखुलासया कार्यक्रमातून दिली आहे.

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे मुंबईत आगमन

मुंबई, दि.26 : भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे दोन दिवसाच्या मुंबई भेटीसाठी आज येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई दलाच्या खास विमानाने आगमन झाले.

राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे आणि मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी त्यांचे स्वागत केले.

पुण्यात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसात १४ जणांचा मृत्यू; ९ बेपत्ता

प्रशासनातर्फे मदत व बचाव कार्य सुरू;आज रात्रीही पावसाचा इशारा

पुणे,दि.26:पुणे शहरासह जिल्ह्यातील5तालुक्यांना काल रात्री मुसळधार पावसाचा फटका बसला. शहरासह ग्रामीण परिसरातील सखल भागातील घरात पाणी शिरले. नदी-नाल्यांना पूर आले. या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील14जण दगावले असून9जण बेपत्ता आहेत. पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून बचाव व मदतीसाठी एनडीआरएफची5पथके कार्यरत आहेत. प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी मदत करण्यात येईल,अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज दिली.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले,यावर्षी22वर्षानंतर प्रथमच ऑगस्ट महिन्यात धरणे भरली. काल रात्रीचा पाऊस मात्र खूपच होता. यावर्षी जिल्ह्यात सरासरी180टक्के पाऊस झाला आहे. कालच्‍या पावसामुळे जिल्ह्यात14जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये पुणे शहरातील6,हवेली तालुक्यातील6,पुरंदर तालुक्यातील2जणांचा समावेश आहे.

या पावसाचा फटका जिल्ह्यातील15तालुक्यांपैकी5तालुक्यांना बसला आहे. पाच तालुक्यातील59गावे बाधित झाली आहेत. नाझरे धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे कऱ्हा नदीच्या पात्रात85हजार क्युसेक पाणी वाहत होते. या कऱ्हा नदीच्या पाण्यामुळे बारामती शहराला फटका बसला. दक्षतेचा उपाय म्हणून बारामती शहरात38निवारा शिबिरांची उभारणी करण्यात आली आहे. या शिबिरात2हजार500नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले. तर पुणे शहरातील3हजार नागरिकांना काही काळासाठी सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले. जिल्ह्यातील1हजार1कुटुंबांतील 3 हजार65लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यात दरड कोसळून5रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले होते. या ठिकाणी तातडीने यंत्रणा पाठवून या रस्त्यांवरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे. जिल्ह्यात एनडीआरएफची5पथके तैनात करण्यात आली असून275जवान मदत कार्य करत आहेत. त्यापैकी बारामती तालुक्यात एनडीआरएफची दोन पथके कार्यरत आहेत. या आपत्कालीन स्थितीची माहिती निवडणूक आयोगाला कळवून त्यांच्या सूचनांनुसार प्रशासनाच्या वतीने बाधित नागरिकांना मदत देण्यात येणार आहे. आचारसंहितेचा कोणताही अडसर मदत व बचाव कार्यात येणार नसल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या पर्यटन दिनानिमित्त विशेष कार्यक्रम

मुंबई, दि. २६ : जागतिक पर्यटन दिन २७ सप्टेंबर रोजी साजरा केला जात आहे. त्यानिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित’जय महाराष्ट्रकार्यक्रमात विशेष कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात  येणार आहे. या कार्यक्रमात पर्यटन विभागाच्या सचिव विनिता वेद-सिंगल, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे, पर्यटन संचालक दिलीप गावडे, सहसंचालक धनंजय सावळकर आणि पर्यटन व्यावसायिक अवधूत मोरे  यांचा सहभाग आहे. हा माहितीपर कार्यक्रम दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर शुक्रवार दिनांक २७ सप्टेंबर २०१९रोजी  रात्री9 वाजता प्रसारित होईल. या कार्यक्रमाचे निवेदन  रेश्मा बोडके  यांनी केले आहे.

या कार्यक्रमात महाराष्ट्रातील पर्यटनाची बलस्थाने, आधुनिक काळातील पर्यटनाचे बदलते  स्वरूप, महाराष्ट्राला लाभलेली पर्यटन स्थळे, पर्यटनामुळे निर्माण होणारा रोजगार, महाराष्ट्र पर्यटन विकास  महामंडळाने विकसित केलेली पर्यटनस्थळे, तीर्थक्षेत्र, सागरी, वन्यजीव, कृषी, पावसाळी पर्यटन यासह पर्यटनामुळे राज्याच्या आर्थिक विकासाला मिळत असलेली चालना आदी विषयांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.        

ताज्या बातम्या

‘जगभरातील रसिकांच्या हृदयाला स्पर्श करणाऱ्या कथा’ यावर विशेष चर्चासत्र

0
वेव्हज - 2025 मध्ये कथाकथनाच्या भविष्याबाबत जागतिक संवादाला चालना प्रसारण, चित्रपट आणि साहित्य यांचा मिलाफ मुंबई, दि. ०३ : पहिल्यांदाच आयोजित करण्‍यात आलेल्या वेव्हज्‌...

भारतासाठी परंपरा आणि तंत्रज्ञानाचा मिलाफ असलेल्या नव्या कथांची निर्मिती करण्याची हीच वेळ – किरण...

0
किरण मझुमदार शॉ यांनी वेव्हज‌्मध्ये मांडला भारताच्या सृजनशील भवितव्याचा आलेख स्टार्ट अप्सनी चित्रपटांच्या पलीकडचा विचार करण्याचे आवाहन मुंबई, दि. ०३ : सृजनशील आशय निर्मिती...

‘एआय’च्या वापरामुळे नवउद्योगाला उज्ज्वल भविष्य

0
मुंबई, दि. ०३ : भारतात स्टार्टअप्सची संख्या झपाट्याने वाढत आहे. प्रामुख्याने आयटी, फिनटेक, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात नव्या संधी निर्माण होत आहेत. राज्य शासनाकडून...

डिजिटल माध्यमांसाठी नाविन्यता आणि सातत्य आवश्यक – डॉली सिंग

0
मुंबई, दि. ०३ : स्पर्धात्मक डिजिटल युगात स्वतःचे वेगळेपण जपण्यासाठी चांगली संहिता, विषयांची प्रभावी मांडणी, व्हिज्युअलचा योग्य वापर याबरोबरच नाविन्यता आणि सातत्य असणे आवश्यक...

डिजिटल पत्रकारिता : वर्गणी, गुणवत्ता आणि विशिष्ट वाचकवर्गावर केंद्रीत

0
मुंबई, दि. ०३ : डिजिटल पत्रकारितेचा भविष्यातील मार्ग हा वर्गणी, गुणवत्ता आणि विशिष्ट वाचकवर्गावर केंद्रित असणार आहे. जाहिरातीतून टिकाव धरण्याचा पारंपरिक मार्ग आता पुरेसा...