बुधवार, मे 14, 2025
Home Blog Page 1680

अवैधरित्या मद्यपुरवठा करणाऱ्या मुंबईतील ६ परवानाधारकांचा परवाना रद्द

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त प्राजक्ता लवंगारे – वर्मा यांची माहिती

मुंबई, दि. ४ : विधानसभा निवडणुका निर्भीड व खुल्या वातावरणात पार पडण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत मुंबईमध्ये नियमभंग करणाऱ्या काही परवानाधारकांवर कडक कारवाई करण्यात आली. ६ परवानाधारकांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. यापुढेही अवैधरित्या मद्यपुरवठा करणाऱ्या अथवा नियमभंग करणाऱ्या अनुज्ञप्तींविरोधात अनुज्ञप्‍ती रद्द अथवा निलंबनाची कठोर कारवाई करण्याचा इशारा राज्य उत्पादन शुल्क आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी दिला आहे. सर्व राज्य उत्पादन शुल्क अधिकारी व कर्मचारी यांना याबाबत सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

निवडणूक आचारसंहिता नियमांचा तसेच मुंबई विदेशी मद्य नियमावली १९५३ अंतर्गत नियमांचा भंग करणाऱ्या व अवैधरित्या मद्यविक्री करणाऱ्या मुंबई उपनगर जिल्ह्यातील वैशाली वाईन्स, व्हरायटी वाईन्स या एफएल-II अनुज्ञप्तीविरुध्द कठोर पावले उचलून या अनुज्ञप्ती रद्द करण्यात आल्या आहेत. अवैधरित्या मद्यपुरवठा करणाऱ्या वैशाली वाईन्स या अनुज्ञप्तीसोबत अवैध मद्याचा पुरवठा होणाऱ्या हॉटेल किनारा या एफएल-III अनुज्ञप्तीचाही परवाना रद्द करण्यात आला आहे. तसेच मुंबई विदेशी मद्य नियमावली १९५३ अंतर्गत अटी व शर्थींचे पालन न करणाऱ्या शशी लंच होम, हॉटेल स्वस्तिक या एफएल-III अनुज्ञप्ती निवडणूक कालावधी संपेपर्यंत निलंबित करण्यात आल्या आहेत. २४ लाँज बार, प्लॅटिनम बार, शिवलीला बार, जरना हॉटेल एफएल – III अनुज्ञप्ती ह्या ०८ ते १५ दिवसांकरिता निलंबित करण्यात आल्या आहेत. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांच्या आदेशान्वये मुंबई उपनगर जिल्ह्याच्या अधीक्षक स्नेहलता श्रीकर, निरीक्षक मनोज चौधरी यांच्यामार्फत ही कार्यवाही करण्यात आली.

निवडणुकीदरम्यान जिल्ह्यात अनुचित प्रकार घडू नये यासाठी एफएल-II, एफएल-III व सीएल –III इ. मद्यविक्री करणाऱ्या अनुज्ञप्तींवर सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ऑनलाईन पद्धतीने मद्यविक्रीची माहिती भरणे, विहित वेळेत मद्य अनुज्ञप्ती उघडणे व बंद करण्याच्या वेळा कसोशीने पाळणे, मद्य विक्रीच्या नोंदवह्या व मद्यसाठा अद्ययावत ठेवणे याबाबत जिल्ह्यातील सर्व अनुज्ञप्तीधारकांस निर्देश देण्यात आलेले आहेत.

अवैध मद्यविक्रीविरोधी तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक

नागरिकांनी अवैध मद्यविक्री विरोधातील तक्रारीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा टोल फ्री क्र. 18008333333 व व्हॉटसॲप क्रमांक-8422001133 वर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क आयुक्त प्राजक्ता लवंगारे – वर्मा यांनी केले आहे. तसेच सर्व अनुज्ञप्तीधारकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत सुरु करण्यात आलेल्या SCM (E) BOOK या अप्लिकेशनचा वापर करुन दैनंदिन मद्यविक्रीची माहिती भरण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

००००

अवैध तरीके से शराब आपूर्ति करनेवाले

मुंबई के छह लाइसेंसधारकों का लाइसेंस रद्द

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त प्राजक्ता लवंगारे – वर्मा की जानकारी

मुंबई : विधानसभा चुनाव निर्भीड और खुले वतावरण में हो, इसके लिए राज्य उत्पादन शुल्क विभाग की ओर से मुंबई में कुछ लाइसेंसधारक शराब विक्रताओं के खिलाफ अवैध शराब आपूर्ति किए जाने से कड़ी कारवाई की गई है. छह लाइसेंसधारकों के लाइसेंस कार्रवाई कर रद्द किए गए हैं. आगे भी अवैध तरीके से शराब आपूर्ति करनेवाले या नियमों का भंग करनेवाले लाइसेंस धारक शराब दुकानदारों के खिलाफ लाइसेंस रद्द या निलंबन की कड़ी कार्रवाई करने का इशारा राज्य उत्पादन शुल्क आयुक्त प्राजक्ता लवंगारे – वर्मा ने दिया है. सभी राज्य राज्य उत्पादन शुल्क अधिकारी और कर्मियों को इसके संदर्भ में सतर्के रहने के निर्देश दिए गए हैं.

चुनाव आचारसंहिता नियम तथा मुंबई विदेशी शराब नियमावली1953 अंतर्गत नियमों का भंग करनेवाले और अवैध तरीके से शराब बिक्री करनेवाले मुंबई उपनगर जिलवली के वैशाली वाईन्स, वरायटी वाईन्स एफएल-II दुकानदारों के खिलाफ कड़ी कार्रवाई कर लाइसेंस रद्द किए गए है. अवैध तरीके से शराब आपूर्ति करनेवाले वैशाली वाईन्स इस दुकानदार के साथ अवैध शराब की आपूर्ति हो रहे होटल  किनारा एफएल-IIIका भी लाइसेंस रद्द किया है.  साथ ही मुंबई विदेशी शराब नियमावली 1953 अंतर्गत नियम और शर्तों का पालन न करनेवाले शशी लंच होम, होटल स्वस्तिक इन एफएल-III के लाइसेंस चुनाव कालावधि खत्म होने तक निलंबित की है. 24 लाँज बार, प्लॅटिनम बार, शिवलीला बार, जरना होटल एफएल – III के लाइसेंस 08 से 15 दिनों तक निलंबित किए गए है.  मुंबई उपनगर जिलाधिकारी मिलिंद बोरीकर के आदेश के बाद मुंबई उपनगर जिल्ह्याच्या अधीक्षक स्नेहलता श्रीकर, निरीक्षक मनोज चौधरी के मार्फ़त यह कार्रवाई की गई.

चुनाव के दौरान जिले में अनुचित प्रकार न हो इसके लिए एफएल-II, एफएल-III व सीएल –III आदि शराब बिक्री करनेवाले लाइसेन्सधारक दुकानदारों को सीसीटीव्ही कैमरा लगाने के निर्देश दिए गए है.  ऑनलाईन पध्दति से शराब बिक्री की जानकारी देना, निर्धारित से समय में दुकान खोलने और बंद करने के समय का पालन, शराब बिक्री का पंजीयन, और शराब का स्टॉक अपडेट रखना आदि के बारे में सभी लाइसेंस धारकों को निर्देश दिए गएBअद्यावत ठेवणे याबाबत जिल्ह्यातील सर्व अनुज्ञप्तीधारकांस निर्देश देण्यात आलेले आहेत.

अवैध शराब बिक्री के विरोध में शिकायत के लिए टोल फ्री नंबर

नागरिकों को अवैध शराब बिक्री के विरोध में शिकायत करने के लिए राज्य उत्पादन शुल्क विभाग के टोल फ्री नंबर18008333333 और वाट्सएप नंबर –8422001133 पर संपर्क करने का आवाहन राज्य उत्पादन शुल्क आयुक्त प्राजक्ता लवंगारे – वर्मा ने किया है. साथ ही सभी लाइसेंस धारकों को राज्य उत्पादन शुल्क विभाग के मार्फत शुरू किए गए SCM (E) BOOK इस एप्लिकेशन का उपयोग कर रोजाना की जानेवाली शराब बिक्री की जानकारी दी जाने की सूचना की गई है. 

००००

Distribution of liquor by illegal way resulted in to cancellation of license of six license holders in Mumbai

Information by State Excise Commissioner Prajakta Lavangare – Verma

Mumbai, 4.Oct.19:” In order to conduct the assembly elections in a fearless and open environment, strict action was taken against some rules violators by the State Excise Department. License of Six of license holders have been revoked, in Mumbai. Even further, license will be cancelled who involved in illegal provision of liquor and any other rules violation” warned State Excise Commissioner, Prajakta Lavangare-Verma.

She instructed to all State Excise Officers and employees to remain vigilant during election period.

The licenses of FL-II Vaishali wines and Variety wines from suburban area of Mumbai have been revoked under the violation of election code of conduct as well as Mumbai Foreign Alcohol Regulation 1953.  License of Hotel Kinara (FL-III) has been cancelled due to its involvement in illegal liquor distribution along with Vaishali Wines. Also, the Shashi Lunch Home, Hotel Swastika of FL-III, which does not comply with the terms and conditions of the Mumbai Foreign Alcohol Rules 1953, has been suspended till the end of the election period. License of 24 Lounge Bar, Platinum Bar, Shivila Bar, Jarna Hotel of FL-III have been suspended for eight to fifteen days. The proceedings were carried out under the orders of Mumbai Suburban District Collector Milind Borikar through the superintendent of the Mumbai suburban district, Snehalta Shrikar, Inspector Manoj Chaudhary.

Orders have been given to install CCTV camera at the liquor shops of license holders of    FL-II, FL-III and CL -III, in the district during the elections. All licensed holders in the district have been instructed to fill online liquor information, open the liquor license in a timely manner and to comply with the time of closure, keeping liquor sales registers and updating the liquor stock.

Toll free number for complaint against illegal selling of alcohol

The toll free number of the state excise department for citizens to raise the complaint against illegal selling of alcohol. State Excise Commissioner, Prajakta Lavangare-Verma, has appealed to citizen to contact on toll free no. 18008333333 and WhatsApp No. 8422001133 to launch the complaint in this concern. Also, all the license holders have been advised to fill up daily liquor selling information using SCM (E) BOOK application launched by the State Excise Department.

0000

आचारसंहिता कालावधीत ४३ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त – अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांची माहिती

मुंबई, दि. 4 : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत निवडणूक यंत्रणा, पोलीस, आयकर विभाग, उत्पादन शुल्क विभाग आदी विभागांनी केलेल्या कारवाईत आतापर्यंत रोख रक्कम, दारु, मादक पदार्थ, सोने-चांदी आदी स्वरुपात 43 कोटी 8 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी आज दिली.

        

श्री. शिंदे म्हणाले, भरारी पथके (एफएस), स्थ‍िर सर्व्हेक्षण पथके (एसएसटी), पोलीस, आयकर आणि सीमाशुल्क विभागाने केलेल्या कारवाईत आजपर्यंत 9 कोटी 53 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. भरारी पथके (एफएस), स्थ‍िर सर्व्हेक्षण पथके (एसएसटी), पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत 9 कोटी 71 लाख रुपये किमतीची 11 लाख 88 हजार 400 लिटर दारु जप्त करण्यात आली आहे.

        

निवडणूक यंत्रणा आणि अंमली पदार्थ विरोधी दलाने केलेल्या कारवाईत आतापर्यंत 15 कोटी 7 लाख रुपयांचे मादक पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय 8 कोटी 77 लाख रुपयांचे  सोने, चांदी, जवाहिर आदी जप्त करण्यात आले आहेत.

००००

सचिन गाढवे/वि.सं.अ./दि.4.10.2019

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी एकूण ५ हजार ५३४ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल

अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांची माहिती

मुंबई, दि. ०४ : विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यात विविध मतदारसंघांमध्ये ३ हजार ७५४ उमेदवारांनी ५ हजार १६३ नामनिर्देशनपत्रे दाखल केली. आजपर्यंत एकूण ५ हजार ५३४ उमेदवारांनी ७ हजार ५८४ नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी श्री. दिलीप शिंदे यांनी दिली. नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याची अंतिम मुदत आज संपली.

सर्वाधिक उमेदवार भोकरमध्ये तर सर्वात कमी उमेदवार माहिम आणि शिवडीमध्ये

अधिक माहिती देताना अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी श्री. शिंदे म्हणाले, आज नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदारसंघात सर्वाधिक १३५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यापाठोपाठ पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात ८५ उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे दाखल केली. सर्वात कमी नामनिर्देशनपत्रे मुंबईतील माहिम आणि शिवडी या मतदारसंघांमध्ये दाखल करण्यात आली. या मतदारसंघांमध्ये प्रत्येकी ४ उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे आजअखेर दाखल केली.   

नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या संपूर्ण कालावधीत आजअखेर नंदुरबार जिल्ह्यात ४ मतदारसंघात एकूण ४४ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केली. तर धुळे जिल्ह्यात ५ मतदारसंघात ७० उमेदवार, जळगाव जिल्ह्यात ११ मतदारसंघात १७५ उमेदवार, बुलढाणा जिल्ह्यात ७ मतदारसंघात ९५ उमेदवार, अकोला जिल्ह्यात ५ मतदारसंघात १०७ उमेदवार, वाशिम जिल्ह्यात ३ मतदारसंघात ६३ उमेदवार, अमरावती जिल्ह्यात ८ मतदारसंघात १७६ उमेदवार, वर्धा जिल्ह्यात ४ मतदारसंघात ६४ उमेदवार, नागपूर जिल्ह्यात १२ मतदारसंघात २५३ उमेदवार, भंडारा जिल्ह्यात ३ मतदारसंघात ७० उमेदवार, गोंदीया जिल्ह्यात ४ मतदारसंघात ७६ उमेदवार, गडचिरोली जिल्ह्यात ३ मतदारसंघात ४७ उमेदवार, चंद्रपूर जिल्ह्यात ६ मतदारसंघात ११० उमेदवार, यवतमाळ जिल्ह्यात ७ मतदारसंघात १३६ उमेदवार, नांदेड जिल्ह्यात ९ मतदारसंघात ४०२ उमेदवार, हिंगोली जिल्ह्यात ३ मतदारसंघात ५८ उमेदवार, परभणी जिल्ह्यात ४ मतदारसंघात ८८ उमेदवार, जालना जिल्ह्यात ५ मतदारसंघात १५० उमेदवार, औरंगाबाद जिल्ह्यात ९ मतदारसंघात २४७ उमेदवार, नाशिक जिल्ह्यात १५ मतदारसंघात २४३ उमेदवार, पालघर जिल्ह्यात ६ मतदारसंघात ८० उमेदवार, ठाणे जिल्ह्यात १८ मतदारसंघात ३०० उमेदवार, मुंबई उपनगर जिल्ह्यात २६ मतदारसंघात ३३५ उमेदवार, मुंबई शहर जिल्ह्यात १० मतदारसंघात १०६ उमेदवार, रायगड जिल्ह्यात ७ मतदारसंघात १३२ उमेदवार, पुणे जिल्ह्यात २१ मतदारसंघात ४४१ उमेदवार, अहमदनगर जिल्ह्यात १२ मतदारसंघात २०३ उमेदवार, बीड जिल्ह्यात ६ मतदारसंघात २३२ उमेदवार, लातूर जिल्ह्यात ६ मतदारसंघात १३५ उमेदवार, उस्मानाबाद जिल्ह्यात ४ मतदारसंघात ९२ उमेदवार, सोलापूर जिल्ह्यात ११ मतदारसंघात २७३ उमेदवार, सातारा जिल्ह्यात ८ मतदारसंघात १२५ उमेदवार, रत्नागिरी जिल्ह्यात ५ मतदारसंघात ४५ उमेदवार, सिंधुदूर्ग जिल्ह्यात ३ मतदारसंघात ३२ उमेदवार, कोल्हापूर जिल्ह्यात १० मतदारसंघात २०४ उमेदवार, सांगली जिल्ह्यात ८ मतदारसंघात १२५ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केली आहेत.

००००

इरशाद बागवान / वि.सं.अ. / दि.04.10.2019

स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन

मुंबई, दि. 3 : थोर स्वातंत्र्यसेनानी व मराठवाडा मुक्ती संग्रामाचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात त्यांच्या प्रतिमेस उपसचिव विलास आठवले यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे उपसचिव श्रीमती मेघना तळेकर, विधान परिषद  सभापतींचे  सचिव महेंद्र काज, अवर सचिव सोमनाथ सानप, अवर सचिव रवींद्र जगदाळे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या ‘सोशल मीडिया व निवडणूक’ या विषयावर पोलीस अधीक्षक डॉ.बाळसिंग राजपूत यांची मुलाखत

मुंबई,दि. ३  : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित’जय महाराष्ट्र’या कार्यक्रमात’सोशल मीडिया व निवडणूक’या विषयावर पोलीस अधीक्षक तथा  विधानसभा निवडणूक २०१९ सोशल मीडिया मॉनिटरींगचे  राज्य समन्वयक  डॉ.बाळसिंग राजपूत यांची मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून शुक्रवार दि.४ ऑक्टोबर, २०१९ रोजी रात्री ९ वाजता प्रसारित होणार आहे.      

     

सोशल मीडियाचा वापर करताना घ्यावयाची खबरदारी,विधानसभा निवडणूक २०१९ सोशल मीडिया मॉनिटरींगचे कामकाज,फेक जाहिराती कशा ओळखाव्यात,क्रियाशील सायबर संस्कृती म्हणजे काय,सोशल मीडियासंदर्भातील तक्रारीसाठी कुठे संपर्क साधावा, या विषयांची  सविस्तर माहिती डॉ. राजपूत  यांनी’जय महाराष्ट्र’  या कार्यक्रमातून दिली आहे. निवेदक हेमंत बर्वे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

पनवेलमध्ये सर्वात जास्त, तर वडाळ्यात सर्वात कमी मतदारांची नोंद

मुंबई दि. 3 : विधानसभा निवडणूक 2019 मध्ये राज्यात पनवेल मतदारसंघात मतदारांची संख्या सर्वाधिक म्हणजेच 5 लाख 54 हजार 827 आहे तर वडाळा मतदारसंघात सर्वांत कमी म्हणजेच 2 लाख 3 हजार 935 मतदारांची नोंदणी करण्यात आलेली आहे.

सर्वाधिक दुसऱ्या क्रमाकांची मतदारनोंदणी चिंचवड मतदारसंघात 5 लाख 17 हजार 004 मतदार आणि तिसऱ्या क्रमाकांची मतदारनोंदणी नालासोपारा मतदारसंघात 5 लाख 12 हजार 434 अशी झाली आहे. सर्वात कमी मतदार असलेल्या दुसऱ्या क्रमांकाची मतदार नोंदणी कुडाळ मतदारसंघात 2 लाख 15 हजार 657 अशी आहे. सर्वांत कमी तिसऱ्या क्रमाकांची मतदारनोंदणी सावंतवाडी मतदारसंघात 2 लाख 24 हजार 934 अशी  झाली आहे.

2009 मध्ये महाराष्ट्रातील एकूण मतदार 7 कोटी 59 लाख 72 हजार 310 होते. तर 2014 मध्ये एकूण मतदार 8 कोटी 35 लाख 15 हजार 425 असल्याची नोंद आहे. राज्यात 31 ऑगस्ट 2019 पर्यंत एकूण 8 कोटी 94 लाख 46 हजार 211 मतदारांची नोंदणी झाली आहे.

15 हून अधिक मतदारसंघात 2014 पेक्षा 2009 मध्ये अधिक मतदार

विधानसभा निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या मतदार नोंदणीमध्ये 15 हून अधिक मतदारसंघात 2014 पेक्षा 2009 मध्ये अधिक मतदार असल्याचे दिसून आले आहे. 2019 विधानसभा मतदार नोंदणीत सर्वाधिक कमी मतदारांची नोंद वडाळ्यात असल्याचे दिसून आले आहे.

नागपूर दक्षिण पश्चिम,नागपूर मध्य,डहाणू,मुलुंड,कलिना,वांद्रे (पश्चिम),धारावी,वडाळा,माहिम,वरळी,भायखळा,मुंबादेवी,कुलाबा शिवाजीनगर,पुणे कन्टोन्मेंट आणि सोलापूर शहर (मध्य) या मतदारसंघात 2014 पेक्षा 2009 मध्ये अधिक मतदार असल्याचे दिसून आले आहेत.

नागपूर दक्षिण -पश्चिममध्ये 2009 मध्ये 3 लाख 51 हजार 021 मतदार असल्याची नोंद आहे,तर 2014 मध्ये 3 लाख 41 हजार 300 मतदार असल्याची नोंद आहे.नागपूर मध्य मतदार संघामध्ये 2009 मध्ये 3 लाख 04 हजार 487 मतदार असल्याची नोंद आहे तर 2014 मध्ये 2 लाख 92 हजार 716 मतदार असल्याची नोंद आहे. डहाणूमध्ये 2009 मध्ये 2 लाख 36 हजार 251 मतदार असल्याची नोंद आहे तर 2014 मध्ये 2 लाख 34 हजार 175 मतदार असल्याची नोंद आहे. याप्रमाणेच इतर बारा मतदारसंघातही 2014 पेक्षा 2009 मध्ये अधिक मतदार असल्याचे दिसून आले आहे.

आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांचे आवाहन

विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमवेत बैठक संपन्न

मुंबई,दि. ३ : आदर्श आचारसंहितेचे पालन आणि निवडणूक खर्च संनियंत्रण या विषयांच्या अनुषंगाने विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमवेत आज मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने बैठक संपन्न झाली.

नामनिर्देशने दाखल करण्याची अंतिम मुदत उद्यापर्यंत (दि. ४ ऑक्टोबर) आहे. सोमवारी ७ ऑक्टोबर रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. त्यानंतर विविध पक्षांचे उमेदवार निश्चित होतील. निवडणुकीच्या संपूर्ण कालावधीत सर्व राजकीय पक्षांनी तसेच उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे,असे आवाहन अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी श्री. दिलीप शिंदे यांनी यावेळी केले.

मतदारयाद्या अंतिम झाल्या असून त्याची प्रत राजकीय पक्षांना उपलब्ध करुन देण्यात येईल,असेही यावेळी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले.

यावेळी निवडणूक प्रक्रियेसंदर्भात विविध विषयांच्या अनुषंगाने चर्चा झाली. राजकीय पक्षांच्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने राजकीय पक्षांसमवेत वेळोवेळी अशा बैठकांचे आयोजन केले जाते.

यावेळी सह मुख्य निवडणूक अधिकारी श्री. अनिल वळवी,श्री. शिरीष मोहोड,भारतीय जनता पक्षाचे उमेश गोसावी,योगेश देशपांडे,भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अशोक सूर्यवंशी,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे डॉ. गजानन देसाई,आशिष दुबे,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इरफान शेख आदी उपस्थित होते.

राष्ट्रपतींच्या हस्ते शारदा दाते यांना वयोश्रेष्ठ प्रतिष्ठित माता राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली,03 : कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील शारदा दाते यांना राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते आज‘वयोश्रेष्ठ प्रतिष्ठित माता राष्ट्रीय पुरस्कार’प्रदान करण्यात आला.

केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या वतीने 1 ऑक्टोबर या आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात‘वयोश्रेष्ठ  पुरस्कार-2019’प्रदान करण्यात आले. केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री थावरचंद गहलोत,राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर आणि विभागाच्या सचिव निलम साहनी,अतिरिक्त सचिव उपमा श्रीवास्तव  यावेळी मंचावर उपस्थित होत्या.

उल्लेखनीय योगदानासाठी 12 श्रेणींमध्ये देशातील व्यक्ती व संस्थांना यावेळी एकूण  15 पुरस्कार प्रदान करण्यात आले. स्वत:च्या असाध्य रोगावर मात करत आपल्या गतिमंद मुलाला इंटरनॅशनल सेलिब्रेटी बनविण्याची किमया करणाऱ्या इचलकरंजी येथील शारदा दाते यांना यावेळी‘वयोश्रेष्ठ प्रतिष्ठित माता पुरस्काराने गौरविण्यात आले. 2 लाख 50 हजार रुपये आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

शारदा दाते स्वत: कर्करोगाने ग्रस्त असून लग्नानंतर तब्बल 10 वर्षांनी त्यांच्या पोटी प्रथमेश हा गतिमंद मुलगा जन्माला आला. अशा कठीण समयी डगमगून न जाता  त्यांनी परिस्थितीचा  समर्थपणे सामना केला. आपल्या गतिमंद मुलाच्या प्रगतीसाठी त्यांनी कष्ट उपसले व मुलाला घडवत मातृत्वाचा आदर्श निर्माण केला. मुलावर उपचार सुरु असतानाच त्याचे शिक्षणही पूर्ण केले आणि त्याला स्वत:च्या पायावर उभे केले. प्रथमेश सारख्या गतिमंद मुलांच्या कल्याणासाठी कार्यरत संस्थांसोबत गेल्या 10 वर्षांपासून श्रीमती दाते जुळल्या असून आपले योगदान देत आहेत.

इचलकरंजी येथील डी.के.टी.ई. संस्थेच्या टेक्स्टाइल इंजिनिअरींग कॉलेजमध्ये गेल्या 11 वर्षांपासून प्रथमेश हा ग्रंथपाल सहायक म्हणून कार्यरत आहे. त्याच्या कर्तृत्वाचा सन्मान म्हणून प्रथमेशला राष्ट्रीय दिव्यांग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. प्रथमेशच्या आदर्शवत कार्याचे कौतुक म्हणून त्याला स्वानुभव कथनासाठी देश-विदेशातून आमंत्रणही येतात तो आता इंटरनॅशनल सेलिब्रेटी  झाला आहे.  

शारदा दाते यांनी समाजापुढे घालून दिलेल्या आदर्शामुळेच त्यांना या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले .

00000

रितेश भुयार /वृत विशेष क्र.227 / दि.03.10.2019                             

आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी शासकीय विभागांनी सक्रिय व्हावे – अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांचे आवाहन

मुंबई,दि.3 :शासकीय विभागांनी निवडणूक प्रक्रियेदरम्यान आदर्श आचारसंहितेच्या चौकटीत निर्णय घ्यावेत;तसेच आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करुन निवडणूक प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी सहयोग द्यावा,असे आवाहन अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी आज केले.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेसंदर्भात प्रशासकीय विभागांची कार्यशाळा मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव,वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे,सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे,सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव अंशु सिन्हा,संसदीय कार्य विभागाचे सचिव राजेंद्र भागवत आदी उपस्थित होते.

आदर्श आचारसंहिता अस्तित्वात असताना काय करावे आणि काय करु नये यासंदर्भात माहिती देण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी सुरू असलेले उपक्रम,योजना सुरू ठेवता येतील;तथापि,नव्याने सुरू करता येणार नाहीत. आपत्तीच्या प्रसंगी व पुनर्वसन कार्याबाबत प्रचलित नियमानुसार मदतकार्य  करता येईल,असे श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी पुण्याचे अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. त्यांनी सांगितले की,निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्याच्या27ऑक्टोबर या दिवसापर्यंत आदर्श आचारसंहिता लागू राहणार आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर शासकीय तसेच अधिनस्त कार्यालये,महामंडळांच्या संकेतस्थळावरील राजकीय व्यक्तींची छायाचित्रे त्यांचे संदेश तसेच प्रसिद्धीपत्रके काढून टाकण्यात आल्याबाबत खात्री करावी.

शासकीय इमारतींवर कोणत्याही प्रकारचे राजकीय प्रचारसाहित्य लावलेले नाही याची खात्री करुन घ्यावी. अद्यापही कार्यवाही झालेली नसल्यास ते काढून टाकण्यासह गुन्हा दाखल करावा. तसेच शासकीय मालमत्तेचे विद्रुपीकरण,ध्वनिक्षेपकांचा वापर,शासकीय वाहनांचा वापर,उमेदवारांच्या निवडणूक खर्चाचा हिशोब ठेवणे,सभांचे चित्रीकरण,निवडणूक आयोगाकडून विकसित केलेले‘सी-व्हिजिल’ॲपवर येणाऱ्या तक्रारींना प्रतिसाद देणे आदी बाबतच्या तरतुदींची माहिती यावेळी देण्यात आली.

बैठकीस सहमुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड यांच्यासह विविध मंत्रालयीन विभागांचे सहसचिव,उपसचिव उपस्थित होते.

०००

सचिन गाढवे/वि.सं.अ./दि.3.10.2019

Government departments should be active for the implementation of the model code of conduct in the state – Additional Chief Election Officer, Dilip Shinde

Mumbai, 3.Oct.19: “Government departments should make decisions during the election process within the framework of the model code of conduct. The code of conduct should be implemented in the state in order to make the election process successful” appealed the Additional Chief Election Officer Dilip Shinde.

He was speaking in the workshop of the administrative departments organized to inform about model code of conduct at the Ministry on behalf of the Chief Election Officer in accordance with the assembly elections. In this workshop information provided on does and don’ts when the model code of conduct exists in the state during the whole election process.

Additional Chief Secretary of Revenue Department Manukumar Srivastav, Principal Secretary of Forest Department Vikas Kharge, Principal Secretary of the department of Social Justice, Dinesh Waghmare, Secretary of General Administration Department Anshu Sinha, Secretary of Parliamentary Affairs Department, Rajendra Bhagwat and others concern officers were prominently present.

Mr. Shinde further stated that activities and projects that were ongoing before the start of the election process can be continued; however, new ones cannot be started. Assistance can be taken if there are any kind of disaster and rehabilitation works as per prevailing norms.

“Model code of conduct will remain in force until 27th October, when the entire election process is completed. Admistration should be ensure that photographs of political persons and their messages on the websites of corporations , government and subordinate offices are removed after the code of conduct is implemented in the state “ said Additional Collector of Pune, Sahebrao Gaikwad. He gave the information through a presentation.

Mr. Gaikwad further told that system make sure there should not be any kind of political propaganda is placed on government buildings. If there is still no action taken in this concern then remove such material immediately and take strict action against it.

In this workshop, information provided about the disinvestment of government property, use of sound cameras, use of government vehicles, keeping track of candidates’ election expenditure, filming of meetings, responding to complaints on the C-Vigil app developed by the Election Commission.

The meeting was attended by Deputy Chief Electoral Officer, Shirish Mohod, along with several secretaries and deputy secretaries of various departments of ministry.

00000

आदर्श आचारसंहिता के क्रियान्वयन के लिए सरकारी विभाग सक्रिय हो जाए -अतिरिक्त मुख्य चुनाव अधिकारी दिलीप शिंदे

मुंबई, दि. 3 : सरकारी विभागों ने चुनाव प्रक्रिया के दौरान आदर्श आचारसंहिता के नियमों में रहकर ही निर्णय लेना चाहिए, साथ ही आचारसंहिता का सूक्ष्म तरीके से क्रियान्वयन कर चुनाव प्रक्रिया सफल करने के लिए सहयोग देने का आवाहन अतिरिक्त मुख्य चुनाव अधिकारी दिलीप शिंदे ने आज किया। मंत्रालय में विधानसभा चुनाव के मद्देनजर आदर्श आचारसंहिता के संदर्भ में प्रशासकीय विभागों की कार्यशाला मुख्य चुनाव अधिकारी कार्यालय की ओर से आयोजित की गई थी। इस दौरान राजस्व विभाग के अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तववन विभाग के प्रधान सचिव विकास खारगे, सामाजिक न्याय विभाग के प्रधान सचिव दिनेश वाघमारेसामान्य प्रशासन विभाग की सचिव अंशु सिन्हासंसदीय कार्य विभाग के सचिव राजेंद्र भागवत आदि उपस्थित थे।

कार्यशाला में आदर्श आचारसंहिता अस्तित्व में रहते हुये क्या करना चाहिए और क्या नहीं, इस संदर्भ में जानकारी देने के लिए आयोजित की गई थी। श्री. शिंदे  ने इस दौरान बताया कि चुनाव प्रक्रिया शुरू होने से पहले जो उपक्रम, योजनाएं शुरू रख सकते है, लेकिन नए से शुरू नहीं कर सकेंगे।  आपदा के समय एवं पुनर्वसन कार्य को लेकर प्रचलित नियमों के अनुसार मददकार्य किया जा सकेगा। 

इस दौरान पुणे के अपर जिलाधिकारी साहेबराव गायकवाड ने प्रस्तुतिकरण के द्वारा उपस्थितों को जानकारी दी।  चुनाव की प्रक्रिया पूरी होने की यानि की 27 अक्तूबर इस दिन तक आदर्श आचारसंहिता लागू रहेगी। आचारसंहिता लागू होने के बाद शासकीय एवं अधिनस्त कार्यालय, महामंडल की वेबसाइट की राजनीतिक व्यक्ति के फोटो, उनके संदेश और  प्रसिद्धीपत्रक हटाने को लेकर खातरजमा करें।

शासकीय इमारतों पर किसी भी प्रकार का राजकीय प्रचारसाहित्य तो लगाया नहीं है, इस बात की भी खारतजमा करें। अभी तक कार्यवाही नहीं हुई हो, तब उसे निकालने समेत मामला दर्ज करे। साथ ही सरकारी मालमत्ता का विद्रुपीकरण, ध्वनीक्षेपका का उपयोग, सरकारी वाहनों का उपयोग, उम्मीदवारों का चुनाव खर्च का हिसाब रखना, सभा का चित्रीकरण, चुनाव आयोग की ओर से विकसित किए गए सी-विजिलॲप पर प्राप्त शिकायतों को  प्रतिसाद देना आदि को लेकर प्रावधान की जानकारी भी इस दौरान दी गई।

बैठक में सहमुख्य चुनाव अधिकारी शिरीष मोहोड समेत विविध मंत्रालयीन विभागों के सहसचिव, उपसचिव उपस्थित थे।

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आज १ हजार ४२३ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल

अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी श्री. दिलीप शिंदे यांची  माहिती

मुंबई, दि. ०३ : विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यात विविध मतदारसंघांमध्ये १ हजार ४२३ उमेदवारांनी १ हजार ९६९ नामनिर्देशनपत्रे दाखल केली. आजपर्यंत एकूण १ हजार ७९२ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी श्री. दिलीप शिंदे यांनी दिली. नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याची अंतिम मुदत उद्या ४ ऑक्टोबर २०१९ पर्यंत आहे

नंदुरबार जिल्ह्यात आज ४ मतदारसंघात १५ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केली. धुळे जिल्ह्यात ५ मतदारसंघात १६ उमेदवार, जळगाव जिल्ह्यात ११ मतदारसंघात ५२ उमेदवार, बुलढाणा जिल्ह्यात ७ मतदारसंघात २६ उमेदवार, अकोला जिल्ह्यात ५ मतदारसंघात ३४ उमेदवार, वाशिम जिल्ह्यात ३ मतदारसंघात १५ उमेदवार, अमरावती जिल्ह्यात ८ मतदारसंघात ३९ उमेदवार, वर्धा जिल्ह्यात ४ मतदारसंघात २० उमेदवार, नागपूर जिल्ह्यात १२ मतदारसंघात ४० उमेदवार, भंडारा जिल्ह्यात ३ मतदारसंघात २० उमेदवार, गोंदिया जिल्ह्यात ४ मतदारसंघात २२ उमेदवार, गडचिरोली जिल्ह्यात ३ मतदारसंघात १० उमेदवार, चंद्रपूर जिल्ह्यात ४ मतदारसंघात २१ उमेदवार, यवतमाळ जिल्ह्यात ७ मतदारसंघात ३७ उमेदवार, नांदेड जिल्ह्यात ९ मतदारसंघात ९० उमेदवार, हिंगोली जिल्ह्यात ३ मतदारसंघात १७ उमेदवार, परभणी जिल्ह्यात ४ मतदारसंघात २६ उमेदवार, जालना जिल्ह्यात ४ मतदारसंघात ४६ उमेदवार, औरंगाबाद जिल्ह्यात ९ मतदारसंघात ५९ उमेदवार, नाशिक जिल्ह्यात १५ मतदारसंघात ६० उमेदवार, पालघर जिल्ह्यात ६ मतदारसंघात २६ उमेदवार, ठाणे जिल्ह्यात १८ मतदारसंघात ६४ उमेदवार, मुंबई उपनगर जिल्ह्यात २६ मतदारसंघात ९८ उमेदवार, मुंबई शहर जिल्ह्यात १० मतदारसंघात ३० उमेदवार, रायगड जिल्ह्यात ७ मतदारसंघात ४० उमेदवार, पुणे जिल्ह्यात २१ मतदारसंघात १०१ उमेदवार, अहमदनगर जिल्ह्यात १२ मतदारसंघात ५० उमेदवार, बीड जिल्ह्यात ६ मतदारसंघात ६४ उमेदवार, लातूर जिल्ह्यात ६ मतदारसंघात ३३ उमेदवार, उस्मानाबाद जिल्ह्यात ४ मतदारसंघात २२ उमेदवार, सोलापूर जिल्ह्यात ११ मतदारसंघात ८० उमेदवार, सातारा जिल्ह्यात ८ मतदारसंघात ३१ उमेदवार, रत्नागिरी जिल्ह्यात ५ मतदारसंघात १३ उमेदवार, सिंधुदूर्ग जिल्ह्यात ३ मतदारसंघात ५ उमेदवार, कोल्हापूर जिल्ह्यात १० मतदारसंघात ६५ उमेदवार, सांगली जिल्ह्यात ८ मतदारसंघात ३७ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केली.

ताज्या बातम्या

महाराष्ट्र रेल्वे फाटक मुक्त करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
महारेलद्वारे मुंबईतील पहिला केबल स्टेड रोड ओवर ब्रिज मुंबई, दि. १३ : संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात रेल्वे ब्रिजचे काम महारेलनी हाती घेतले आहे. आतापर्यंत...

महाराष्ट्राला नागरी क्षेत्रातील प्रकल्पांसाठी आवश्यक सहकार्य करणार – केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर

0
मुबंई, दि. १३: महाराष्ट्रात मेट्रोचे जाळे अधिक विस्तारीत करण्यासाठी तसेच नागरी क्षेत्रातील विविध प्रकल्पांच्या व्यापक अंमलबजावणीसाठी आवश्यक सर्व सहाकार्य केंद्रीय नगरविकास मंत्रालयाकडून  करण्यात येईल,असे...

चिंचघाट उपसा सिंचन योजनेला गती द्या – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई, दि. १३: चिंचघाट उपसा सिंचन योजना नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात प्रस्तावित महत्त्वपूर्ण सिंचन प्रकल्प आहे. या योजनेचा उद्देश कृषी क्षेत्रात सिंचन सुविधा वाढवून शेतकऱ्यांना...

युवकांनी  ‘MY भारत’ पोर्टलवर सिव्हिल डिफेन्स वॉरिअर म्हणून नोंदणी करावी – मंत्री चंद्रकांत पाटील

0
मुंबई, दि. १३ : आपत्ती व्यवस्थापन, वैद्यकीय सेवा, पोलीस दल, अग्निशमन दल यासारख्या आपत्कालीन यंत्रणांमध्ये युवकांचा सक्रिय सहभाग असणे महत्त्वाचे आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यास...

महाराष्ट्र सागरी मंडळाने महसूल वाढीसाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखावा – मंत्री नितेश राणे

0
मुंबई, दि. १३: महाराष्ट्र सागरी मंडळाने प्राप्त होणारा निधी शंभर टक्के खर्च करावा. तसेच मंडळाच्या महसूल वाढीसाठी नियोजनबद्ध कार्यक्रम राबवावा अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे...